शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या पंतप्रधानपदी कुत्रा जरी...; लष्करप्रमुख मुनीर यांनी अमेरिकेत सभा घेतली अन् शोभा केली
2
Video : हॉट एअर बलूनमध्ये लागली आग, २१ जण जमिनीवर कोसळले! ८ जणांचा जागीच मृत्यू
3
IND vs ENG : बुमराह एकटा नडला! फिल्डिंगवेळी गडबड घोटाळा; ओली पोपच्या सेंच्युरीसह दुसरा दिवस इंग्लंडचा
4
इराणवर मोठा हल्ला; इस्रायलने पुन्हा खामेनेईंचे कमांडर मारले; अणुशास्त्रज्ञाचाही मृत्यू
5
बंकर बस्टर बॉम्ब...! अमेरिकेची एकाचवेळी ६ बी-२ बॉम्बर विमाने झेपावली; इराणमध्ये काहीतरी मोठे घडणार...
6
बुमराहचा मोठा पराक्रम! इंग्लंडच्या मैदानात पाकच्या वसीम अक्रमच्या विक्रमाला लावला सुरुंग
7
सस्पेन्स...! कोण होणार बिहारचा CM? अमित शाह स्पष्टच बोलले, नितिश कुमारांचे टेन्शन वाढवले
8
मोठा खुलासा! राजाचा मृतदेह घरी आणण्यापासून ते अंत्यविधीपर्यंत प्रत्येक क्षणाची खबर सोनमला देत होता राज कुशवाहा अन्... 
9
१४ वर्षांनी लहान असणाऱ्या तरुणाच्या प्रेमात पडली ४५ वर्षांची महिला, पतीला असं संपवलं की कुणाला संशयही आला नाही!
10
"पिक्चर अभी बाकी है…!"; 2029 मधील आपल्या भूमिकेबद्दल नेमकं काय म्हणाले नितिन गडकरी?
11
Superb! पंतच्या खेळीवरील गावसकरांची कमेंट चर्चेत; आधी 'स्टुपिड' म्हणत काढली होती 'अक्कल' (VIDEO)
12
युद्धाच्या सावटाखाली इराण, खामेनेई यांनी निवडले तीन संभाव्य उत्तराधिकारी, पण मुलाचे नाव नाही!
13
बापरे...! आता गो इंडिगोच्या वैमानिकाने मेडे अलर्ट पाठविला; रात्रीची वेळ अन् विमानात प्रवासीही होते...
14
गोदाम फोडणाऱ्या दोघांना अटक; अडीच लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त, लातूर स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई
15
मौसम मस्ताना..! जसप्रीत बुमराहनं पहिल्याच षटकात सलामीवीर Zak Crawley चा केला 'करेक्ट कार्यक्रम'
16
महाराष्ट्र निवडणुकीचे सीसीटीव्ही फुटेज देण्यास नकार; राहुल गांधींची मागणी, आयोगाने दिली ही कारणे...  
17
कुपवाडजवळ पावणेबारा लाखांची दारू पकडली, आटपाडीच्या दोघांना अटक, स्थानिक गुन्हे अन्वेषणची कारवाई
18
रिलायन्स दरोड्यातील प्रिन्सकुमारला अटक; डेहराडून कारागृहातून ताबा, साथीदारांना दुचाकी पुरवली
19
"दहशत आणि विनाशासाठी इस्रायल दोषी...!", UN मधील अमेरिकेच्या विधानाने सर्वच चकित; व्हिडिओ व्हायरल
20
Viral Video : प्रसिद्धीसाठी काहीही! लाईक्स आणि व्ह्यूजसाठी महिलेनं चक्क बेडकांसोबत बनवला व्हिडीओ

पर्यावरण जपण्यासाठी धडपडणारी 7 ठिकाणं. पर्यावरण आणि पर्यटन याचा समतोल कसा राखावा हे यांच्याकडून शिका! -

By admin | Updated: June 21, 2017 18:36 IST

पर्यटन आणि पर्यावरणाचा समतोलकसा साधला जातो हे बघायचं असेल तर या सात ठिकाणी एकदा जावून यायला हवं.

