शहरं
Join us  
Trending Stories
1
युतीबाबत एक पाऊल पुढे! शिवतीर्थावर उद्धव-राज यांच्यात अडीच तास चर्चा, बंधुऐक्याची ‘फ्रेम’ ठरली 
2
डोनाल्ड ट्रम्प यांच्या निकटवर्तीयाची गोळ्या झाडून हत्या, विद्यापीठातील कार्यक्रमादरम्यान झाला गोळीबार  
3
आजचे राशीभविष्य- ११ सप्टेंबर २०२५: आजचा दिवस लाभदायी, नियोजित कामे पूर्ण होतील!
4
Maratha Reservation: हैदराबाद गॅझेटियर अधिसूचनेला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान; काय आहे याचिकेत?
5
सोने-चांदीने गुंतवणूकदार मालामाल, गेल्या एका वर्षात मिळाले सोन्यातून ४४ तर चांदीतून ४५ टक्के रिटर्न
6
अग्रलेख: राधाकृष्णन आता देशाचे! नव्या उपराष्ट्रपतींनी हे लक्षात ठेवायला हवेच
7
विम्याचा हप्ता दहा वर्षांत दुप्पट! कंपन्यांकडून ग्राहकांची लूट; भीती दाखवून प्रीमियमवाढ
8
‘कोहिनूर’ची ‘बहीण’ ११७ वर्षांनी दिसणार! या बहिणीचं नाव आहे ‘दरिया-ए-नूर’ 
9
Maratha Reservation: राज्यात आजपर्यंत दिलेल्या कुणबी प्रमाणपत्रांची श्वेतपत्रिका काढावी; ओबीसी मंत्रिमंडळ उपसमितीची भूमिका
10
विशेष लेख: एका परिवर्तनशील, सहृदय नेतृत्वाचा अमृतमहोत्सव
11
नेपाळमध्ये देशभरात संचारबंदी लागू; महाराष्ट्रातील १०० पर्यटकांसह शेकडो प्रवासी अडकले 
12
भारत-अमेरिका यांच्यात चर्चेची दारे खुली होणार; पंतप्रधान मोदी म्हणाले, "ट्रम्प यांच्याशी..."
13
नेपाळनंतर फ्रान्समध्येही जनतेचा उद्रेक; २५० निदर्शकांना अटक 
14
Asia Cup 2025 : बुमराहच्या परफेक्ट यॉर्करशिवाय ही गोष्ट ठरली लक्षवेधी; कारण ६ वर्षांनी असं घडलं
15
सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान; बालेंद्र शाहांचा पाठिंबा, आंदोलकांना केले आवाहन...
16
नागपुरातील कडबी चौकाजवळ भर रस्त्यावर व्यापाऱ्यावर गोळीबार, ५० लाखांची लूट
17
IND vs UAE : अभिषेकनं षटकारासह उघडलं खातं! गिलनं खणखणीत चौकार मारत पॉवरप्लेमध्ये संपवली मॅच
18
रुमाल पडला; तो क्रीजमध्ये यायला विसरला! सूंजचा डायरेक्ट थ्रो; पण Out बॅटरला सूर्यानं दिलं Not Out
19
'तुमचा वापर केला जातोय...', नेपाळमधील सत्तापालटानंतर केपी शर्मा ओलींची पहिली प्रतिक्रिया
20
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता

सुट्ट्या घालवायला रेल्वेने जाताना वेळीच करा तिकिट कन्फर्म, 'या' गाड्यांची वेटिंग लिस्ट संपेना

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 13, 2022 19:30 IST

उन्हाळ्यात जम्मूसह इतर धार्मिक स्थळांव्यतिरिक्त डोंगराळ भागाकडे धावणाऱ्या गाड्यांमध्ये तिकिटांसाठी भांडण होत आहेत. अनेक प्रवासी तिकीट मिळत नसल्यामुळे स्थानकातून परतत आहेत.

