शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्याचे तीन महिने आचारसंहितेत; ‘झेडपी’मध्ये याचिकांचाच अडसर
2
आजचे राशीभविष्य- १८ सप्टेंबर २०२५: नोकरी- व्यवसायात अडचणी येतील; अनपेक्षित घटना घडण्याची शक्यता
3
तीस जिल्ह्यांत १७ लाख हेक्टरवरील पिकांची माती; अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका नांदेड जिल्ह्याला
4
लोकशाहीचा पाचोळा होऊ नये !... तर लोकशाही केवळ नावापुरती उरेल
5
‘गर्व से कहो यह स्वदेशी हैं’ प्रत्येक दुकानावर फलक लावा ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा दिला स्वदेशीचा नारा
6
नोकरीच्या नावाखाली बनवले ‘गुलाम’, थायलंडमध्ये नोकरीचे आमिष दाखवून केली फसवणूक
7
उपराष्ट्रपतींची निवडणूक : ‘कोऱ्या’ मतपत्रिकांचे रहस्य!
8
एअर इंडिया अपघाताची सरकारने चौकशी करावी; माझ्या मुलावर बट्टा नको, सुमितच्या वडिलांची मागणी
9
मृतदेहाची ‘डोली’तून दोन किमी फरपट, मृत्यूनंतरही अवहेलना
10
देशातील दोनच राज्यांत त्रिभाषा सूत्र, हिंदी सक्तीवरून वाद; नरेंद्र जाधव समितीची पहिली बैठक संपन्न; जनमत जाणून देणार अहवाल
11
विरार-डहाणू रोडदरम्यान सात स्टेशन; चौपदरीकरणामुळे गर्दी टाळण्यास मदत
12
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
13
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच
14
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
15
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
16
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
17
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
18
Asia Cup 2025 : दुबईत 'सिंग इज किंग' शो! PAK विरुद्ध UAE च्या ताफ्यातून सिमरनजीतचा भांगडा
19
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
20
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख

विकेन्डला धमाल-मस्ती करण्यासाठी खास वन-डे डेस्टिनेशन!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 22, 2018 11:50 IST

आम्ही मुंबई-ठाण्याजवळील काही खास ठिकाणांची माहिती घेऊन आलो आहोत. या ठिकाणांना भेट देऊन तुम्ही एका दिवसात परत येऊ शकता. 

सध्या सगळीकडे पावसाला जोरदार सुरुवात झाली आहे. मुंबई-ठाण्यातही पाऊस सुरु आहे. त्यामुळे विकेंडला ट्रिपला जाण्याचा प्लॅन अनेकांच्या डोक्यात सुरु असेल. त्यामुळे आम्ही मुंबई-ठाण्याजवळील काही खास ठिकाणांची माहिती घेऊन आलो आहोत. या ठिकाणांना भेट देऊन तुम्ही एका दिवसात परत येऊ शकता. 

१) बारवी डॅम –

ठाणे जिल्ह्यातील बदलापूर जवऴील बारवी डॅमला पावसाळ्यात फारच गर्दी असते. धरणात जायला बंदी असली तरी आजूबाजूचा परिसर पावसाळ्यात बहरून जातो. त्यामुळे पावसात तुम्ही इथे भरपूर एन्जॉय करु शकता.

2) जयसागर डॅम-

धरणाच्या भिंतीवरील पाण्यात भीजायचे असेल तर जव्हारला जायला हवे. जव्हार म्हणजे ठाणे जिल्ह्याचे महाबळेश्वरच. ठाणे ते जव्हार हे अंतर सुमारे १०० किमी आहे. पावसाळ्यात दाट धुक्यात जव्हार हरवून जातं. जव्हारला पाणी पुरवठा करणारा जयसागर डॅम पावसाळ्यात भरून वाहू लागतो. 

3) पेल्हार

अहमदाबाद हायवेवर वसई विरार दरम्यान पेल्हार गाव आहे. पेल्हार गावाजवळ असलेल्या छोट्या धरणातून पाणी भरभरून वाहू लागतं. तेव्हा पर्यटकांची तेथे गर्दी उसळते. वसई-विरारहून एसटी किंवा रिक्षाने पेल्हारला जाता येतं. 

4) दाभोसा धबधबा

जव्हार तालुक्यातला हा धबधबा म्हणजे पावसाळ्यात पर्यंटकांचे मोठे आकर्षण ठरले आहे. शेतमाळ, सनसेट पॉईंट, हनुमान पॉईंट, जयविलास पॅलेस अशी अनेक सौंदर्यस्थळ इथे असून रस्त्यालगत अनेक छोटे  धबधबे आहेत. दाभोसा धबधबा हे पर्यटकांचे प्रमुख आकर्षण असून या धबधब्यातून बाराही महिने पाणी वाहतं. 

5) कुंडेश्वर धबधबा

(Image Credit : www.indiamike.com)

बदलापूर -कर्जत मुख्य महामार्गावर खरवई गावात येताच कोंडेश्वरकडे जाणारा एक मार्ग लागतो. दहिवली गावाची वेस ओलांडली की समोरं दिसतं थक्क करणारं, डोळ्यांना आणि मनालाही सुखावणारं दृश्य. डोंगर कपारीतून वाहणारे झरे, हिरव्यागार वनराजीतून फेसाळत कोसळणारे धबधबे, हिरवीगार भातशेतीची खाचरं, रिमझिमणारा पाऊस आणि दुस-या बाजुला ताठ मानेनं डौलत उभी असलेली सह्याद्रीची पर्वतरांग. सारं काही मनाचा, शरिराचा थकवा घालवणारं असंच.

टॅग्स :Travelप्रवासMumbaiमुंबई