-अमृता कदम

आपण जेव्हा बाहेर फिरायला जातो तेव्हा स्वत:ची, आपल्या सामानाची नीट काळजी घेतो. पण आपण जिथे फिरायला गेलो आहोत, त्या ठिकाणाची, तिथल्या निसर्गाची आणि पर्यावरणाचीही आपण तितकीच काळजी घेतो का? सध्याच्या काळात पर्यावरणाचा ऱ्हास वेगानं होतो आहे. आणि यात बेजबाबदार पर्यटनाचा वाटाही मोठा आहे. आणि म्हणूनच पर्यावरणाचं संरक्षण करण्याच्या उपायात जबाबदार पर्यटन हाही एक उपाय आहे.

पर्यटन करताना, निसर्गाचा आनंद उपभोगताना आपण पर्यावरण संरक्षण आणि संवर्धनाचं भान बाळगणं गरजेचं आहे. त्यातूनच ‘शाश्वत पर्यटना’ची संकल्पना उदयाला आली आहे. शाश्वत पर्यटनामध्ये पर्यटनस्थळाच्या नैसर्गिक, सामाजिक आणि कलात्मक पर्यावरणाला कोणत्याही पद्धतीनं बाधा उत्पन्न न करणं आणि पर्यटनाचा पर्यावरणावर कमीत कमी दुष्परिणाम होईल हे पाहणं अपेक्षितआहे. शाश्वत पर्यटनाच्या याच संकल्पनेला प्रोत्साहन देण्यासाठी संयुक्त राष्ट्रसंघानं 2017 हे वर्ष ‘आंतरराष्ट्रीय शाश्वत पर्यटन वर्ष’ म्हणून घोषित केलं आहे. आंतरराष्ट्रीय शाश्वत पर्यटन वर्षाचं औचित्य साधत वान्डरट्रेल या पर्यटनविषयक आॅनलाइन पोर्टलनं भारतातल्या सात इको-फ्रेंडली पर्यटनस्थळांची यादी दिली आहे. याठिकाणी पर्यटन आणि पर्यावरणाचा समतोल साधण्याचा प्रयत्न केला आहे. हा समतोल कसा साधला जातो हे बघायचं असेल तर या सात ठिकाणी एकदा जावून यायला हवं.

पर्यटनाचा उद्देश असतो तो आनंद मिळवणं. पण आपला आनंद उपभोगताना आजूबाजूच्या पर्यावरणाला जपणंही तितकंच महत्त्वाचं आहे. कारण शेवटी आपल्या प्रत्येक छोट्या-मोठ्या गरजांसाठी आपण प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे या पर्यावरणावरच तर अवलंबून असतो. पर्यावरणाच्या संवर्धानासाठी पुढाकार घेणारी ही गावं आपल्याला प्रकर्षानं या वास्तवाची जाणीव करुन देतात. 1) उरवू बाम्बू व्हिलेज, वायनाड ( केरळ)

बांबूवर आधारित हस्तोद्योग आणि बांबू हाऊसमधील स्टे यांच्या माध्यमातून स्वयंपूर्ण झालेलं हे गाव इको-फ्रेंडली पर्यटनासाठीचं एकदम आदर्श उदाहरण आहे. इथे येणारे पर्यटक इथल्या बांबूंच्या घरात राहतात, घरगुती पद्धतीचंच जेवण जेवतात. इथल्या हस्तोद्योगांच्या कारखान्याला भेट देतानाच स्थानिक जीवनशैली आणि त्यांच्या जीवनशैलीत असलेलं बांबूचं महत्त्व जाणून घेतात. पर्यटनामुळे या छोट्याशा गावाचा आर्थिक विकासही साध्य होत आहे. जेव्हा केव्हा तुम्ही केरळची ट्रीप प्लॅन कराल, तेव्हा एक-दोन दिवस या गावासाठी राखून ठेवायलाही विसरु नका.

