शहरं
Join us  
Trending Stories
1
कुख्यात दहशतवादी सैफुल्लाह खालिद ठार, भारतात झालेल्या तीन हल्ल्यांमागे होता हात, पाकिस्तानमध्ये अज्ञातांनी झाडल्या गोळ्या  
2
अभिनेत्री नुसरत फारियाला ढाका विमानतळावर अटक; कोणत्या प्रकरणात झाली कारवाई?
3
आणखी एका पाकिस्तानी हेराला ठोकल्या बेड्या, ISIला भारताची गोपनीय माहिती पुरवणारा अरमान अटकेत  
4
RR विरुद्धच्या विजयासह PBKS चा प्लेऑफ्सचा पेपर झाला सोपा! आता GT च्या निकालावर असतील नजरा, कारण...
5
समुद्रात तैनात केला जाणार मेड इन इंडिया 'रक्षक', गौतम अदानी यांच्या कंपनीने केली मोठी डील
6
IPL 2025: मोठी बातमी! SRHचा स्टार क्रिकेटर कोरोना पॉझिटिव्ह; काव्या मारनची डोकेदुखी वाढली!
7
ज्योती मल्होत्राचा पहलगाम दहशतवादी हल्ल्याशी काय संबंध? पोलिसांनी केला मोठा खुलासा...
8
Spying for Pakistan: ज्योती मल्होत्रानंतर यु ट्यूबर प्रियांका सेनापती रडारवर! केंद्रीय गुप्तचर ब्युरोने केली चौकशी
9
एकच आंबा तीन किलोंचा! शेतकऱ्याने दिलेलं गिफ्ट बघून शरद पवार भारावले; फोटो शेअर करत म्हणाले...
10
IPL 2025 खेळण्यासाठी PSL सोडून आला, पण किटबॅग पाकिस्तानात राहिली, मेंडिसने पुढे काय केलं?
11
इंडोनेशिया, थायलंड, दुबई... पाकिस्तानी लष्करी अधिकाऱ्यांसोबत कोणकोणते देश फिरली Youtuber ज्योती?
12
Viral Video : कांदा कापताना डोळ्यांतून येणार नाही पाणी! सोशल मीडियावरचा व्हायरल देसी जुगाड बघाच
13
'या' अभिनेत्याला डेट करतीये राधिका मदन? रिलेशनशिपवर म्हणाला, "मी खूप चिपकू बॉयफ्रेंड..."
14
रशियाचा युक्रेनवर सर्वात मोठा ड्रोन हल्ला! एकाच वेळी २७३ ड्रोन्स सोडले अन्...
15
RR vs PBKS : शशांक सिंहचा परफेक्ट फिनिशिंग टच! पंजाब किंग्जनं उभारली विक्रमी धावसंख्या
16
सोलापूर आग दुर्घटना; मृतांचा आकडा पोहचला आठवर; बेडरूममध्ये सापडले पाच जणांचे मृतदेह 
17
Nehal Wadhera नं फिफ्टीसह सावरला डाव; मग प्रीती झिंटानं संघाच्या हिरोला अशी दिली दाद
18
'हा' मराठमोळा स्टार टीव्ही इंडस्ट्रीत सर्वांत महागडा! दिलीप जोशी, रुपाली गांगुलीही मागे पडले!
19
जगात 'मेड इन इंडिया'चा बोलबाला; स्मार्टफोन निर्यातीत भारताची मोठी झेप, 24 अब्ज डॉलर्स...
20
"चिंदबरम यांनी जो कायदा आणला, त्याला मी विरोध केला, मात्र..."; शरद पवारांनी सांगितली आठवण

जोडीदारासोबत रोमॅन्टिक ठिकाणी जायच मग या पाच जागा आहेत ना !

By admin | Updated: May 5, 2017 13:02 IST

तुमच्या जोडीदारासोबत रोमॅण्टिक सफरीसाठी काहीतरी नाविन्यपूर्ण करायचा विचार तुम्ही करत असाल तर फार लांब जायची गरज नाही. भारतातहीअशा रोमॅन्टिक जागा खूप आहेत,एकदा शोधून तर पाहा.

