शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
कसा आहे मेस्सीचा भारत दौरा? कोलकाता येथे पहिला मुक्काम; PM मोदींच्या भेटीसह सांगता; जाणून घ्या सविस्तर
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

चिमूटभर धान्यातून दररोज भोजनदान! राम मंदिराला आकार देणाऱ्यांची अविरत सेवा

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 10, 2024 12:01 IST

काही भक्त निधीदेखील देतात. त्यातून मग तेल, इंधन आदींची तजवीज केली जाते.

लोकमत न्यूज नेटवर्क, अयोध्या: अयोध्येतील प्रभू श्रीराम मंदिराच्या उभारणीसाठी झटणाऱ्या शेकडो व्यक्तिंना दररोज भोजनदान आणि चहापाणी देण्याचा अनोखा उपक्रम चालविला जात आहे. ना त्याची कुठे प्रसिद्धी केली जाते ना त्याचे श्रेय घेतले जाते.

बाबा जय गुरूदेव यांच्या शिष्यवर्गाने आध्यात्मिक गुरू उमाकांतजी महाराज यांच्या प्रेरणेने हा उपक्रम अखंड सुरू ठेवला आहे. मंदिराची उभारणी सुरू झाली तेव्हाच उमाकांतजी महाराज यांनी असा संकल्प केला होता की, इथे राबणाऱ्या मजुरांसाठी तसेच कारसेवकपूरममध्ये मोठमोठ्या शिळांवर कोरीव काम करणाऱ्यांसाठी ते भोजनदान नियमितपणे करतील. दोनवेळेला त्यांना चहापाणीही द्यायचे. एवढेच नव्हे तर प्रभू श्रीराम मंदिराच्या परिसरात सुरक्षेसाठी तैनात असलेल्या सुरक्षारक्षकांना आणि अयोध्येतील भिक्षेकऱ्यांनाही भोजनदान देण्याचे ठरविले गेले आणि या सेवेत आजवर एकही दिवस खंड पडलेला नाही.

धान्य कधीच कमी नाही

  • हे भोजनदान प्रभू रामाप्रति असलेल्या भक्तीचा एक भाग आहे. त्यासाठी धनधान्य येते कुठून हे अधिक अचंबित करणारे आहे.
  • हजारो, लाखो रामभक्तांनी दिलेल्या चिमूटभर धान्यातून धान्याच्या राशीच्या राशी तयार होतात आणि धान्य कमी पडले, असे कधीही होत नाही.
  • काही भक्त निधीदेखील देतात. त्यातून मग तेल, इंधन आदींची तजवीज केली जाते.

सेवेसाठी अट काय?

  • या सर्व उपक्रमात सेवेकरी म्हणून ज्यांची सेवा घेतली जाते ते निर्व्यसनी असलेच पाहिजेत, ही मुख्य अट आहे. कारसेवकपूरममध्ये भोजनालय चालविले जाते.
  • तेथूनच मंदिर आणि राम जन्मभूमी ट्रस्टच्या कार्यशाळेत काम करणाऱ्यांना भोजन, चहापाणी पोहोचविले जाते. ४५ जणांची टीम हे काम करते.
  • जगदीश पटेल, पातीराम, आयुष अग्निहोत्री, शोभा राम, जग्गू राम आर्य हे त्यातीलच काही जण आहेत.  
टॅग्स :Ram Mandirराम मंदिरAyodhyaअयोध्या