शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाण्याच्या थेंबा-थेंबासाठी तरसणार पाकिस्तान! पहलगामनंतर भारताचे 'वॉटर स्ट्राइक'; सिंधू जल करार स्थगित
2
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
3
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
4
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
5
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
6
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
7
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
8
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
9
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
10
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
11
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
12
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
13
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
14
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

यंदाचा अर्थ संकल्प हा एका वर्षाचा असला तरी यात दशकाचा विचार   - दीपक करंजीकर 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 4, 2020 16:43 IST

ठाणे  : यंदाचा अर्थसंकल्प हा एका वर्षाचा असला तरी यात दशकाचा विचार केलेला आहे. जागतिकीकरण, खाजगिकारण, उदारीकरण या १९९१ ...

ठळक मुद्देवर्षाचा संकल्प, दशकाचा विचार - दीपक करंजीकर अर्थभान आणि संकल्प याचा समन्वय - डॉ. अभिजित फडणीस आर्थिक मंदी की संधी या पुस्तकाचे प्रकाशन 

ठाणे : यंदाचा अर्थसंकल्प हा एका वर्षाचा असला तरी यात दशकाचा विचार केलेला आहे. जागतिकीकरण, खाजगिकारण, उदारीकरण या १९९१ च्या बदलानंतर पुन्हा एक मोठा बदल घडविण्याचे संकेत अर्थ संकल्पाने दिला आहे. केवळ सवलतीचा विचार करण्यापेक्षा संपूर्ण देशाच्या अर्थकारणाचा विचार करायला लावणारा अर्थसंकल्प आहे, असे प्रतिपादन प्रमुख वक्ते, अर्थ विश्लेषक, उदयॊजक, लेखक, अभिनेते दीपक करंजीकर यांनी केले.

          दीनदयाळ प्रेरणा केंद्र आयोजित स्व, भगवानराव पटवर्धन स्मृती व्याख्यानात अर्थसंकल्प २०२० या विषयवार दीपक करंजीकर बोलत  होते. येथील सहयोग मंदिराच्या सभागृहात व्याख्यान झाले. यावेळी व्यासपीठावर कार्यक्रमाचे अध्यक्ष  अर्थ अभ्यासक डॉ. अभिजित फडणीस, दीनदयाळ प्रेरणा केंद्राचे अध्यक्ष भा. वा. दाते, कार्यवाह मकरंद मुळे, सदस्य संजीव ब्रह्मे उपस्थित होते. या व्याख्यानाच्या निमित्त डॉ. अभिजित फडणीस यांनी लिहिलेल्या आर्थिक मंदी की संधी या पुस्तकाचे प्रकाशन दीपक करंजीकर यांच्या हस्ते झाले. आपल्या भाषणात डॉ. दीपक करंजीकर म्हणाले, अर्थसाक्षरतेच्या पुढचे पाऊल या अर्थसंकल्पाने टाकले आहे. हा अर्थसंकल्प दीर्घकाळाचा विचार मांडतो. वर्ष २०३० पर्यंतच्या आर्थिक बदलांची पायाभरणी या अर्थसंकल्पात आहे. आपल्या सवयी बदलायला लावणारा हा अर्थसंकल्प आहे. गुंतवणूक केवळ कर वाचविण्यासाठी नव्हेतर भविष्याचा विचार करण्यासाठी हे सूत्र अर्थसंकल्पात मांडले आहे. देशाचा गियर या अर्थसंकल्पाने बदलला आहे. हा बदल लक्षात घेऊन अर्थसंकल्पावर चर्चा केली पाहिजे. असे दीपक करंजीकर यांनी सांगितले.  आपल्या अध्यक्षीय भाषणात डॉ. अभिजित फडणीस म्हणाले,  अर्थसंकल्प म्हणजे अर्थभान आणि संकल्प यांचा समन्वय आहे. आकडेवारीपेक्षा संकल्पावर भर देण्याचा पायंडा गेल्या काही वर्षांपासून सुरू झाला आहे त्याचे स्वागत केले पाहिजे. येत्या तीन वर्षात शेतकऱ्याचे उत्पन्न दुप्पट करण्याचा संकल्प त्यातीलच एक भाग आहे. रासायनिक खर्चिक शेतीपासून परत एकदा पारंपारिक नैसर्गिक आणि जैविक शेतीकडे वाटचाल करण्याचा आणि त्यातून शेतकऱ्यांची बचत वाढवण्याचा निर्धार आणि त्याचबरोबर अन्नदाता ते उर्जादाता, जैविक विविधता जपणारी आणि स्त्रियांना त्यांचा अधिकार परत प्रदान करणारी धान्यलक्ष्मी योजना या माध्यमातून काही मूलभूत बदल होणार आहेत. पायाभूत साधने, स्वच्छ भारत आणि उत्तम रेल्वे आणि नवीन १०० विमानतळ यांची सांगड पर्यटनाशी घातली जाणार आहे. आपली सिंधू-सरस्वतीवर आधारित पुरातन संस्कृती, आपलं कलावैविध्य हे जगाला खुणावत आहे आणि त्यातून पर्यटनाचे नवीन आयाम जोडले जाणार आहेत. तसेच भारतातील तरुण हा जगाच्या मागण्या पूर्ण करणारा शिक्षक, परिचारक, तंत्रज्ञ होऊ शकतो ही नवी दिशा देखील अर्थसंकल्पात आहे. वित्तीय शिस्त पाळत, जनसामान्यांसाठी नवीन संधी उपलब्ध करून देणारा हा अर्थसंकल्प आहे,  असेही डॉ. अभिजित फडणीस म्हणाले.  प्रमुख वक्ते दीपक करंजीकर यांचे स्वागत भा.वा .दाते यांनी तर, अध्यक्ष डॉ. अभिजित फडणीस यांचे स्वागत संजीव ब्रह्मे यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दीनदयाळ प्रेरणा केंद्राच्या भरत अनिखिंडी यांनी तर आभार प्रदर्शन प्रमोद घोलप यांनी आणि वक्त्यांचा परिचय कल्पना राईलकर यांनी करून दिला. व्याख्यानाला नागरिकांनी उस्फूर्त प्रतिसाद दिला. सभागृह तुडुंब भरले होते.  

टॅग्स :thaneठाणेbudget 2020बजेटEconomyअर्थव्यवस्था