शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
IND vs PAK U19 Asia Cup Final Live Streaming: भारत-पाक महामुकाबला कुठे आणि कसा पाहता येईल?
4
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
5
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
6
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
7
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
8
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
9
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
10
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
11
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
12
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
13
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
14
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
15
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
16
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
17
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
18
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
19
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
20
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
Daily Top 2Weekly Top 5

अयोध्येत २२ जानेवारीला ११,००० व्हीआयपी ; मंदिराकडून सर्वांनाच मिळणार भेटवस्तू

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 10, 2024 16:34 IST

१२ जानेवारीपासूनच अयोध्येत रामभक्त पोहोचणा असून २२ जानेवारीपर्यंत ते अयोध्या नगरीत वास्तव्यास असणार आहेत

अयोध्येत २२ जानेवारी रोजी होत असलेल्या राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याची जय्यत तयारी सुरू आहे. राम मंदिर उभारणीचा देशभरात उत्साह असून भाविकांचे डोळे अयोध्येकडे लागले आहेत. देशाच्या कानाकोपऱ्यातून तब्बल ७ लाख भाविक अयोध्येत दाखल होणार आहेत. तर, पंतप्रधान नरेंद्र मोदींसह दिग्गज नेते, सेलिब्रिटीही सोहळ्याला उपस्थित असणार आहेत. या सोहळ्यासाठी तब्बल ११ हजार व्हीआयपी व्यक्तींना निमंत्रण देण्यात आले आहे. तर, संत, महात्मा आणि अयोध्येतील राम मंदिरासाठी संघर्ष करणारे कारसेवकही या सोहळ्यासाठी अयोध्येत येत आहेत. 

१२ जानेवारीपासूनच अयोध्येत रामभक्त पोहोचणा असून २२ जानेवारीपर्यंत ते अयोध्या नगरीत वास्तव्यास असणार आहेत. सनातन सेवा न्यासकडून या व्यक्तींना रामजन्मभूमीशी निगडीत स्मृतीचिन्ह दिले जाईल. प्रभू श्रीराम यांच्याशी संबंधित हे स्मृतीचिन्ह अतिशय खास असणार आहे. सनातन सेवा न्यासचे संस्थापक आणि जगदगुरू भद्राचार्य यांचे शिष्य शिव ओम मिश्रा यांनी सांगितले की, अतिथी देवो भवं, म्हणजे अतिथींना देव मानले जाते. त्यामुळेच, अयोध्येत येणाऱ्या पाहुण्यांसाठी प्रभू श्रीराम यांचे स्मृतीचिन्ह बनविण्यात आले आहे. हे स्मृतीचिन्हा ११,००० पाहुण्यांना भेट म्हणून दिले जाईल. यासोबत प्रसादही देण्यात येणार आहे. 

शिव ओम मिश्रा यांनी ते स्मृतीचिन्ह दाखवून पुढे सांगितले की, पाहुण्यांना दोन बॉक्स दिले जाणार आहेत. त्यापैकी, एका बॉक्समध्ये प्रसाद असणार आहे. त्यात बेसनचा लाडू, रामानंदी प्रथेनुसार लावण्यात येणारी विभूतही असणार आहे. तर, दुसऱ्या बॉक्समध्ये प्रभू श्रीराम यांच्याशी संबंधित साहित्य असणार आहे. राम मंदिर भूमीपूजन सोहळ्यावेळी जी माती मंदिराच्या गर्भगृहातून काढण्यात आली होती, ती माती यातील एका डब्बीत असणार आहे. तसेच, शरयू नदीचं पाणीही स्मृतीचिन्हासोबत पॅकेटबंद स्वरुपात देण्यात येणार आहे. एक चांदीचा शिक्का आणि ब्रास थाळीही असणार आहे. हे दोन्ही बॉक्स एकत्रितपणे ठेवण्यासाठी पिशवीही तयार करण्यात आली आहे. ज्या पिशवीवर राम मंदिराचा इतिहास आणि त्यासाठीच्या संघर्षांची माहिती लिहिण्यात आली आहे. 

दरम्यान, सनातन सेवा न्यासला या कामाची जबाबदारी अगोदरपासूनच देण्यात आली आहे. त्यामुळे, अगोदरपासूनच याची तयारी सुरू असून ११,००० पेक्षा अधिक बॉक्स तयार करण्यात आले आहेत. अयोध्या प्राणप्रतिष्ठा सोहळा आणि अयोध्येतील राम मंदिर सोहळ्याची आठवण कायमस्वरुपी या स्मृतीचिन्हाच्या माध्यमातून सोबत राहमार आहे.

टॅग्स :Ayodhyaअयोध्याRam Mandirराम मंदिरNarendra Modiनरेंद्र मोदी