शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
6
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
7
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
8
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
9
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
10
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
11
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
12
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
13
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
14
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
15
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
16
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
17
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
18
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
19
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
20
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...

प्रवासाला जाताना या गोष्टी थोड्या जास्तीच असू द्या तुमच्या बॅगेत!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 9, 2017 15:51 IST

अत्यावश्यक गोष्टींच्या यादीत त्यांचा समावेश नक्की करा..

ठळक मुद्देबॅग ओव्हरपॅक करू नका, जास्त सामान बरोबर घेऊ नका, हे तर खरंच, पण काही गोष्टी खरंच जास्त घेणं गरजेचं असतं. या गोष्टी तुम्ही थोड्या जास्त घेतल्या तर केव्हाही चांगलं..सॉक्सचे काही पेअर तर जास्तीचे हवेतच. बºयाचदा आपण प्रवासात पूर्णवेळ शूज घालून वावरतो. अशावेळी सॉक्सचा घाण वास येतो. ते वेळीच बदलावे लागतात.काही वेळा कपड्यांवर चहा-कॉफीचे डाग पडू शकतात. कपडे घाण होऊ शकतात. टॉप, शर्ट थोडे जास्तीचे असले तर केव्हाही बरं.

- मयूर पठाडेनेहमीचा प्रश्न.. प्रवासाला जायचं तर किती सामान सोबत बरोबर न्यायचं? महिलांसाठी तर हा प्रश्न खरोखरच खूपच गंभीर असतो. अर्थातच तुम्ही प्रवासाला कुठे आणि किती दिवसासाठी जाताय यावर बरोबर किती सामान घ्यायचं हे ठरतं. अनेक प्रवासप्रेमी माणसं सांगतात, आपल्या सोबत कमीत कमी सामान ठेवावं. आपल्या बॅग कधीच ओव्हरपॅक करू नका. तुमच्या प्रवासाचा मजा त्यामुळे किरकिरा होईल आणि प्रवासाच्या आनंदापेक्षा तुमचा हमालच जास्त होईल. अगदी खरं आहे ते. दोन दिवसांच्या प्रवासासाठी चार चार, पाच पाच ड्रेस कशासाठी? तेवढं तारतम्य आपण बाळगायलाच हवं.पण त्यालाही दुसरी एक बाजू आहे. बॅग ओव्हरपॅक करू नका, जास्त सामान बरोबर घेऊ नका, हे तर खरंच, पण काही गोष्टी खरंच जास्त घेणं गरजेचं असतं. या गोष्टी तुम्ही थोड्या जास्त घेतल्या तर केव्हाही चांगलं..काय आहेत अशा गोष्टी? फार थोड्या आहेत, पण अतिशय महत्त्वाच्या. सॉक्स, अंडरवेअर्स, टॉप्स.. सॉक्सचे काही पेअर तर जास्तीचे हवेतच. बºयाचदा प्रवासात आपण कायम शूज घातलेले असतात. अशावेळी सॉक्सचा घाण वास येतो. ते वेळीच बदलावे लागतात. काही वेळा प्रवासात ऊन असलं तर खूप घाम येतो. इनरवेअर्सही घामानं ओले झाले तर त्यामुळे आपल्याला अगदी अनइझी होतं. दिवसभर तशाच अवस्थेत आपण फिरू शकत नाही. शिवाय या घामाचाही वास यायला लागतो.जे टॉप किंवा शर्ट आपण घालतो, त्याचाही एखाद दुसरा जोड जास्तीचा असणं फायद्याचं ठरतं. कधी चहा-कॉफीच सांडली, त्याचा डाग पडला, धुळीमुळे ते खराब झाले, तर तसंच आपण बाहेर वावरू शकत नाही. त्यासाठी या कपड्यांचे काही जोड आपल्याकडे जास्तीचे हवेतच. अत्यावश्यक कपड्यांच्या यादीत याचा समावेश करायला हवा.कोणतं सामान जास्त आणि कोणतं मोजकं याचं तारतम्य ठेवलं, तर आपला प्रवास मजेत होईल.