शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
2
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
3
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
4
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
5
गुजरात पोलिसांची मोठी कावाई! अहमदाबाद, सुरतमध्ये १ हजार बांगलादेशी ताब्यात
6
पर्यटकांवरील गोळीबाराच्या व्हिडीओंमुळे बेचैनी, अस्वस्थता वाढली, देशभरात नागरिकांमध्ये चिंता
7
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
8
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले
9
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
10
पाकिस्तानी दहशतवाद्यांना आता धास्ती 'अननोन गनमॅन'ची; दोन वर्षांत २० ते २५ अतिरेक्यांचा केला खात्मा
11
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
12
बिलावल बरळले; पाणी रोखले तर भारतीयांच्या रक्ताचे पाट वाहतील
13
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
14
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
15
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
16
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
17
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!
18
पाकिस्तानला पाण्यासाठी भीक मागायला लावायची असेल तर...
19
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
20
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा

Travel Tips: अनेक भुयारी मार्गांनी वेढलेला आहे 'हा' किल्ला, रहस्यांनी आहे भरलेला

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 2, 2022 18:55 IST

काही आजही उत्तम अवस्थेत आहेत तर काही मात्र भग्न झाले आहेत. अनेक किल्ले रहस्यमयी बनून राहिले आहेत. अश्या किल्ल्याबाबत आजही अनेकांच्या मनात भयाची भावना आहे.

भारत हा प्राचीन काळापासून राजेरजवाडे यांची भूमी राहिलेला देश आहे. सुरक्षा, शान शौकत यासाठी या सम्राटांनी, शासकांनी अनेक किल्ले बांधले होते. त्यातील काही आजही उत्तम अवस्थेत आहेत तर काही मात्र भग्न झाले आहेत. अनेक किल्ले रहस्यमयी बनून राहिले आहेत. अश्या किल्ल्याबाबत आजही अनेकांच्या मनात भयाची भावना आहे.

बिहारच्या रोहतास जिल्ह्यात असलेला शेरगढ हा असाच एक किल्ला. अफगाणी शासक शेरशहा सुरी याने पहाड कापून त्याच्या आत हा किल्ला बांधला होता. या किल्ल्यात शेकडो भुयारे आणि तहखाने असून त्याचे रहस्य आजही उलगडलेले नाही. या किल्ल्याबाबत अनेक कहाण्या सांगितल्या जातात. शत्रू पासून बचाव व्हावा यासाठी शेरशहा, त्याचा परिवार आणि १० हजार सैनिकांसह येथे राहत असे. सुरक्षेबरोबरच सर्व सुविधांनी हा किल्ला परिपूर्ण होता.

या किल्ल्याचे बांधकाम असे केले गेले होते की, कुठल्याही दिशेने शत्रू येत असेल तर १० किमी अंतरावरून सुद्धा शत्रू दिसत असे पण शत्रूला जवळ येईपर्यंत किल्ला दिसत नसे. या किल्ल्याच्या तीन बाजूला जंगल आणि एका बाजूला दुर्गावती नदी आहे. १५४० ते १५४५ या काळात शेरशहा येथे राहत होता. या किल्ल्यात शेकडो भुयारे असून त्याची माहिती फक्त शेरशहा आणि त्याच्या विश्वासू सैनिकांना होती. या किल्ल्यात प्रवेश करताना सुद्धा भुयारातून जावे लागत असे. संकट समयी सुखरूप निसटून जाताना भूयारांचा वापर होत असे.

१९४५ मध्ये शेरशहाचा मृत्यू झाला.१५७६ मध्ये मोंगलांनी या किल्ल्यावर हल्ला चढवून शेरशहाचे कुटुंब आणि सैनिकांना मारहाण करून ताब्यात घेतले.या किल्ल्यात मोठा खजिना असल्याचे सांगितले जाते पण अजूनही कुणाला त्या खजिन्याचा शोध घेता आलेला नाही. कारण येथील भुयारे आणि तहखाने यांचे जाळे असे विचित्र आहे की लोक आत जायलाच आजही घाबरतात.

टॅग्स :Travel Tipsट्रॅव्हल टिप्स