शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

आयुष्यभरासाठी स्मरणात राहील देशातील या ५ रोडवरील प्रवास

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 18, 2018 14:17 IST

रोड ट्रिपची आवड आहे त्यांच्यासाठी आम्ही काही खास रोडची माहीत घेऊन आलो आहोत. हे हायवेंना भारतातील सर्वात सुंदर हायवे मानले जाते.

असे म्हणतात की, रस्ता सुंदर असला तर प्रवास चांगला होतो. प्रत्येकाची प्रवासाची वेगळी आवड असते. कुणाला हिरवीगार झाडे आणि डोंगर बघत ट्रेनने प्रवास करायचा असतो तर काहींना बाइकने प्रवास करणे पसंत असतं. ज्यांना रोड ट्रिपची आवड आहे त्यांच्यासाठी आम्ही काही खास रोडची माहीत घेऊन आलो आहोत. हे हायवेंना भारतातील सर्वात सुंदर हायवे मानले जाते. या रस्त्यांवरुन प्रवास करणे तुमच्यासाठी यादगार होईल. 

१) मनाली ते लेह

कदाचित या रोडवरून केलेल्या प्रवासाला भारतातील सर्वात सुंदर प्रवास म्हणता येईल. या रोडवरून प्रवास करणे तुमच्यासाठी फार वेगळा अनुभव असेल. बर्फाने झाकलेले उंचच उंच डोंगर आणि रस्ता तुमचा हा प्रवास नेहमीसाठी यादगार करेल. तसा तर लेहला जाण्यासाठीचा रस्ता वर्षातून केवळ ५ महिन्यांसाठीच खुला असतो. पण तरीही एकदा हा रस्त्यावरील प्रवास अनुभवायला हवा.  

२) मुंबई ते पुणे

मुंबई ते पुणे हा प्रवासही अनेक सुंदर प्रवासांपैकी एक मानला जातो. कारण या रस्त्याने जाताना सुंदर डोंगर-दऱ्या, लोणावळा-खंडाळा घाट तुम्हाला वेगळाच अनुभव देतो. मुंबईच्या गर्दीतून दूर जरा मोकळा श्वास घेण्यासाठी विकेंडला तुम्ही या रस्त्यावर प्रवास करू शकता. खासकरून पावसाळ्यात या मार्गावरील प्रवास तुमच्या नेहमी लक्षात राहिल. 

३) शिमला ते मनाली

अनेकजण आपल्या सुट्ट्यांमध्ये फिरायला किंवा नवीन जोडपी हनीमूनसाठी बाहेर जाण्याचा प्लॅन करतात. जर तुमचाही असाच काही फिरायला जाण्याचा प्लॅन असेल तर शिमला ते मनाली रोड ट्रिप जरूर करा. या रस्त्यावरुन केलेला प्रवास तुम्हाला आणि तुमच्या पार्टनरला जवळ आणेल. उंचच उंच झाडे, बर्फाने झाकले गेलेले डोंगर तुमच्या डोळ्यांना अद्भूत अनुभव देतील. तुमचा हा २५० किमीचा प्रवास आयुष्यभरासाठी तुमच्या लक्षात राहील.  

४) गुवाहाटी ते तवांग

चहाच्या बागा आणि आपल्या नैसर्गिक सौंदर्यासाठी ओळखल्या जाणाऱ्या गुवाहाटीवरूनही तुम्ही तुमचा यादगार प्रवास सुरु करू शकता. गुवाहाटी ते तवांग हा प्रवास तुम्हाला कधीही न अनुभवलेल्या निर्सगाचा अनुभव देईल. येथील वळणदार रस्ते, ढगांनी घेरले गेलेले डोंगर यामुळे तुमचा प्रवास एखाद्या स्वप्नासारखाच होईल. या रस्त्यावर गाडी चालवणे तसे अवघड काम आहे. कारण ढगांमुळे रस्त्यावर समोरचं काहीच दिसत नाही. पण तरीही कमी ढग असताना तुम्ही येथून प्रवास करू शकता. 

५) चेन्नई ते मुन्नार

जर तुम्ही चेन्नईला जाण्याचा प्लॅन करत असाल तर थोडा वेळ काढून मुन्नारला जायला विसरू नका. कोयम्बटूरपासून ९० किमी अंतरावर असलेलं हे हिल स्टेशन हे जन्नत म्हणूनही ओळखलं जातं. मुन्नारला जाताना लागणारा रस्ता तुम्हाला नक्की आवडेल. चारही बाजूंनी हिरवळ आणि उंच डोंगर तुमच्या डोळ्याचं पारणं फेडतील.  

टॅग्स :Travelप्रवासtourismपर्यटन