शहरं
Join us  
Trending Stories
1
'ते विधान राहुल गांधींचे नाही, मी परस्परच..."; वकिलाचा यू-टर्न, जिवाला धोका असल्याच्या वक्तव्याबद्दल काय बोलले?
2
Arjun Tendulkar Engagement :अर्जुन तेंडुलकरची होणारी बायको, साराची खास मैत्रिण; सानिया चांडोकचे फोटो पाहा
3
Arjun Tendulkar Engagement : चांडोकांची लेक होणार सचिन तेंडुलकरची सून; मुंबईत पार पडला अर्जुन सानियाचा साखरपुडा
4
पुण्यात वाहतूक पोलीस आणि कॅब चालक यांच्यात वाद; शिवीगाळ करत मारहाण केली; व्हिडीओ व्हायरल
5
कबुतरखाने प्रकरणात राज ठाकरेंना साकडे; पण बाळा नांदगावकर स्पष्टच बोलले, कुणाला सुनावले?
6
धक्कादायक! जमिनीच्या वादातून भर चौकात नवरा-बायकोला संपवले; कोयत्याने वार
7
महायुतीत समन्वय समितीच्या बैठका वेळेवर होत नाही, महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे नी दिली कबुली
8
'आमचे कोणतेही लष्करी मित्र नाहीत, फक्त भारतीय नौदलाकडे धाडस'; फिलिपिन्सच्या राजदूतांची पाश्चात्य देशांवर टीका
9
Fatehpur Tomb Controversy: ज्यांच्या मकबऱ्यामध्ये मंदिर असल्याचा दावा, ते नवाब अब्दुल समद कोण?
10
RR नं संजूच्या बदल्यात जड्डू अन् ऋतुराजला मागितले! CSK ला ते अजिबात नाही पटलं; ट्रेड डील फिस्कटली
11
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी 'ऑपरेशन सिंदूर' आणि 'स्वदेशी' विषयी जनजागृती करावी - CM देवेंद्र फडणवीस
12
Video: राहुल गांधींची 'मृत' लोकांसोबत 'चाय पे चर्चा', निवडणूक आयोगाने मारल्याचा आरोप...
13
गणेशोत्सवासाठी कोकणवासीयांना खुशखबर! मुंबई-गोवा महामार्गाबाबत धडक कारवाईचे आदेश
14
"हा वादाचा नव्हे, समाजाचा विषय; आरोग्य अन् आस्था..."; CM फडणवीसांचे कबुतरखाना वादावर विधान
15
Trump's Tariff Policy : ट्रम्प यांचा डाव उलटला! टॅरिफमुळे भारत अन् चीन एकत्र आले; अमेरिकेने स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारली?
16
निशिकांत दुबेला भाजपा नेत्यानेच कशी दिली मात?; कॉन्स्टिट्यूशन क्लब निवडणुकीत तोंडावर पाडले
17
Palghar Crime: धक्का लागला म्हणून कुऱ्हाडीने केले वार, लोकांनी झाडाला बांधून आरोपी चोपला
18
चहलला जळवण्यासाठी बिग बॉस विनरसोबत थिरकली धनश्री? व्हायरल व्हिडिओ मागची गोष्ट
19
"आम्हाला नाही माहीत, पाकिस्तानला...!"; ऑपरेशन सिंदूर दरम्यान एफ-१६ लढाऊ विमान पाडलं गेलं? अमेरिकेनं दिलं असं उत्तर
20
सावरकरांवरील विधानांमुळे माझ्या जीवितास धोका, राहुल गांधींचा दावा, महात्मा गांधींचा उल्लेख करत म्हणाले... 

बालाजी मंदिराची गूढ कहाणी; इथला प्रसाद खाण्याबाबतही आहे अजब श्रद्धा (की अंधश्रद्धा?)

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 26, 2019 18:20 IST

मेहंदीपूर बालाजी हनुमानाच्या भक्तांसाठी एक प्रसिद्ध तीर्थक्षेत्र आहे. त्याचबरोबर ज्या व्यक्ती भूत आणि प्रेत यांसारख्या अंधश्रद्धांवर विश्वास ठेवतात. त्यांच्यासाठी हे एका मुक्ती स्थळाप्रमाणे आहे.

