शहरं
Join us  
Trending Stories
1
पाक आशिया कप स्पर्धेतून Out? UAE विरुद्ध खेळणार नसल्याची मोठी माहिती आली समोर
2
चलो दिल्ली! मनोज जरांगेंनी केली मोठी घोषणा; मराठा समाजाचे अधिवेशन घेणार, महत्त्वाचे कारण समोर
3
सारख्या नावाचे दिवस गेले... सेम चेहराही शोधावा लागणार; यापुढे EVM वर उमेदवाराचा रंगीत फोटो छापणार...
4
प्रसिद्धीचा मुद्दा, अजितदादांचा फडणवीसांकडे रोख;  म्हणाले, “जाहिरात करावी तर देवाभाऊंसारखी”
5
समुद्रात दडलाय सोन्याचा खजिना; किंमत 2000 अब्ज डॉलर्सपेक्षा जास्त, काढणार कसा?
6
आरोपीला पकडण्यासाठी गेलेल्या पोलिसांवर प्राणघातक हल्ला: अनेक पोलिस एम्समध्ये दाखल
7
कार अन् ट्रकचा भीषण अपघात; एकाच कुटुंबातील सात जणांचा जागीच मृत्यू
8
ICC T20I Rankings : नंबर वन अभिषेक शर्मानं साधला मोठा डाव; कॅप्टन सूर्यासह तिलक वर्मा घाट्यात
9
हॉलिवूडची हुल! स्टीव्हन स्पिलबर्गच्या सिनेमात दिसले असते दिलीप प्रभावळकर, किस्सा सांगत म्हणाले...
10
उल्हासनगरात अनोख्या पद्धतीचा निषेध! रस्त्यांवरील खड्ड्यात मनसे पदाधिकाऱ्यानी केली आंघोळ
11
इतकी हिम्मत येते कुठून? शालार्थ घोटाळ्यामधील ५० पैकी ३३ शिक्षकांची सुनावणीलाच दांडी!
12
भयंकर! आरोपीला पकडण्यासाठी आलेल्या पोलिसांच्या टीमवर जीवघेणा हल्ला, अनेक जण जखमी
13
लोकांच्या हातात जादाचे २ लाख कोटी उरणार; जीएसटी कपातीवर अर्थमंत्र्यांचा अंदाज
14
VIRAL : 'थार' घेऊन डिलिव्हरी बॉय पार्सल द्यायला आला, बघणारा प्रत्येकजण अवाक् झाला! व्हिडीओ होतोय व्हायरल
15
"बाप्पा तुम्ही खूप भाग्यवान, नांगरलं कुणी, पेरलं कुणी अन्..."; पंकजा मुंडेंचा खासदार बजरंग सोनवणेंना टोला
16
आमिर खानला नाही आवडली दादासाहेब फाळकेंवरील सिनेमाची स्क्रिप्ट, नक्की कारण काय?
17
ऑनलाइन मागवलेल्या बिर्याणीत झुरळ, घटनेने उडाली खळबळ; कुठे घडला 'हा' किळसवाणा प्रकार?
18
पितृपक्ष २०२५ गुरुपुष्यामृत योग: लक्ष्मी-स्वामींची कायम कृपा, ५ गोष्टी करा, लाभ-पुण्य मिळवा!
19
टाटा-इन्फोसिससह 'या' शेअर्समध्ये वाढ! सलग दुसऱ्या दिवशी सेन्सेक्स-निफ्टी वधारले, कुठे झाली घसरण?
20
World Athletics Championships 2025 : नीरज चोप्राची फायनलमध्ये धडक; इथंही IND vs PAK महामुकाबला?

९ तास आईचा मृतदेह चितेवर ठेवला अन् स्मशानभूमीतच हायव्हॉल्टेज ड्रामा, काय घडलं?

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 15, 2024 15:37 IST

ज्यानंतर स्मशान भूमीत असलेल्या लोकांनी पोलिसांना माहिती दिली. त्यानंतर घटनास्थळी पोलीस दाखल झाले त्यांनी तिन्ही बहिणींना समजवण्याचा प्रयत्न केला परंतु ते अयशस्वी ठरले.

