शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
2
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
3
शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची तलवार मिळवण्यात महाराष्ट्र सरकार यशस्वी; जिंकला लिलाव
4
जिद्दीला सलाम! आई नोट्स बनवून वाचून दाखवायची; अंध मुलाने क्रॅक केली UPSC...
5
Cricket VIDEO: 'शायनिंग' नडली..!! हेल्मेट न घालता खेळायला गेला, तोंडावर चेंडू आदळला अन्...
6
ही पाच ठिकाणं आहेत पाकिस्तानी सैन्याचे पंचप्राण, भारताने इथे हल्ला केल्यास पाकिस्तान गुडघे टेकून पत्करेल शरणागती
7
आता ते दया-माया दाखवणार नाहीत! शास्त्रींनी युवा शतकवीर वैभव सूर्यंवशीला केलं सावध
8
काश्मीरच्या बडगाममध्ये CRPF च्या वाहनाचा अपघात; अनेक जवान जखमी
9
अक्षय कुमार-ऋषी कपूर यांच्यासोबत केलं काम, पण आता उदरनिर्वाहासाठी अभिनेता करतोय वॉचमेनची नोकरी
10
"महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाच्या समस्या सोडवण्यासाठी सर्वतोपरी मदत करणार’’, अजित पवार यांचं आश्वासन
11
पहलगाम हल्ल्यानंतर घेतलेल्या भूमिकेवरून काँग्रेसनं मोदींना घेरलं, हे चार प्रश्न उपस्थित करून केली कोंडी
12
रेल्वे कर्मचाऱ्यांनी निवृत्त सहकाऱ्याला दिला 'असा' निरोप; ये- जा करणारे बघतंच राहिले!
13
INDW vs RSAW : प्रतिकाच्या विक्रमी खेळीनंतर स्नेह राणाचा 'पंजा'; टीम इंडियाचा सलग दुसरा विजय
14
बाबूरावला कंटाळले परेश रावल, म्हणाले- "हेरा फेरी म्हणजे गळ्याला लागलेला फास..."
15
१८ वर्षांची तरुणी पडली ५५ वर्षीय व्यक्तीच्या प्रेमात, पुढं घडलं भयंकर, ऐकून पायाखालची जमीन सरकेल
16
गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांचा पगार किती? कंपनीने फक्त सुरक्षेवरच खर्च केले ७१ कोटी रुपये
17
बंगळुरूत 'पाकिस्तान जिंदाबाद' म्हणणाऱ्या व्यक्तीला बेदम मारहाण, जागीच मृत्यू; गृहमंत्री म्हणाले...
18
झिपलाईन ऑपरेटर अल्लाहू अकबर का म्हणत होता? पीडीपी, नॅशनल कॉन्फरन्सच्या नेत्यांचा वेगळाच दावा...
19
तणावपूर्ण परिस्थितीदरम्यान पाकिस्तानकडून सायबर ‘वार’, भारतीय लष्कराची वेबसाईट हॅक करण्याचा प्रयत्न 
20
१ लाखांपेक्षा अधिक गुंतवणूकदार कंगाल झाले; ९२% आपटला हा शेअर, आता विकणंही झालं कठीण

पूरग्रस्तांचे गाऱ्हाणे थेट दिल्लीदरबारी, पाटील यांनी मांडला मुद्दा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2019 01:19 IST

मदतीची मागणी : पाटील यांनी मांडला मुद्दा

डोंबिवली : कल्याण, बदलापूर, वांगणी परिसरांतील पूरग्रस्तांना मदत करण्यासाठी केंद्र सरकारने राज्य सरकारला जास्तीतजास्त मदत द्यावी, अशी मागणी भाजपचे खासदार कपिल पाटील यांनी लोकसभेत बुधवारी शून्य प्रहरात केली. राज्य सरकारसोबतच केंद्र सरकारनेही मदत दिल्यास हजारो पूरग्रस्तांना दिलासा मिळेल, अशी आशा खासदार पाटील यांनी व्यक्त केली.

२६ जुलैच्या मध्यरात्री आलेल्या महापुराचा मुद्दा पाटील यांनी बुधवारी लोकसभेत मांडला. या महापुरात नागरिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. चाळीमध्ये राहणाऱ्या नागरिकांच्या घराच्या पत्र्यांपर्यंत पाणी पोहोचले होते. अनेक इमारतींनाही झळ पोहोचली. राज्य सरकारच्या तरतुदीनुसार पूरग्रस्तांना केवळ पाच हजार रुपये नुकसानभरपाई देण्याची तरतूद आहे. त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी २०१५ च्या राज्य सरकारच्या अध्यादेशात सुधारणा करण्याचा विचार करणार असल्याचे म्हटले आहे. तसेच सध्याची पाच हजार रुपयांची मदत आणखी वाढवून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे आश्वासन दिले आहे. हजारो पूरग्रस्तांना दिलासा देण्यासाठी केंद्र सरकारने राज्य सरकारला आर्थिक साह्य दिल्यास पूरग्रस्तांना आणखी मदत देता येईल, असेही खा. कपिल पाटील यांनी दिली. मध्य रेल्वेमार्गावरील वांगणीजवळ महालक्ष्मी एक्स्प्रेस अडकल्यानंतर प्रवाशांची सुटका करण्यासाठी बचावकार्य राबवले होते. नौदल, एनडीआरएफ, अग्निशमन दल, रेल्वे, महसूल विभागाबरोबरच चामटोली ग्रामस्थांनीही पाण्यातून गाडीपर्यंत पोहोचत प्रवाशांना मदत केली.

टॅग्स :badlapurबदलापूरfloodपूर