शहरं
Join us  
Trending Stories
1
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
2
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
3
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
4
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
5
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
6
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
7
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
8
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
9
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
10
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
11
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
12
राहुल गांधींनी जर्मनीत उपस्थित केला 'व्होट चोरी'चा मुद्दा; देशाची बदनामी केल्याचा भाजपचा आरोप
13
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
14
भारतीय रेल्वेच नंबर १… चीन, रशिया, जपान देशांना धोबीपछाड दिली; नवा मोठा वर्ल्ड रेकॉर्ड केला!
15
सायबर भामट्यांकडून IPS अधिकाऱ्याला ८ कोटींना गंडा; १२ पानांच्या चिठ्ठीत सगळं लिहिलं अन्...
16
Prashant Jagtap: अजित पवारांसोबत जाण्याला विरोध का? प्रशांत जगतापांनी अखेर कारण सांगितलं, पुणेकरांचा मांडला मुद्दा
17
सोने, स्टॉक की बिटकॉइन? अब्जाधीश गुंतवणूकदार रे डॅलिओ यांनी निखिल कामतसोबत उलगडली गुपिते
18
अदानींच्या 'या' उद्योगासंदर्भात मोठी अपडेट, ₹62 चा शेअर खरेदी करण्यासाठी उडाली लोकांची झुंबड
19
राज्यातील महानगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेसचे ४० स्टार प्रचारक जाहीर; पाहा, संपूर्ण यादी
20
Palmistry: तुमच्या हातावरील 'शुक्र पर्वत' सांगतो विवाहसौख्याचे गुपित; खडतर जीवन की श्रीमंती?
Daily Top 2Weekly Top 5

Travel Tips: अनेक भुयारी मार्गांनी वेढलेला आहे 'हा' किल्ला, रहस्यांनी आहे भरलेला

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 2, 2022 18:55 IST

काही आजही उत्तम अवस्थेत आहेत तर काही मात्र भग्न झाले आहेत. अनेक किल्ले रहस्यमयी बनून राहिले आहेत. अश्या किल्ल्याबाबत आजही अनेकांच्या मनात भयाची भावना आहे.

भारत हा प्राचीन काळापासून राजेरजवाडे यांची भूमी राहिलेला देश आहे. सुरक्षा, शान शौकत यासाठी या सम्राटांनी, शासकांनी अनेक किल्ले बांधले होते. त्यातील काही आजही उत्तम अवस्थेत आहेत तर काही मात्र भग्न झाले आहेत. अनेक किल्ले रहस्यमयी बनून राहिले आहेत. अश्या किल्ल्याबाबत आजही अनेकांच्या मनात भयाची भावना आहे.

बिहारच्या रोहतास जिल्ह्यात असलेला शेरगढ हा असाच एक किल्ला. अफगाणी शासक शेरशहा सुरी याने पहाड कापून त्याच्या आत हा किल्ला बांधला होता. या किल्ल्यात शेकडो भुयारे आणि तहखाने असून त्याचे रहस्य आजही उलगडलेले नाही. या किल्ल्याबाबत अनेक कहाण्या सांगितल्या जातात. शत्रू पासून बचाव व्हावा यासाठी शेरशहा, त्याचा परिवार आणि १० हजार सैनिकांसह येथे राहत असे. सुरक्षेबरोबरच सर्व सुविधांनी हा किल्ला परिपूर्ण होता.

या किल्ल्याचे बांधकाम असे केले गेले होते की, कुठल्याही दिशेने शत्रू येत असेल तर १० किमी अंतरावरून सुद्धा शत्रू दिसत असे पण शत्रूला जवळ येईपर्यंत किल्ला दिसत नसे. या किल्ल्याच्या तीन बाजूला जंगल आणि एका बाजूला दुर्गावती नदी आहे. १५४० ते १५४५ या काळात शेरशहा येथे राहत होता. या किल्ल्यात शेकडो भुयारे असून त्याची माहिती फक्त शेरशहा आणि त्याच्या विश्वासू सैनिकांना होती. या किल्ल्यात प्रवेश करताना सुद्धा भुयारातून जावे लागत असे. संकट समयी सुखरूप निसटून जाताना भूयारांचा वापर होत असे.

१९४५ मध्ये शेरशहाचा मृत्यू झाला.१५७६ मध्ये मोंगलांनी या किल्ल्यावर हल्ला चढवून शेरशहाचे कुटुंब आणि सैनिकांना मारहाण करून ताब्यात घेतले.या किल्ल्यात मोठा खजिना असल्याचे सांगितले जाते पण अजूनही कुणाला त्या खजिन्याचा शोध घेता आलेला नाही. कारण येथील भुयारे आणि तहखाने यांचे जाळे असे विचित्र आहे की लोक आत जायलाच आजही घाबरतात.

टॅग्स :Travel Tipsट्रॅव्हल टिप्स