शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
2
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
3
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
4
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
5
लेकीच्या डोईवर अक्षता टाकून वधुपित्याने लग्न मांडवातच सोडले प्राण
6
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
7
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
8
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
9
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
10
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
11
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
12
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
13
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
14
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?
15
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
16
ड्रग्जमाफियांनी पोखरली मुंबई विमानतळाची सुरक्षा; ड्रग्जचे पार्सल करायचे क्लिअर : कस्टम अधीक्षकासह दोन पोलिसांना अटक
17
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
18
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
19
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
20
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  

बालाजी मंदिराची गूढ कहाणी; इथला प्रसाद खाण्याबाबतही आहे अजब श्रद्धा (की अंधश्रद्धा?)

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 26, 2019 18:20 IST

मेहंदीपूर बालाजी हनुमानाच्या भक्तांसाठी एक प्रसिद्ध तीर्थक्षेत्र आहे. त्याचबरोबर ज्या व्यक्ती भूत आणि प्रेत यांसारख्या अंधश्रद्धांवर विश्वास ठेवतात. त्यांच्यासाठी हे एका मुक्ती स्थळाप्रमाणे आहे.

मेहंदीपूर बालाजी हनुमानाच्या भक्तांसाठी एक प्रसिद्ध तीर्थक्षेत्र आहे. त्याचबरोबर ज्या व्यक्ती भूत आणि प्रेत यांसारख्या अंधश्रद्धांवर विश्वास ठेवतात. त्यांच्यासाठी हे एका मुक्ती स्थळाप्रमाणे आहे. दररोज येथे मोठ्या संख्येमध्ये भूत, प्रेम आणि वाईट शक्ती दूर करण्यासाठी अनेक लोक येत असतात. या मंदिरामध्ये प्रेतराज सरकार आणि भैरवबाबा म्हणजेच कोतवाल कॅप्टनची मूर्ती आहे. प्रत्येक दिवशी 2 वाजता प्रेतराज सरकार यांच्या दरबारामध्ये पेशी म्हणजेच किर्तन करण्यात येतं. या किर्तनामध्ये लोकांवर असलेल्या वाईट शक्तींना दूर करण्यात येतं, असा समज आहे. 

काय आहे या मंदिराची वैशिष्ट्य?

राजस्थानातील दौसा जिल्ह्यामधील दोन डोंगरांमध्ये मेहंदीपूर बालाजीचं मंदिर आहे. येथे तुम्हाला अनेक विचित्र प्रकार पाहायला मिळतात. तेथे घडणाऱ्या सर्व गोष्टी पहिल्यांदा पाहून तुम्हीही हैराण व्हाल आणि घाबरूनही जाल. खरं तर विज्ञानाचा भूत-प्रेत यांसारख्या गोष्टींवर अजिबात विश्वास नाही तरिही, येथे दरदिवशी अनेक लोक भूत-प्रेत आणि वाईट शक्तींपासून मुक्ती मिळवण्यासाठी येत असतात. 

जाणून घेऊयात येथील काही नियम

मेहंदीपुर बालाजीची मूर्तीच्या समोर राम आणि सीतेची मूर्ती आहे. तसेच या मंदिरामध्ये बाल हनुमानाचीही मूर्ती आहे. येथे येणाऱ्या अनेक भक्तांना येथील काही नियमांचे पालन करणं गरजेचं आहे. अशा लोकांसाठी कमीत कमी एक आठवड्यापर्यंत लसूण, कांदा, अंडी, मांस, मद्यपान यांसारख्या पदार्थांचं सेवन करणं बंद करावं लागतं. 

या मंदिरात प्रसाद खाऊ शकत नाही

मेहंदीपूर बालाजी मंदिरातील कोणताही प्रसाद तुम्ही खाऊ शकत नाही आणि कोणाला देऊही शकत नाही. एवढचं नाही तर येथील प्रसाद तुम्ही घरीही घेऊन जाऊ शकत नाही. तसेच कोणतीही खाण्याचा पदार्थ आणि सुगंधित पदार्थ तुम्ही येथून घरी घेऊन जाऊ शकत नाही. असं सांगण्यात येतं की, जर तुम्ही प्रसाद खाल्ला तर वाईट शक्ती दूर होत नाहीत. 

असं पोहचू शकता मेहंदीपूर बालाजी मंदिरापर्यंत 

जर तुम्ही दिल्ली-एनसीआरपासून ट्रेनद्वारे मेहंदीपूर बालाजी जाण्याचा विचार करत असाल तर येथून मेहंदीपूरसाठी कोणतीही डायरेक्ट ट्रेन नाही. मेंहदीपूरचं सर्वात जवळचं रेल्वे स्टेशन बांदीकुई आहे. जे मेहंदीपूरपासून 36 किलोमीटर अंतरावर आहे. येथून टॅक्सी बुक करून तुम्ही बालाजी मंदिरापर्यंत पोहोचू शकता. 

रस्तेमार्गे 

जर तुम्ही तुमची स्वतःची गाडी घेऊन जाण्यार असाल तर बालाजीच्या दर्शनासाठी एनएच 352, ताज एक्सप्रेस हायवे किंवा यमुना एक्सप्रेस हायवेपासून जाऊ शकता. या मार्गांवरून तुम्हाला मंदिरापर्यंत पोहोचण्यासाठी जवळपास 6 तास लागतात. दिल्लीपासून दौसापर्यंत तुम्ही बसनेही प्रवास करू शकता. 

टॅग्स :Travel Tipsट्रॅव्हल टिप्सIndiaभारतRajasthanराजस्थान