शहरं
Join us  
Trending Stories
1
सरकारचा जीआर कोणाला सरसकट आरक्षण देत नाही; मुख्यमंत्री फडणवीसांनी स्पष्ट केली भूमिका
2
नेपाळचा पंतप्रधान कोण? आंदोलकांमध्येच जुंपली; भारत समर्थक म्हणून सुशीला कार्की यांना एका गटाने नाकारले
3
अमेरिकेत भारतीय वंशाच्या व्यक्तीची निर्घृण हत्या, पत्नी आणि मुलासमोरच केले कुऱ्हाडीने वार
4
आजचे राशीभविष्य- १२ सप्टेंबर २०२५: प्रकृतीची काळजी घ्या, वाहन चालवताना दक्ष राहा!
5
विशेष लेख: मशाल हाती घेऊन इंजिन धावेल असे दिसते; पण...
6
बस प्रवास स्वस्त? टोलमध्ये मिळणार सवलत, राष्ट्रीय महामार्गासाठी टोल धोरण लवकरच
7
लाखो मुंबईकर लवकरच होणार 'अधिकृत रहिवासी'; २५ हजारांहून अधिक इमारतींच्या 'ओसी'चा मार्ग अखेर मोकळा
8
बुलेट ट्रेनच्या १५७ किमीवरील कामांसाठी महत्त्वाकांक्षी करार, मुंबई-अहमदाबाद प्रवास होणार वेगाने
9
अग्रलेख: जागतिक खेडे ते खंडित जग! युद्धज्वर जगाला संपवून टाकेल
10
राज्यात तब्बल एक लाख आठ हजार कोटींची गुंतवणूक; ४७ हजार रोजगारांची निर्मिती होणार
11
व्होटबंदी : साप मेला नाही; पण दात काढले!
12
Mhada: ठाणे शहर आणि जिल्हा, वसईतील म्हाडाच्या ५ हजार घरांसाठी दोन लाख अर्ज
13
पाकिस्तानसोबत क्रिकेट नकोच..; IND-PAK सामन्यावर प्रियंका चतुर्वेदींचे सरकारला आवाहन
14
मोठी बातमी! एल्फिन्स्टन ब्रिज उद्या मध्यरात्रीपासून बंद; जाणून घ्या पर्यायी मार्ग...
15
Asia Cup 2025 PAK vs Oman : भारतीय वंशाचा कॅप्टन सलमानच्या पाकला भिडणार! अन्...
16
'रशियन तेल खरेदी थांबवा अन्यथा...',अमेरिकन मंत्री हॉवर्ड लुटनिकची भारताला पुन्हा धमकी
17
Asia Cup 2025 BAN vs HK : कॅप्टन लिटन दासची 'फिफ्टी'; बांगलादेशनं मॅच जिंकली, पण...
18
छत्तीसगडमध्ये भीषण चकमक! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 
19
परदेशात कोणत्या गुप्त बैठकांसाठी जाता? CRPF च्या पत्रावरुन भाजपने राहुल गांधींना घेरले
20
Mustafizur Rahman Stunning Catch : विकेटचा रकाना रिकामा; पण मुस्ताफिझुरनं बेस्ट कॅचसह केली हवा (VIDEO)

कोणत्या खटल्यांना प्राधान्य द्यायचे हे ठरवावे लागेल; न्या. अभय ओक यांचे प्रतिपादन

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 17, 2021 09:00 IST

न्यायालयाने कोणत्या प्रकारच्या खटल्यांना प्राधान्य द्यावे, याबाबतचे धोरण अद्याप तयार झालेले नाही. कोणत्या खटल्याना प्राधान्य द्यायचे याचा विचार करण्याची वेळ आली आहे. त्याबाबत प्रयत्न सुरू आहेत, असे प्रतिपादन सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश न्या. अभय ओक यांनी केले.

ठाणे : न्यायालयाने कोणत्या प्रकारच्या खटल्यांना प्राधान्य द्यावे, याबाबतचे धोरण अद्याप तयार झालेले नाही. कोणत्या खटल्याना प्राधान्य द्यायचे याचा विचार करण्याची वेळ आली आहे. त्याबाबत प्रयत्न सुरू आहेत, असे प्रतिपादन सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश न्या. अभय ओक यांनी केले.शहरातील मो. ह. विद्यालय येथे शनिवारी सकाळी त्यांच्यासाेबत प्रश्नोत्तराचा तास रंगला होता. यावेळी ज्येष्ठ पत्रकार प्रकाश बाळ, ग्रंथालीचे दिनकर गांगल, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते संजय मं. गो., ॲड. संजय बोरकर यांनी त्यांना प्रश्न विचारले.ओक म्हणाले की, न्यायदानाचे काम हे निर्भयपणे, निःपक्षपाती आणि अलिप्तपणे करावे अशी संकल्पना आहे. तालुकानिहाय, जिल्हानिहाय न्यायालये ही खरी न्यायालये असल्याचे ते यावेळी म्हणाले. वकील आणि न्यायाधीश म्हणून काम करताना येणारा फरक सांगताना ते म्हणाले की, वकील म्हणून पक्षकाराची बाजू न्यायाधीशाला समजावून सांगताना मर्यादा येतात, पण न्यायाधीश म्हणून आपल्या विवेकबुद्धीला पटते आणि जे कायद्यात बसते असा आदेश काढता येतो. न्यायालयापेक्षा जी वेगळी शक्ती आहे ती योग्य न्याय देईल या संकल्पनेला १९५० नंतर स्थान नसल्याचे ते म्हणाले. कमी उत्पन्न असलेल्या व्यक्तींना मोफत कायदेविषयक साहाय्य या संकल्पनेसाठी सर्वोच्च न्यायालयाने पुढाकार घेतला आहे.‘चांगले काम करण्याचा प्रयत्न’ठाणे : माझ्याकडून अनेकांच्या अपेक्षा आहेत. या अपेक्षांचे ओझे माझ्यावर आहे. माझी सर्वोच्च न्यायालयाची कारकीर्द तीन वर्षे २६७ दिवस इतकी आहे. या कारकिर्दीत जितके चांगले काम करता येईल, तितके करीन, असे प्रतिपादन सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश न्या. अभय ओक यांनी केले.  ओक म्हणाले की, अनेक घटना अशा घडत असतात की त्यावेळी शाळेची आठवण येत असते. यावेळी त्यांनी कर्नाटक उच्च न्यायालयातील काही प्रसंग सांगताना शाळेतील शिक्षकांच्या आठवणींना उजाळा दिला. शाळेच्या जुन्या इमारतीचा फोटो पाहून शाळेच्या जुन्या आठवणी जाग्या झाल्या.