शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai: तोंडाला रुमाल बांधून आला अन् धाड, धाड; धारावीत भर बाजारात महिलेवर गोळीबार!
2
Russia Ukraine War: 'रशियाकडे युद्ध थांबवण्याची शेवटची संधी' डोनाल्ड ट्रम्प यांचा पुतिन यांना इशारा!
3
मनसे कार्यकर्त्यांकडून कोचिंग सेंटरच्या संचालकाला मारहाण, कल्याण येथील व्हिडीओ व्हायरल
4
Sangli: नागपंचमीनिमित्त सांगलीत भाविकांना जिवंत नागांचे दर्शन घडणार, खेळावर बंदी कायम!
5
निशिकांत दुबेंना घेराव घातल्यानं राज ठाकरेंकडून वर्षा गायकवाड यांचे कौतुक, म्हणाले...
6
महापालिका निवडणुकीत आघाडी असणार की नाही, त्वरीत सांगा! पुण्यातून शरद पवार गटाची जाहीर मागणी
7
तब्बल ३८ तास बंद राहिला टोलनाका, तरीही २४ हजार लोकांनी प्रामाणिकपणे भरला टोल     
8
How To Deal With Heart Attack: घरात एकटे असताना 'हार्ट अटॅक' आला तर स्वत:चा जीव कसा वाचवाल? डॉक्टरांनी सांगितल्या 'या' सोप्या टिप्स
9
'नागपूरची लेक' वर्ल्ड चॅम्पियन दिव्या देशमुखला नितीन गडकरींचा 'व्हिडीओ कॉल', काय झाल्या गप्पा?
10
"महाराष्ट्राकडे 'बुद्धी आणि बळ' दोन्ही ओतप्रोत, ते जेव्हा..."; राज ठाकरेंकडून दिव्या देशमुखचं कौतुक
11
Pune Crime: 'छातीत दुखतंय', इंजिनिअर तरुण मीटिंग रुममधून उठला अन् सातव्या मजल्यावरून मारली उडी
12
वयोवृद्ध महिलेच्या खुनाचे रहस्य उलगडले, सावत्र मुलाला व पतीला अटक, गुन्हे शाखा दोनची कामगिरी
13
नागपुरला मिळाले ३५ वे पोलीस ठाणे; खापरखेडा पोलीस ठाणे आता नागपुरच्या कार्यकक्षेत
14
'अर्थव्यवस्था बंद करावी का?' रशियाकडून स्वस्त तेल खरेदी करण्याच्या वादाला भारताचे प्रत्युत्तर, आरसा दाखवला
15
Divya Deshmukh: बुद्धिबळाच्या पटावर नव्या 'क्वीन'चं राज्य! 'महाराष्ट्राची लेक' दिव्या देशमुख 'वर्ल्ड चॅम्पियन'; कोनेरु हम्पी उपविजेती
16
"ऑपरेशनला सिंदूर नाव देणं म्हणजे भावनांशी खेळ, एकाही देशाने साथ दिली नाही’’, अरविंद सावंत यांचा मोदी सरकारवर हल्लाबोल
17
'लाडकी बहीण योजनेला सुद्धा भ्रष्टाचारातून सुट्टी नाही'; रोहित पवारांचा अजित पवारांवर पलटवार, आदिती तटकरेंच्या खात्याचं प्रकरण काढलं
18
'शत्रूची किती विमानं पाडली, हे त्यांनी कधीच विचारलं नाही'; राजनाथ सिंह यांचा लोकसभेत राहुल गांधींवर निशाणा
19
थायलंड आणि कंबोडियामध्ये अखेर युद्धविराम! संघर्ष थांबला, या देशाची मध्यस्थी ठरली निर्णायक
20
टाटा ते HDFC बँक.. बाजाराच्या घसरणीतही 'हे' ५ स्टॉक करणार बंपर कमाई! एक्सपर्टने दिले टार्गेट प्राईज

पांढऱ्या कांद्याने आणले यंदा डोळ्यांत पाणी

By admin | Updated: April 24, 2017 02:18 IST

रुचकर, चवदार आणि औषधी गुणधर्मांमुळे पांढऱ्या कांद्याला महत्त्व आहे. मात्र, या वर्षी योग्य भाव मिळत नसल्यामुळे नफा तर सोडाच,

अंबाडी : रुचकर, चवदार आणि औषधी गुणधर्मांमुळे पांढऱ्या कांद्याला महत्त्व आहे. मात्र, या वर्षी योग्य भाव मिळत नसल्यामुळे नफा तर सोडाच, पण झालेला खर्चही वसूल होतो की नाही, अशी भीती शेतकऱ्यांना वाटू लागली आहे. यामुळे शेतकऱ्यांच्या डोळ्यांत पाणी आले आहे.भिवंडी, वाडा, वसई या तालुक्यांमध्ये भाताचे पीक मोठ्या प्रमाणात घेतले जाते. भातपिकानंतर येथील शेतकरी कडधान्ये, फळे व फुलांच्या शेतीसह भाजीपाल्याची शेती करतात. पूर्वी एकमेव भाताचे पीक घेतले जात असे. आता मात्र पांढऱ्या कांद्याला येथील हवामान पोषक असल्याने अनेक शेतकरी त्याची शेती करू लागले आहेत. वेढे, वेढेपाडा, दुगाड, कोशिंबे, वारेट, झडिके, हिवाळी (भिवंडी), चांबळे, डाकिवली, बिलावली, देवघर, गातेस (वाडा), भिनार, शिरवली, आडणे, भाताणे, वडघर (वसई) या गावांमध्ये पांढऱ्या कांद्याची लागवड केली जाते. कांद्याला १० ते १२ दिवसांमध्ये पाणी दिले जाते. त्यामुळे कमी पाण्यात कांदा तयार होत असल्याने शेतकऱ्यांनी कांदा लागवडीस पसंती दिली आहे. कांद्याला शेणखत व रासायनिक खतेही दिली जातात. कीटकनाशके फवारणीसह एका एकराला सुमारे ६० हजार इतका खर्च येतो. या वर्षी थंडी पडल्याने कांदा पिकावर परिणाम होऊन कांद्याची म्हणावी तशी वाढ झाली नाही. त्यातच, गेल्या वर्षी २५ रु पये प्रतिकिलो असणारा भाव घसरून सद्य:स्थितीत चालू वर्षी निम्म्यावर येऊन १० ते १२ रु पये प्रतिकिलो एवढा झाला आहे, अशी माहिती वेढेपाडा येथील चंद्रकांत भोईर, अशोक लाटे, योगेश लाटे व वेढे येथील आत्माराम पाटील या शेतकऱ्यांनी दिली. (वार्ताहर)