मेहंदीपूर बालाजी हनुमानाच्या भक्तांसाठी एक प्रसिद्ध तीर्थक्षेत्र आहे. त्याचबरोबर ज्या व्यक्ती भूत आणि प्रेत यांसारख्या अंधश्रद्धांवर विश्वास ठेवतात. त्यांच्यासाठी हे एका मुक्ती स्थळाप्रमाणे आहे. दररोज येथे मोठ्या संख्येमध्ये भूत, प्रेम आणि वाईट शक्ती दूर करण्यासाठी अनेक लोक येत असतात. या मंदिरामध्ये प्रेतराज सरकार आणि भैरवबाबा म्हणजेच कोतवाल कॅप्टनची मूर्ती आहे. प्रत्येक दिवशी 2 वाजता प्रेतराज सरकार यांच्या दरबारामध्ये पेशी म्हणजेच किर्तन करण्यात येतं. या किर्तनामध्ये लोकांवर असलेल्या वाईट शक्तींना दूर करण्यात येतं, असा समज आहे. 

काय आहे या मंदिराची वैशिष्ट्य?

राजस्थानातील दौसा जिल्ह्यामधील दोन डोंगरांमध्ये मेहंदीपूर बालाजीचं मंदिर आहे. येथे तुम्हाला अनेक विचित्र प्रकार पाहायला मिळतात. तेथे घडणाऱ्या सर्व गोष्टी पहिल्यांदा पाहून तुम्हीही हैराण व्हाल आणि घाबरूनही जाल. खरं तर विज्ञानाचा भूत-प्रेत यांसारख्या गोष्टींवर अजिबात विश्वास नाही तरिही, येथे दरदिवशी अनेक लोक भूत-प्रेत आणि वाईट शक्तींपासून मुक्ती मिळवण्यासाठी येत असतात. 

जाणून घेऊयात येथील काही नियम

मेहंदीपुर बालाजीची मूर्तीच्या समोर राम आणि सीतेची मूर्ती आहे. तसेच या मंदिरामध्ये बाल हनुमानाचीही मूर्ती आहे. येथे येणाऱ्या अनेक भक्तांना येथील काही नियमांचे पालन करणं गरजेचं आहे. अशा लोकांसाठी कमीत कमी एक आठवड्यापर्यंत लसूण, कांदा, अंडी, मांस, मद्यपान यांसारख्या पदार्थांचं सेवन करणं बंद करावं लागतं. 

या मंदिरात प्रसाद खाऊ शकत नाही

मेहंदीपूर बालाजी मंदिरातील कोणताही प्रसाद तुम्ही खाऊ शकत नाही आणि कोणाला देऊही शकत नाही. एवढचं नाही तर येथील प्रसाद तुम्ही घरीही घेऊन जाऊ शकत नाही. तसेच कोणतीही खाण्याचा पदार्थ आणि सुगंधित पदार्थ तुम्ही येथून घरी घेऊन जाऊ शकत नाही. असं सांगण्यात येतं की, जर तुम्ही प्रसाद खाल्ला तर वाईट शक्ती दूर होत नाहीत. 

असं पोहचू शकता मेहंदीपूर बालाजी मंदिरापर्यंत 

जर तुम्ही दिल्ली-एनसीआरपासून ट्रेनद्वारे मेहंदीपूर बालाजी जाण्याचा विचार करत असाल तर येथून मेहंदीपूरसाठी कोणतीही डायरेक्ट ट्रेन नाही. मेंहदीपूरचं सर्वात जवळचं रेल्वे स्टेशन बांदीकुई आहे. जे मेहंदीपूरपासून 36 किलोमीटर अंतरावर आहे. येथून टॅक्सी बुक करून तुम्ही बालाजी मंदिरापर्यंत पोहोचू शकता. 

रस्तेमार्गे 

जर तुम्ही तुमची स्वतःची गाडी घेऊन जाण्यार असाल तर बालाजीच्या दर्शनासाठी एनएच 352, ताज एक्सप्रेस हायवे किंवा यमुना एक्सप्रेस हायवेपासून जाऊ शकता. या मार्गांवरून तुम्हाला मंदिरापर्यंत पोहोचण्यासाठी जवळपास 6 तास लागतात. दिल्लीपासून दौसापर्यंत तुम्ही बसनेही प्रवास करू शकता. 

टॅग्स :Travel Tipsट्रॅव्हल टिप्सIndiaभारतRajasthanराजस्थान