शहरं
Join us  
Trending Stories
1
Diwali Muhurat Trading 2025: शेअर बाजारात कधी होणार मुहूर्त ट्रेडिंग, १ तासासाठी उघडणार मार्केट; वेळ लिहून ठेवा, यावेळी झालाय बदल
2
भारताच्या इशाऱ्यावर तालिबाननं केला हल्ला, पाक पंतप्रधानांचा दावा; "जर युद्ध झालं तर..."
3
Gen Z आंदोलनाचा उडाला भडका, आणखी एका देशात सत्तांतर; कर्नल बनले राष्ट्रपती, लष्कर चालवणार देश
4
Shivajirao Kardile: भाजपा आमदार शिवाजीराव कर्डिले यांचं हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन
5
सोनं-चांदी विक्रमी स्तरावर! एका वर्षात चांदी ९०% तर सोनं ६५% वधारलं; का वाढली इतकी मागणी?
6
पत्नीसोबत मिळून करा 'इतकी' गुंतवणूक, महिन्याला मिळेल ₹६१६७ चं फिक्स व्याज; जबरदस्त आहे पोस्टाची 'ही' स्कीम
7
"कठीण काळ सुरु आहे, पण हा शेवट नाही..." अभिनेत्याची पोस्ट, म्हणाला, नाम याद रखना!
8
'कर्मचारी कमी नको, जास्त हवेत!' ट्रम्प यांच्या व्हिसा धोरणाविरोधात अमेरिकेतील कंपन्या आक्रमक, कायदेशीर संघर्षाला सुरुवात
9
भारताच्या 'मेक इन इंडिया' धोरणाची चीनला भीती; म्हणतात आमची कॉपी केली! नेमकं प्रकरण काय?
10
त्रिग्रही योग: ९ राशींची संक्रांत संपेल, १ महिना फक्त लाभ; रोज १ उपायाने भाग्योदय, मंगल काळ!
11
टेक सेक्टरमध्ये कर्मचारी कपात, पण Infosys मध्ये 'फ्रेशर्स'ची भरती जोरात; १२ हजार जणांना नोकरी, आताही ८००० वेकन्सी
12
बिहारमध्ये राबवणार महाराष्ट्र पॅटर्न? अमित शाहांनी टाकला डाव; मुख्यमंत्रिपदावर थेट भाष्य
13
चांदी २०% प्रीमियमवरही मिळेना; ऑनलाइन भाव अडीच लाखांवर
14
संपादकीय: रक्तपात, संसार अन् भविष्य
15
सोने सव्वालाखावर गेले तरी दिवाळीला २० टन सोन्याची विक्री होणार? दागिन्यांची मागणी घटली; पण बार, नाण्याला पसंती
16
‘ऑपरेशन ब्लू स्टार’ ही चूकच होती; पण कोणाची? इंदिरा गांधींची खरेच होती का...
17
आजचे राशीभविष्य, १७ ऑक्टोबर २०२५: कामात यश मिळेल, आर्थिक लाभ होईल अन् आत्मविश्वासही वाढेल!
18
राज ठाकरे ना भाजपला हवे आहेत, ना काँग्रेसला!
19
‘घोटाळ्याच्या १५ वर्षांनी घेतला अनिल पवारांनी पदभार; ईडीकडे पुरावा नाही’
20
सॅटेलाईट आधारित टोल यंत्रणा लांबणीवर, ऑपरेशन सिंदूरमुळे घेतला निर्णय...

तुरूंगवारी करा पण हातात बेड्या ठोकून नाही तर पर्यटक म्हणून!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 16, 2017 16:26 IST

तुरूंग आणि पयर्टन हे शब्द एकत्र उच्चारल्यावर अनेकांच्या भुवया उंचावतील. पण भारतात काही तुरूंग असे आहेत ज्यांच्यासोबत शतकांचा इतिहास जोडला गेलेला आहे. या तुरूंगांना एक विशिष्ट वलय प्राप्त झालं आहे आणि अशा तुरूंगांना भेट देण्यासाठी पर्यटकांचा ओढा सध्या वाढत चालला आहे.

ठळक मुद्दे* ब्रिटीशांच्या काळात काळ्या पाण्याच्या शिक्षेसाठी सेल्यूलर जेल प्रसिद्ध होता. या ठिकाणाची पर्यटकांना व्यवस्थित माहिती व्हावी, तुरूंग नीट पाहता यावी यासाठी अनेक सोयीसुविधा करण्यात आल्या आहेत. इथेच सावरकरांचा पुतळाही बसवण्यात आला आहे.* डच लोकांनी च राजमुद्रीतल्या किल्ल्याची निर्मिती केली होती. 1870 मध्ये या किल्ल्याचं रूपांतर राजमुद्री जेलमध्ये करण्यात आलं.* पश्चिम बंगालमधल्या अलीपोर जेलची निर्मिती ब्रिटीशकाळात झालेली होती. या तुरूंगाचं एक वैशिष्टय म्हणजे या ठिकाणी जुन्या काळात वापरली जाणारी अनेक शस्त्रं ठेवण्यात आलेली आहेत.

