शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
2
इतिहासाची पुनरावृत्ती... तारीख, दिवस अन् घटनाही त्याच; ८४ वर्षापूर्वी घडलेले, सेम टू सेम...
3
'मनसेसोबत युती केली तरच फायदा होईल'; उद्धव ठाकरेंच्या बैठकीत राज ठाकरेंसोबत जाण्याचा 'सूर'
4
महापालिका निवडणुकीचे वारे वाहताच, उल्हासनगरात ठाकरेसेनेच्या पदाधिकाऱ्याच्या घरावर पेट्रोल टाकून पेटविण्याचा प्रयत्न
5
'आमच्यावर युद्ध लादले; आत्मसमर्पण करणार नाही', खमेनी यांचा इस्रायसह अमेरिकेलाही थेट इशारा
6
राजा रघुवंशी नव्हे, 'या' व्यक्तीशी होणार होतं सोनमचं लग्न, २५ गुणही जुळलेले! मग का मोडलं नातं? 
7
जिद्दीला सॅल्यूट! २३ वेळा अपयश पण मानली नाही हार; शेतकऱ्याचा लेक झाला असिस्टंट कमांडंट
8
आमच्या कार चालवायचे थांबवा! सिट्रोएनने C3 साठी युरोपमध्ये जारी केला इशारा
9
भाजपा सरकारच्या ‘या’ निर्णयाचे जयंत पाटलांनी केले स्वागत; गडकरींचा उल्लेख करत म्हणाले...
10
कुंडलीतच पतीच्या हत्येचा योग...! राजापूर्वी दुसऱ्याच मुलासोबत ठरलं होतं सोनमचं लग्न, पंडितजींनी वाचवलं
11
Ashadhi Ekadashi 2025: विठ्ठल नामोच्चारात हृदयविकार टाळण्याची ताकद? वैद्यकीय संशोधन सांगते...
12
उत्पन्न वाढलं, महागाईही नियंत्रणात पण खिशात पैसेच शिल्लक राहत नाहीत; बचत झाली कमी, कर्ज वाढली
13
Anaya Sanjay Bangar, IND vs ENG: अनाया बांगरचे वडील संजय बांगरने इंग्लंड दौऱ्यावर टीम इंडियाकडून केलेली धमाकेदार खेळी
14
Share Market Update : सलग दुसऱ्या दिवशी बाजार घसरला! निफ्टी बँक तेजीत, पण इतर ठिकाणी विक्रीचा जोर, पाहा आजचे आकडे!
15
नोकरीला कंटाळलात? फक्त २०,००० रुपयांमध्ये सुरू करा 'हे' ४ छोटे व्यवसाय, दरमहा बंपर कमाईची संधी!
16
Raj Kushwaha : "सोनमने तिच्या पतीला खाल्लं आणि आता..." असं म्हणणाऱ्या राजच्या आजीचा झाला मृत्यू
17
Glenn Maxwell Video: याला म्हणतात 'कमबॅक'... ग्लेन मॅक्सेवलने मारले तब्बल १३ षटकार, ४८ चेंडूत केलं शतक
18
सोशल मीडियावर व्हायरल झालेले खान सर निवडणूक लढवणार?,'आप'च्या संजय सिंह यांची भेट घेतली
19
२४ वर्षाच्या युवतीचा कारनामा, ८ बॉयफ्रेंडकडून लुटले २५ लाख; नवव्याला फसवणार होती, पण... 

Travel Tips: अनेक भुयारी मार्गांनी वेढलेला आहे 'हा' किल्ला, रहस्यांनी आहे भरलेला

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 2, 2022 18:55 IST

काही आजही उत्तम अवस्थेत आहेत तर काही मात्र भग्न झाले आहेत. अनेक किल्ले रहस्यमयी बनून राहिले आहेत. अश्या किल्ल्याबाबत आजही अनेकांच्या मनात भयाची भावना आहे.

भारत हा प्राचीन काळापासून राजेरजवाडे यांची भूमी राहिलेला देश आहे. सुरक्षा, शान शौकत यासाठी या सम्राटांनी, शासकांनी अनेक किल्ले बांधले होते. त्यातील काही आजही उत्तम अवस्थेत आहेत तर काही मात्र भग्न झाले आहेत. अनेक किल्ले रहस्यमयी बनून राहिले आहेत. अश्या किल्ल्याबाबत आजही अनेकांच्या मनात भयाची भावना आहे.

बिहारच्या रोहतास जिल्ह्यात असलेला शेरगढ हा असाच एक किल्ला. अफगाणी शासक शेरशहा सुरी याने पहाड कापून त्याच्या आत हा किल्ला बांधला होता. या किल्ल्यात शेकडो भुयारे आणि तहखाने असून त्याचे रहस्य आजही उलगडलेले नाही. या किल्ल्याबाबत अनेक कहाण्या सांगितल्या जातात. शत्रू पासून बचाव व्हावा यासाठी शेरशहा, त्याचा परिवार आणि १० हजार सैनिकांसह येथे राहत असे. सुरक्षेबरोबरच सर्व सुविधांनी हा किल्ला परिपूर्ण होता.

या किल्ल्याचे बांधकाम असे केले गेले होते की, कुठल्याही दिशेने शत्रू येत असेल तर १० किमी अंतरावरून सुद्धा शत्रू दिसत असे पण शत्रूला जवळ येईपर्यंत किल्ला दिसत नसे. या किल्ल्याच्या तीन बाजूला जंगल आणि एका बाजूला दुर्गावती नदी आहे. १५४० ते १५४५ या काळात शेरशहा येथे राहत होता. या किल्ल्यात शेकडो भुयारे असून त्याची माहिती फक्त शेरशहा आणि त्याच्या विश्वासू सैनिकांना होती. या किल्ल्यात प्रवेश करताना सुद्धा भुयारातून जावे लागत असे. संकट समयी सुखरूप निसटून जाताना भूयारांचा वापर होत असे.

१९४५ मध्ये शेरशहाचा मृत्यू झाला.१५७६ मध्ये मोंगलांनी या किल्ल्यावर हल्ला चढवून शेरशहाचे कुटुंब आणि सैनिकांना मारहाण करून ताब्यात घेतले.या किल्ल्यात मोठा खजिना असल्याचे सांगितले जाते पण अजूनही कुणाला त्या खजिन्याचा शोध घेता आलेला नाही. कारण येथील भुयारे आणि तहखाने यांचे जाळे असे विचित्र आहे की लोक आत जायलाच आजही घाबरतात.

टॅग्स :Travel Tipsट्रॅव्हल टिप्स