शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

पावसाळ्यात गाडी चालवतांना या गोष्टींची घ्या काळजी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 12, 2018 13:06 IST

काही गोष्टींची काळजी घेतल्यास तुम्ही पाण्यात कुठेही अडकणार नाहीत आणि आरामात ड्राईव्ह करु शकाल. चला जाणून घेऊया अशाच काही खास टिप्स...

सगळीकडेच आता पावसाला जोरदार सुरुवात झाली आहे. या दिवसात अनेक अपघात झाल्याचे बघायला मिळतात. अशात या दिवसात गाडी चालवणे जरा कठीण आणि धोकादायक असतं. पण काही गोष्टींची काळजी घेतल्यास तुम्ही पाण्यात कुठेही अडकणार नाहीत आणि आरामात ड्राईव्ह करु शकाल. चला जाणून घेऊया अशाच काही खास टिप्स...

पाणी साचलेल्या परिसरात जाणे टाळा

पावसाच्या दिवसात काही रस्त्यांवर खूप पाणी साचलं जातं. इतक्या साचलेल्या पाण्यात काही गाड्या चालवणं फारच कठीण होऊन बसतं. त्यामुळे पावसात कुठेही जाण्याआधी त्या मार्गाची माहिती घ्या. त्या रस्त्यावर किती पाणी साचलं असेल याचा अंदाज तुम्ही त्या रस्त्यावरुन जात असलेल्या गाड्यांवरुन आणि चालत असलेल्या लोकांवरुन लावू शकता. 

पाण्यात थांबवू नका गाडी

जर पाणी साचलेल्या रस्त्यावरुन तुम्ही गेलाच तर अशा जागेवर अजिबात थांबू नका जिथे पाणी जास्त साचलंय. अशा जागेवर थांबल्यास तुमची गाडी बंद होण्याची शक्यता अधिक असते. 

हळूहळू पुढे जा

पाणी साचलेल्या रस्त्यावरुन फार वेगाने गाडी चालवू नये तसेच एकदम ब्रेकही लावू नये. अशा जागेवरुन गाडी हळू आणि एकसारख्या गतीने चालवावी. पाण्यात गाडी थांबवल्यास गाडीचे महत्वाचे पार्ट्स खराब होऊ शकतात. 

जर पाण्यात बंद पडली गाडी

जर तुमची कार पाण्यात बंद पडली तर कार लगेच रिस्टार्ट करु नका. कारण याने तुमच्या कारच्या इंजिनाचं नुकसान होऊ शकतं. आधी गाडी पाणी नसलेल्या ठिकाणी घेऊन जा आणि मेकॅनिकच्या मदतीने गाडी सुरु करा. 

कारमध्ये अडकले असाल तर...

जर तुमची कार पाण्यात फसली असेल आणि तुम्ही आत अडकले असाल तर घाबरु नका. अशावेळी कशाच्यातरी मदतीने कारच्या खिडकीचा काच तोडण्याचा प्रयत्न करा. 

पाण्यातून गाडी बाहेर काढल्यावर...

पाणी साचलेल्या रस्त्यातून गाडी बाहेर काढल्यानंतर पुन्हा पुन्हा ब्रेक लावा. याने गाडीच्या इतर भागात गेलेलं पाणी निघून जाईल. त्यासोबतच ब्रेक ड्रममध्ये गेलेलं पाणीही बाहेर येईल. 

टॅग्स :Travelप्रवासMonsoon Specialमानसून स्पेशल