शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

फॉरेन टूरचं बुकिंग मग ते हुशारीनच करायला हवं !

By admin | Updated: May 3, 2017 18:18 IST

विदेशात फिरायची हौस तर आहे, बजेटही मोठं आहे, पण त्यासाठी नेमकं कुठल्या वेळेला बुकिंग करायचं हेच माहीत नसेल तर

- अमृता कदमविदेशात फिरायची हौस तर आहे, बजेटही मोठं आहे, पण त्यासाठी नेमकं कुठल्या वेळेला बुकिंग करायचं याची पुरेशा कल्पना नाहीये... खरंतर असं अनेक जणांच्या बाबतीत होतं. क्रिकेटमध्ये टायमिंग शॉटला जे महत्व आहे, तसंच काहीसं प्रवासाच्या बुकिंगमध्येही आहे. बुकींगच्याबाबतीत योग्य वेळेला हिट केलं तर सिक्सर नाहीतर उगीचंच खिशाला खार लागला म्हणून पश्चातापाची वेळ येते. त्यामुळे इतरांचं ऐकून, त्यांच्या अनुभवांवर अवलंबून राहून तिकीट बुकिंग करु नका. अनेकांना तिकीट बुकिंगसाठी रिसर्च, नियोजन आणि प्रत्यक्षात बुकिंग करणं हे कटकटीचं वाटतं. त्यामुळे ते सरळ स्वत:ला ट्रॅव्हल एजंटच्या हातात सोपवून मोकळे होतात. पण तुमचा हा त्रास वाचवण्यासाठी एका नामांकित संस्थेनं बुकिंगबद्दल केलेल्या रिसर्चची इंटरेस्टिंग आकडेवारी तुम्हाला नक्की फायदेशीर ठरु शकते.

 

स्कायस्कॅनर काय सांगतं?* ‘स्कायस्कॅनर’ या आघाडीच्या ग्लोबल सर्च इंजिननं भारतीयांसाठी जगात फिरण्याची सर्वोत्तम ठिकाणं कुठली आहेत याचा शोध तर घेतलाच, शिवाय त्यासाठी नेमकं कुठल्या काळात बुकिंग केलं तर फायदेशीर ठरेल याचाही निष्कर्ष काढला आहे. जवळपास 5 कोटी ग्राहकांची आकडेवारी गोळा करु न हे निष्कर्ष काढले आहेत त्यामुळे ते नक्कीच विश्वासार्ह आहेत. * स्कायस्कॅनरचा हा निष्कर्ष सांगतो की 24 आठवडे म्हणजे सहा महिन्यांआधी बुकिंग करणं हे सगळ्यात उत्तम. बाली, क्वालालांपूर यासारख्या ठिकाणी 25 आठवडे आधी बुकिंग करणं फायदेशीर ठरतं. भारतीयांसाठी तिकीटांचे जे दर आहेत, त्यात दोन आठवड्याआधी जादा मागणीमुळे 11 ते 16 टक्के वाढ होत असल्याचं या सर्वेक्षणात नमूद केलं आहे. * केवळ शेजारच्या देशांत फिरायला जाण्याऐवजी, सध्या युरोपमध्ये फिरायला जायचाही ट्रेंड वाढू लागला आहे. युरोपसाठी तुम्ही 6 महिन्यांआधी तिकीटं बुक केली तर तुम्ही तब्बल 17 टक्के बचत करु शकता. अर्थात हंगेरीची राजधानी असलेल्या बुडापेस्टसारख्या ठिकाणी तुम्ही दोन महिने आधी प्लॅन केलं तरी विमान तिकीटांत 13 टक्के बचत होऊ शकते. स्पेनची राजधानी माद्रिद तुम्हाला जास्तीत जास्त एक्सप्लोअर करायची असेल तर अडीच महिने आधी बुकिंग केलेलं फायदेशीर ठरतं. . * जवळपास तीन तृतीयांश म्हणजे 70 टक्के भारतीय प्रवाशांना बुकिंगसाठी योग्य वेळ कुठली याची माहितीच नसणं म्हणजे आश्चर्य आहे असा शेरा त्या अहवालात नोंदवला गेलेला आहे. ‘दोन महिन्यांआधी बुकिंग केलं तरी चालतंय की’ या भ्रमात अनेक भारतीय राहतात आणि शेवटच्या मीनिटांपर्यंत धावाधाव करून खिशाला चाप लावून घेतात. * वर नमूद केलेली सगळी ठिकाणं फिरण्यासाठी सप्टेंबर ते डिसेंबर हा कालावधी सर्वांत योग्य आहे. अर्थात बालीसारख्या ठिकाणी जायचं असेल तर एप्रिल हा सर्वात उत्तम महिना असल्याचं स्कायस्कॅनरच्या रिपोर्टमध्ये म्हटलं आहे. त्यामुळे विनाकारण खिसा हलका करून घेणाऱ्या भारतीयांमध्ये आपला समावेश होऊ द्यायचा नसेल तर पुढच्या वेळी बुकिंगबद्दलच्या या महत्वपूर्ण गोष्टी जरूर लक्षात ठेवा.