शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
6
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
7
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
8
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
9
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
10
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
11
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
12
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
13
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
14
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
15
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
16
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
17
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
18
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
19
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
20
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...

देशातला प्रवास स्वस्त की विदेशातला? उन्हाळ्याच्या सुट्टीचे नियोजन करताय, मग हे वाचाच!

By मनोज गडनीस | Updated: March 17, 2024 06:52 IST

यंदा प्रवासाचे नियोजन करताना पहिल्यांदा तुमचे बजेट निश्चित करा.

मनोज गडनीस, विशेष प्रतिनिधी

अलीकडच्या काळात विमान प्रवासाचे गगनाला भिडलेले दर लक्षात घेता उन्हाळ्याच्या सुट्टीचे नियोजन बहुतांश लोकांनी आतापासूनच करायला घेतले आहे. साधारणपणे नियोजन करताना लोक आपल्याला कुठे जायचे आहे, ते पहिले निश्चित करतात आणि त्यानंतर तेथील प्रवासाची तिकिटे, राहण्याची-फिरण्याची आदी व्यवस्था करतात. अर्थात, हे करताना या प्रवासासाठी बजेटही निश्चित झालेले असतेच. मात्र, यंदा प्रवासाचे नियोजन करताना पहिल्यांदा तुमचे बजेट निश्चित करा. कुठे प्रवास करायचा ते मात्र पहिल्या फटक्यात निश्चित करू नका. कारण तुमच्या बजेटमध्ये कदाचित देशातील एका पर्यटनस्थळाच्या तुलनेत परदेशातील एखाद्या उत्तम ठिकाणी तुम्हाला फिरण्याची संधी मिळू शकेल. ती कशी, त्याचाच हा सारांश...

परदेशी प्रवास स्वस्त आहे का?

सध्या भारतातील विमान प्रवास दर विचारात घेतले तर त्या तुलनेमध्ये पर्यटनासाठी लोकप्रिय असलेल्या काही देशांतील विमान प्रवासाचे दर कमी आहेत. याचे प्रमुख कारण म्हणजे, अनेक भारतीय तसेच परदेशी विमान कंपन्यांनी परदेशात प्रवाशांना आकृष्ट करण्यासाठी सूट योजना जाहीर केल्या आहेत. त्यातही भारतीय विमान कंपन्या सध्या परदेशातील सेवा वाढवत आहेत. त्यामुळे त्याचा विस्तार करण्यासाठी त्यांच्यातर्फे देखील घसघशीत सूट योजना जाहीर होत आहेत.

परदेशात भारतीयांची पसंती कोणत्या देशांना?

मलेशिया, मालदीव, थायलंड, व्हिएतनाम, श्रीलंका, नेपाळ यासह जगातील लहानमोठ्या ६२ देशांत प्रवास करण्यासाठी भारतीयांना व्हिसाची गरज भासत नाही. त्यामुळेच यापैकी बहुतांश देशात पर्यटनासाठी जाण्यास भारतीय लोक उत्सुक आहेत.

व्हिसापोटी प्रति माणसी किमान तीन हजार ते सात हजार रुपये आजवर खर्च होत होता. त्यामध्ये बचत होत असल्यामुळेच लोक  नमूद देशांना प्राधान्याने पसंती देत आहेत. याखेरीज, कॅनडा, चीन, फ्रान्स, जर्मनी, इटली, जपान, नेदरलँडस्, सौदी अरेबिया, स्वित्झर्लंड, युके, अमेरिका येथे जाणाऱ्या भारतीयांची संख्या देखील लक्षणीय आहे.  

देशातील प्रवास का महागला?

२०१४ पासून आतापर्यंत सरत्या दहा वर्षांत देशामध्ये ७५ नवीन विमानतळांची उभारणी झाली आहे. विमान प्रवासाची सुविधा अधिकाधिक उपलब्ध झाल्यामुळे वेळेची बचत करण्यासाठी लोकही विमान प्रवासाला प्राधान्य देत आहेत.

टॅग्स :Travel Tipsट्रॅव्हल टिप्स