शहरं
Join us  
Trending Stories
1
सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही...
2
मित्रपक्षांना चर्चेत गुंतवत स्वबळाचाच डाव टाकण्याची भाजपाची खेळी?; इच्छुकही करतायेत 'डबल गेम'
3
भाडं वाढणार; १००, २००, ५०० कोटी नाही तर, 'इतक्या' कोटींचा होणार रेल्वेला बंपर फायदा, जाणून घ्या
4
शरीफ उस्मान हादी यांचा मारेकरी देश सोडून पळाला? बांगलादेश पोलिसांनी सत्य परिस्थिती केली स्पष्ट
5
भाजपाच्या नजरेने RSS कडे पाहणे चुकीचे; सरसंघचालक मोहन भागवत यांनी असं विधान का केले?
6
Post Office मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹८९,९९० चं फिक्स व्याज, पैसेही सुरक्षित आणि मिळणार सरकारची गॅरेंटी
7
काँग्रेस-शरद पवारांसोबत आघाडी करून शिंदेसेनेने २ नगरपरिषदेत भाजपाच्या तोंडचा घास हिसकावला
8
'धुरंधर'च्या 'शरारत' गाण्यातून तमन्ना भाटियाला दिग्दर्शकाने दाखवला बाहेरचा रस्ता, म्हणाला- "मला सिनेमात आयटम साँग..."
9
'बांगलादेशातील अराजकतेला युनूस जबाबदार, भारतासोबतचे संबंधही बिघडवले'; शेख हसीना यांचा जोरदार हल्लाबोल
10
नांदेडमधील लोह्यात एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव, ‘घराणेशाही संपवू’ म्हणणाऱ्या भाजपचा धुव्वा
11
आणखी एक मुस्कान! मेरठच्या 'सौरभ' हत्याकांडासारखा प्लॅन बनवला; पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीचे केले तुकडे
12
वंचित बहुजन आघाडी दुर्लक्षित राहिली, पण एक नगराध्यक्ष पदासह या ठिकाणांवर मारलीय बाजी
13
नगराध्यक्ष एकाचा, बहुमत दुसऱ्याचे! जनतेतून निवडीमुळे नगर परिषदांत 'पॉवर गेम' रंगणार; ५ वर्षे संघर्षाची ठिणगी?
14
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २२ डिसेंबर २०२५: प्रिय व्यक्तीची भेट होईल, अचानक पदोन्नती होण्याचीही शक्यता!
15
संपादकीय: नगरांचा जनादेश सत्तेला, काँग्रेस पक्ष राज्यात जिवंत असल्याचे...
16
U19 Asia Cup: 'हाय व्होल्टेज' राडा! भारतीय युवा संघाने गमावला आशिया चषक; पाक पीसीबी प्रमुखांच्या हस्ते पदक स्वीकारण्यास नकार
17
‘नगरां’च्या निवडणुकीत मारली बाजी; भाजप ‘धुरंधर’ तर ठाकरेंचा धुव्वा उडाला
18
पक्षाने माझी शक्ती कमी केली- मुनगंटीवार; सत्तारूढ अन् विरोधकांमधील नेत्यांनी कुठे राखली प्रतिष्ठा
19
भारताविरुद्ध बांगलादेशात षड्‌यंत्र! कोण कोण रचतेय...
20
महामुंबईत भाजप-शिंदेसेनेचाच ‘आवाज’; प्रत्येकी पाच नगराध्यपदांवर विजय; अजित पवार गटही दमदार
Daily Top 2Weekly Top 5

जिवंतपणीच स्वत:चा तेरावा घालणाऱ्या व्यक्तीचा २ दिवसांत मृत्यू; नेमकं काय प्रकरण?

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 17, 2024 13:26 IST

मृत्यूपूर्वी हाकीम सिंह यांनी भाऊ आणि पुतणे घर, जमीनीसाठी त्यांना मारहाण करायचे असं सांगितले.

एटा - उत्तर प्रदेशातील एटा इथं जिवंतपणीच स्वत:च्या मृत्यूनंतरचे विधी पार पाडणाऱ्या व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. त्याच्या तेराव्याला शेकडो लोकांनी हजेरी लावली होती. या प्रकाराची चर्चा सर्वत्र सुरू होती. परंतु कुणाला हा व्यक्ती इतक्या लवकर जाईल याची कल्पना नव्हती. २ दिवसांपूर्वी लोकांना हसत हसत स्वत:च्या तेराव्याचे भोजन देणाऱ्या व्यक्तीच्या मृत्यूनं गावकरी हैराण झाले आहेत. एटा येथील रहिवासी हाकिम सिंह यांनी १५ जानेवारीला स्वत:चे मृत्यूनंतरचे विधी उरकून घेतले. 

जिवंतपणी पिंडदान आणि तेरावा करण्यामागे हाकीम यांनी म्हटलं की, माझा कुटुंबावरील विश्वास उडाला आहे. मृत्यूनंतर ते प्रथेनुसार माझे विधी करतील की नाही यावर मला शंका आहे. त्यासाठी जिवंतपणीच मी या सर्व विधी माझ्या डोळ्यादेखत पूर्ण करून घेतल्या. आता या प्रकाराच्या तिसऱ्या दिवशी हाकिम सिंह यांचे निधन झाले आहे. कदाचित हाकीम यांना त्यांच्या मृत्यूचे संकेत मिळाले असावेत असं लोकांनी म्हटलं. हाकीम यांचा मृत्यू नैसर्गिकरित्या झाला. त्यांच्या मृत्यूनंतर कुटुंब आणि गावकऱ्यांनी हाकीम यांच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार पार पाडले. 

काही दिवसांपूर्वी मुहल्ला परिसरातील मुंशीनगर येथे राहणाऱ्या हाकीम सिंह यांनी कार्ड छापून त्यांच्या तेराव्याचे निमंत्रण गावकऱ्यांना दिले होते. या कार्यक्रमात जवळपास ८०० लोक सहभागी झाले. याआधा हाकीम यांनी तेराव्यासाठी लागणाऱ्या विधी पूर्ण केल्या होत्या. मिळालेल्या माहितीनुसार, हाकीम सिंह यांनी बिहारच्या एका युवतीसोबत लग्न केले होते. परंतु काही काळ एकत्र घालवल्यानंतर पत्नी हाकीम यांना सोडून पुन्हा माहेरी निघून गेली. हाकीम यांना अपत्य नसल्याने नातेवाईकांनी त्यांची जमीन आणि इतर मालमत्ता यावर कब्जा केला. कुटुंब आणि नातेवाईकांच्या अशा वागण्याने हाकीम सिंह खूप चिंतेत जीवन जगत होते. 

मृत्यूपूर्वी हाकीम सिंह यांनी भाऊ आणि पुतणे घर, जमीनीसाठी त्यांना मारहाण करायचे असं सांगितले. या मारहाणीत अलीकडेच हाकीम सिंह यांचा हातही मोडला होता. कुटुंबासोबत वाद आणि जगण्याची उमेद नसलेल्या हाकीम सिंह यांना मृत्यूनंतर आपल्यावर प्रथेनुसार विधी पार पाडतील का अशी चिंता होती. त्यातूनच जिवंतपणी हाकीम सिंह यांनी त्यांचा तेरावा उरकून घेतला. या तेराव्याच्या जेवणासाठी ८०० लोकही सहभागी झाले. या प्रकाराची चर्चा सगळीकडे पसरली होती. त्यातच या घटनेच्या २ दिवसांनी हाकीम सिंह यांनी अखेरचा श्वास घेतला.