मथुरा - उत्तर प्रदेशात आईच्या मृत्यूनंतर मुलींमध्ये जमीन वाटपावरून वाद झाला. स्मशानभूमीत आईचा मृतदेह ठेवला आणि मुलींमध्ये भांडण झाले. जोपर्यंत हा वाद मिटत नाही तोवर मृतदेहाला मुखाग्नी दिला नाही. या वादात जवळपास ८ ते ९ तास वाया गेले. त्यानंतर तिथे अंत्यसंस्काराला आलेल्या लोकांनी मुलींना खडे बोल सुनावले. माणुसकीला लाजवणारी ही धक्कादायक घटना मथुराच्या स्मशानभूमीत घडली आहे. जिथे ८५ वर्षीय महिला पुष्पा यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या ३ मुलींमध्ये जमिनीवरून वाद झाला आणि कित्येक तास आईचा मृतदेह अंत्यसंस्कारापासून ताटकळत राहिला. 

स्मशानभूमीत अक्षरश: हायव्हॉल्टेज ड्रामा सुरू होता. त्यात अंत्यसंस्कारासाठी आलेले पंडित विधी उरकून घरी गेले. खूप वेळ मुलींमधला वाद मिटण्याचे चिन्ह नव्हते. त्यामुळे अंत्यसंस्काराला आलेले लोक आणि नातेवाईक त्रस्त झाले. त्यानंतर कायदेशीररित्या स्टॅम्प पेपरवर जमिनीचे वाटप केले गेले त्यानंतर हा वाद शमला आणि आईच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यात आले. वृद्ध महिला पुष्पाला मुलगा नाही. त्यांना ३ मुली होत्या. ज्यांचे नाव मिथिलेश, सुनीता आणि शशी. मागील काही दिवसांपासून मिथिलेश पुष्पासोबत राहत होती. मिथिलेशने बहाण्याने आईकडून दीड एकर जमीन विकून टाकली असा आरोप आहे. 

यातच वृद्ध पुष्पा यांचा मृ्त्यू झाला. अशावेळी मिथिलेशसह नातेवाईक पुष्पा यांच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यासाठी स्मशानभूमीला पोहचले. आईच्या मृत्यूची बातमी मिळताच सुनीता आणि शशीही तिथे आल्या. या दोन बहिणींनी मोठ्या बहिणीवर आरोप करत आईचे अंत्यसंस्कार रोखले. त्यानंतर या तिन्ही बहिणींमध्ये आईच्या संपत्तीवरून वाद झाला. मालमत्तेचे समान वाटप करण्यावरून बहिणी एकमेकांना भिडल्या. या तिन्ही बहिणी एकमेकींवर आरोप प्रत्यारोप करत होत्या. 

सुनीता आणि शशी आईची शिल्लक असलेली मालमत्ता आमच्या नावावर करा त्यानंतरच आम्ही अंत्यसंस्कारासाठी तयार होऊ असा हट्ट धरला. परंतु मिथिलेश त्यासाठी तयार नव्हती. या तिन्ही बहिणींमध्ये भांडण सुरू होते आणि त्याला बराच वेळ झाला. ज्यानंतर स्मशान भूमीत असलेल्या लोकांनी पोलिसांना माहिती दिली. त्यानंतर घटनास्थळी पोलीस दाखल झाले त्यांनी तिन्ही बहिणींना समजवण्याचा प्रयत्न केला परंतु ते अयशस्वी ठरले. अखेर संध्याकाळी ६ वाजता तिन्ही बहिणींमध्ये लिखित करार झाला. ज्यात मृत आईची संपत्ती शशी आणि सुनीता यांच्यावर नावावर केली जाईल असं मान्य झाले. त्यानंतरच आईच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यात आले. हा वाद निकालात निघायला तब्बल ८-९ तास गेले त्यामुळे अंत्यसंस्कारासाठी आलेल्या लोकांना नाहक त्रास सहन करावा लागला.