शहरं
Join us  
Trending Stories
1
Parth Pawar Land Deal: भूखंड खरेदी प्रकरणात तिघांविरोधात गुन्हा दाखल, FIR मध्ये पार्थ पवारांचे नाव नाही 
2
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
3
...अखेर मनोहर शिंदेंनी दाखवला काँग्रेसला 'हात'! पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह जिल्हाध्यक्षांना पाठवला राजीनामा
4
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
5
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
6
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
7
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
8
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
9
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
10
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
11
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
12
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
13
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
14
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
15
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
16
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
17
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात
18
LIC चे तिमाही निकाल जाहीर; नफा 31% ने वाढला अन् ₹10,098 कोटींचा आकडा गाठला...
19
बांगलादेश, नेपाळनंतर आता पाकिस्तानात Gen Z आंदोलन पेटले; शहबाज शरीफ यांच्या सत्तेला हादरा?
20
पार्थ पवारांच्या जमीन व्यवहार प्रश्नावर अजित पवार शांतपणे निघून गेले; पत्रकारांना काहीच उत्तर दिले नाही

९ तास आईचा मृतदेह चितेवर ठेवला अन् स्मशानभूमीतच हायव्हॉल्टेज ड्रामा, काय घडलं?

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 15, 2024 15:37 IST

ज्यानंतर स्मशान भूमीत असलेल्या लोकांनी पोलिसांना माहिती दिली. त्यानंतर घटनास्थळी पोलीस दाखल झाले त्यांनी तिन्ही बहिणींना समजवण्याचा प्रयत्न केला परंतु ते अयशस्वी ठरले.

मथुरा - उत्तर प्रदेशात आईच्या मृत्यूनंतर मुलींमध्ये जमीन वाटपावरून वाद झाला. स्मशानभूमीत आईचा मृतदेह ठेवला आणि मुलींमध्ये भांडण झाले. जोपर्यंत हा वाद मिटत नाही तोवर मृतदेहाला मुखाग्नी दिला नाही. या वादात जवळपास ८ ते ९ तास वाया गेले. त्यानंतर तिथे अंत्यसंस्काराला आलेल्या लोकांनी मुलींना खडे बोल सुनावले. माणुसकीला लाजवणारी ही धक्कादायक घटना मथुराच्या स्मशानभूमीत घडली आहे. जिथे ८५ वर्षीय महिला पुष्पा यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या ३ मुलींमध्ये जमिनीवरून वाद झाला आणि कित्येक तास आईचा मृतदेह अंत्यसंस्कारापासून ताटकळत राहिला. 

स्मशानभूमीत अक्षरश: हायव्हॉल्टेज ड्रामा सुरू होता. त्यात अंत्यसंस्कारासाठी आलेले पंडित विधी उरकून घरी गेले. खूप वेळ मुलींमधला वाद मिटण्याचे चिन्ह नव्हते. त्यामुळे अंत्यसंस्काराला आलेले लोक आणि नातेवाईक त्रस्त झाले. त्यानंतर कायदेशीररित्या स्टॅम्प पेपरवर जमिनीचे वाटप केले गेले त्यानंतर हा वाद शमला आणि आईच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यात आले. वृद्ध महिला पुष्पाला मुलगा नाही. त्यांना ३ मुली होत्या. ज्यांचे नाव मिथिलेश, सुनीता आणि शशी. मागील काही दिवसांपासून मिथिलेश पुष्पासोबत राहत होती. मिथिलेशने बहाण्याने आईकडून दीड एकर जमीन विकून टाकली असा आरोप आहे. 

यातच वृद्ध पुष्पा यांचा मृ्त्यू झाला. अशावेळी मिथिलेशसह नातेवाईक पुष्पा यांच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यासाठी स्मशानभूमीला पोहचले. आईच्या मृत्यूची बातमी मिळताच सुनीता आणि शशीही तिथे आल्या. या दोन बहिणींनी मोठ्या बहिणीवर आरोप करत आईचे अंत्यसंस्कार रोखले. त्यानंतर या तिन्ही बहिणींमध्ये आईच्या संपत्तीवरून वाद झाला. मालमत्तेचे समान वाटप करण्यावरून बहिणी एकमेकांना भिडल्या. या तिन्ही बहिणी एकमेकींवर आरोप प्रत्यारोप करत होत्या. 

सुनीता आणि शशी आईची शिल्लक असलेली मालमत्ता आमच्या नावावर करा त्यानंतरच आम्ही अंत्यसंस्कारासाठी तयार होऊ असा हट्ट धरला. परंतु मिथिलेश त्यासाठी तयार नव्हती. या तिन्ही बहिणींमध्ये भांडण सुरू होते आणि त्याला बराच वेळ झाला. ज्यानंतर स्मशान भूमीत असलेल्या लोकांनी पोलिसांना माहिती दिली. त्यानंतर घटनास्थळी पोलीस दाखल झाले त्यांनी तिन्ही बहिणींना समजवण्याचा प्रयत्न केला परंतु ते अयशस्वी ठरले. अखेर संध्याकाळी ६ वाजता तिन्ही बहिणींमध्ये लिखित करार झाला. ज्यात मृत आईची संपत्ती शशी आणि सुनीता यांच्यावर नावावर केली जाईल असं मान्य झाले. त्यानंतरच आईच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यात आले. हा वाद निकालात निघायला तब्बल ८-९ तास गेले त्यामुळे अंत्यसंस्कारासाठी आलेल्या लोकांना नाहक त्रास सहन करावा लागला.