शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
2
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
3
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
4
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
5
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!
6
पाकिस्तानला पाण्यासाठी भीक मागायला लावायची असेल तर...
7
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
8
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
9
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
10
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
11
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
12
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
13
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
14
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
15
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
16
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
17
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
18
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
19
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
20
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...

हे आहे भारतीय सीमेवरील सर्वात शेवटचं गाव, अॅडव्हेंचरचा अनुभव घेण्यासाठी खास डेस्टिनेशन!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 16, 2018 17:20 IST

या गावात केवळ बर्फाने माखलेले डोंगरच नाहीतर हिरवाईने सजलेले मैदानही आहेत. तुम्ही जर फिरायला जाण्यासाठी अशाच वेगळ्या डेस्टिनेशनचा शोध घेत असाल तर या गावाला तुम्ही भेट देऊ शकता. 

भारतासारख्या देशात हजारो गावे असतील. पण यातील काहीच गावे हे चर्चेचा विषय ठरतात. सर्वांनाच सर्वी गाबे बघायला मिळतात असेही नाही. पण कधी ना कधी कुणाच्यातरी डोक्यात हा विचार आलाच असेल की, भारतातील शेवटचं गाव कोणतं आणि कुठे आहे? आज आम्ही तुम्हाला भारतीय सीमेवरील सर्वात शेवटचं गाव कोणतं आहे त्याबाबत सांगणार आहोत. या गावात केवळ बर्फाने माखलेले डोंगरच नाहीतर हिरवाईने सजलेले मैदानही आहेत. तुम्ही जर फिरायला जाण्यासाठी अशाच वेगळ्या डेस्टिनेशनचा शोध घेत असाल तर या गावाला तुम्ही भेट देऊ शकता. 

तिबेटच्या सीमेवर आहे हे भारतातील शेवटचं गाव

भारत आणि तिबेटच्या सीमेवर वसलेलं छितकुल हे नैसर्गिक सौंदर्याने सजलेलं आहे. खळखळून वाहणारी नदी, उंचच उंच डोंगर, हिरवीगार झाडे असे इथे चित्र आहे. समुद्र सपाटीपासून हे गाव 3450 मीटर ऊंचीवर आहे. भारतीय सीमेवरील शेवट्या गावांमध्ये या गावाचा समावेश आहे. 

हिमाचल मार्गे किन्नोर जिल्ह्यातील बास्पा घाटातून तुम्ही या गावात जाऊ शकता. बास्पा नदीच्या तटावर या गावातील स्थानिक देवीची तीन मंदिरे बघायला मिळतात. या गावाला किन्नोर जिल्ह्याला क्राऊनही म्हटलं जातं. हिमाचल प्रदेशची राजधानी शिमलापासून हे गाव 250 किमी अंतरावर आहे. 

रोमांचक प्रवास

नारकंडा ते रामपूर, सराहन,वागंटु, करच्छमा, सांगला मार्गे डोंगर रांगातून तुम्ही इथे पोहोचू शकता. इथे ड्रायव्हिंग करणे फारच कठीण आहे. या मार्गावरुन जाताना तुम्हाला बर्फाने वेढलेले डोंगर बघायला मिळतील. डोंगरांमधून निघणाऱ्या छोट्या छोट्या धारा बास्पा नदीला जाऊन मिळतात. 

ट्रेकर्ससाठी खास आहे ही जागा

जे लोक ट्रेकिंगचे शौकीन आहेत त्यांच्यासाठी ही जागा फारच चांगली आहे. सांगला व्हॅलीच्या कामरु गावात 2600 मीटर उंचीवर कामरु फोर्ट आहे. हा फोर्ट साधारण 15व्या शतकातील आहे. लाकडांनी तयार करण्यात आलेला हा फोर्ट फार सुंदर नक्शीकामाने सजला आहे. या फोर्टवर जाण्यासाठी 500 मीटर अंतर पायी चालावं लागतं. 

टॅग्स :Travelप्रवासtourismपर्यटन