शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
2
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
3
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
4
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
5
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
6
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
7
समृद्धी महामार्गावर अपघात, आयशर वाहन खांबावर आदळले! संभाजीनगरचा चालक ठार, सहकारी जखमी
8
"अशीच कुठूनतरी येईल गोळी किंवा फुटेल ग्रेनेड...", श्रेयस राजेची पहलगाम हल्ल्यावरील कविता चर्चेत
9
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
10
EPFO पोर्टलनं वाढवली युजर्सची डोकेदुखी; लॉग इन पासून पासबुक डाऊनलोडपर्यंत येताहेत समस्या
11
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
12
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
13
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
14
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
15
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
16
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
17
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज
18
पाकिस्तानला तुर्कीची रसद! बायरकतार ड्रोनसह सहा विमाने भरून शस्त्रास्त्रे कराचीला पोहोचली
19
Mumbai: BEST बसचे तिकीट दरात दुप्पटीने महागणार! साध्या आणि एससी बसच्या प्रवासासाठी किती पैसे मोजावे लागणार?
20
ऐकावे ते नवलच! एक व्यक्ती मृत असतानाही सोलापुरातील निवडणुकीत झाले १०० टक्के मतदान

येत्या गुरूवारी ठाण्यातील गावदेवी मैदानात शून्य सावली शो

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 13, 2018 15:53 IST

ठाण्यात विज्ञानाविषयी कुतूहल निर्माण व्हावे यासाठी पहिल्यांदाच शून्य सावली शो आयोजित करण्यात आला आहे.

ठळक मुद्देयेत्या गुरूवारी ठाण्यातील गावदेवी मैदानात शून्य सावली शोशून्य सावली दिवसाचे महत्व प्रात्यिक्षकासह सांगणार जनमानसात विज्ञानाविषयी कुतूहल जागृत करणे हा उद्देश - सोमण

ठाणे: मराठी विज्ञान परिषद ठाणे विभाग आणि विश्वास सामाजिक संस्था ठाणे यांच्या संयुक्त विद्यमानेगुरु वार १७ मे रोजी दुपारी ठीक १२ वाजता ठाण्यातील गावदेवी मैदानात ‘शून्य सावली शो’ आयोजित करण्यात आला आहे. यामध्ये खगोल अभ्यासक दा. कृ. सोमण शून्य सावली दिवसाचे महत्व प्रात्यिक्षकासह सांगणार आहेत तरी सर्व विज्ञानप्रेमी लोकांनी वेळेवर हजर राहून याचा लाभ घ्यावा असे आवाहन नगरसेवक संजय वाघुले यांनी केले आहे.     ठाण्यात प्रथमच अशा प्रकारचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. जनमानसात विज्ञानाविषयी कुतूहल जागृत करणे हा उद्देश असल्याचे सोमण यांनी सांगितले. यात शून्य सावली म्हणजे काय, शुन्य सावली कशी होते याची माहिती देत उपस्थितांना वर्तळाकार उभे करुन प्रात्यक्षिक दाखविणार आहे. सूर्य नेहमी डोक्यावर येत नाही तो वर्षातून दोनदा डोक्यावर का येतो याचे उत्तर ठाणेकरांना येत्या गुरूवारी मिळणार आहे. सूर्याचा जन्म कसा झाला, त्याचा मृत्यू कधी होणार आहे याची माहिती यादिवशी दिली जाणार असल्याचे सोमण यांनी सांगितले. यावेळी उपस्थितांच्या शंकांचे निरसन केले जाईल. विज्ञानप्रेमींनी आपले प्रश्न लिहून आणावे असे आवाहन देखील आयोजकांनी केले आहे. संकटकाळी सावलीही आपली साथ देत नाही असं म्हटलं जातं. परंतू १७ मे रोजी संकट नसतानाही ठाणेकरांची सावली साथ सोडणार आहे. येत्या गुरूवारी ठाणे, डोंबिवली, कल्याण येथे शुन्य सावलीचा दिवस असणार आहे. या दिवशी मधून दुपारी १२ वाजून ३५ मिनिटांनी उन्हात उभे राहिल्यास आपली सावली पायाखाली आल्याने दिसणार नाही याचे प्रात्यक्षिक ठाणेकरांना पाहायला मिळेल. ज्या दिवशी सूर्याची क्रांती आपल्या गावच्या अक्षांशाएव्हढी होते त्या दिवशी दुपारी सूर्य आपल्या डोक्यावर आल्याने आपली सावली आपल्या पायाखाली आल्याने सावली अदृश्य होते. या दिवसाला ‘शून्य सावलीचा दिवस ‘ असे म्हणतात. यावर्षी ८ मे- सिंधुदुर्ग, कणकवली, देवगड, राजापूर, १० मे कोल्हापूर , मिरज सांगली, ११ मे रत्नागिरी, १२ मे सातारा - सोलापूर,  १३ मे उस्मानाबाद, १४ मे रायगड, पुणे, लातूर, १५ मे अंबेजोगई, १६ मे मुंबई, नगर, परभणी नांदेड, १७ मे ठाणे डोंबिवली, कल्याण, पैठण. १९ मे औरंगाबाद बीड, जालना, चंद्रपूर. २० मे नाशिक, वाशीम गढचिरोली २१ मे बुलढाणा , यवतमाळ २२ मे वर्धा २३ मे धुळे, २४ मे भुसावळ जळगांव या ठिकाणांवरून त्या त्या दिवशी अनुभव घेता येणार असल्याचे सोमण म्हणाले. 

टॅग्स :thaneठाणेcultureसांस्कृतिकMumbaiमुंबई