शहरं
Join us  
Trending Stories
1
स्टार फुटबॉलर लिओ मेस्सी पोहोचला 'वनतारा'मध्ये; केली महाआरती, वन्य प्राण्यांमध्येही रमला!
2
मेस्सीची 'वनतारा भेट'! महाआरती, शिवाभिषेक, बाप्पाचरणी नतमस्तक अन् वाघ-सिंहाशी धमाल (Photos)
3
IPL 2026 Auction: पृथ्वी शॉने लिलाव सुरू असताना केलेली मोठी चूक, नंतर करावं लागलं 'हे' काम
4
नागपुरात भाजपमध्ये उमेदवारीसाठी तोबा गर्दी, मुलाखतीच्या वेळापत्रकात करावा लागला बदल
5
VIDEO : अनसोल्ड परदेशी खेळाडूसाठी काव्या मारननं पर्समधून १३ कोटी काढले; संजीव गोएंका बघतच राहिले!
6
Aadhaar New Rules : आधार फेस ऑथेंटिकेशन म्हणजे काय? केंद्र सरकार नवीन नियम लागू करणार
7
पृथ्वीचं 'ग्रहण' सुटलं! दोन वेळा 'अनसोल्ड' राहिल्यावर शेवटी जुन्या मालकानेच दाखवला भरवसा
8
स्मृतिभ्रंशाने त्रस्त असलेल्या महिलेचा क्रिकेटपटू सलीम दुराणी यांची पत्नी असल्याचा दावा
9
"पंतप्रधान मोदींना दोन गोष्टींचा अत्यंत तिरस्कार, एक गांधींचे विचार अन् दुसरे...!"; राहुल गांधींचा हल्लाबोल
10
पतसंस्था अध्यक्षाला ग्राहक आयोगाने सुनावली दोन वर्षांच्या कारावास, दंडाची शिक्षा
11
विरार हत्याकांड प्रकरण: कुख्यात गुंड सुभाषसिंह ठाकूर याला ७ दिवसांची पोलीस कोठडी
12
मुंबईकर सरफराज खानला मोठा दिलासा! IPL च्या आगामी हंगामात पगारवाढीसह चेन्नईकडून उतरणार मैदानात
13
रोजगार क्षेत्रातून दिलासादायक बातमी; बेरोजगारी 9 महिन्यांच्या नीचांकी पातळीवर
14
IPL Auction 2026 : काव्या मारन vs आकाश अंबानी यांच्यात जुगलबंदी; त्यात अनकॅप्ड खेळाडू झाला 'करोडपती'
15
धक्कादायक! विमानतळावर भुताटकी, प्रवाशांना त्रास देते एक रहस्यमय सावली, प्रवाशांचा दावा
16
IPL 2026 Auction: 'त्या' खेळाडूविषयी मनात आदरच..; आकाश अंबानींनी सांगितली पडद्यामागची गोष्ट
17
Harsimrat Kaur Badal : "सरकार गरिबांच्या पोटावर लाथा मारतंय...", मनरेगावरून हरसिमरत कौर यांचा जोरदार हल्लाबोल
18
पीएम मोदींना दोन गोष्टींची खूप चीड; 'जी राम जी' विधेयकावरुन राहुल गांधींची टीका
19
कोण आहे Prashant Veer? MS धोनीसोबत खेळण्याचं स्वप्न पाहणाऱ्या खेळाडूवर CSK नं लावली विक्रमी बोली
Daily Top 2Weekly Top 5

यंदा अपघातांची संख्या ७३ ने घटली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 19, 2019 23:18 IST

