शहरं
Join us  
Trending Stories
1
बदल्याची आग पेटली! लश्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरला भारतीय जवानांनी ठार केले
2
रेल्वे स्थानकावर ओळखीतून आठ महिन्यांच्या बाळाचे अपहरण..! रिक्षाचालकाच्या मदतीने असा उलगडला गुन्हा
3
याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या
4
Navi Mumbai Crime: बेलापूरमध्ये विकासकाने घरातच गोळी झाडून केली आत्महत्या, प्रकरण काय?
5
टॅरिफमुळे जागतिक व्यापार घसरणार; जागतिक व्यापार संघटनेने व्यक्त केली भीती
6
ISI ची साथ, ५ दहशतवाद्यांना घेऊन सैफुल्लाहनं रचला कट; पहलगाम हल्ल्यात पाकचा बुरखा फाटला
7
Shakti Dubey : शाब्बास पोरी! ४ वेळा अपयश अन् पाचव्या प्रयत्नात 'नंबर वन'; शक्ती दुबेची अभिमानास्पद कामगिरी
8
भारतात पाकिस्तानी डिग्री अवैध, तरीही एवढे भारतीय विद्यार्थी शिक्षण घेतायत; ना मिळणार नोकरी, ना उच्चशिक्षण... 
9
Pahalgam Terror Attack : "विनय नरवाल यांच्या पत्नीला खोटं सांगितलं की ते जिवंत आहेत, त्यानंतर मी खूप वेळा रडलो"
10
Swami Samartha: स्वामी पुण्यतिथीनिमित्त जाणून घ्या स्वामींनी भक्तांना दिलेला आदेश, उपासना आणि संकल्प!
11
जागतिक बाजारपेठेत तेजी असूनही भारतीय शेअर बाजार का कोसळला? 'ही' आहेत ३ मोठी कारणे
12
"पीडितांना सतत तेच बोलायला लावणं क्लेशदायक आहे", मीडिया आणि राजकारण्यांवर संतापली मराठी अभिनेत्री
13
Gensol Engineering च्या प्रमोटरना ईडीनं घेतलं ताब्यात, फंड डायव्हर्जन प्रकरणी मोठी कारवाई
14
कॉमेडियन कुणाल कामराला मोठा धक्का, शिंदेंच्या विडंबन प्रकरणी दाखल गुन्हा रद्द करण्यास कोर्टाचा नकार 
15
सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांना दिल्ली पोलिसांनी केली अटक; काय आहे प्रकरण?
16
Pahalgam Terror Attack: दहशतवादी हल्ला त्याठिकाणी लष्कराचे जवान का नव्हते? सरकारने दिलं उत्तर, कुठे झाली चूक?
17
Ramayana: साई पल्लवी नव्हे तर ही अभिनेत्री बनली असती सीता, म्हणाली - "मी स्वतःच दिला नकार..."
18
पाकिस्तानी खेळाडूला आमंत्रित केल्यामुळे ट्रोल झालेल्या नीरज चोप्रानं लिहिली भलीमोठी पोस्ट
19
'कुणी नाश्ता करत होतं, कुणी फिरत होतं'; बैसरन घाटीतील दहशतवादी हल्ला होण्यापूर्वीचा व्हिडीओ
20
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांवर पहिला प्रहार, आसिफ शेख आणि आदिलची घरं सुरक्षा दलांकडून उद्ध्वस्त

IPS अधिकारी आनंद मिश्रांचा राजीनामा; लोकसभेच्या मैदानात उतरणार?

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 27, 2023 13:56 IST

आसाम-मेघालय कॅडरमधील २०११ आर.आर. च्या बॅचमधील ते आयपीएस अधिकारी आहेत.

