शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

पाणीसमस्या नसलेल्या पाड्यांमध्येही यंदा टंचाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 3, 2019 00:15 IST

टँकरने होणारा पुरवठा कमी : विहिरींनीही गाठला तळ, ग्रामस्थांचे हाल

भातसानगर : शहापूर तालुक्यातील पाणीटंचाई संपण्याचे नावच घेत नाही, असे वाटू लागले आहे. कलभोंडे, पाटीलवाडी, नवीवाडी, राजाचीवाडी या वाड्यांची त्यामध्ये भर पडली आहे.

शहापूर तालुक्यात पावसाळा सुरू होण्याच्या आधी मात्र पाणीटंचाई तीव्र होत असताना दिसते. अनेक गाव, पाडे पाणीटंचाईच्या समस्येने त्रस्त झाले आहे. सकाळची कामाची सुरु वात व संध्याकाळी शेवटही याच पाणीसमस्येने होतो. कधी नव्हे ती गावे व पाडे आज पाणीसमस्येने ग्रस्त झाले आहेत. पुढील वर्षी मात्र ही समस्या निर्माण होऊ नये, म्हणून त्यावर काय उपाययोजना केल्या, हेही पाहणे आवश्यक झाले आहे.

तालुक्यात सद्य:स्थितीत २०० गावपाड्यांवर हे संकट ओढवले आहे. कलभोंडे, पाटीलवाडी, नवीनवाडी, राजाचीवाडी या सर्वच वाड्यांत टँकरने पाणी सुरू असून ते कमी पडत आहे. त्यातच तीनतीन दिवसांआड टँकर येत असल्याने नागरिकांना मिळालेले पाणी पुरवून वापरावे लागत आहे. मात्र, कधीकधी विहिरीतील झऱ्याच्या पाण्यासाठीही तासन्तास विहिरीवर ताटकळत बसावे लागते. या तिन्ही पाड्यांतील लोक विहिरीतील पाण्याचा वापर करत असतात. नदीपात्रातील भागात वनविभागाच्या मदतीने बंधारे बांधण्यात आले आहेत. या बंधाºयात पाणी साठवून राहिल्याने त्याचा या लोकांना चांगला वापर करता येतो. मात्र, या वर्षी त्यामध्येही पाणी नसल्याने मोठी अडचण झाली आहे.

या पाड्यांमध्ये असलेल्या विहिरी आटत नाही. बºयाच दिवसांपर्यंत हे पाणी पुरत असे. मात्र, यावर्षी लवकरच टंचाई निर्माण झाली. ही टंचाई लवकर कमी होण्यासाठी आता वळवाच्या पावसाची वाट बघत बसावी लागणार आहे.

हंडाभर पाण्यासाठी महिलांची वणवण सुरू असते. त्यात वरून सूर्य आग ओकत असल्यामुळे त्यांच्या हालात अधिकच भर पडत आहे.सध्या मोठ्या संख्येने गावपाड्यांत पाणीटंचाई निर्माण झाली आहे. त्यामुळे सर्वच गावपाड्यांना दररोज पाणी पुरवणे शक्य नाही. मात्र, तीही काळजी घेतली जात आहे. - एम.बी. आव्हाड, उपकार्यकारी अभियंता

या परिसरातील पाड्यामध्ये टँकरने पाणीपुरवठा सुरू आहे. मात्र, तीन ते चार दिवसांनी येणारे पाणी पुरत नाही. - जानू हिरवे, म. ठाकूर आदिवासी संघटना

टॅग्स :water scarcityपाणी टंचाई