शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपचा मोठा निर्णय; मंत्री, खासदार आणि आमदारांच्या नातेवाईकांना महापालिकेचं तिकीट नाही!
2
नाशिकनंतर पुण्यातही महायुती फुटीच्या उंबरठ्यावर; दोन्ही राष्ट्रवादीसोबत शिंदेसेना करणार युती?
3
तीन कोटींचा विमा आणि सरकारी नोकरीसाठी मुलाने रचला भयंकर कट, वडिलांना सर्पदंश करवला, त्यानंतर...
4
संभाजीनगरात 'हायव्होल्टेज' ड्रामा; जंजाळांच्या डोळ्यात अश्रू, शिरसाटांच्या घराबाहेर कार्यकर्ते जमा
5
BMC Elections: महानगरपालिकेसाठी शरद पवारांच्या राष्ट्रवादीची पहिली गर्जना; ७ उमेदवारांची यादी जाहीर!
6
किशोरी पेडणेकर यांना अखेर एबी फॉर्म मिळाला; उमेदवारी मिळताच ठाकरेंची रणरागिनी गरजली!
7
जेवणावळीत ऐनवेळी भात संपला, संतापलेल्या काँग्रेस कार्यकर्त्यांनी मिळेल त्यावर ताव मारला, व्हिडीओ व्हायरल  
8
पॉलिटिकल 'स्टेटस' ठेवाल तर सरकारी नोकरी गमावून बसाल ! कर्मचाऱ्यांसाठी काय नियम ?
9
वर्षानुवर्षे द्वेष मनात विषासारखा पेरला जातो..; एंजेल चकमाच्या मृत्यूवर राहुल-अखिलेश संतापले
10
नाशिकमध्ये महायुतीत फूट! भाजपा स्वबळावर तर एकनाथ शिंदे अन् अजित पवारांचा पक्ष युतीत लढणार
11
Video:साडेचार कोटींचा दरोडा! डोक्याला लावल्या बंदुका, ज्वेलरी शॉप कसे लुटले? सीसीटीव्ही बघा
12
Kishori Pednekar: अर्ज भरण्यासाठी फक्त एकच दिवस शिल्लक, अजूनही एबी फॉर्म नाही; किशोरीताईंची मातोश्रीवर धाव!
13
"जे झालं ते झालं! आता मला पुन्हा शून्यातून सुरुवात करावी लागेल"; असं का म्हणाली स्मृती मानधना?
14
ज्यांनी ज्यांनी धनुष्यबाणाला मतदान केलं ते स्वर्गात जातील; शिंदेसेनेचे नेते शहाजीबापूंचं विधान
15
न्यूझीलंडविरुद्ध होणाऱ्या एकदिवसीय मालिकेपूर्वी विराटने घेतला मोठा निर्णय, आता...
16
BMC Election 2026: मुंबई मनपासाठी काँग्रेसकडून ८७ उमेदवारांची पहिली यादी प्रसिद्ध, ‘या’ चेहऱ्यांना संधी  
17
क्रिकेट खेळताना वाद, लग्नाच्या रिसेप्शनमध्ये चाकू हल्ला; कुणालचा रेल्वे स्टेशन जवळच्या झुडूपात सापडला मृतदेह
18
"अन्याय कितीही मोठा असला तरी..." मुंबईत भाजपाच्या माजी नगरसेविका बंडखोरीच्या तयारीत
19
IND vs NZ ODI : न्यूझीलंडविरुद्धच्या वनडेत बुमराह–हार्दिकला विश्रांती; श्रेयस अय्यरचं काय?
20
मनसेचा पहिला उमेदवार ठरला, राज ठाकरेंनी दिला AB फॉर्म; यशवंत किल्लेदार कुठून लढणार?
Daily Top 2Weekly Top 5

भारतातील अशी 10 ठिकाणं जिथे तुमच्या जाण्यावर आहे बंदी

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 6, 2018 11:10 IST

काही कारणांमुळे भारतीयांनाच जाण्याची परवानगी नाहीये. कुठे कुठे तुम्हाला जाण्यास परवानगी नाहीये याची यादी खालीलप्रमाणे... 

