शहरं
Join us  
Trending Stories
1
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
2
एपस्टीन फाईल्समधून ट्रम्प यांचं नाव गायब; माजी राष्ट्रपती बिल क्लिंटन यांचे अनेक फोटो समोर
3
२०४७ चं स्वप्न आणि कटू सत्य, आकडेवारी भारतासोबत नाही; RBI च्या माजी गव्हर्नरांनी उपस्थित केले प्रश्न
4
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
5
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
6
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
7
"त्यांची समजूत घालायला २ वर्ष लागली...", सोनाक्षी-जहीरच्या नात्याबद्दल पूनम सिन्हांचा खुलासा
8
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
9
ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
10
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
11
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
12
'सनबर्न'मध्ये मद्यसेवनास परवानगी कशी? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल
13
शिल्पांतला 'राम' हरपला! पाषाणाला जिवंतपणा देणारा महान कलाकार काळाच्या पडद्याआड
14
मन शांत, बुद्धी तीक्ष्ण, हृदय कोमल करणारे ध्यान! नकारात्मकतेकडून उत्साहाकडे...
15
उजव्या हाताच्या कोवळ्या अंगठ्यांना 'सक्ती'चा आराम! ऑस्ट्रेलियाचा धडा भारत गिरवणार का?
16
नगरपरिषद निवडणुकीचा आज दुसरा टप्पा; रविवारी सर्व निकाल
17
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
18
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
19
आमचे ९०० कोटी रुपये परत द्या! इंडिगोची कोर्टात धाव; कस्टम्स विभागाकडून मागितले हायकोर्टाने उत्तर
20
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
Daily Top 2Weekly Top 5

हे आहे भारतीय सीमेवरील सर्वात शेवटचं गाव, अॅडव्हेंचरचा अनुभव घेण्यासाठी खास डेस्टिनेशन!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 16, 2018 17:20 IST

या गावात केवळ बर्फाने माखलेले डोंगरच नाहीतर हिरवाईने सजलेले मैदानही आहेत. तुम्ही जर फिरायला जाण्यासाठी अशाच वेगळ्या डेस्टिनेशनचा शोध घेत असाल तर या गावाला तुम्ही भेट देऊ शकता. 

भारतासारख्या देशात हजारो गावे असतील. पण यातील काहीच गावे हे चर्चेचा विषय ठरतात. सर्वांनाच सर्वी गाबे बघायला मिळतात असेही नाही. पण कधी ना कधी कुणाच्यातरी डोक्यात हा विचार आलाच असेल की, भारतातील शेवटचं गाव कोणतं आणि कुठे आहे? आज आम्ही तुम्हाला भारतीय सीमेवरील सर्वात शेवटचं गाव कोणतं आहे त्याबाबत सांगणार आहोत. या गावात केवळ बर्फाने माखलेले डोंगरच नाहीतर हिरवाईने सजलेले मैदानही आहेत. तुम्ही जर फिरायला जाण्यासाठी अशाच वेगळ्या डेस्टिनेशनचा शोध घेत असाल तर या गावाला तुम्ही भेट देऊ शकता. 

तिबेटच्या सीमेवर आहे हे भारतातील शेवटचं गाव

भारत आणि तिबेटच्या सीमेवर वसलेलं छितकुल हे नैसर्गिक सौंदर्याने सजलेलं आहे. खळखळून वाहणारी नदी, उंचच उंच डोंगर, हिरवीगार झाडे असे इथे चित्र आहे. समुद्र सपाटीपासून हे गाव 3450 मीटर ऊंचीवर आहे. भारतीय सीमेवरील शेवट्या गावांमध्ये या गावाचा समावेश आहे. 

हिमाचल मार्गे किन्नोर जिल्ह्यातील बास्पा घाटातून तुम्ही या गावात जाऊ शकता. बास्पा नदीच्या तटावर या गावातील स्थानिक देवीची तीन मंदिरे बघायला मिळतात. या गावाला किन्नोर जिल्ह्याला क्राऊनही म्हटलं जातं. हिमाचल प्रदेशची राजधानी शिमलापासून हे गाव 250 किमी अंतरावर आहे. 

रोमांचक प्रवास

नारकंडा ते रामपूर, सराहन,वागंटु, करच्छमा, सांगला मार्गे डोंगर रांगातून तुम्ही इथे पोहोचू शकता. इथे ड्रायव्हिंग करणे फारच कठीण आहे. या मार्गावरुन जाताना तुम्हाला बर्फाने वेढलेले डोंगर बघायला मिळतील. डोंगरांमधून निघणाऱ्या छोट्या छोट्या धारा बास्पा नदीला जाऊन मिळतात. 

ट्रेकर्ससाठी खास आहे ही जागा

जे लोक ट्रेकिंगचे शौकीन आहेत त्यांच्यासाठी ही जागा फारच चांगली आहे. सांगला व्हॅलीच्या कामरु गावात 2600 मीटर उंचीवर कामरु फोर्ट आहे. हा फोर्ट साधारण 15व्या शतकातील आहे. लाकडांनी तयार करण्यात आलेला हा फोर्ट फार सुंदर नक्शीकामाने सजला आहे. या फोर्टवर जाण्यासाठी 500 मीटर अंतर पायी चालावं लागतं. 

टॅग्स :Travelप्रवासtourismपर्यटन