2) शोला शॅक, वायनाड (केरळ)

केरळमधलं अजून एक निसर्गसंपन्न गाव. इथे तुम्ही इथल्या स्थानिक लोकांसोबत कम्युनिटी लिव्हिंगचा अनुभव घेऊ शकता. इथल्या आदिवासी जमातींचं संगीत आणि लोककलांचाही आनंद तुम्हाला घेता येतो. या गावाचं एक महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे इथे प्रत्येक घरात इको-फ्रेंडली टॉयलेट बांधलेलं आहे. पर्यटनातून जो पैसा मिळतो त्यातला बराचसा भाग हा इथल्या आदिवासींच्या आरोग्यविषयक गरजा भागवण्यासाठी वापरला जातो.

 

3) वनघाट, जिम कॉर्बेट ( उत्तराखंड)

निसर्गप्रेमी आणि संरक्षक सुमंत यांनी वनघाटला पर्यावरणस्नेही बनवण्याची संकल्पना मांडली. इथे येणाऱ्या पर्यटकांना निसर्गाची जवळीक अनुभवायला मिळावं हाच त्यामागचा उद्देश. वनघाटमध्ये फिरणं म्हणजे इथल्या समृद्ध जैववैविधतेला जवळून अनुभवण्यासारखं आहे. वनघाटमध्ये तुम्ही कोणत्याही स्टर हॉटेल्समध्ये राहत नाही तर इको-फ्रेंडली घरांमध्येच राहता. इथे मिळणारी शांती तुम्हाला एक वेगळाच आत्मिक आनंद मिळवून देते.

4) फार्म कँप, मिसनागुडी ( तामिळनाडू)

नावावरूनच हा अग्रो-टूरिझमचाच एक प्रकार असल्याचं लगेच लक्षात येतं. ‘फार्म टू प्लेट’ या संकल्पनेवरच इथल्या पर्यटनाचं मॉडेल तयार करण्यात आलं आहे. फार्म टू प्लेट’ संकल्पना प्रत्यक्षात आणण्यासाठी हातभार लावण्याची संधीही तुम्हाला फार्म कँपमध्ये मिळते. दुभत्या जनावरांना चारा घालणं, दुधाच्या धारा काढणं, अंडी गोळा करु न आणणं, शेतावर जाणं या सगळ्या गोष्टी फार्म कँपमध्ये तुम्ही एन्जॉय करू शकता.

5) सेव्हाग्राम, गढवाल (उत्तराखंड)

सेंद्रिय शेती हे इथलं वैशिष्ट्य. कोणत्याही रासायनिक द्रव्यांचा वापर न करता पिकवलेल्या भाज्या खाणं हे हायब्रीड धान्य, भाज्या खाणाऱ्या आपल्यासारख्या लोकांसाठी खास अनुभवच म्हणायला हवा. पर्यटनातून येणारा महसूल या गावातील लोकांचं जीवनमान उंचावण्यासाठी खर्च होतो. सेंद्रिय शेतीचा प्रसार आणि त्याचं महत्त्व जाणवून देण्यात या गावाचं योगदान विचारात घेऊनच त्याचा समावेश पर्यावरणस्नेही पर्यटनस्थळात केला गेला आहे.

6) मानेलँड ( गुजरात)

गीरमधलं हे ठिकाण सर्वार्थानं इको-फ्रेण्डली आहे. हे गीर जिल्ह्यातलं एकमेव ठिकाण आहे जे स्वयंपाकघरातील टाकाऊ पदार्थांचा वापर कंपोस्ट तयार करण्यासाठी करतं, ज्यांचा उपयोग तिथल्या झाडांसाठी केला जातो. आता या गावाचं पुढचं लक्ष आहे ते सोलर हिटर्स आणि रेनवॉटर हार्वेस्टिंग! त्यामुळे गीरच्या अभयारण्याला भेट देण्याचं ठरवत असाल तर तुमच्या प्लॅनिंगमध्ये या गावासाठीही एक दिवस राखून ठेवायला हरकत नाही.

 

           

7)सराई कोठी (मध्य प्रदेश)

इथे वन्यजीव संवर्धनासाठी स्थानिकांची मदत घेतली जाते, त्यांना या कामात सामावून घेतलं जातं. त्यामुळे वनसंपदेचा गैरवापर आणि नुकसानही टळतं.