शहरं
Join us  
Trending Stories
1
यावेळी बिहारमध्ये चार-चार दिवाळी उत्सव, किती जागा जिंकणार NDA? अमित शाह यांनी सेट केलं टार्गेट; राहुल-तेजस्वी यांच्यावरही बरसले
2
“भाजपाला प्रशासन चालवता येत नाही, CM सहायता फंडाबाबत फडणवीसांनी बोलू नये”; ठाकरेंचा पलटवार
3
“सोनू सूद पंजाबच्या मदतीला धावला, मराठी कलावंतांनी मराठवाड्याला मदत करावी”: अमोल मिटकरी
4
महाराष्ट्रावर प्रचंड मोठे संकट असताना पंतप्रधान का फिरकले नाहीत? काँग्रेसचा सवाल
5
३० सेकंदात रुग्णवाहिका तिथून निघून गेली; आरोपी गगनप्रीत कौरला जामीन मंजूर, कोर्टाने काय म्हटले?
6
१ ऑक्टोबरपासून लागू होणार ट्रेन तिकीट बुकींगचा नवा नियम, झटपट आटोपून घ्या हे काम, अन्यथा...
7
“पूरग्रस्तांचे संसार पुन्हा उभे करण्यासाठी सर्वस्व पणाला लावू”; अजित पवारांचा VCद्वारे संवाद
8
नवरात्रात सोनं खरेदी करणं झालं अवघड! सर्वकालीन उच्चांकी पातळीच्या अगदी जवळ जाऊन पोहोचलं; चेक करा 'लेटेस्ट रेट'
9
जॉन अब्राहमच्या 'फोर्स ३'मध्ये साउथच्या या प्रसिद्ध अभिनेत्रीची झाली एन्ट्री, जाणून घ्या कोण आहे ती?
10
Dombivli Video: हात सोडला अन् ११व्या मजल्यावरून तरुण कोसळला; डोंबिवलीतील घटनेचा व्हिडीओ
11
दुहेरी हत्येच्या प्रयत्नाने दिल्ली हादरली, पतीने पत्नी आणि मुलावर झाडल्या गोळ्या 
12
'सोनम वांगचुकच्या संपर्कात पाकिस्तानी नागरिक, बांगलादेशातही गेले'; पोलिसांचा धक्कादायक खुलासा
13
संविधान रक्षणासाठी काँग्रेस काढणार दीक्षाभूमी ते सेवाग्राम ‘संविधान सत्याग्रह पदयात्रा’
14
"आम्ही जगायचं की नाही, मुख्यमंत्र्यांनी सांगावं"; लक्ष्मण हाकेंचा संतप्त सवाल, हल्ल्याचा सगळा घटनाक्रम सांगितला
15
सुंदर वहिनीला नणंदेने पळवून नेले, घरदार सोडून दोघे झाले गायब, असं फुटलं बिंग   
16
लिव्हिंग रुम, किचन अन् बेडरुम! 'महाराष्ट्राची हास्यजत्रा'मधील 'सावत्या'ने खूपच सुंदर सजवलंय मुंबईतील आलिशान घर
17
Laxman Hake: दहा-बारा पोलीस असताना लक्ष्मण हाकेंची गाडी फोडली; बांबूने हल्ला, काय घडलं?
18
“PM केअर फंडात महाराष्ट्राचाही पैसा, ५० हजार कोटींची मदत जाहीर करावी”; उद्धव ठाकरेंची मागणी
19
“संकट आले तेव्हा आम्ही पंचांग काढून बसलो नाही, सरकारने सरसकट कर्जमाफी द्यावी”: उद्धव ठाकरे
20
'आज आपण संघाची सुरुवात करत आहोत', ना कुठली घोषणा, ना कुठले अतिथी; शंभर वर्षांअगोदर अशी झाली संघाची सुरवात

सुर्योदय अनुभवण्यासाठी देशातील 'या' सनराइज पॉइंट्सना नक्की भेट द्या!

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 11, 2018 13:25 IST

हिवाळ्यामध्ये अनेक जण सुट्टी घेऊन बाहेर फिरून येण्याचा विचार करतात. या मागील उद्देश म्हणजे आपल्या व्यस्त दिनचर्येतून थोडासा वेळ काढून स्वतःला वेळ द्यावा हाच असतो.

