शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा वाद चिघळण्याची चिन्हे; गिरीश महाजनच करणार महाराष्ट्रदिनी झेंडावंदन
2
PM मोदींच्या कॅबिनेट सुरक्षा समितीच्या बैठकीत मोठा निर्णय; माजी रॉ प्रमुखांकडे सोपवली महत्त्वाची जबाबदारी
3
निर्लज्ज पाकिस्तान! संसदेत, परराष्ट्रमंत्र्यांनी टीआरएफला वाचवल्याची कबुली दिली, म्हणाले, आम्ही त्यांचे नाव यूएनएससीच्या निवेदनातून...
4
ऐश्वर्या-अविनाश नारकर यांचे भन्नाट रील्स; लेकाची काय असते प्रतिक्रिया? म्हणाले, "तो कधीच..."
5
जगातील टॉप १० सर्वात महागडी शहरे; इथे एक दिवसांचा खर्च म्हणजे महिन्याचा पगार
6
वॉरेन बफेंनी १९८८ मध्ये खरेदी केलेले Coca-Cola चे शेअर्स, माहितीये त्यांच्या १ हजार डॉलर्सचं आज मूल्य काय आहे?
7
'माझा मुलगा फक्त १० वर्षांचा आहे आणि...' वैभव सूर्यवंशीबाबत एबी डिव्हिलियर्सचं मोठं वक्तव्य
8
पती सौदीला कमवायला गेला, इथं पत्नीचे जुळले शेजाऱ्याशी अनैतिक संबंध; पती परतला अन् शेवट झाला
9
नवऱ्याची दाढी आवडली नाही, कापण्यास नकार देताच बायको क्लीन शेव असलेल्या दिरासोबत पसार
10
Akshaya Tritiya 2025: यंदाची अक्षय्य तृतीया 'या' पाच राशींसाठी ठरणार खास; धनसंपत्तीची पूर्ण होणार आस!
11
मागण्या मान्य न झाल्यास २९ ऑगस्टपासून मुंबईत निर्णायक आंदोलन; मनोज जरांगेंचा अल्टिमेटम
12
रणबीर कपूरसोबत रिलेशनशिपमध्ये होती अमिषा पटेल? खुलासा करत म्हणाली, "आम्ही रोमँटिक..."
13
"पहलगामच्या हल्ल्यात धर्म आणायची गरज नाही, तो देशावरचा हल्ला"; 'त्या' विधानावर शरद पवारांचे स्पष्टीकरण
14
डोंगराळ भागाचा प्रत्येक कोपरा होता ठाऊक; पहलगाम हल्ल्यातील खरा सूत्रधार कोण? पाहा
15
क्राईम थ्रिलर! गर्लफ्रेंडला साजरा करायचा होता करवा चौथ; पतीने रचला पत्नीच्या हत्येचा कट
16
"असल्या सर्जिकल स्ट्राईक तर आम्ही गल्लीबोळात करतो’’, संजय राऊतांचा सरकारला टोला 
17
पाकिस्तानी ओसामा...! आधार कार्ड, रेशन कार्ड, मतदानही केले, आता सरकारी नोकरीची तयारी करतोय
18
वडिलांपासून दूर राहिला, किटसाठी दूध विकलं; बर्थडे बॉय रोहित शर्माचा थक्क करणारा प्रवास!
19
IPS देवेन भारती मुंबईचे नवे पोलीस आयुक्त; २६/११ हल्ल्याच्या तपासाचे केले होते नेतृत्व
20
Simhastha Kumbh Mela Nashik: नाशिकमधील रस्ते होणार चकाचक; २२७० कोटी रुपयांची कामे, कोणत्या रस्त्यांचा समावेश?  

भारतातील अशी 10 ठिकाणं जिथे तुमच्या जाण्यावर आहे बंदी

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 6, 2018 11:10 IST

काही कारणांमुळे भारतीयांनाच जाण्याची परवानगी नाहीये. कुठे कुठे तुम्हाला जाण्यास परवानगी नाहीये याची यादी खालीलप्रमाणे... 

