शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
6
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
7
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
8
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
9
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
10
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
11
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
12
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
13
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
14
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
15
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
16
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
17
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
18
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
19
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

९ तास आईचा मृतदेह चितेवर ठेवला अन् स्मशानभूमीतच हायव्हॉल्टेज ड्रामा, काय घडलं?

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 15, 2024 15:37 IST

ज्यानंतर स्मशान भूमीत असलेल्या लोकांनी पोलिसांना माहिती दिली. त्यानंतर घटनास्थळी पोलीस दाखल झाले त्यांनी तिन्ही बहिणींना समजवण्याचा प्रयत्न केला परंतु ते अयशस्वी ठरले.

मथुरा - उत्तर प्रदेशात आईच्या मृत्यूनंतर मुलींमध्ये जमीन वाटपावरून वाद झाला. स्मशानभूमीत आईचा मृतदेह ठेवला आणि मुलींमध्ये भांडण झाले. जोपर्यंत हा वाद मिटत नाही तोवर मृतदेहाला मुखाग्नी दिला नाही. या वादात जवळपास ८ ते ९ तास वाया गेले. त्यानंतर तिथे अंत्यसंस्काराला आलेल्या लोकांनी मुलींना खडे बोल सुनावले. माणुसकीला लाजवणारी ही धक्कादायक घटना मथुराच्या स्मशानभूमीत घडली आहे. जिथे ८५ वर्षीय महिला पुष्पा यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या ३ मुलींमध्ये जमिनीवरून वाद झाला आणि कित्येक तास आईचा मृतदेह अंत्यसंस्कारापासून ताटकळत राहिला. 

स्मशानभूमीत अक्षरश: हायव्हॉल्टेज ड्रामा सुरू होता. त्यात अंत्यसंस्कारासाठी आलेले पंडित विधी उरकून घरी गेले. खूप वेळ मुलींमधला वाद मिटण्याचे चिन्ह नव्हते. त्यामुळे अंत्यसंस्काराला आलेले लोक आणि नातेवाईक त्रस्त झाले. त्यानंतर कायदेशीररित्या स्टॅम्प पेपरवर जमिनीचे वाटप केले गेले त्यानंतर हा वाद शमला आणि आईच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यात आले. वृद्ध महिला पुष्पाला मुलगा नाही. त्यांना ३ मुली होत्या. ज्यांचे नाव मिथिलेश, सुनीता आणि शशी. मागील काही दिवसांपासून मिथिलेश पुष्पासोबत राहत होती. मिथिलेशने बहाण्याने आईकडून दीड एकर जमीन विकून टाकली असा आरोप आहे. 

यातच वृद्ध पुष्पा यांचा मृ्त्यू झाला. अशावेळी मिथिलेशसह नातेवाईक पुष्पा यांच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यासाठी स्मशानभूमीला पोहचले. आईच्या मृत्यूची बातमी मिळताच सुनीता आणि शशीही तिथे आल्या. या दोन बहिणींनी मोठ्या बहिणीवर आरोप करत आईचे अंत्यसंस्कार रोखले. त्यानंतर या तिन्ही बहिणींमध्ये आईच्या संपत्तीवरून वाद झाला. मालमत्तेचे समान वाटप करण्यावरून बहिणी एकमेकांना भिडल्या. या तिन्ही बहिणी एकमेकींवर आरोप प्रत्यारोप करत होत्या. 

सुनीता आणि शशी आईची शिल्लक असलेली मालमत्ता आमच्या नावावर करा त्यानंतरच आम्ही अंत्यसंस्कारासाठी तयार होऊ असा हट्ट धरला. परंतु मिथिलेश त्यासाठी तयार नव्हती. या तिन्ही बहिणींमध्ये भांडण सुरू होते आणि त्याला बराच वेळ झाला. ज्यानंतर स्मशान भूमीत असलेल्या लोकांनी पोलिसांना माहिती दिली. त्यानंतर घटनास्थळी पोलीस दाखल झाले त्यांनी तिन्ही बहिणींना समजवण्याचा प्रयत्न केला परंतु ते अयशस्वी ठरले. अखेर संध्याकाळी ६ वाजता तिन्ही बहिणींमध्ये लिखित करार झाला. ज्यात मृत आईची संपत्ती शशी आणि सुनीता यांच्यावर नावावर केली जाईल असं मान्य झाले. त्यानंतरच आईच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यात आले. हा वाद निकालात निघायला तब्बल ८-९ तास गेले त्यामुळे अंत्यसंस्कारासाठी आलेल्या लोकांना नाहक त्रास सहन करावा लागला.