शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदी सरकारनं 'मनरेगा'चं नाव बदललं, आता 'या' नव्या नावानं ओळखली जाणार योजना; फायदाही वाढला! केला मोठा बदल
2
ट्रम्प, क्लिंटन ते बिल गेट्स; एपस्टीनच्या 'काळ्या' डायरीतील बड्या नेत्यांचे फोटो बाहेर, आक्षेपार्ह वस्तूंचाही समावेश
3
"भय ओळखून त्यावर विजय मिळवणाराच खरा वीर"; अमित शाहांकडून वीर सावरकरांच्या शौर्याला सलाम
4
'मत चोरी'च्या मुद्द्यावर काँग्रेसचा हल्लाबोल; साडे 5 कोटी लोकांनी केल्या स्वाक्षऱ्या, आता मोठ्या रॅलीची तयारी
5
"वर्षभर विमान भाड्यावर मर्यादा घालणे शक्य नाही"; इंडिगो संकटादरम्यान केंद्र सरकारचे लोकसभेत स्पष्टीकरण
6
कोर्टाची टीम दरवाजावर, आत आईसह दोन मुलांचे मृतदेह; घर जप्त होण्याच्या भीतीने कुटुंबाचा सामूहिक अंत.
7
पुतिन यांनी पाकच्या पंतप्रधानांना ४० मिनिटे ठेवले ताटकळत; चिडलेले शरीफ अखेर जबरदस्तीने बैठकीत शिरले
8
चीन-जपान तणाव वाढला; रशियानं Su-30, Su-35 विमानं उतरवताच अमेरिकाही अ‍ॅक्शन मोडवर, तैनात केले B-2 बॉम्बर्स!
9
IND vs UAE U19 Asia Cup 2025: जे कुणाला जमलं नाही ते आयुष म्हात्रेच्या कॅप्टन्सीतील टीम इंडियानं करुन दाखवलं
10
भारताने पाकिस्तानचा घुसखोरीचा कट उधळला; नियंत्रण रेषेवर BSFकडून संशयित दहशतवाद्याला अटक
11
"मी राजकारणी नाही, पण 5-10 कोटी...!" मतदारांसंदर्भात नेमकं काय म्हणाले बाबा रामदेव? टीव्ही अँकरवर जोरदार भडकले
12
सरपंच देशमुख हत्याकांडाचा क्रूर घटनाक्रम हायकोर्टात पुन्हा समोर; पत्नी, भावास अश्रू अनावर
13
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या भव्य पुतळ्याचे अमित शाह, मोहन भागवत यांच्या हस्ते अनावरण
14
जनगणनेसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय, 11718 कोटी मंजूर; शेतकऱ्यांसाठीही खुशखबर!
15
२०२६ च्या पहिल्याच दिवशी ‘हा’ उपाय नक्की करा, घरावरील अशुभ नजर टळेल; वर्षभर शुभ-लाभच होईल!
16
IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांना क्लीन चीट ! महिला आयोगाचा अंतिम चौकशी अहवाल येणे बाकी
17
“मुंबईत येणार जगातील सर्वांत मोठा GCC प्रोजेक्ट, ४५ हजार रोजगार निर्माण होणार”: CM फडणवीस
18
"10 हजार द्या किंवा 1 लाख द्या, कुणीही मुस्लीम...!"; हिमंत बिस्वा सरमा यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
19
एक नंबर! WhatsApp युजर्ससाठी खुशखबर; कॉल न उचलल्यास पाठवा व्हॉइस किंवा व्हिडीओ नोट
20
रेल्वे अपघातांमध्ये विक्रमी घट! 'या' स्वदेशी तंत्रज्ञानामुळे सुरक्षेच्या दृष्टीने मोठं पाऊल
Daily Top 2Weekly Top 5

फिरायला अवश्य जा, पण ‘टुरिस्ट’ म्हणून नको..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 28, 2017 16:59 IST

‘या’ गोष्टींची काळजी घ्या आणि आपला प्रवास संस्मरणीय करा..

ठळक मुद्देबाहेरगावी गेल्यानंतर आपण ‘टुरिस्ट’ आहोत, हे सहजासहजी कोणाला लक्षात यायला नको.सुरक्षेची आवर्जुन काळजी घ्या.प्रवासाची बॅग भक्कम आणि वेगळी असायला हवी.

