शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यासाठी १०० अन् कॉफीसाठी ७०० रुपये घेतल्यास मल्टिप्लेक्स बंद होतील : सुप्रीम कोर्ट
2
हरयाणा निवडणुकांत चोरी, २५ लाख बनावट मतदार; राहुल गांधींनी काढली ‘एच फाइल’
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
आचारसंहिता लागू तरीही सरकारला ४ दिवस घेता येणार धोरणात्मक निर्णय; आयोगाची पूर्वपरवानगी हवी
5
‘मोनो रेल’ला पुन्हा अपघात; तीन कर्मचारी जखमी; चाचणी करताना नवी गाडी बिमवरून घसरली
6
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
7
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
8
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
9
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
10
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
11
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
12
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
13
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
14
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
15
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
16
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
17
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
18
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
19
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
20
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ

जोडीदारासोबत रोमॅन्टिक ठिकाणी जायच मग या पाच जागा आहेत ना !

By admin | Updated: May 5, 2017 13:02 IST

तुमच्या जोडीदारासोबत रोमॅण्टिक सफरीसाठी काहीतरी नाविन्यपूर्ण करायचा विचार तुम्ही करत असाल तर फार लांब जायची गरज नाही. भारतातहीअशा रोमॅन्टिक जागा खूप आहेत,एकदा शोधून तर पाहा.

-अमृता कदमतेच तेच समुद्रकिनारे, हिलस्टेशन्स, तिथल्या हॉटेल्समधे आयोजित केले जाणारे घाऊक कँडल लाईट डिनर याचा तुम्हाला कंटाळा आला असेल, तुमच्या जोडीदारासोबत रोमॅण्टिक सफरीसाठी काहीतरी नाविन्यपूर्ण करायचा विचार तुम्ही करत असाल तर फार लांब जायची गरज नाही. भारतातही नितांत सुंदर पण काहीशी अपरिचित अशी ठिकाणं आहेत जी तुमच्या रोमॅण्टिक ट्रीपला अविस्मरणीय करून टाकतील. हिमालयाच्या कुशीतलं ‘मशोबरा’शिमल्यापासून अवघ्या अधर््या तासाच्या अंतरावर मशोबरा नावाचा एक छोटा स्वर्गच वसलाय. ओक आणि पाईनच्या घनदाट वृक्षराजीत वसलेला हा परिसर. जोडीदाराच्या हातात हात गुंफून लॉंग वॉक करण्यासाठी एकदम योग्य जागा. सफरचंदांच्या बागांना भेट द्या किंवा दुपारी जंगली स्ट्रॉबेरी हातानं तोडून खाण्याचा आनंद लुटा. ज्यांना सगळं काही विसरु न निसर्गाच्या सान्निध्यात राहायला आवडतं त्यांच्यासाठी हिमालायच्या कुशीत वसलेलं मशोबरा अवर्णनीय आनंद देणारं आहे.

 

‘हॅवलॉक बेट’पांढरीशुभ्र वाळू अन निळशार पाणी अंदमानातल्या पोर्ट ब्लेअरपासून अवघ्या 57 किमी अंतरावर वसलेलं हे छोटं बेट आहे. पांढरीशुभ्र वाळू, किनाऱ्याशेजारच्या टुमदार झोपड्या आणि भोवताली निळंशार पाणी.. अशा वातावरणात तुमच्या रोमँटिक भेटीचा माहौल न झाला तरच नवल. जोडीदारासोबत केवळ पाण्यात पाय सोडून गप्पा मारत राहिला तरी वेळ कसा संपतोय हे कळणार नाही. शिवाय अधिक वेगळं काही करायचं असेल तर स्कुबा डायव्हिंगचाही पर्याय आहेच.

‘खज्जियार’ भारताचं स्वित्झर्लंडहिमाचल प्रदेशच्या चंबा जिल्ह्यात वसलेलं खज्जियार म्हणजे या पर्वतरांगांमधलं एक रत्नच आहे जणू. एका छोट्या पठारावर वसलेल्या या हिल स्टेशनला लागूनच एक तलावही आहे. या तलावाच्या भोवती फिरत फिरत हिमालयातली नवी शिखरं पाहण्याचा आनंद लुटा. इथल्या जंगलातल्या एका सफरीनंही तुमचं मन प्रफुल्लित होईल. उगीच नाही खज्जियारला ‘भारताचं स्वित्झर्लंड’ म्हणून ओळखलं जातं.

कोणत्याही ॠतुत पावासाळ्याचा फील देणारं ‘चेरापुंजी’ भूगोलाच्या पुस्तकात सर्वाधिक पावसाचं ठिकाण म्हणून हे नाव आपल्या सगळ्यांना माहिती असतंच. पण इथल्या निसर्गसौंदर्याबद्दल फारसं माहिती नसतं. हे असं ठिकाण आहे ज्या ठिकाणी वर्षातल्या कुठल्याही वेळेला तुम्ही पावसाळी वातावरण अनुभवू शकता. सोबत वाफाळलेल्या चहाचा कप आणि तितकीच उबदार स्पर्शाची साथ. शिवाय जेव्हा इथला पाऊस थांबतो तेव्हा इथल्या मातीचा वास वेड लावतो.

                                   निवांत जागेचं ‘मरारीकुलम’भारताच्या अगदी दक्षिण टोकाला केरळमध्ये हे किनारी गाव वसलेलं आहे. भारतातला सर्वांत स्वच्छ किनारा म्हणून या गावाची ख्याती आहेच. पण हे स्थळ इतकं निवांत आहे की ते फारसं कुणाला माहितही नाही. त्यामुळेच इतर किनाऱ्यांसारखी या किनाऱ्यावर तुम्हाला एकावेळी फार गर्दी कधी दिसतच नाही. प्रेमाच्या आठवणींसह किनाऱ्यावर पावलांचे ठसे उमटवत गप्पा करायला, सूर्यास्ताकडे पाहत नव्या स्वप्नांत रमायला किंवा कधी हातात नारळपाणी घेऊन निवांत सगळा किनारा धुंडाळून काढायला याच्यासारखं दुसरं ठिकाण नाही. तुम्ही जर हनीमूनला जायचा किंवा तुमच्या लग्नाचा, जोडीदाराचा वाढदिवस साजरा करण्यासाठी बाहेरगावी जायचा प्लॅन करत असाल तर या रोमॅण्टिक फील देणाऱ्या जागांचा अवश्य विचार करा.