(Image Credit : topyaps.com)

भारत हा साऊथ एशियातील सर्वात मोठा देश आणि जगातला सातवा सर्वात मोठा(क्षेत्रफळाने) देश आहे. भारताला मोठी ऐतिहासिक पार्श्वभूमी आहे. पण आजही भारतात अशी काही ठिकाणं आहेत, जिथे काही कारणांमुळे भारतीयांनाच जाण्याची परवानगी नाहीये. कुठे कुठे तुम्हाला जाण्यास परवानगी नाहीये याची यादी खालीलप्रमाणे... 

1) अक्सन चीन, जम्मू-काश्मीर

अक्सन चीन ही भारत आणि चीन या दोन देशातील सर्वात मोठी सीमारेषा आहे. या ठिकाणाला लाईन ऑफ अॅक्च्यूअल कंट्रोल (LAC) असेही म्हटले जाते. हा परीसर जगातील अनेक धोकादायक जागांपैकी एक मानली जाते. 

2) भानगढ किल्ला, राजस्थान

राजस्थानातील अलवार जिल्ह्यात भानगढ हा किल्ला आहे. 17 व्या शतकातील हा किल्ला देशातील अनेक प्रसिद्ध हॉन्टेड ठिकाणांपैकी एक आहे. या किल्ल्याच्या परीसरात कथित भूतं असल्याची चर्चा नेहमीच होत असते. अनेकांनी इथे भूतं असल्याचं सांगितलं आहे. या किल्ल्यात जाण्यासाठी सहसा कुणालाही परवानगी मिळत नाही. पण कुणाला मिळालीच तर अनेक अटींवर परवानगी दिली जाते. 

3) निकोबार आयलंड 

निकोबार आयलंड हे अजूनही अनटच्ड आहेत. यूनेस्कोने या आयलंडला विशेष दर्जा दिला आहे. त्यामुळे इथे जाण्यास सर्वसामान्यांना मज्जाव आहे. मात्र केवळ रिसर्चसाठी जात असाल तर आधी स्थानिक प्रशासनाची परवानगी घ्यावी लागते.  

4) चोलमू लेक, नॉर्थ सिक्कीम

चोलमू लेक ही भारतातील सर्वात उंच लेक आहे. ही लेक नॉर्थ सिक्कीममध्ये असून तिथून चीनची सीमा केवळ चार किमी अंतरावर आहे. इथे जाण्यासाठी मज्जाव आहे. काही योग्य कारण असल्याशिवाय आणि आर्मीची परवानगी असल्याशिवाय इथे जाता येत नाही.

 5) सियाचिन हिमनदी

सियाचिन हे ठिकाण हिमालयात आहे. इथेच भारत-पाकिस्तान सीमारेषा संपते. हा परीसर जगातला सर्वात उंच मिलिट्री पॉईंट आहे. सर्वसामान्य नागरीकांना इथे जाण्यासाठी परवानगी नाहीये. 

6) नॉर्थ सेंटिनेल आयलंड, अंदमान

नॉर्थ सेंटिनेल आयलंड हे अंदमान आणि निकोबारचा भाग आहे. इथे काही आदिवासी राहतात. असे म्हणतात की, त्यांना बाहेरील जगाबाबत काहीही माहिती नाही. त्यामुळे ते बाहेरच्यांना इथे येऊ देत नाहीत. भारत सरकारने इथे जाण्यास बंदी घातली आहे. 

7) बस्तर, छत्तीसगढ

बस्तर हा छत्तीसगढमधील एक जिल्हा असून येथील नैसर्गिक सौंदर्य नेहमीच सर्वांना भुरळ घालतं. पण या परीसरात अनेल नक्षलवागी कारवाया होत असतात. त्यामुळे या परीसरात प्रवास करणे धोक्याचे आहे.  

टॅग्स :Travelप्रवास