-अमृता कदमतेच तेच समुद्रकिनारे, हिलस्टेशन्स, तिथल्या हॉटेल्समधे आयोजित केले जाणारे घाऊक कँडल लाईट डिनर याचा तुम्हाला कंटाळा आला असेल, तुमच्या जोडीदारासोबत रोमॅण्टिक सफरीसाठी काहीतरी नाविन्यपूर्ण करायचा विचार तुम्ही करत असाल तर फार लांब जायची गरज नाही. भारतातही नितांत सुंदर पण काहीशी अपरिचित अशी ठिकाणं आहेत जी तुमच्या रोमॅण्टिक ट्रीपला अविस्मरणीय करून टाकतील. हिमालयाच्या कुशीतलं ‘मशोबरा’शिमल्यापासून अवघ्या अधर््या तासाच्या अंतरावर मशोबरा नावाचा एक छोटा स्वर्गच वसलाय. ओक आणि पाईनच्या घनदाट वृक्षराजीत वसलेला हा परिसर. जोडीदाराच्या हातात हात गुंफून लॉंग वॉक करण्यासाठी एकदम योग्य जागा. सफरचंदांच्या बागांना भेट द्या किंवा दुपारी जंगली स्ट्रॉबेरी हातानं तोडून खाण्याचा आनंद लुटा. ज्यांना सगळं काही विसरु न निसर्गाच्या सान्निध्यात राहायला आवडतं त्यांच्यासाठी हिमालायच्या कुशीत वसलेलं मशोबरा अवर्णनीय आनंद देणारं आहे.

 

‘हॅवलॉक बेट’पांढरीशुभ्र वाळू अन निळशार पाणी अंदमानातल्या पोर्ट ब्लेअरपासून अवघ्या 57 किमी अंतरावर वसलेलं हे छोटं बेट आहे. पांढरीशुभ्र वाळू, किनाऱ्याशेजारच्या टुमदार झोपड्या आणि भोवताली निळंशार पाणी.. अशा वातावरणात तुमच्या रोमँटिक भेटीचा माहौल न झाला तरच नवल. जोडीदारासोबत केवळ पाण्यात पाय सोडून गप्पा मारत राहिला तरी वेळ कसा संपतोय हे कळणार नाही. शिवाय अधिक वेगळं काही करायचं असेल तर स्कुबा डायव्हिंगचाही पर्याय आहेच.

‘खज्जियार’ भारताचं स्वित्झर्लंडहिमाचल प्रदेशच्या चंबा जिल्ह्यात वसलेलं खज्जियार म्हणजे या पर्वतरांगांमधलं एक रत्नच आहे जणू. एका छोट्या पठारावर वसलेल्या या हिल स्टेशनला लागूनच एक तलावही आहे. या तलावाच्या भोवती फिरत फिरत हिमालयातली नवी शिखरं पाहण्याचा आनंद लुटा. इथल्या जंगलातल्या एका सफरीनंही तुमचं मन प्रफुल्लित होईल. उगीच नाही खज्जियारला ‘भारताचं स्वित्झर्लंड’ म्हणून ओळखलं जातं.

कोणत्याही ॠतुत पावासाळ्याचा फील देणारं ‘चेरापुंजी’ भूगोलाच्या पुस्तकात सर्वाधिक पावसाचं ठिकाण म्हणून हे नाव आपल्या सगळ्यांना माहिती असतंच. पण इथल्या निसर्गसौंदर्याबद्दल फारसं माहिती नसतं. हे असं ठिकाण आहे ज्या ठिकाणी वर्षातल्या कुठल्याही वेळेला तुम्ही पावसाळी वातावरण अनुभवू शकता. सोबत वाफाळलेल्या चहाचा कप आणि तितकीच उबदार स्पर्शाची साथ. शिवाय जेव्हा इथला पाऊस थांबतो तेव्हा इथल्या मातीचा वास वेड लावतो.

                                   निवांत जागेचं ‘मरारीकुलम’भारताच्या अगदी दक्षिण टोकाला केरळमध्ये हे किनारी गाव वसलेलं आहे. भारतातला सर्वांत स्वच्छ किनारा म्हणून या गावाची ख्याती आहेच. पण हे स्थळ इतकं निवांत आहे की ते फारसं कुणाला माहितही नाही. त्यामुळेच इतर किनाऱ्यांसारखी या किनाऱ्यावर तुम्हाला एकावेळी फार गर्दी कधी दिसतच नाही. प्रेमाच्या आठवणींसह किनाऱ्यावर पावलांचे ठसे उमटवत गप्पा करायला, सूर्यास्ताकडे पाहत नव्या स्वप्नांत रमायला किंवा कधी हातात नारळपाणी घेऊन निवांत सगळा किनारा धुंडाळून काढायला याच्यासारखं दुसरं ठिकाण नाही. तुम्ही जर हनीमूनला जायचा किंवा तुमच्या लग्नाचा, जोडीदाराचा वाढदिवस साजरा करण्यासाठी बाहेरगावी जायचा प्लॅन करत असाल तर या रोमॅण्टिक फील देणाऱ्या जागांचा अवश्य विचार करा.