शहरं
Join us  
Trending Stories
1
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
2
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
3
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
4
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
5
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
6
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
7
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
8
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
9
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
10
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
11
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
12
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
13
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
14
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
15
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
16
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
17
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
18
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
19
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
20
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!

आतापर्यंत दीड कोटी भाविकांनी घेतलं रामललाचं दर्शन, दररोज 1 लाख लोक येताहेत मंदिरात 

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 22, 2024 11:38 IST

राम मंदिरात दररोज मोठ्या संख्येने भाविकांची गर्दी होत आहे

अयोध्या : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते गेल्या 22 जानेवारीला अयोध्येतील राम मंदिरात प्रभू श्री रामाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठापणा करण्यात आली होती. त्यानंतर राम मंदिरात दररोज मोठ्या संख्येने भाविकांची गर्दी होत आहे. प्राणप्रतिष्ठापणापासून आतापर्यंत जवळपास दीड कोटी लोक रामललाचे दर्शन घेण्यासाठी मंदिरात आले आहेत, असे श्री रामजन्मभूमी तीर्थ क्षेत्राचे सरचिटणीस चंपत राय यांनी सांगितले आहे.

दररोज एक लाखांहून अधिक लोक मंदिरात दर्शनासाठी येत आहेत. 22 जानेवारीच्या प्राणप्रतिष्ठापणापासून आतापर्यंत सुमारे दीड कोटी लोक रामललाच्या दर्शनासाठी आले आहेत, असे चंपत राय म्हणाले. दरम्यान, सध्या मंदिराचा फक्त तळमजला पूर्ण झाला आहे, याठिकाणी रामललाची प्राणप्रतिष्ठापणा करण्यात आली होती. पहिल्या मजल्यावर काम सुरू आहे. मंदिराभोवती 14 फूट रुंद सुरक्षा भिंत बांधण्यात येणार आहे. या भिंतीला मंदिराचा 'परकोटा' म्हणतात. 

हे मंदिर तीन मजली असणार आहे. प्रत्येक मजल्याची उंची 20-20 फूट असणार आहे. एकूण 2.7 एकर जागेवर राम मंदिर बांधले जात आहे. मंदिराची उंची अंदाजे 161 फूट आहे. मंदिर उभारणी आणि इतर प्रकल्पांना अधिक वेळ लागू शकतो. मंदिर बांधकाम समितीचे अध्यक्ष नृपेंद्र मिश्रा म्हणाले की, तळमजला नुकताच बांधण्यात आला आहे. पहिला आणि दुसरा मजला डिसेंबर 2024 पर्यंत पूर्ण होईल. पण, अयोध्येत देवत्व आणि भव्यता दिसू लागली आहे. येत्या काही दिवसांत येथील भाविकांना त्रेतायुग असाच काहीसा अनुभव येणार आहे. मंदिराच्या रचनेपासून ते शहरी शैलीपर्यंत विशेष आहे.

राम मंदिर ट्रस्टचे म्हणणे आहे की, प्रभू रामाच्या मंदिरासोबतच या परिसरात इतर 7 मंदिरेही बांधली जात आहेत. महर्षी वाल्मिकी मंदिर, महर्षि वशिष्ठ मंदिर, महर्षी विश्वामित्र मंदिर, महर्षी अगस्त्य मंदिर, निषाद राज, माता शबरी, देवी अहिल्या मंदिर असणार आहे. यामुळे लोकांना त्रेतायुग असल्याचे वाटणार आहे. मंदिराचा मुख्य दरवाजा सिंह द्वार या नावाने ओळखला जाईल. हे मंदिर पूर्णपणे भारतीय परंपरेनुसार आणि स्वदेशी तंत्रज्ञानाने बांधले जात आहे. पर्यावरण-जलसंवर्धनावर विशेष लक्ष दिले जात आहे. 

टॅग्स :Ram Mandirराम मंदिरAyodhyaअयोध्या