शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

पाणीसमस्या नसलेल्या पाड्यांमध्येही यंदा टंचाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 3, 2019 00:15 IST

टँकरने होणारा पुरवठा कमी : विहिरींनीही गाठला तळ, ग्रामस्थांचे हाल

भातसानगर : शहापूर तालुक्यातील पाणीटंचाई संपण्याचे नावच घेत नाही, असे वाटू लागले आहे. कलभोंडे, पाटीलवाडी, नवीवाडी, राजाचीवाडी या वाड्यांची त्यामध्ये भर पडली आहे.

शहापूर तालुक्यात पावसाळा सुरू होण्याच्या आधी मात्र पाणीटंचाई तीव्र होत असताना दिसते. अनेक गाव, पाडे पाणीटंचाईच्या समस्येने त्रस्त झाले आहे. सकाळची कामाची सुरु वात व संध्याकाळी शेवटही याच पाणीसमस्येने होतो. कधी नव्हे ती गावे व पाडे आज पाणीसमस्येने ग्रस्त झाले आहेत. पुढील वर्षी मात्र ही समस्या निर्माण होऊ नये, म्हणून त्यावर काय उपाययोजना केल्या, हेही पाहणे आवश्यक झाले आहे.

तालुक्यात सद्य:स्थितीत २०० गावपाड्यांवर हे संकट ओढवले आहे. कलभोंडे, पाटीलवाडी, नवीनवाडी, राजाचीवाडी या सर्वच वाड्यांत टँकरने पाणी सुरू असून ते कमी पडत आहे. त्यातच तीनतीन दिवसांआड टँकर येत असल्याने नागरिकांना मिळालेले पाणी पुरवून वापरावे लागत आहे. मात्र, कधीकधी विहिरीतील झऱ्याच्या पाण्यासाठीही तासन्तास विहिरीवर ताटकळत बसावे लागते. या तिन्ही पाड्यांतील लोक विहिरीतील पाण्याचा वापर करत असतात. नदीपात्रातील भागात वनविभागाच्या मदतीने बंधारे बांधण्यात आले आहेत. या बंधाºयात पाणी साठवून राहिल्याने त्याचा या लोकांना चांगला वापर करता येतो. मात्र, या वर्षी त्यामध्येही पाणी नसल्याने मोठी अडचण झाली आहे.

या पाड्यांमध्ये असलेल्या विहिरी आटत नाही. बºयाच दिवसांपर्यंत हे पाणी पुरत असे. मात्र, यावर्षी लवकरच टंचाई निर्माण झाली. ही टंचाई लवकर कमी होण्यासाठी आता वळवाच्या पावसाची वाट बघत बसावी लागणार आहे.

हंडाभर पाण्यासाठी महिलांची वणवण सुरू असते. त्यात वरून सूर्य आग ओकत असल्यामुळे त्यांच्या हालात अधिकच भर पडत आहे.सध्या मोठ्या संख्येने गावपाड्यांत पाणीटंचाई निर्माण झाली आहे. त्यामुळे सर्वच गावपाड्यांना दररोज पाणी पुरवणे शक्य नाही. मात्र, तीही काळजी घेतली जात आहे. - एम.बी. आव्हाड, उपकार्यकारी अभियंता

या परिसरातील पाड्यामध्ये टँकरने पाणीपुरवठा सुरू आहे. मात्र, तीन ते चार दिवसांनी येणारे पाणी पुरत नाही. - जानू हिरवे, म. ठाकूर आदिवासी संघटना

टॅग्स :water scarcityपाणी टंचाई