शहर पोलीस आयुक्तालय कार्यक्षेत्रात ३७ ब्लॅक स्पॉट; पोलीस उपायुक्तांची माहिती

ठाणे : ठाणे शहर पोलीस आयुक्तालय कार्यक्षेत्रात गतवर्षापेक्षा या वर्षी अपघातांचे प्रमाण ७३ ने घटले असून त्यामध्ये मयत आणि जखमींचे प्रमाण ही १६७ ने कमी करण्यात वाहतूक शाखेला यश आले आहे. यातील ५० टक्के अपघात हे इतर रस्त्यांवर झाले आहेत. तसेच जिल्ह्यातील १०८ ब्लॅक स्पॉटपैकी ३७ ब्लॅक स्पॉट हे ठाणे शहर पोलीस आयुक्तालय कार्यक्षेत्रात आहेत. या ३७ पैकी १५ स्पॉट हे नॅशनल हायवे नंबर ३ वर असल्याची माहिती ठाणे वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त अमित काळे यांनी मंगळवारी घेतलेल्या एका पत्रकार परिषदेत दिली. त्याचबरोबर कोपरी ब्रीजवरील चार ही लेनचे काम हे मे २०२० पर्यंत पूर्ण होईल, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.ठाणे शहर पोलीस आयुक्तालयात जानेवारी ते आॅक्टोबर २०१८ दरम्यान ८०८ अपघात झाले होते. त्यामध्ये २१५ जणांचा बळी गेला असून ८०७ जण जखमी झाले आहेत. यामध्ये प्राणांतिक २०८, गंभीर ३८७ अपघातात आणि किरकोळ १९३ तसेच कोणीही जखमी न झालेले २० अपघातांचा समावेश आहे.तर, २०१९ च्या जानेवारी-आॅक्टोबरमध्ये एकूण ७३५ अपघात झाले आहेत. तसेच १७८ जणांचा बळी गेला असून ६७७ जण जखमी झाले आहेत. प्राणांतिक अपघातात ३७ जणांचे प्राण वाचवण्यात यश आले असून गंभीर अपघातात ८६ तर किरकोळ अपघातात ४४ ने जखमींची संख्या घडल्याचे वाहतूक शाखेने सांगितले. या वर्षात झालेल्या अपघातांमध्ये नॅशनल हायवेवर १७९ अपघात झाले असून त्यामध्ये ६७ जणांचा मृत्यू झाला आहे. तर गंभीर, किरकोळ अपघातात १४८ जण जखमी झाले आहेत. तर राष्टÑीय महामार्गांवर ५८ अपघात झाले आहेत. त्याध्ये १९ जण मयत तर ४८ जखमी झाले आहेत. त्याचबरोबर इतर रस्त्यांवर ४९८ अपघात झाले असून त्यामध्ये ९२ जणांचा मृत्यू झाला आहे. तर ४८१ जण जखमी झाले आहेत.मध्यंतरी वाढलेल्या अपघात आणि त्यामध्ये मयत आणि जखमींची संख्या लक्षात घेऊन सर्वोच्च न्यायालयाने १० टक्के अपघात कमी करण्याचे उद्दिष्ट प्रत्येक जिल्ह्यास दिले आहे. त्यानुसार, जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षेखाली रस्ता सुरक्षा कमिटी तयार करण्यात आली आहे. जिल्ह्यात सद्यस्थितीत १०८ ब्लॅक स्पॉटपैकी ३७ स्पॉट हे शहर पोलीस आयुक्तालयाच्या कार्यक्षेत्रात आहेत. अपघातांचे प्रमाण शून्यावर आणण्यासाठी वाहतूक शाखा प्रयत्न करत आहे. नागरिकांनी सुरक्षेच्या उपाययोजना, नियम पाळले तर हे प्रमाण १० टक्क्यांऐवजी निश्चितच ३० ते ४० टक्क्यांनी कमी होईल, असेही उपायुक्त काळे म्हणाले.कोपरीच्या चार लेनचे काम मे २०२० पर्यंत होईलयेत्या मे २०२० पर्यंत कोपरी ब्रीजवरील जाणाºया आणि येणाºया मार्गावरील प्रत्येकी चार लेनचे काम पूर्ण होईल. त्यानंतर जो जुना पूल तो तोडण्यात येईल. तसेच या कामाबाबत संबंधित ठेकेदाराला वाहतूक शाखेमार्फत लागणाºया सर्वप्रकारच्या परवानग्या देण्यात आल्या आहेत. वाहतूककोंडी होऊ नये. यासाठी इंच-इंच जागेचा वापर करत आहोत. बारा बंगल्यातील रस्त्यांवरूनही वाहतूक होत असल्याचे उपायुक्तांनी सांगितले.एक ते सव्वालाख वाहनांची होत आहे नोंदणी : ठाण्यात दरवर्षी १ ते सव्वालाख वाहनांची नव्याने भर पडत असल्याची माहिती आरटीओ विभागाने वाहतूक शाखेला दिली आहे. या वाढत्या नव्या वाहनांमुळे वाहतूककोंडीत भर पडत आहे. तसेच या वाहनचालकांच्या मी पहिला जाणार या भावनेतूनही वाहतूककोंडीत जास्त भर पडत असल्याची माहिती वाहतूक शाखेने यावेळी दिली.

टॅग्स :Accidentअपघात