शहरं
Join us  
Trending Stories
1
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: SC
2
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
3
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
4
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
5
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
6
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
7
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
8
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
9
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
10
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
11
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
12
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
13
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
14
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
15
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
16
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
17
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
18
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
19
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
20
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?

९ तास आईचा मृतदेह चितेवर ठेवला अन् स्मशानभूमीतच हायव्हॉल्टेज ड्रामा, काय घडलं?

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 15, 2024 15:37 IST

ज्यानंतर स्मशान भूमीत असलेल्या लोकांनी पोलिसांना माहिती दिली. त्यानंतर घटनास्थळी पोलीस दाखल झाले त्यांनी तिन्ही बहिणींना समजवण्याचा प्रयत्न केला परंतु ते अयशस्वी ठरले.

मथुरा - उत्तर प्रदेशात आईच्या मृत्यूनंतर मुलींमध्ये जमीन वाटपावरून वाद झाला. स्मशानभूमीत आईचा मृतदेह ठेवला आणि मुलींमध्ये भांडण झाले. जोपर्यंत हा वाद मिटत नाही तोवर मृतदेहाला मुखाग्नी दिला नाही. या वादात जवळपास ८ ते ९ तास वाया गेले. त्यानंतर तिथे अंत्यसंस्काराला आलेल्या लोकांनी मुलींना खडे बोल सुनावले. माणुसकीला लाजवणारी ही धक्कादायक घटना मथुराच्या स्मशानभूमीत घडली आहे. जिथे ८५ वर्षीय महिला पुष्पा यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या ३ मुलींमध्ये जमिनीवरून वाद झाला आणि कित्येक तास आईचा मृतदेह अंत्यसंस्कारापासून ताटकळत राहिला. 

स्मशानभूमीत अक्षरश: हायव्हॉल्टेज ड्रामा सुरू होता. त्यात अंत्यसंस्कारासाठी आलेले पंडित विधी उरकून घरी गेले. खूप वेळ मुलींमधला वाद मिटण्याचे चिन्ह नव्हते. त्यामुळे अंत्यसंस्काराला आलेले लोक आणि नातेवाईक त्रस्त झाले. त्यानंतर कायदेशीररित्या स्टॅम्प पेपरवर जमिनीचे वाटप केले गेले त्यानंतर हा वाद शमला आणि आईच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यात आले. वृद्ध महिला पुष्पाला मुलगा नाही. त्यांना ३ मुली होत्या. ज्यांचे नाव मिथिलेश, सुनीता आणि शशी. मागील काही दिवसांपासून मिथिलेश पुष्पासोबत राहत होती. मिथिलेशने बहाण्याने आईकडून दीड एकर जमीन विकून टाकली असा आरोप आहे. 

यातच वृद्ध पुष्पा यांचा मृ्त्यू झाला. अशावेळी मिथिलेशसह नातेवाईक पुष्पा यांच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यासाठी स्मशानभूमीला पोहचले. आईच्या मृत्यूची बातमी मिळताच सुनीता आणि शशीही तिथे आल्या. या दोन बहिणींनी मोठ्या बहिणीवर आरोप करत आईचे अंत्यसंस्कार रोखले. त्यानंतर या तिन्ही बहिणींमध्ये आईच्या संपत्तीवरून वाद झाला. मालमत्तेचे समान वाटप करण्यावरून बहिणी एकमेकांना भिडल्या. या तिन्ही बहिणी एकमेकींवर आरोप प्रत्यारोप करत होत्या. 

सुनीता आणि शशी आईची शिल्लक असलेली मालमत्ता आमच्या नावावर करा त्यानंतरच आम्ही अंत्यसंस्कारासाठी तयार होऊ असा हट्ट धरला. परंतु मिथिलेश त्यासाठी तयार नव्हती. या तिन्ही बहिणींमध्ये भांडण सुरू होते आणि त्याला बराच वेळ झाला. ज्यानंतर स्मशान भूमीत असलेल्या लोकांनी पोलिसांना माहिती दिली. त्यानंतर घटनास्थळी पोलीस दाखल झाले त्यांनी तिन्ही बहिणींना समजवण्याचा प्रयत्न केला परंतु ते अयशस्वी ठरले. अखेर संध्याकाळी ६ वाजता तिन्ही बहिणींमध्ये लिखित करार झाला. ज्यात मृत आईची संपत्ती शशी आणि सुनीता यांच्यावर नावावर केली जाईल असं मान्य झाले. त्यानंतरच आईच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यात आले. हा वाद निकालात निघायला तब्बल ८-९ तास गेले त्यामुळे अंत्यसंस्कारासाठी आलेल्या लोकांना नाहक त्रास सहन करावा लागला.