आगामी लोकसभा निवडणुकांना अवघे काही महिने शिल्लक राहिले असून पुढील ३ ते ३ महिन्यात निवडणुकांची घोषणा होण्याची शक्यता आहे. त्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्ष कामाला लागले असून संभाव्य इच्छुक उमेदवारही तयारी करत आहेत. उत्तर प्रदेशातून सर्वाधिक ८० सदस्या लोकसभेत निवडून जातात. याच उत्तर प्रदेशातील बक्सरलोकसभा मतदारसंघातून निवडणुकीसाठी इच्छुक असलेल्या आयपीएस अधिकारी आनंद मिश्रा यांनी आपल्या नोकरीचा राजीनामा दिला आहे. ते, भारती पोलीस सेवेतून स्वेच्छानिवृत्ती घेत आहेत. 

आसाम-मेघालय कॅडरमधील २०११ आर.आर. च्या बॅचमधील ते आयपीएस अधिकारी आहेत. क्रिसमसची सुट्टी संपताच त्यांनी १६ जानेवारी २०२४ पासून आपला राजीनामा मंजूर करण्यात यावा, अशी मागणी स्वेच्छानिवृत्ती पत्रात आसाम सरकारकडे केली आहे. आसामच्या मुख्य सचिवांकडे त्यांनी राजीनामापत्र दिले आहे. सध्या ते आसामच्या लखीमपूर जिल्ह्यात पोलीस अधीक्षक पदावर कार्यरत आहेत. आनंद मिश्रा हे मूळचे बिहारच्या भोजपूर जिल्ह्यातील शाहपूर तालुक्यातील पडसौरा गावचे रहिवाशी आहेत. त्यांचे संपूर्ण शिक्षण व सांभाळ कोलकाता येथे झाले. आसाममधील डॅशिंग आणि कर्तबगार पोलीस अधिकारी म्हणून त्यांचा नावलौकीक आहे. येथील नगांव जिल्ह्यात त्यांनी ड्रग्ज माफियांविरुद्ध केलेली कारवाई चांगलीच चर्चेत आली होती. विशेष म्हणजे भाजपाच्या अनेक बड्या नेत्यांसोबत त्यांचे चांगले संबंध आहेत. आपलं खासगी आयुष्य आणि सामाजिक कार्यातील ओढ यासाठी आपण राजीनामा देत असल्याचं त्यांनी पत्रात म्हटलं आहे.

मिश्रा यांच्या वडिलांचे मूळ गाव हे बक्सर जिल्ह्यात असून गत लोकसभा निवडणुकीत ते बक्सर लोकसभा मतदारसंघाचा हिस्सा राहिले आहे. गेल्या काही महिन्यांपासून आयपीएस आनंद मिश्रा यांनी बक्सर जिल्ह्यात आपला सक्रीय सहभाग दर्शवल्याचंही पाहायला मिळत आहे. येथील स्थानिक प्रभावशाली व्यक्तींसोबत त्यांचा संपर्क वाढला असून कार्यक्रमातही सहभागी होत आहेत. मणिपूर येथील हिंसाचाराच्या चौकशीसाठी न्यायालयाने गठित केलेल्या विशेष समितीचे ते प्रमुख आहेत. त्यामुळेच, बस्कर लोकसभा मतदारसंघातील त्यांच्या सहभागावर आणि सार्वजनिक भेटीगाठींवर काही प्रमाणात अंकुश आल्याचं बोललं जात आहे.  

दरम्यान, बक्सर हा ब्राह्मणबहुल मतदारसंघ असून येथील गत ७ लोकसभा निवडणुकांपैकी ६ वेळा ब्राह्मण उमेदवारच विजयी झाला आहे, तेही भाजपाच्या कमळ चिन्हावर. सध्या येथून भाजपा नेते अश्विनी चौबे खासदार आहेत. त्यांच्या अगोदर भाजपाच्या लाल मुनी चौबे यांनी ४ वेळा येथून संसदेत लोकप्रतिनिधीत्व केलं आहे. 

टॅग्स :upscकेंद्रीय लोकसेवा आयोगlok sabhaलोकसभाElectionनिवडणूकBiharबिहारbuxar-pcबक्सर