शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवार हे महाराष्ट्रातील कट कारस्थानाचा कारखाना, त्यांच्यावर..."; गोपीचंद पडळकरांची बोचरी टीका
2
दिल्ली-मुंबई हल्ल्यात मसूद अजहरचा हात; जैश कमांडर इलियासचा आणखी एक कबुलीजबाब
3
साखर कारखान्याच्या टँकरमध्ये सापडले दोन तरुणांचे मृतदेह, गार्ड आणि अधिकारी गायब  
4
मंत्र्यांच्या बंगल्यांच्या दुरुस्तीसाठी कोटींची उधळपट्टी? कंत्राटदाराने २१ टक्के 'बिलो'ने काम घेतल्याने प्रकार उघडकीस
5
इनरवेअर बनवणाऱ्या शेअरचा जलवा! १०० स्टॉक्समधून एकाच महिन्यात २ लाख रुपयांची कमाई
6
राज्यात ३९४ ठिकाणी 'नमो उद्यान' विकसित करणार; नरेंद्र मोदींच्या वाढदिवशी एकनाथ शिंदे यांची घोषणा
7
"आमचे प्रेरणास्रोत..."; पंतप्रधान नरेंद्र मोदींना इटलीच्या जॉर्जिया मेलोनी यांच्याकडून खास शुभेच्छा
8
अशक्यही होईल शक्य फक्त जिद्द हवी; १५ वर्षीय दृष्टीहीन करुणाने मिळवलं भारतीय संघात स्थान
9
५% व्याजावर ३ लाख रुपयांपर्यंतचं लोन; 'या' लोकांसाठी आहे मोदी सरकारचं मोठं गिफ्ट
10
माँसाहेब मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्यावर रंग फेकला, ठाकरे गट आक्रमक, दादरमध्ये तणाव
11
कंपन्या जीएसटी रिकव्हरीच्या मुडमध्ये! २२ सप्टेंबरआधीच शाम्पू, साबण २० टक्के डिस्काऊंटवर विकू लागल्या... 
12
"महाराष्ट्रात ओला दुष्काळ जाहीर करा, शेतकऱ्यांना  हेक्टरी ५० हजार रुपयांची मदत द्या’’, काँग्रेसची मागणी   
13
पत्नीचं अफेअर, पतीला लागली कुणकुण; जळफळाट झाला अन् खुनी खेळ रंगला!
14
सॉवरेन गोल्ड बॉंड गुंतवणूकदारांसाठी मोठी बातमी! ६ वर्षांत १८३% परतावा, RBI ने जाहीर केली मुदतीपूर्वीची किंमत
15
WiFi कनेक्शन बंद केल्याने पोटच्या लेकानेच केली आईची हत्या; वडील म्हणाले, "मुलाला फाशी द्या"
16
"अमेरिका, युरोपमधून इस्लाम संपुष्टात आणणार’’, ट्रम्प समर्थक महिला नेत्याचं वादग्रस्त विधान  
17
आता जेवढा जीएसटी कमी झालाय ना, तेवढ्याला १९८६ मध्ये बुलेट मिळत होती...
18
बोल्ड लूकसह स्मार्ट फीचर्स! होन्डाची पहिली इलेक्ट्रिक बाईक लॉन्च, एका चार्जवर १३० किमी धावणार
19
लग्नाच्या अवघ्या २०व्या दिवशी नवरी झाली फरार; नवऱ्याला म्हणाली लवकर जाऊन येते अन्...
20
पंतप्रधान नरेंद्र मोदींवरील बायोपिकची घोषणा, हा अभिनेता साकारणार भूमिका, पोस्टर रिलीज

पूरग्रस्तांचे गाऱ्हाणे थेट दिल्लीदरबारी, पाटील यांनी मांडला मुद्दा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2019 01:19 IST

मदतीची मागणी : पाटील यांनी मांडला मुद्दा

डोंबिवली : कल्याण, बदलापूर, वांगणी परिसरांतील पूरग्रस्तांना मदत करण्यासाठी केंद्र सरकारने राज्य सरकारला जास्तीतजास्त मदत द्यावी, अशी मागणी भाजपचे खासदार कपिल पाटील यांनी लोकसभेत बुधवारी शून्य प्रहरात केली. राज्य सरकारसोबतच केंद्र सरकारनेही मदत दिल्यास हजारो पूरग्रस्तांना दिलासा मिळेल, अशी आशा खासदार पाटील यांनी व्यक्त केली.

२६ जुलैच्या मध्यरात्री आलेल्या महापुराचा मुद्दा पाटील यांनी बुधवारी लोकसभेत मांडला. या महापुरात नागरिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. चाळीमध्ये राहणाऱ्या नागरिकांच्या घराच्या पत्र्यांपर्यंत पाणी पोहोचले होते. अनेक इमारतींनाही झळ पोहोचली. राज्य सरकारच्या तरतुदीनुसार पूरग्रस्तांना केवळ पाच हजार रुपये नुकसानभरपाई देण्याची तरतूद आहे. त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी २०१५ च्या राज्य सरकारच्या अध्यादेशात सुधारणा करण्याचा विचार करणार असल्याचे म्हटले आहे. तसेच सध्याची पाच हजार रुपयांची मदत आणखी वाढवून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे आश्वासन दिले आहे. हजारो पूरग्रस्तांना दिलासा देण्यासाठी केंद्र सरकारने राज्य सरकारला आर्थिक साह्य दिल्यास पूरग्रस्तांना आणखी मदत देता येईल, असेही खा. कपिल पाटील यांनी दिली. मध्य रेल्वेमार्गावरील वांगणीजवळ महालक्ष्मी एक्स्प्रेस अडकल्यानंतर प्रवाशांची सुटका करण्यासाठी बचावकार्य राबवले होते. नौदल, एनडीआरएफ, अग्निशमन दल, रेल्वे, महसूल विभागाबरोबरच चामटोली ग्रामस्थांनीही पाण्यातून गाडीपर्यंत पोहोचत प्रवाशांना मदत केली.

टॅग्स :badlapurबदलापूरfloodपूर