शहरं
Join us  
Trending Stories
1
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
2
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
3
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
4
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
7
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
8
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
9
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
10
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
11
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
12
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
13
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
14
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
15
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
16
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
17
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
18
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
19
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
20
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
Daily Top 2Weekly Top 5

विकेन्डला धमाल-मस्ती करण्यासाठी खास वन-डे डेस्टिनेशन!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 22, 2018 11:50 IST

आम्ही मुंबई-ठाण्याजवळील काही खास ठिकाणांची माहिती घेऊन आलो आहोत. या ठिकाणांना भेट देऊन तुम्ही एका दिवसात परत येऊ शकता. 

सध्या सगळीकडे पावसाला जोरदार सुरुवात झाली आहे. मुंबई-ठाण्यातही पाऊस सुरु आहे. त्यामुळे विकेंडला ट्रिपला जाण्याचा प्लॅन अनेकांच्या डोक्यात सुरु असेल. त्यामुळे आम्ही मुंबई-ठाण्याजवळील काही खास ठिकाणांची माहिती घेऊन आलो आहोत. या ठिकाणांना भेट देऊन तुम्ही एका दिवसात परत येऊ शकता. 

१) बारवी डॅम –

ठाणे जिल्ह्यातील बदलापूर जवऴील बारवी डॅमला पावसाळ्यात फारच गर्दी असते. धरणात जायला बंदी असली तरी आजूबाजूचा परिसर पावसाळ्यात बहरून जातो. त्यामुळे पावसात तुम्ही इथे भरपूर एन्जॉय करु शकता.

2) जयसागर डॅम-

धरणाच्या भिंतीवरील पाण्यात भीजायचे असेल तर जव्हारला जायला हवे. जव्हार म्हणजे ठाणे जिल्ह्याचे महाबळेश्वरच. ठाणे ते जव्हार हे अंतर सुमारे १०० किमी आहे. पावसाळ्यात दाट धुक्यात जव्हार हरवून जातं. जव्हारला पाणी पुरवठा करणारा जयसागर डॅम पावसाळ्यात भरून वाहू लागतो. 

3) पेल्हार

अहमदाबाद हायवेवर वसई विरार दरम्यान पेल्हार गाव आहे. पेल्हार गावाजवळ असलेल्या छोट्या धरणातून पाणी भरभरून वाहू लागतं. तेव्हा पर्यटकांची तेथे गर्दी उसळते. वसई-विरारहून एसटी किंवा रिक्षाने पेल्हारला जाता येतं. 

4) दाभोसा धबधबा

जव्हार तालुक्यातला हा धबधबा म्हणजे पावसाळ्यात पर्यंटकांचे मोठे आकर्षण ठरले आहे. शेतमाळ, सनसेट पॉईंट, हनुमान पॉईंट, जयविलास पॅलेस अशी अनेक सौंदर्यस्थळ इथे असून रस्त्यालगत अनेक छोटे  धबधबे आहेत. दाभोसा धबधबा हे पर्यटकांचे प्रमुख आकर्षण असून या धबधब्यातून बाराही महिने पाणी वाहतं. 

5) कुंडेश्वर धबधबा

(Image Credit : www.indiamike.com)

बदलापूर -कर्जत मुख्य महामार्गावर खरवई गावात येताच कोंडेश्वरकडे जाणारा एक मार्ग लागतो. दहिवली गावाची वेस ओलांडली की समोरं दिसतं थक्क करणारं, डोळ्यांना आणि मनालाही सुखावणारं दृश्य. डोंगर कपारीतून वाहणारे झरे, हिरव्यागार वनराजीतून फेसाळत कोसळणारे धबधबे, हिरवीगार भातशेतीची खाचरं, रिमझिमणारा पाऊस आणि दुस-या बाजुला ताठ मानेनं डौलत उभी असलेली सह्याद्रीची पर्वतरांग. सारं काही मनाचा, शरिराचा थकवा घालवणारं असंच.

टॅग्स :Travelप्रवासMumbaiमुंबई