शहरं
Join us  
Trending Stories
1
Rain Update : ठाणे, रायगड, मुंबईत मुसळधार, ऑरेंज अलर्ट, पालघरसाठी रेड अलर्ट, भरती-ओहोटीबाबतही इशारा
2
आमदार रोहित पवारांच्या अडचणीत वाढ; मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी ईडीकडून मोठी कारवाई
3
महायुतीत २ मंत्र्यांमध्ये रंगलं मानापमान नाट्य; शिंदेसेनेचे मंत्री नाराज, भाजपा मंत्र्यांचा पलटवार
4
२ मुलांना विष पाजलं, पत्नीचा गळा दाबला अन् मग पतीने...; एकाच कुटुंबातील चौघांची जीवनयात्रा संपली
5
धक्कादायक घटना! एक वर्षाच्या मुलाने नागाचा चावा घेतला, कोब्राचा मृत्यू झाला; पण मुलगाही...
6
पाकिस्तानने अमेरिकेसमोर TRF'वर सूर बदलला! म्हणाले, आम्हाला काही हरकत नाही', हुशारीही दाखवली
7
अल्पवयीन मुलीवर गँगरेप, प्रेग्नेंट असल्याचं कळताच जिवंत गाडण्याचा प्रयत्न; २ अटक तर १ आरोपी फरार
8
₹३० वरुन ₹३००० पार गेला हा शेअर; आता कंपनीनं मोठ्या गुंतवणुकीची केली घोषणा, तुमच्याकडे आहे का?
9
बनावट राजदूत मोठा मासा निघाला! दहा वर्षात १६२ वेळा परदेशात गेला, या मुस्लिम देशात बऱ्याच वेळा गेला
10
ना नुकसानीची भीती, ना पैसे बुडण्याची चिंता; 'या' स्कीममध्ये ₹१ लाख गुंतवून बनवू शकता २७ लाख रुपये
11
पीएम मोदींच्या स्वागतास अख्खे मंत्रिमंडळच आले; भारत मालदीवला 'इतके' कर्ज देणार
12
Video: गुगल मॅपच्या नादात बेलापूर येथे कार पडली खाडीत; सागरी पोलिसांच्या सतर्कतेमुळे महिलेला जीवदान
13
"मेरे को बहुत तकलीफ दिया...", सोलापूरच्या युवकाची अखेरची चिठ्ठी; मृत्यूनंतर वेगळीच शंका
14
आजचे राशीभविष्य २६ जुलै २०२५: 'या' ३ राशीच्या लोकांसाठी लाभाचा दिवस, अपूर्ण कामे पूर्ण होतील
15
"म्हातारी झालीस, लग्न कधी करणार?"; चाहत्याने केली कमेंट, ३८ वर्षीय अभिनेत्री म्हणाली-
16
कारगिल विजयदिन : वयाच्या विसाव्या वर्षी पती शहीद, आता मुलगाही देशसेवेसाठी झाला सज्ज
17
बापरे! १४,२९८ पुरुषांना ‘लाडकी बहीण’चा लाभ! डल्ला मारला कसा?
18
केवळ ‘आय लव्ह यू’ म्हणणे हा लैंगिक छळ नाही; छत्तीसगड उच्च न्यायालयाचा निकाल
19
राज्यात ८०० कोटींचा रुग्णवाहिका घोटाळा, निधी गेला श्रीकांत शिंदेंच्या ट्रस्टकडे : खा. राऊत 
20
महाराष्ट्रात ‘पीएम-किसान’ लाभार्थी संख्येत चौपट वाढ! शेतकऱ्यांच्या खात्यात किती

फॉरेन टूरचं बुकिंग मग ते हुशारीनच करायला हवं !

By admin | Updated: May 3, 2017 18:18 IST

विदेशात फिरायची हौस तर आहे, बजेटही मोठं आहे, पण त्यासाठी नेमकं कुठल्या वेळेला बुकिंग करायचं हेच माहीत नसेल तर

