शहरं
Join us  
Trending Stories
1
"लाज वाटू द्या, गिधाडांनो !"; प्रिया फुकेंच्या हातून कागद हिसकावला, पोलिसांची दडपशाही (video viral)
2
CCTV: धावत्या स्कूल व्हॅनच्या डिक्कीतून पडले विद्यार्थी; चालकाला पत्ताच नाही, रिक्षावाल्यामुळे वाचले
3
“सत्ता हे भाजपाचे ध्येय नव्हते, ठाकरे बंधू एकत्र आल्याचा काही परिणाम नाही”: सुधीर मुनगंटीवार
4
पुतिन यांनी काही तासांपूर्वीच मंत्र्याची मंत्रिमंडळातून हकालपट्टी केली; आता सापडला मृतदेह
5
"आयुष्यात कधीही कोणावर प्रेम करू नका..."; इन्स्टावर लाईव्ह येत तरुणाने संपवलं जीवन
6
“वाद निर्माण करायला निशिकांत दुबेंचे विधान, हिंदी सक्तीचा फतवा रेशिमबागेतून”; काँग्रेसची टीका
7
उपमुख्यमंत्री अजित पवारांचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना पत्र; केली मोठी मागणी, म्हणाले...
8
चेटकीण असल्याच्या संशय; एकाच कुटुंबातील पाच जणांना जाळून मारले, संपूर्ण गावावर आरोप....
9
"प्राथमिक शिक्षण मातृभाषेतच घ्यायला हवं"; हिंदी वादावर आरएसएसची स्पष्ट भूमिका
10
Video - रीलचा नाद लय बेक्कार! ट्रॅकवर झोपला १२ वर्षांचा मुलगा, समोरून आली ट्रेन अन्...
11
फक्त फोटो काढायला आलीस का? महिलेच्या संतापानंतर कंगना म्हणाली, "मला मदत निधी मिळत नाही"
12
“ठाकरे गटाच्या खासदार प्रियंका चतुर्वेदींना दोन ओळी मराठी बोलता येत नाही”; शिंदेसेनेची टीका
13
“हेच मराठी, महाराष्ट्राचे मारेकरी, हिंदूंनाही वाचवू शकत नाही”; उद्धव ठाकरेंचा भाजपावर पलटवार
14
ब्रायन लाराचा ४०० धावांचा विक्रम थोडक्यात बचावला, फलंदाज ३६७ धावांवर नाबाद असताना घडलं असं काही...  
15
राहा फिट! वजन कमी करण्यासाठी अत्यंत प्रभावी ठरतं 'पिरॅमिड वॉक'; पण 'ते' आहे तरी काय?
16
'पंचायत'च्या विनोदने 'या' मराठी अभिनेत्रीसोबतही केलंय काम, सिनेमाची आंतरराष्ट्रीय स्तरावर चर्चा
17
…तेव्हा अवघ्या २ मतांनी पराभव, आता ४ वर्षांनी बदललं नशीब, पुनर्मतमोजणीत बाजी मारून बनल्या सरपंच  
18
“महात्मा गांधींचे विचार देशाची दिशा, सत्य; पुतळ्यावर वार करून संपणार नाही”: हर्षवर्धन सपकाळ
19
सेन्सेक्स-निफ्टी सपाट! पण, अंबानींच्या 'या' कंपनीच्या शेअर्समध्ये धडाकेबाज वाढ! कोणत्या क्षेत्रात घसरण?
20
"संजय शिरसाट यांच्या मुलाची मालमत्ता शून्य, मग त्यांनी हॉटेल विकत कसं घेतलं?" अंबादास दानवेंचा सवाल

आपल्याला राग का येतो?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 6, 2020 06:35 IST

सतत सतत राग येणं हे चांगलं आहे का?

ठळक मुद्देउठसुट राग

आपल्याला राग का येतो? ऋतूजा  मडावी, नागपूर

आपल्याला काहीही करण्याची इच्छा  नसते आणि आई कामं सांगते. आपण एखादा मस्त गेम खेळत असतो आणि आई फोन मागते,  खूप राग येतो. चिडचिड होते. का असं होतं?राग ही माणसाची मूलभूत भावना आहे. त्याला एखादी गोष्ट आवडली नाही, मनासारखी झाली नाही की त्रस होतो आणि तोच त्रस मग रागातून व्यक्त होतो. राग सीमित स्वरूपात असेल आणि लगेच जाणारा असेल तर ठीके पण अतिसंताप, दीर्घकाळ राग धरून ठेवणं, राग आला म्हणून समोरच्याला हानी करण्याचा विचार मनात येणं या गोष्टी मात्र चुकीच्या आहेत. राग आला तरी तो लगेच गेला पाहिजे. राग कमी करण्याची सगळ्यात सोपी पद्धत म्हणजे 1 ते 100 आकडे मोजायचे. अगदी सावकाश मोजायचे. आकडे मोजण्याच्या नादात आपण ब?्याचदा राग विसरून जातो. तसंच लहानांपासून मोठ्यांपयर्ंत सगळ्यांनी श्वसनाचे व्यायाम केले पाहिजेत. अगदी सोपे सोपे. जसं की दीर्घ श्वसन. लांब श्वास आत घ्यायचा आणि हळूहळू सोडायचा. ही क्रिया करत असताना लक्ष संपूर्ण श्वासावर केंद्रित करायचं. असं केल्यानेही रागावर नियंत्रण ठेवता येतं आणि उठल्या सुटल्या राग येण्याचं प्रमाण कमी होऊ शकतं. 

राग येणं नैसर्गिक आहे पण त्याचा अतिरेक मात्र नको. त्यामुळे सारखा राग येत असेल, चिडचिड होत असेल तर ती कशामुळे होतेय हेही बघायला हवं. अनेकदा भलत्याच गोष्टीचा राग भलत्याच गोष्टीवर निघतो. उदा. अनेक मुलांना भूक सहन होत नाही. भूक लागली, पोटात खड्डा पडला आणि लगेच काही खायला मिळालं नाही तर त्यांची चिडचिड सुरु होते आणि त्यातून त्यांना राग यायला लागतो. पण त्याचवेळी जर त्यांनी व्यवस्थित खाल्लं तर त्यांची चिडचिडही कमी होते आणि रागही निघून जातो. त्यामुळे रागवावं पण आपण का रागावलो आहोत आणि ते योग्य आहे का याचाही विचार केला पाहिजे.