हिवाळ्यामध्ये अनेक जण सुट्टी घेऊन बाहेर फिरून येण्याचा विचार करतात. या मागील उद्देश म्हणजे आपल्या व्यस्त दिनचर्येतून थोडासा वेळ काढून स्वतःला वेळ द्यावा हाच असतो. जर तुम्हीही असाच काहीसा प्लॅन करण्याच्या विचारात असाल तर आम्ही तुम्हाला काही बेस्ट डेस्टिनेशन्स सांगणार आहोत. सध्या अनेक मंडळी फिरण्यासाठी सतत विदेशी जाण्याच्या विचारात असतात. यामध्ये वेळही वाया जातो आणि बजेटही थोडं वाढतं. त्याऐवजी आपल्या भारतातच अनेक अशी ठिकाण आहेत जी विदेशातील ठिकाणांची आठवणही येऊ देणार नाहीत. या ठिकाणांना निसर्गाने जणू वरदानच दिलं आहे. जाणून घेऊयात भारतातील सनराइज पॉइन्ट्सबाबत...

टाइगर हिल, दार्जिलिंग 

पश्चिम बंगालमधील दार्जिलिंगमध्ये असलेलें टायगर हिल सनराइज पाहण्यासाठी फार सुंदर ठिकाण आहे. देशा-विदेशातून अनेक पर्यटक येथे निसर्गाचा आस्वाद घेण्यासाठी येत असतात. येथे जेवढे पर्यटक येतात ते टायगर हिलवर सुर्योदय पाहण्यासाठी नक्की जातात. तुम्ही दार्जिलिंगच्या आधी असलेल्या घूम स्टेशनवरून चालत किंवा गाडीने टायगर हिलपर्यंत जाऊ शकता. टायगर हिलपासून कंचनजंगा आणि माउंट एवरेस्टचं सुंदर दृश्य न्याहाळता येतं. 

नंदी हिल्स, कर्नाटक 

दक्षिण भारतातील नंदी टाउनजवळ असलेलं नंदी हिल्स तुम्हाला शहरातील धवपळीपासून थोडासा आराम देऊन वेगळ्या जगाची सफर घडवेल. येथाल जुनी मंदिरं आणि डोंगर दऱ्यांमध्ये तुम्ही हरवल्याशिवाय राहणार नाही. हलक्या धुक्यामधून हळूहळू होणारा सुर्योदय आणि त्याचसोबत आकाशामध्ये पसरणाऱ्या रंगछटा तुमचं मन प्रसन्न करतील. 

कोवलम बीच, केरळ

'गॉड्स ओन कंट्री' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या केरळची ख्याती तर संपूर्ण जगभरात पसरली आहे. निसर्गाचं वरदान लाभलेल्या केरळमध्ये सुर्योदय पाहणं म्हणजे निसर्गाची किमयाच आहे. केरळातील कोवलम बीच आपल्या नैसर्गसौंदर्यासोबतच अरबी समुद्राच्या निळ्याशार पाण्यासाठीही प्रसिद्ध आहे. 

कन्याकुमारी, तमिलनाडु 

भारताच्या दक्षिणेकडील सर्वात शेवटचं टोक म्हणजे कन्याकुमारीची खासियत.  येथे सनराइज पाहणं म्हणजे मन प्रसन्न करणारा अनुभव. हे ठिकाण सुर्योदय आणि सुर्यास्त पाहण्यासाठी परफेक्ट डेस्टिनेशन आहे. कन्याकुमारी म्हणजे हिंद महासागर, अरबी समुद्र आणि बंगालची खाडी या तिघांचाही मिटिंग पॉइंट म्हणूनही ओळखला जातो. 

उमियम लेक, मेघालय 

भारताच्या उत्तरेला असलेला हा तलाव अनेक पर्यटकांचं आकर्षणाचं केंद्र आहे. येथील अद्भुत करणारं सौंदर्य भारतातील नव्हे तर विदेशातील पर्यटकांनाही आपली दखल घेण्यास भाग पाडतं. हा तलाव शिलॉन्गपासून 15 किलोमीटर अंतरावर आहे. तुम्ही शिलॉन्गवरून गाडी बुक करून सकाळी येथे जाऊ शकता. 

टॅग्स :tourismपर्यटनKeralaकेरळTamilnaduतामिळनाडूKarnatakकर्नाटक