- अमृता कदमविदेशात फिरायची हौस तर आहे, बजेटही मोठं आहे, पण त्यासाठी नेमकं कुठल्या वेळेला बुकिंग करायचं याची पुरेशा कल्पना नाहीये... खरंतर असं अनेक जणांच्या बाबतीत होतं. क्रिकेटमध्ये टायमिंग शॉटला जे महत्व आहे, तसंच काहीसं प्रवासाच्या बुकिंगमध्येही आहे. बुकींगच्याबाबतीत योग्य वेळेला हिट केलं तर सिक्सर नाहीतर उगीचंच खिशाला खार लागला म्हणून पश्चातापाची वेळ येते. त्यामुळे इतरांचं ऐकून, त्यांच्या अनुभवांवर अवलंबून राहून तिकीट बुकिंग करु नका. अनेकांना तिकीट बुकिंगसाठी रिसर्च, नियोजन आणि प्रत्यक्षात बुकिंग करणं हे कटकटीचं वाटतं. त्यामुळे ते सरळ स्वत:ला ट्रॅव्हल एजंटच्या हातात सोपवून मोकळे होतात. पण तुमचा हा त्रास वाचवण्यासाठी एका नामांकित संस्थेनं बुकिंगबद्दल केलेल्या रिसर्चची इंटरेस्टिंग आकडेवारी तुम्हाला नक्की फायदेशीर ठरु शकते.

 

स्कायस्कॅनर काय सांगतं?* ‘स्कायस्कॅनर’ या आघाडीच्या ग्लोबल सर्च इंजिननं भारतीयांसाठी जगात फिरण्याची सर्वोत्तम ठिकाणं कुठली आहेत याचा शोध तर घेतलाच, शिवाय त्यासाठी नेमकं कुठल्या काळात बुकिंग केलं तर फायदेशीर ठरेल याचाही निष्कर्ष काढला आहे. जवळपास 5 कोटी ग्राहकांची आकडेवारी गोळा करु न हे निष्कर्ष काढले आहेत त्यामुळे ते नक्कीच विश्वासार्ह आहेत. * स्कायस्कॅनरचा हा निष्कर्ष सांगतो की 24 आठवडे म्हणजे सहा महिन्यांआधी बुकिंग करणं हे सगळ्यात उत्तम. बाली, क्वालालांपूर यासारख्या ठिकाणी 25 आठवडे आधी बुकिंग करणं फायदेशीर ठरतं. भारतीयांसाठी तिकीटांचे जे दर आहेत, त्यात दोन आठवड्याआधी जादा मागणीमुळे 11 ते 16 टक्के वाढ होत असल्याचं या सर्वेक्षणात नमूद केलं आहे. * केवळ शेजारच्या देशांत फिरायला जाण्याऐवजी, सध्या युरोपमध्ये फिरायला जायचाही ट्रेंड वाढू लागला आहे. युरोपसाठी तुम्ही 6 महिन्यांआधी तिकीटं बुक केली तर तुम्ही तब्बल 17 टक्के बचत करु शकता. अर्थात हंगेरीची राजधानी असलेल्या बुडापेस्टसारख्या ठिकाणी तुम्ही दोन महिने आधी प्लॅन केलं तरी विमान तिकीटांत 13 टक्के बचत होऊ शकते. स्पेनची राजधानी माद्रिद तुम्हाला जास्तीत जास्त एक्सप्लोअर करायची असेल तर अडीच महिने आधी बुकिंग केलेलं फायदेशीर ठरतं. . * जवळपास तीन तृतीयांश म्हणजे 70 टक्के भारतीय प्रवाशांना बुकिंगसाठी योग्य वेळ कुठली याची माहितीच नसणं म्हणजे आश्चर्य आहे असा शेरा त्या अहवालात नोंदवला गेलेला आहे. ‘दोन महिन्यांआधी बुकिंग केलं तरी चालतंय की’ या भ्रमात अनेक भारतीय राहतात आणि शेवटच्या मीनिटांपर्यंत धावाधाव करून खिशाला चाप लावून घेतात. * वर नमूद केलेली सगळी ठिकाणं फिरण्यासाठी सप्टेंबर ते डिसेंबर हा कालावधी सर्वांत योग्य आहे. अर्थात बालीसारख्या ठिकाणी जायचं असेल तर एप्रिल हा सर्वात उत्तम महिना असल्याचं स्कायस्कॅनरच्या रिपोर्टमध्ये म्हटलं आहे. त्यामुळे विनाकारण खिसा हलका करून घेणाऱ्या भारतीयांमध्ये आपला समावेश होऊ द्यायचा नसेल तर पुढच्या वेळी बुकिंगबद्दलच्या या महत्वपूर्ण गोष्टी जरूर लक्षात ठेवा.