(Image Credit : topyaps.com)

भारत हा साऊथ एशियातील सर्वात मोठा देश आणि जगातला सातवा सर्वात मोठा(क्षेत्रफळाने) देश आहे. भारताला मोठी ऐतिहासिक पार्श्वभूमी आहे. पण आजही भारतात अशी काही ठिकाणं आहेत, जिथे काही कारणांमुळे भारतीयांनाच जाण्याची परवानगी नाहीये. कुठे कुठे तुम्हाला जाण्यास परवानगी नाहीये याची यादी खालीलप्रमाणे... 

1) अक्सन चीन, जम्मू-काश्मीर

अक्सन चीन ही भारत आणि चीन या दोन देशातील सर्वात मोठी सीमारेषा आहे. या ठिकाणाला लाईन ऑफ अॅक्च्यूअल कंट्रोल (LAC) असेही म्हटले जाते. हा परीसर जगातील अनेक धोकादायक जागांपैकी एक मानली जाते. 

2) भानगढ किल्ला, राजस्थान

राजस्थानातील अलवार जिल्ह्यात भानगढ हा किल्ला आहे. 17 व्या शतकातील हा किल्ला देशातील अनेक प्रसिद्ध हॉन्टेड ठिकाणांपैकी एक आहे. या किल्ल्याच्या परीसरात कथित भूतं असल्याची चर्चा नेहमीच होत असते. अनेकांनी इथे भूतं असल्याचं सांगितलं आहे. या किल्ल्यात जाण्यासाठी सहसा कुणालाही परवानगी मिळत नाही. पण कुणाला मिळालीच तर अनेक अटींवर परवानगी दिली जाते. 

3) निकोबार आयलंड 

निकोबार आयलंड हे अजूनही अनटच्ड आहेत. यूनेस्कोने या आयलंडला विशेष दर्जा दिला आहे. त्यामुळे इथे जाण्यास सर्वसामान्यांना मज्जाव आहे. मात्र केवळ रिसर्चसाठी जात असाल तर आधी स्थानिक प्रशासनाची परवानगी घ्यावी लागते.  

4) चोलमू लेक, नॉर्थ सिक्कीम

चोलमू लेक ही भारतातील सर्वात उंच लेक आहे. ही लेक नॉर्थ सिक्कीममध्ये असून तिथून चीनची सीमा केवळ चार किमी अंतरावर आहे. इथे जाण्यासाठी मज्जाव आहे. काही योग्य कारण असल्याशिवाय आणि आर्मीची परवानगी असल्याशिवाय इथे जाता येत नाही.

 5) सियाचिन हिमनदी

सियाचिन हे ठिकाण हिमालयात आहे. इथेच भारत-पाकिस्तान सीमारेषा संपते. हा परीसर जगातला सर्वात उंच मिलिट्री पॉईंट आहे. सर्वसामान्य नागरीकांना इथे जाण्यासाठी परवानगी नाहीये. 

6) नॉर्थ सेंटिनेल आयलंड, अंदमान

नॉर्थ सेंटिनेल आयलंड हे अंदमान आणि निकोबारचा भाग आहे. इथे काही आदिवासी राहतात. असे म्हणतात की, त्यांना बाहेरील जगाबाबत काहीही माहिती नाही. त्यामुळे ते बाहेरच्यांना इथे येऊ देत नाहीत. भारत सरकारने इथे जाण्यास बंदी घातली आहे. 

7) बस्तर, छत्तीसगढ

बस्तर हा छत्तीसगढमधील एक जिल्हा असून येथील नैसर्गिक सौंदर्य नेहमीच सर्वांना भुरळ घालतं. पण या परीसरात अनेल नक्षलवागी कारवाया होत असतात. त्यामुळे या परीसरात प्रवास करणे धोक्याचे आहे.  

टॅग्स :Travelप्रवास