शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
2
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
3
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
4
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले
5
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
6
पाकिस्तानी दहशतवाद्यांना आता धास्ती 'अननोन गनमॅन'ची; दोन वर्षांत २० ते २५ अतिरेक्यांचा केला खात्मा
7
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
8
बिलावल बरळले; पाणी रोखले तर भारतीयांच्या रक्ताचे पाट वाहतील
9
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
10
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
11
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
12
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
13
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!
14
पाकिस्तानला पाण्यासाठी भीक मागायला लावायची असेल तर...
15
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
16
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
17
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
18
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
19
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
20
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक

तिकिट कॅन्सल केल्यानंतर  किती वेळात किती पैसे मिळतात? जाणून घ्या 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 3, 2020 16:23 IST

आपण नेहमीच रेल्वेने प्रवास करत असतो. काहीजण रोज कामानिमित्ताने रेल्वेने प्रवास करतात.

 आपण नेहमीच रेल्वेने प्रवास करत असतो. काहीजण रोज कामानिमित्ताने रेल्वेने प्रवास करतात. तर काहीजण कुठे बाहेर फिरायला जाण्यासाठी किंवा नातेवाईकांना भेटी देण्यासाठी रेल्वेने प्रवास करत असतात. संपूर्ण भारतात आपण कुठेही रेल्वेने जाऊ शकतो . जास्तीतजास्त ठिकाणी जाण्यासाठी रेल्वेसेवा वापरली जाते.  फिरण्यासाठी किंवा इतर कामासाठी रेल्वेने प्रवास करत असलेल्या लोकांची संख्या जास्त अशावेळी भरपूर लोकं हे एडवान्स बुकिंग करत असतात. 

पण काही अडचणींमुळे जर  तुम्हाला तिकीट कॅन्सल करायला लागलं तर खूप विचार करायला लागतो. आपले पैसे मिळतील की नाही या बाबत शंका असते. तुम्हाला सुध्दा जर बूकिंग रद्द कराव लागलं तर किती पैसे मिळतील याची माहीती आज आम्ही तुम्हाला  देणार आहोत. आईआरसीटीसीची ऑनलाईन वेबसाइट irctc.co.in यावर गेल्यानंतर तुम्हाला बुक केलेलं तिकिट कॅन्सल करता येणार आहे. यातून पीआरएसए या सिस्टीमच्या माध्यमातून  परत मिळणार आहेत. चला तर मग जाणून घेऊया फंडिंग पॉलिसी कशी आहे. 

आईआरसीटीसीच्या नियमांनुसार टिकिट कॅन्सल करण्यासाठी काही मर्यादा असणार आहेत. तसंच रिफंट पॉलीसी ई-तिकिटच्या स्टेटसवर आधारीत असणार आहे. जर तुमचं तिकिट वेटिंग असेल तर तुम्हाला टिकिट कॅन्सल केल्यानंतर पैसे मिळू शकतात. जर ट्रेन सुरू होण्याच्या अर्धा तास आधी तुम्ही तिकीट कॅन्सल केलं तर तुम्हाला क्लेरिकल चार्ज सोडून सगळे पैसे परत मिळू शकतात. 

जर तुमचं कन्फॉर्म तिकिट तुम्हाला कॅन्सल करायचं असेल तर  तुम्ही २ दिवस आधी कॅन्सल करा. जर ट्रेन निघण्याच्या १२ तास आधी तुम्ही तिकिट कॅन्सल केलं  तर तुम्हाला २५ टक्के रक्कम कापून पैसे परत मिळतात. तेच जर तुम्ही ट्रेन सुरू होण्याच्या ४ तास आधी बुकिंग कॅन्सल करत असाल तर ५० टक्के रक्कम वगळून पैसे परत देण्यात येतात. पण एकदा चार्ट तयार झाल्यानंतर संपूर्ण पैसे कापले जातात.

टॅग्स :Travel Tipsट्रॅव्हल टिप्स