उन्हाळ्याच्या सुट्टीत तुम्ही पिकनिकला जाण्याचा विचार करत असाल, तर सर्वात आधी ट्रेनची स्थिती तपासा. लग्नसमारंभ आणि शाळांच्या उन्हाळ्याच्या सुट्ट्या सुरू होण्यापूर्वीच बहुतांश दिशेने धावणाऱ्या गाड्या भरलेल्या असतात. केवळ स्लीपरच नाही, तर एसी कोचमध्ये वेटिंग तिकीटही मिळत आहेत. उन्हाळ्यात जम्मूसह इतर धार्मिक स्थळांव्यतिरिक्त डोंगराळ भागाकडे धावणाऱ्या गाड्यांमध्ये तिकिटांसाठी भांडण होत आहेत. अनेक प्रवासी तिकीट मिळत नसल्यामुळे स्थानकातून परतत आहेत.

कोरोनाच्या कालावधीनंतर पहिल्यांदाच लांब पल्ल्याच्या सर्व गाड्या आता भरल्या आहेत. प्रवासीही वेटिंग तिकीट घेत असल्यामुळे त्यांना तिकीट कन्फर्म मिळणे कठीण होत आहे. तुम्हीही प्रवास करण्याचा विचार करत असाल तर आधी तुमच्या ट्रेनची स्थिती तपासा, जेणेकरून प्रवासादरम्यान कोणतीही अडचण येणार नाही.

दिल्लीच्या स्थानकांवरून दररोज धावणाऱ्या जवळपास सर्वच गाड्यांना आजकाल प्रचंड गर्दी होत आहे. विशेषत: वैष्णव देवी, मुंबई, लखनौ, गोरखपूर, मुझफ्फरपूर, लखनौ, पाटणा यासह दक्षिण दिशेने जाणाऱ्या एक्स्प्रेस गाड्यांना सर्वाधिक गर्दी असते. या गाड्यांमध्ये 15 दिवस ते महिनाभर प्रतीक्षा तिकिटे दिली जात आहेत.

प्रदीर्घ वेटिंगमुळे वाढली समस्यासध्याच्या परिस्थितीत आरक्षित तिकिटे मिळणे अत्यंत कठीण झाले आहे. जर तुम्ही गोव्याला भेट देण्याची योजना आखत असाल, तर या मार्गावर निजामुद्दीन दुरांतो, गोवा संपर्क क्रांती, स्वराज, गोल्डन टेंपल, पश्चिम एक्सप्रेस, पंजाब मेल या मुख्य गाड्या आहेत आणि सर्व गाड्या भरलेल्या आहेत. वैष्णव धामला जाणाऱ्या गाड्यांमध्येही जागा नाही. जम्मू तावी एक्स्प्रेस, मालवा, झेलम, हमसफर, उत्तर संपर्क क्रांतीसह या दिशेने धावणाऱ्या गाड्यांमध्येही आरक्षित तिकिटे उपलब्ध नाहीत. त्याचप्रमाणे लखनौला जाणारी कैफियत सुहेलदेवमध्ये रिग्रेस केली जाते, म्हणजेच वेटिंगही मिळत नाही.

जास्त क्षमतेच्या स्लीपर आणि जनरल डब्यातील प्रवासीरेल्वेची तयारीही प्रवाशांच्या गर्दीसमोर ठेंगणी ठरत आहे. स्लीपर, सीटिंग कोच, जनरल कोचमध्ये जास्त प्रवासी प्रवास करत आहेत. अनेक प्रवाशांना वेटिंग तिकीट न मिळाल्यामुळे अनारक्षित तिकीट काढून दंड भरून आरक्षित डब्यातून प्रवास करावा लागत आहे.

प्रवाशांना गरज आहे विशेष गाड्यांचीउन्हाळ्यात सर्वच मार्गावरील गाड्यांमध्ये प्रवाशांची संख्या वाढते. त्यामुळे विशेष गाड्या चालवून दिलासा देण्याची गरज आहे. यंदाचा उन्हाळी कृती आराखडा उत्तर रेल्वेने अद्याप तयार केलेला नाही. रेल्वे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे की, जास्त गर्दी लक्षात घेऊन वेळोवेळी विशेष गाड्यांची घोषणा केली जाते.

टॅग्स :Travel Tipsट्रॅव्हल टिप्सIRCTCआयआरसीटीसी