शहरं
Join us  
Trending Stories
1
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
2
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
3
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
4
शेअर बाजारात टाटा-अंबानींना मोठा धक्का! टॉप १० पैकी ६ कंपन्यांचे २.२२ लाख कोटींचे नुकनान; मग कमावले कोणी?
5
Video: हिमाचल प्रदेशातील पर्यटनस्थळी भारतीयांनी केला कचरा; परदेशी नागरिकाने केली सफाई
6
"उद्धव ठाकरेंच्या वाढदिवशी असं गिफ्ट..."; पुणे रेव्ह पार्टीवरून भाजपाचा 'मविआ'ला खोचक टोला
7
IND vs ENG: इंग्लंडच्या गोलंदाजावर 'बॉल टॅम्परिंग'चा आरोप, 'त्या' कृतीमुळे चर्चा, VIDEO व्हायरल
8
कोट्यवधींचा व्यवसाय सोडून जपानी अब्जाधीश बनला शिवभक्त! एका रात्री स्वप्नात... आणि संपूर्ण आयुष्य बदललं
9
Mansa Devi Stampede: गुदमरून टाकणारी गर्दी, एक अफवा अन्...; चेंगराचेंगरीपूर्वीचा व्हिडीओ आला समोर 
10
अनुष्का शर्माचा 'चकदा एक्सप्रेस' झाला डबाबंद? सिनेमातील अभिनेत्यानेच दिली प्रतिक्रिया, म्हणाला...
11
Roshni Walia : "कधीकधी काही लोक...", वडिलांनी सोडली आईची साथ, नातेवाईकांनी दिला शाप, अभिनेत्री भावुक
12
मोहम्मद मुइझ्झूंचा चीनला धक्का; भारतासोबत मुक्त व्यापार करार करण्याची व्यक्त केली इच्छा...
13
श्रावण विनायक चतुर्थी: दूर्वागणपती व्रत का करतात? वाचा, बाप्पाला प्रिय अमृतासमान दुर्वा कथा
14
यापेक्षा चांगली संधी मिळणार नाही; ही कंपनी आपल्या कारवर देतेय १ लाख रुपयांची सूट
15
कुठे गेला 'श्वास'मधला चिमुकला 'परश्या'? २९ वर्षीय तरुणाने आता धरली वेगळीच वाट
16
IND vs ENG: गिल-राहुलची फलंदाजी अन् स्टोक्सची तंदुरूस्ती... 'या' ५ गोष्टी ठरवतील चौथ्या कसोटीचा निकाल
17
चातुर्मासातील पहिली श्रावण विनायक चतुर्थी: गणपती होईल प्रसन्न, कसे कराल व्रतपूजन? शुभच घडेल
18
पहिला श्रावणी सोमवार: ‘असे’ करा शिवपूजन, कोणती शिवामूठ वाहावी? पाहा, महत्त्व अन् मान्यता
19
Corona Virus : संकटं संपता संपेना! कोरोना महामारीचा मेंदूवर भयंकर परिणाम, संसर्ग झाला नसला तरी...
20
प्राडाच्या वादानंतर कोल्हापुरी चप्पलांना QR कोड! संघटनेने का घेतला असा निर्णय? जाणून घ्या कोल्हापुरीचा इतिहास!

अमेठीतून गेले आता रायबरेलीतूनही जाणार खटा-खट-खटा-खट, पंतप्रधान मोदींचा राहुल गांधींवर हल्लाबोल

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 16, 2024 20:44 IST

मोदी म्हणाले, आता कुणी यांना सांगा, आता रायबरेलीची जनताही यांना खटा खट खटा खट खटा खट घरी पाठवणार आहे. अमेठीतून गेले, आता रायबरेलीतूनही जाणार.

काँग्रेस नेते तथा खासदार राहुल गांधी आपल्या सभांमधून, निवडणुकीनंतर सरकार स्थापन झाल्यास बँक खात्यात खटा खट खटा खट पैसे पाठवण्यात येतील, असे आश्वासन देत आहेत. त्यांच्या या आश्वासनांवरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी जोरदार हल्ला चढवला. मोदी म्हणाले, आता कुणी यांना सांगा, आता रायबरेलीची जनताही यांना खटा खट खटा खट खटा खट घरी पाठवणार आहे. अमेठीतून गेले, आता रायबरेलीतूनही जाणार. पंतप्रधान मोदींनी प्रतापगडमध्ये भाजपाचे उमेदवार संगम लाल गुप्ता यांच्या प्रचारार्थ आयोजित प्रचारसभेत बोलत होते.  

राहुल गांधींवर निशाणा साधताना पीएम मोदी म्हणाले, देश चालवणे हा सोन्याचा चमचा घेऊन जन्मलेल्या मुलांचा खेळ नाही. तुम्हाला जमणार नाही. 4 जूननंतर मोदी सरकार नक्कीच स्थापन होईल आणि आणखी बऱ्याच गोष्टी होणार आहेत.

राहुल गांधींच्या खटा खट खटा खट विधानावर मोदींनी जोरदार निशाणा साधला. ते म्हणाले, चार जूननंतर इंडी आघाडी तुटून जाईल खटा खट खटा खट. पराजयानंतर, बळीचा बकरा शोधला जाईल खटा खट खटा खट. लखनऊचा शहजादा (अखिलेश यादव) आणि दिल्लीचा शहजादा (राहुल गांधी) गर्मीच्या सुट्ट्यांवर देशातून बाहेर जातील खटा खट खटा खट. ये दोघे खटा खट खटा खट पळून जाणार. तेव्हा आपणच राहू.

मोदी म्हणाले, काँग्रेस आणि इंडी आघाडी दहा वर्षांपासून सत्तेबाहेर आहे. त्यांची काळी कमाई संपली आहे. त्यामुळे त्यांची नजर देशाच्या तिजोरीवर आहे. आरक्षण संपवून संविधान बदलण्यासंदर्भातील आरोपांवरून पीएम मोदींनी जोरदार हल्ला चढवला. ते म्हणाले, कर्नाटक-तेलंगणात काँग्रेसने अल्पसंख्याकांना ओबीसी आरक्षण दिले. त्यांना संविधान बदलून संपूर्ण देशात हेच करायचे आहे. यावर सपाचे लोक शांत आहेत. त्यांचे तुष्टीकरण एढ्यावरच थांबलेले नाही. हे लोक मोदींच्या विरोधात व्होट जिहाद करत आहेत. त्यांच्याच लोकांनी म्हटले आहे की, त्यांचे सरकार आल्यास, ते पुन्हा रामललांना तंबूत पाठवणार आणि मंदिराला टाळे ठोकणार. 

 

टॅग्स :lok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४Narendra Modiनरेंद्र मोदीRahul Gandhiराहुल गांधी