- अमृता कदमकाही ठिकाणं अशी असतात ज्याबद्दल आपल्या मनात आधीच काही गृहीतकं बनलेली असतात. त्यामुळे तुरूंग असा शब्द उच्चारल्यावर आपल्या मनात नकारात्मकच भाव यायला लागतात. डोक्यात गुन्हेगारी वर्तुळाशी संबंधित काहीतरी घुमायला लागतं. त्यामुळे तुरूंग  आणि पयर्टन हे शब्द एकत्र उच्चारल्यावर अनेकांच्या भुवया उंचावतील. पण भारतात काही तुरूंग असे आहेत ज्यांच्यासोबत शतकांचा इतिहास जोडला गेलेला आहे. देशातल्या अनेक थोर व्यक्तींनी या तुरूंगात काळ व्यतीत केलेला आहे, अगदी ग्रंथही लिहिले आहेत. त्यांच्यामुळे या तुरूंगांना एक विशिष्ट वलय प्राप्त झालं आहे आणि अशा तुरूंगांना भेट देण्यासाठी पर्यटकांचा ओढा वाढत चालला आहे.

सेल्यूलर जेल, अंदमान

अंदमानच्या तुरूंगाबद्दल किमान मराठी माणसाला तरी नव्यानं सांगण्याची गरज नाही. सावरकरांच्या विचारांची आपल्याकडे दोन राष्ट्रीय पक्षांत टोकाची विभागणी झालेली असली तरी त्यांच्या राष्ट्रप्रेमाबद्दल मात्र शंका घ्यायचं कारण नाही. अंदमान निकोबार बेटाची राजधानी असलेल्या पोर्ट ब्लेअर या ठिकाणी हा तुरूंग आहे. ब्रिटीशांच्या काळात काळ्या पाण्याच्या शिक्षेसाठी हा तुरूंग  प्रसिद्ध होता. या ठिकाणाची पर्यटकांना व्यवस्थित माहिती व्हावी, तुरूंग नीट पाहता यावी यासाठी अनेक सोयीसुविधा करण्यात आल्या आहेत. इथेच सावरकरांचा पुतळाही बसवण्यात आला आहे. जिथे सावरकरांनी नरकयातना भोगल्या आहेत, तो तुरूंग पाहताना आजही मन हेलावून जाते.

 

 

राजमुद्री जेल, आंध्र

भारतातल्या या भागात डच लोकांची वसाहत होती. त्यांनीच राजमुद्रीतल्या किल्ल्याची निर्मिती केली होती. 1870 मध्ये या किल्ल्याचं रूपांतर तुरूंगात करण्यात आलं. आज या ठिकाणी अनेक पर्यटक ऐतिहासिक स्थळ म्हणून भेट देण्यासाठी येत असतात.

 

 

हिजली जेलबंगालच्या मिदनापूर जिल्ह्यात हा तुरूंग आहे. स्वातंत्र्यांच्या आंदोलनात या ठिकाणी दोन नि:शस्त्र क्रांतीकारकांची हत्या करण्यात आली होती. ज्यावर रवींद्रनाथ टागोर आणि सुभाषचंद्र बोस यांनी आवाज उठवला होता. आज या तुरूंगात टागोर आणि बोस या दोघांच्याही प्रतिमा आहेत. ऐतिहासिक महत्व असलेल्या या किल्ल्यात स्वातंत्र्य चळवळीत बंगालच्या योगदानाचीही झलक पाहायला मिळते.

 

 

वाइपर आइसलॅण्ड

अंदमान निकोबार बेटांवर वसलेला हा आणखी एक तुरूंग. भारतीय स्वातंत्र्य चळवळीतल्या अनेक क्रांतीकारकांना या ठिकाणी डांबण्यात आलेलं होतं. या क्रांतीकारकांच्या स्मृतींना अभिवादन करण्यासाठीही अनेक पर्यटक इथे येत असतात.

 

अलीपोर जेल

पश्चिम बंगालमधल्या या तुरूंगाची निर्मिती ब्रिटीशकाळात झालेली होती. या तुरूंगाचं एक वैशिष्टय म्हणजे या ठिकाणी जुन्या काळात वापरली जाणारी अनेक शस्त्रं ठेवण्यात आलेली आहेत. जेलसोबतच या जुन्या शस्त्रांची सफर तुमच्या ज्ञानात आणखी भर टाकणारी होते.स्वातंत्र्यलढ्याच्या इतिहासाचा काळ अनुभवण्यासाठी एकदा तरी या तुरूंगाची वारी करायला हवी. आणि हो इथे जाण्यासाठी हातात बेड्या पडण्याचीही गरज नाही!