- मयूर पठाडेनियमित प्रवासाला जाणं, फिरायला जाणं, वर्षातून किमान एखादी फॅमिली पिकनिक काढणं.. या गोष्टी आता तशा नवीन राहिलेल्या नाहीत. अगदी सर्वसामान्य कुटुंबंही आता सर्रास प्रवासाला जातात. पूर्वी जसं प्रवासासाठी सव्यापसव्य करावे लागायचे, तसेही आता करायला लागत नाहीत. तुमची पिकनिक तुमची तुम्हाला अरेंज करायची, स्वत:च डेस्टिनेशन्स ठरवायची आणि आपल्या मनाप्रमाणे, जिथे जितक्या दिवस राहावंसं वाटेल, तितकं राहायचं, अशी टेलरमेड टूरही अनेक जण काढतात. त्यासाठीचे तयार प्लान्सही आजकाल बनवून मिळतात. तुमच्याकडे आत्ता पैसे नसतील, तर त्यासाठीचं लोन द्यायलाही अनेक जण तयार असतात..थोडक्यात प्रवासाला जाणं हा काही तसा आता डोक्याला खुराक राहिलेला नाही. देशात जायचं असो किंवा अगदी परदेशात, त्यासाठी तुमच्याकडे पैसा असो वा नसो, कुठे जायचं हे नक्की होत नसेल, तर त्यासाठीची तयार मदत.. अशी सगळी काही सोय आजकाल होऊ शकते.त्यामुळे प्रवासाला जाणाºयांची संख्या दिवसेंदिवस वाढते आहे. मात्र प्रवासाला जाण्यापूर्वी काही ठराविक गोष्टींची काळजी घ्यायला पाहिजे, ती मात्र आजही घेतली जात नाही.त्यातल्या काही गोष्टी म्हटलं तर अगदीच प्राथमिक, पण अतिशय महत्त्वाच्या आहेत. त्या आपण जाणून घेतल्याच पाहिजेत.प्रवासाला, पिकनिकला तुम्ही कोणाहीबरोबर गेलेला असा, स्वत: किंवा ट्रॅव्हल एजन्सीबरोबर, एक गोष्ट कटाक्षानं पाळायला हवी, ती म्हणजे ज्या ठिकाणी आपण जातोय, त्या ठिकाणचे आपण झालं पाहिजे. अगदीच कायापालट जरी नाही करता आला, तरी आपण टुरिस्ट आहोत, हे सहजासहजी कोणाला लक्षात यायला नको. तुम्ही ‘टुरिस्ट’ आहात, हे कळलं की काही वेळा अनेक अडचणींना तोंड देण्याची वेळ येऊ शकते. ज्या ठिकाणी आपण जाऊ, तिथे तुमचा ‘बकरा’ बनण्याचीही शक्यता असते. अनेक टुरिस्ट प्लेसेसवर त्यामुळेच पर्यटकांची लुटालुट होण्याचे प्रकार घडतात.ज्या ठिकाणी आपण जातो आहोत, त्या ठिकाणी गेल्यानंतर आपल्या सुरक्षेची आवर्जुन काळजी घ्या. ती आपल्यालाच घ्यावी लागते. किमान रात्रीच्या वेळी दरवाजा, खिडक्या बंद करणे, आपल्या महत्त्वाच्या वस्तु व्यवस्थित लॉक करणे.. अशा साध्या वाटणाºया गोष्टी.. पण त्या करायलाच हव्यात.प्रवासात अनेकांच्या बॅगा तुटतात. याचं मुख्य कारण म्हणजे नको इतका सोबत घेतलेला पसारा आणि घरातून निघताना घरात असेल ती बॅग उचलल्यामुळष असा प्रॉब्लेम होतो. त्यामुळे प्रवासासाठीची बॅग भक्कम आणि वेगळीच हवी.टूरमध्ये एन्जॉय करणं ठीक आहे, पण म्हणून एकदम ‘टल्ली’च झालं पाहिजे असं काही नाही. त्याचं तारतम्य अवश्य बाळगलं पाहिजे..तर निघा प्रवासाला, मस्त मजा करा, पण थोडीशी काळजी घ्या इतकंच..