शहरं
Join us  
Trending Stories
1
पहिला दिवस गोंधळाचा; विरोधक झाले आक्रमक; पहलगाम हल्ला ते बिहार मतदारयादीवरून गोंधळ 
2
मोठी बातमी: उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी दिला पदाचा राजीनामा
3
शाळेवर विमान कोसळून २० ठार; बांगलादेशात अहमदाबादची पुनरावृत्ती!
4
६३ खासदार म्हणतात, न्या. वर्मांना पदावरून हटवा! कारण काय?
5
महाराष्ट्रातील ४ लाख शेतकरी लाभार्थी यादीतून झाले गायब; लाभार्थी १०.२ लाखांवरून केवळ १५ हजारांवर
6
स्थानके चकाचक, डेपो मात्र घाण; एस.टी.च्या स्वच्छता अभियानात १४९ बसस्थानके नापास
7
धनखड यांचा राजीनामा, आता पद कोण सांभाळणार, नव्या उपराष्ट्रपतींची निवड कशी होणार? अशी आहे संपूर्ण प्रक्रिया
8
सूरज चव्हाण यांची अखेर हकालपट्टी; छावा कार्यकर्त्यांना मारहाण भोवली
9
हनी ट्रॅपप्रकरणी संबंधित अधिकाऱ्यांची चौकशी; ‘त्या’ हॉटेल व्यावसायिकाचे जमीन व्यवहार तपासणार
10
मंत्री शिरसाट यांच्या घरात शिरला खतरनाक गुन्हेगार; सुपारी दिल्याचा संशय 
11
शेतकऱ्याचा मुलगा ते उपराष्ट्रपती, अशी राहिली आहे जगदीप धनखड यांची वादळी कारकीर्द
12
संविधानाचे कलम ६७(अ) काय सांगते? ज्याअंतर्गत जगदीप धनखड यांनी दिला उपराष्ट्रपतीपदाचा राजीनामा
13
गोव्याहून इंदूरला येणाऱ्या इंडिगो विमानाचे आपत्कालीन लँडिंग, १४० जण करत होते प्रवास
14
सुनील तटकरे यांच्या सांगण्यावरूनच विजयकुमार घाडगे यांना मारहाण, मनोज जरांगे-पाटील यांचा आरोप
15
दातांवर उपचार करताना महिलेचे कानही झाले बरे, २० वर्षांपासून येत नव्हतं ऐकू, असा घडला चमत्कार
16
ऑनलाइन बेटिंग अ‍ॅपसंदर्भात ईडीची कारवाई, राणा दग्गुबाती अन् प्रकाश राजसह ४ कलाकारांना समन्स
17
'आखडू' पाकिस्तानची मस्ती भारत जिरवणार! BCCIच्या एका निर्णयाने पाकचे ११६ कोटी बुडणार...
18
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यासह 'या' दोन विभूतींना भारतरत्न देण्यात यावा, राज्यसभेत मागणी
19
"स्पष्टीकरण दिलं तरी जे घडलं ते भूषणावह नाही"; कोकाटेंच्या व्हिडीओवर CM फडणवीस स्पष्टच बोलले
20
धक्कादायक! प्रफुल्ल लोढाविरोधात बलात्कार प्रकरणी बावधन पोलिस ठाण्यातही गुन्हा दाखल

ह्दयविकाराने कल्याणच्या रेल्वे प्रवाशाचे डोंबिवलीत निधन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 18, 2018 12:24 IST

रेल्वेप्रवासात ह्दयविकाराच्या झटका आल्याने जयवंत जयसिंग साळुंखे (४७) या प्रवासाचा मृत्यू झाल्याची घटना बुधवारी डोंबिवली स्थानकात घडल्याची माहिती समोर आली आहे. मयत साळुंखे हे काटेमानवली, कल्याण येथिल रहिवासी असल्याची माहिती डोंबिवली लोहमार्ग पोलिसांनी दिली.

ठळक मुद्देअंबरनाथ-सीएसएमटी जलद लोकलमध्ये घडली घटना

डोंबिवली: रेल्वेप्रवासात ह्दयविकाराच्या झटका आल्याने जयवंत जयसिंग साळुंखे (४७) या प्रवासाचा मृत्यू झाल्याची घटना बुधवारी डोंबिवली स्थानकात घडल्याची माहिती समोर आली आहे. मयत साळुंखे हे काटेमानवली, कल्याण येथिल रहिवासी असल्याची माहिती डोंबिवली लोहमार्ग पोलिसांनी दिली.साळुंखे हे बांद्रा येथे एका खासगी कंपनीत कार्यरत होते, बुधवारी सकाळी नेहमीप्रमाणे ते कामावर जात असतांना सकाळी ८ वाजण्याच्या सुमारास त्यांनी कल्याण स्थानकातून अंबरनाथ-सीएसएमटी जलद ही लोकल पकडली होती. दरम्यान त्यांना ह्दयविकाराचा झटका आल्याने सहप्रवाशांनी डोंबिवली स्थानकात उतरवले, त्यानंतर लोहमार्ग पोलिसांनी त्यांना तातडीने स्थानकातील प्रथमोपचार केंद्रात नेत, शास्त्रीनगर रुग्णालयात हलवले, परंतू तेथे सकाळी ८ वाजून ४५ मिनिटांच्या सुमारास त्यांचा मृत्यू झाल्याचे लोहमार्ग पोलिसांनी सांगितले. त्यानूसार त्यांच्या वारशांना कळवण्यात आले, माहिती मिळताच मयत जयवंत यांचे ज्येष्ठ बंधू सुरज साळुंखे यांनी ओळख पटवल्याचे सांगण्यात आले. मयत साळुंखे यांच्या पश्चात आई, पत्नी, दोन मुली असा परिवार असल्याचेही सांगण्यात आले. या घटनेची डोंबिवली लोहमार्ग पोलिस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली असून जानेवारी महिन्यात या पोलिस ठाण्यांतर्गत मृत्यूची नोंद करण्यात आलेल्यांमध्ये आतापर्यंत ९ प्रवाशांचा मृत्यू झाल्याचे मिळालेल्या माहितीवरुन स्पष्ट झाले.

टॅग्स :central railwayमध्य रेल्वेRailway Passengerरेल्वे प्रवासीpiyush goyalपीयुष गोयल