शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांच्या मुंबईतील बैठकीला भाजप कार्यकर्त्यालाच पाठविले? फोटो समोर आल्याने उडाली खळबळ...
2
पाकिस्तानला मोठा झटका देण्याच्या तयारीत अफगाणिस्तान, करणार तगडा प्रहार; भारतही देणार साथ!
3
'काँग्रेसमुळे जम्मू-काश्मीरचा एक भाग पाकिस्तानात गेला', पंतप्रधान मोदींचा घणाघात...
4
दरमहा लाखोंची कमाई; तरीही महिन्याच्या शेवटी खर्चाला पैसे उरत नाही? आर्थिक तज्ञांनी सांगितलं खरं कारण
5
लिव्ह-इन पार्टनरच्या सांगण्यावरून रुग्णालयातून बाळ चोरलं, पण परत येताना रस्ताच विसरली! आणखी एक चूक केली अन्...
6
"रोहित आर्यने जो मार्ग स्वीकारला तो चुकीचा, पण..." काँग्रेसचे उपस्थित केले गंभीर प्रश्न
7
"मी मालिकेत येईन पण...", शिल्पा शिंदे 'भाभीजी घर पर है'मध्ये कमबॅक करणार? दिली प्रतिक्रिया
8
Mumbai Local Train Update: वांगणी-शेलू स्थानकादरम्यान मालगाडीच्या इंजिनात बिघाड; CSMT कडे जाणारी लोकलसेवा ठप्प
9
World Cup 2025 FINAL: टीम इंडियाला नडू शकते आफ्रिकन कर्णधार लॉरा वोल्वार्ड, जाणून घ्या रेकॉर्ड
10
भयानक! 'तो' वाद टोकाला गेला! बायकोने फेसबुक वापरल्याने नवरा संतापला, थेट जीवच घेतला
11
५ वर्षांसाठी ₹१० लाखांचं कार लोन घेतल्यास कोणत्या बँकेत किती पडेल EMI? पाहा संपूर्ण गणित
12
७-८ नव्हे तर 'पुन्हा शिवाजीराजे भोसले' सिनेमा बनवण्यासाठी लागले तब्बल 'इतके' कोटी; महेश मांजरेकर म्हणाले- "बजेट वाढलं कारण..."
13
पृथ्वीच्या 'महाविनाशा'चा धोका टळला? शास्त्रज्ञांचा नवीन अभ्यास समोर आला...
14
सोने महागले! मागणी १६% ने घटली; लोक आता ज्वेलरीपेक्षा 'या' फॉर्ममध्ये करतायेत मोठी गुंतवणूक
15
जेमिमा रॉड्रीग्ज, गौतम गंभीर अन् माखलेली जर्सी... १४ वर्षांपूर्वीचा भारताचा 'विजयी' योगायोग
16
नोव्हेंबरमध्ये जन्मलेल्या व्यक्ती म्हणजे प्रेमाचा सागर, पण पोटात ज्वालामुखी; वाचा गुण दोष!
17
Rakhi Sawant : "मी दोन्ही किडन्या विकल्या, सलमानसाठी सोन्याची अंगठी घेतली"; राखी सावंतचा धक्कादायक दावा
18
सौदी अरेबियाने घेतला मोठा निर्णय! लाखों भारतीय मुस्लिमांवर होणार थेट परिणाम; नेमकं प्रकरण काय?
19
ट्रम्पना ठेंगा! भारतात परत येतेय 'ही' ऑटो कंपनी; ४ वर्षांपूर्वी बंद केलेली फॅक्ट्री परत होणार सुरू
20
वेगाची राणी...! महाराष्ट्राची लेक, डायना पंडोले इतिहास रचणार; फेरारी क्लब चॅलेंजमध्ये भाग घेणारी पहिली भारतीय महिला रेसर

जमिनीखाली असलेला एक अद्भुत किल्ला, ज्यात एकाचवेळी १० हजार सैनिक मावतात.

