शहरं
Join us  
Trending Stories
1
विजय रुपाणींच्या मृतदेहाची DNA चाचणीनं ओळख पटली; संध्याकाळी कुटुंबाला सोपवणार मृतदेह
2
"हे गोंधळ पसरवण्यासारखे ..."; एअर इंडियाच्या विमान अपघातावर तुर्कीचे विधान; मेंटनन्स कंपनीवर स्पष्टीकरण दिले
3
तिरुअनंतपुरममध्ये ब्रिटिश लढाऊ विमान F-35 चे आपत्कालीन लँडिंग; धोकादायक विमान भारतात का आले?
4
नीट-यूजीमध्ये महाराष्ट्रातील सव्वा लाख विद्यार्थी उत्तीर्ण!
5
पार्टीसाठी अपहरण करुन अज्ञाताची केली हत्या; एकाच्या चुकीने सात अल्पवयीन मुले ताब्यात
6
"आता तरी 'चोकर्स' म्हणू नका..."; WTC Finalच्या विजयानंतर भावूक झाला शतकवीर एडन मार्करम
7
Donald Trump : "जर आमच्यावर हल्ला केला तर अमेरिकन सैन्य..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला कडक इशारा
8
केदारनाथहून परतताना कोसळलं हेलिकॉप्टर; महाराष्ट्रातल्या जयस्वाल दाम्पत्यासह २ वर्षाची चिमुरडी ठार
9
Israel Iran War: इराणचा ड्रोन, क्षेपणास्त्रांनी प्रतिहल्ला; इस्रायलचा हल्ले निकामी 
10
माळेगाव कारखान्याचा चेअरमन मीच होणार..! भर सभेत अजित पवार नेमकं काय म्हणाले ?
11
Bachchu Kadu: ...तर आम्ही मंत्रालयात घुसणार, बच्चू कडू यांचा सरकारला इशारा!
12
खुल्लम खुल्ला प्यार... 'चॅम्पियन' एडन मार्करमने भरमैदानात सर्वांसमोर पत्नीला केलं किस, Photo व्हायरल
13
पहिली गोळी मांडीवर अन् शाहरुख आडवा झाला; असा होता एन्काऊंटरचा थरार...
14
कोल्हार- घोटी राज्यमार्गावर भीषण अपघात; तीन ठार, दहा जखमी
15
पालकांच्या कष्टाची जाण! मराठी अभिनेत्याने आई-बाबांसाठी घेतलं नवीन घर, चाहत्यांकडून कौतुकाचा वर्षाव
16
Maharashtra Rains: राज्यात पावसाचा जोर वाढला, वीज पडून ९ जणांचा मृत्यू; ७ जण भाजले!
17
हेलिकॉप्टर पायलट बनायचंय? किती खर्च, किती पगार? जाणून घ्या A to Z माहिती!
18
Ahmedabad Plane Crash : आईच्या शब्दाखातर 'तो' थांबला अन् विमान अपघातातून जीव वाचला; ऐनवेळी नेमकं काय घडलं?
19
Israel–Iran War : इस्त्रायल-इराण युद्धात जग दोन गटात विभागले! 'या' मुस्लीम देशांनी घेतली इराणची बाजू; भारत कोणासोबत?
20
BCCI ने जाहीर केलं 'टीम इंडिया'चं पुढल्या वर्षीचं वेळापत्रक, रोहित-विराट 'या' तगड्या संघाविरूद्ध मैदानात उतरणार

पूरग्रस्तांचे गाऱ्हाणे थेट दिल्लीदरबारी, पाटील यांनी मांडला मुद्दा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2019 01:19 IST

मदतीची मागणी : पाटील यांनी मांडला मुद्दा

डोंबिवली : कल्याण, बदलापूर, वांगणी परिसरांतील पूरग्रस्तांना मदत करण्यासाठी केंद्र सरकारने राज्य सरकारला जास्तीतजास्त मदत द्यावी, अशी मागणी भाजपचे खासदार कपिल पाटील यांनी लोकसभेत बुधवारी शून्य प्रहरात केली. राज्य सरकारसोबतच केंद्र सरकारनेही मदत दिल्यास हजारो पूरग्रस्तांना दिलासा मिळेल, अशी आशा खासदार पाटील यांनी व्यक्त केली.

२६ जुलैच्या मध्यरात्री आलेल्या महापुराचा मुद्दा पाटील यांनी बुधवारी लोकसभेत मांडला. या महापुरात नागरिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. चाळीमध्ये राहणाऱ्या नागरिकांच्या घराच्या पत्र्यांपर्यंत पाणी पोहोचले होते. अनेक इमारतींनाही झळ पोहोचली. राज्य सरकारच्या तरतुदीनुसार पूरग्रस्तांना केवळ पाच हजार रुपये नुकसानभरपाई देण्याची तरतूद आहे. त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी २०१५ च्या राज्य सरकारच्या अध्यादेशात सुधारणा करण्याचा विचार करणार असल्याचे म्हटले आहे. तसेच सध्याची पाच हजार रुपयांची मदत आणखी वाढवून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे आश्वासन दिले आहे. हजारो पूरग्रस्तांना दिलासा देण्यासाठी केंद्र सरकारने राज्य सरकारला आर्थिक साह्य दिल्यास पूरग्रस्तांना आणखी मदत देता येईल, असेही खा. कपिल पाटील यांनी दिली. मध्य रेल्वेमार्गावरील वांगणीजवळ महालक्ष्मी एक्स्प्रेस अडकल्यानंतर प्रवाशांची सुटका करण्यासाठी बचावकार्य राबवले होते. नौदल, एनडीआरएफ, अग्निशमन दल, रेल्वे, महसूल विभागाबरोबरच चामटोली ग्रामस्थांनीही पाण्यातून गाडीपर्यंत पोहोचत प्रवाशांना मदत केली.

टॅग्स :badlapurबदलापूरfloodपूर