शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिल्लीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट, शिंदेसेनेत प्रवेश करणार? चर्चांना उधाण
3
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
4
IND W vs SL W : गोलंदाजीत शर्मा; फलंदाजीत वर्मा! दुसऱ्या टी-२० सामन्यातही लंकेसमोर टीम इंडियाचा डंका!
5
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
6
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
7
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
8
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
9
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
10
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
11
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
12
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
13
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
14
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
15
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
16
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
17
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
18
राहुल गांधींनी जर्मनीत उपस्थित केला 'व्होट चोरी'चा मुद्दा; देशाची बदनामी केल्याचा भाजपचा आरोप
19
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
20
पाकिस्तानी एअरलाइन्स PIAचा नवा मालक कोण होणार? 'या' कंपनीने लावली तब्बल १० लाख कोटींची बोली
Daily Top 2Weekly Top 5

फॉरेन टूरचं बुकिंग मग ते हुशारीनच करायला हवं !

By admin | Updated: May 3, 2017 18:18 IST

विदेशात फिरायची हौस तर आहे, बजेटही मोठं आहे, पण त्यासाठी नेमकं कुठल्या वेळेला बुकिंग करायचं हेच माहीत नसेल तर

- अमृता कदमविदेशात फिरायची हौस तर आहे, बजेटही मोठं आहे, पण त्यासाठी नेमकं कुठल्या वेळेला बुकिंग करायचं याची पुरेशा कल्पना नाहीये... खरंतर असं अनेक जणांच्या बाबतीत होतं. क्रिकेटमध्ये टायमिंग शॉटला जे महत्व आहे, तसंच काहीसं प्रवासाच्या बुकिंगमध्येही आहे. बुकींगच्याबाबतीत योग्य वेळेला हिट केलं तर सिक्सर नाहीतर उगीचंच खिशाला खार लागला म्हणून पश्चातापाची वेळ येते. त्यामुळे इतरांचं ऐकून, त्यांच्या अनुभवांवर अवलंबून राहून तिकीट बुकिंग करु नका. अनेकांना तिकीट बुकिंगसाठी रिसर्च, नियोजन आणि प्रत्यक्षात बुकिंग करणं हे कटकटीचं वाटतं. त्यामुळे ते सरळ स्वत:ला ट्रॅव्हल एजंटच्या हातात सोपवून मोकळे होतात. पण तुमचा हा त्रास वाचवण्यासाठी एका नामांकित संस्थेनं बुकिंगबद्दल केलेल्या रिसर्चची इंटरेस्टिंग आकडेवारी तुम्हाला नक्की फायदेशीर ठरु शकते.

 

स्कायस्कॅनर काय सांगतं?* ‘स्कायस्कॅनर’ या आघाडीच्या ग्लोबल सर्च इंजिननं भारतीयांसाठी जगात फिरण्याची सर्वोत्तम ठिकाणं कुठली आहेत याचा शोध तर घेतलाच, शिवाय त्यासाठी नेमकं कुठल्या काळात बुकिंग केलं तर फायदेशीर ठरेल याचाही निष्कर्ष काढला आहे. जवळपास 5 कोटी ग्राहकांची आकडेवारी गोळा करु न हे निष्कर्ष काढले आहेत त्यामुळे ते नक्कीच विश्वासार्ह आहेत. * स्कायस्कॅनरचा हा निष्कर्ष सांगतो की 24 आठवडे म्हणजे सहा महिन्यांआधी बुकिंग करणं हे सगळ्यात उत्तम. बाली, क्वालालांपूर यासारख्या ठिकाणी 25 आठवडे आधी बुकिंग करणं फायदेशीर ठरतं. भारतीयांसाठी तिकीटांचे जे दर आहेत, त्यात दोन आठवड्याआधी जादा मागणीमुळे 11 ते 16 टक्के वाढ होत असल्याचं या सर्वेक्षणात नमूद केलं आहे. * केवळ शेजारच्या देशांत फिरायला जाण्याऐवजी, सध्या युरोपमध्ये फिरायला जायचाही ट्रेंड वाढू लागला आहे. युरोपसाठी तुम्ही 6 महिन्यांआधी तिकीटं बुक केली तर तुम्ही तब्बल 17 टक्के बचत करु शकता. अर्थात हंगेरीची राजधानी असलेल्या बुडापेस्टसारख्या ठिकाणी तुम्ही दोन महिने आधी प्लॅन केलं तरी विमान तिकीटांत 13 टक्के बचत होऊ शकते. स्पेनची राजधानी माद्रिद तुम्हाला जास्तीत जास्त एक्सप्लोअर करायची असेल तर अडीच महिने आधी बुकिंग केलेलं फायदेशीर ठरतं. . * जवळपास तीन तृतीयांश म्हणजे 70 टक्के भारतीय प्रवाशांना बुकिंगसाठी योग्य वेळ कुठली याची माहितीच नसणं म्हणजे आश्चर्य आहे असा शेरा त्या अहवालात नोंदवला गेलेला आहे. ‘दोन महिन्यांआधी बुकिंग केलं तरी चालतंय की’ या भ्रमात अनेक भारतीय राहतात आणि शेवटच्या मीनिटांपर्यंत धावाधाव करून खिशाला चाप लावून घेतात. * वर नमूद केलेली सगळी ठिकाणं फिरण्यासाठी सप्टेंबर ते डिसेंबर हा कालावधी सर्वांत योग्य आहे. अर्थात बालीसारख्या ठिकाणी जायचं असेल तर एप्रिल हा सर्वात उत्तम महिना असल्याचं स्कायस्कॅनरच्या रिपोर्टमध्ये म्हटलं आहे. त्यामुळे विनाकारण खिसा हलका करून घेणाऱ्या भारतीयांमध्ये आपला समावेश होऊ द्यायचा नसेल तर पुढच्या वेळी बुकिंगबद्दलच्या या महत्वपूर्ण गोष्टी जरूर लक्षात ठेवा.