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 19, 2020 15:51 IST

या किल्ल्यात शेकडो तळघरं आणि भूयारी मार्ग सुद्धा आहेत. या ठिकाणचे भूयारी मार्ग कुठे सुरू होतात याबद्दल कोणालाही फारशी माहिती नाही. 

भारतात अनेक ऐतिहासीक किल्ले आहेत. पण आजपर्यंत तुम्ही जितके किल्ले पाहिले ते सगळे जमिनीवर असतील. आज आम्ही तुम्हाला ज्या किल्ल्याबद्दल सांगणार आहोत. तो खूप अनोखा आणि वेगळा आहे. हा भारतातील एकमेव किल्ला आहे जो जमिनीवर नाही तर चक्क जमिनीच्या खाली आहे. 

जवळपास ४०० वर्ष जुन्या या किल्ल्याला अफगाणी शासनकर्ता शेरशह सुरी याने तयार केले होते. म्हणूनच या किल्ल्याला शेरगडचा किल्ला असं म्हटलं जातं.  या किल्ल्यात शेकडो तळघरं आणि भूयारी मार्ग सुद्धा आहेत. या ठिकाणचे भूयारी मार्ग कुठे सुरू होतात याबद्दल कोणालाही फारशी माहिती नाही. 

(Image credit- quora)

बिहारच्या या कॅमूर पर्वतावर असलेल्या या किल्ल्याला अशाप्रकारे तयार करण्यात आलं आहे की बाहेरून या किल्ल्याला कोणीही पाहू शकणार नाही. चारही बाजूनीं उंचच उंच भिंतीनी घेरलेला हा किल्ला आहे. आजूबाजूला जंगल सुद्धा आहेत. एकाबाजूने दुर्गावती नदी वाहत असते. या किल्ल्याच्या चारही बाजूला भूयारी मार्गांचं जाळ तयार झालं आहे. या किल्ल्याच्या आत जाण्यासाठी सुद्धा याच मार्गातून जावं लागतं. जर ही भूयारी मार्ग बंद झाला तर किल्ला दिसत सुद्धा नाही. 

शेरशाह सुरी याने हा किल्ला आपल्या शत्रुंपासून वाचण्यासाठी तसंच सुरक्षित राहण्यासाठी तयार केला होता. हा व्यक्ती आपले सैनिक आणि कुटूंबासह या ठिकाणी राहत होता. या किल्ल्याला अशा पद्धतीने बनवण्यात आलं होतं की  किल्ल्याच्या दिशेने १० किलोमीटरपासून जरी शत्रु येत असेल तरी दृष्टीस पडेल. ( हे पण वाचा-अहमदनगरमधील ५०० वर्षाचा इतिहास असलेला 'हा' किल्ला पाहिला का? नसेल तर लगेच करा प्लॅन!)

या किल्ल्यातील तळघरात १० हजारांपेक्षा जास्त सैनिक थांबायचे. अनेक दिवसांचं अन्नपाणी या ठिकाणी स्टोर केलं जात होतं. या ठिकाणी अनेक वर्ष जुनी विहिर सुद्धा आहे. जवळपास ४०० वर्ष आधी या रहस्यमय किल्ल्यात तयार झालेला भूूयारी मार्ग कठिण काळात किल्ल्याच्या बाहेर जाण्यासाठी तयार करण्यात आली होती. शत्रुंना शिक्षा देण्यासाठी तळघर तयार करण्यात आली होती.  या किल्ल्याबद्दल अधिक माहिती ही इतिहासकरांकडे सुद्धा नाही. पण यांच्यामते  राजा शाहबाद यांना त्यांचे प्रिय मित्र खरवार राजा गजपती यांनी भेट म्हणून हा किल्ला दिला होता. (हे पण वाचा- Mahashivratri Special Tour Package : महाशिवरात्रीसाठी खास टूर पॅकेज, कमी खर्चात करा ९ ज्योतिर्लिंगांचे दर्शन)

टॅग्स :Travel Tipsट्रॅव्हल टिप्स