शहरं
Join us  
Trending Stories
1
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
2
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
3
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
4
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
5
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
6
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
7
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
8
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
9
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
10
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
11
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
12
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
13
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
14
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
15
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
16
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
17
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
18
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
19
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
20
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...

निवारा अभियान : आपणच बांधू परवडणारी घरं!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 11, 2018 03:48 IST

यूएलसी कायद्यांतर्गत सरकारच्या ताब्यात असलेली १००९ एकर जमीन मुंबई व उपनगरांतील नागरिक खरेदी करू शकतो. त्यासाठी २५ जणांची सदस्य असलेली सहकारी संस्था स्थापन करून ती जमीन खरेदी करा.

डोंबिवली - यूएलसी कायद्यांतर्गत सरकारच्या ताब्यात असलेली १००९ एकर जमीन मुंबई व उपनगरांतील नागरिक खरेदी करू शकतो. त्यासाठी २५ जणांची सदस्य असलेली सहकारी संस्था स्थापन करून ती जमीन खरेदी करा. त्या संस्थेच्या माध्यमातून परवडणारी घरे आपण बांधू शकतो, अन्यथा ती जमीन बिल्डरांच्या घशात जाईल, असा विश्वास स्वस्त घरांचे स्वप्न बघणाऱ्यांच्या मनात निवारा अभियानाचे कार्याध्यक्ष विश्वास उटगी यांनी वसवला.स्वस्त घरांच्या चळवळीसाठी डोंबिवलीत आंबेडकर सभागृहात शनिवारी एक सभा आयोजित करण्यात आली होती. याप्रसंगी कार्याध्यक्ष उटगी यांनी उपरोक्त आवाहन केले.उटगी म्हणाले की, कमाल जमीन धारणा कायदा अर्थात यूएलसी अ‍ॅक्ट आघाडी सरकारने रद्द केला. हा कायदा रद्द करताना घरबांधणीचे प्रमाण वाढेल. त्यामुळे जागांच्या किमती कमी होतील, असा दावा तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांनी केला होता. परंतु, ना जमिनीच्या किमती कमी झाल्या, ना परवडणारी घरे उभारली गेली. तसेच पडून असलेल्या जमिनीवर विशेष करही बसवला गेला नाही. त्यामुळे सामान्यांना त्याची किंमत मोजावी लागत आहे.मुंबई व उपनगरांत घरांच्या किमती भरमसाट वाढल्या आहे. त्या सामान्यांच्या आवाक्याबाहेर आहे. ज्याला मुंबईत एक लाख रुपये पगाराची नोकरी आहे, त्यालादेखील मुंबईत घर घेता येत नाही. मुंबई उपनगरांत घरांच्या किमती ३० ते ७० लाखांपर्यंत आहेत. ही वस्तुस्थिती आहे. आघाडी सरकारने यूएलसी कायदा रद्द करून सामान्यांच्या डोळ्यांत धूळफेक केली, असा आरोपही उटगी यांनी केला.भाजपा सरकारकडून स्वस्त घरांच्या भूलथापाभाजपाने पंतप्रधान आवास योजनेंंतर्गत २०२२ पर्यंत देशातील प्रत्येक व्यक्तीला घर देण्याचे आश्वासन दिले. २०१४ साली दिलेल्या आश्वासनानुसार त्यांच्या सरकारची टर्म २०१९ ला संपते. चार वर्षे उलटून गेली, तरी अद्याप एकाही ठिकाणी घरे बांधली गेलेली नाही.वचननाम्याच्या पूर्तीचा कुठेही मागमूस नाही. एकीकडे आश्वासन देऊन फसवणूक केली जात आहे. दुसरीकडे परवडणारी घरे उभारू, असे सरकार सांगते. बिल्डरांकडूनही परवडणाºया घरांची जाहिरात केली जात आहे. प्रत्यक्षात ही घरे पडवडणारी नाहीत, असे उटगी यांनी सांगितले.यूएलसीअंतर्गत ४९ हजार एकर जागायूएलसी कायदा रद्द झाल्यावर सरकारच्या ताब्यात एकूण ४९ हजार हेक्टर जमिनीपैकी १००९ एकर जमीन आहे. या जमिनीवर सरकार परवडणारी घरे उभारत नाही. ही जमीन बिल्डरांच्या घशात घालण्याचा कट सरकारचा आहे. ही जमीन कुठे आहे, याची माहितीदेखील माहितीच्या अधिकारात देण्यास सरकारकडून टाळाटाळ केली जात आहे. त्यामुळे या जमिनीवर हक्क सांगण्यासाठीसहकारी सोसायटी स्थापन करावी.प्रत्येकाने १० हजार रुपये बँकेत जमा करावे. २५ जणांचे अडीच लाख रुपये होतील. तसेच निवारा अभियानाकडे या सोसायटीची नोंद करावी. त्यासाठी प्रत्येक सदस्याला ३०० रुपये शुल्क भरावे लागेल. हजारो सहकारी सोसायट्या स्थापन करून १००९ एकर जमीन सरकारकडून विकत घेता येईल. बांधकाम खर्चासाठी वर्गणी काढून घरे उभारता येतील, असे आवाहन उटगी यांनी केले आहे.या मोहिमेतून मुंबई व उपनगरांतील ४५ लाख सामान्य नागरिकांना परवडणारी घरे उभी करता येऊ शकतात. केवळ यूएलसीची जमीनच नव्हे, तर मुंबई उपनगरांत मिठागरांची पाच हजार एकर जमीन उपलब्ध आहे. त्याठिकाणी परवडणारी घरे बांधली जाऊ शकतात. मुंबईत आतापर्यंत चार हजार ४०० सोसायट्या स्थापन करण्यात यश आलेले आहे.म्हाडाचा आदर्श संपलापरवडणारी घरे महाराष्ट्राच्या निर्मितीनंतर म्हाडा उभारत होती. म्हाडा ही एक आदर्श संस्था होती. गेल्या २० वर्षांत म्हाडाने परवडणारी घरे उभारणे बंद केले आहे. म्हाडाकडे दीड लाख घरे पडून आहे. त्यापैकी केवळ १६०० घरांसाठी म्हाडाने आता लॉटरी काढली आहे. म्हाडाच्या घरांच्या किमती मुंबईत एक ते दीड कोटीच्या खाली नाही. स्वस्त घरांची बांधणीच म्हाडाने थांबवली आहे.‘सरकारने बिल्डरांचे खिसे भरले’सरकारने शहरी गरिबांसाठी एसआरएची घरकुल योजना आणली. या योजनेतून सरकारने मुंबई व ठाण्यातील बिल्डरांचे खिसे भरले. बिल्डरांनी या योजनेतून एफएसआय लाटले, असा आरोप उटगी यांनी केला.

टॅग्स :HomeघरMumbaiमुंबईnewsबातम्या