शहरं
Join us  
Trending Stories
1
'बापजाद्यांची पायवाट मोडू नका!'; मनोज जरांगेंचा पंकजा मुंडे,अजित पवारांना आपुलकीचा सल्ला!
2
Bihar Election: ती चूक  भोवली, मतदानापूर्वीच एक जागा गमावली, बिहारमध्ये NDA ला मोठा धक्का
3
'अदीना मशीद नाही, आदिनाथ मंदिर', खासदार युसूफ पठाणच्या पोस्टवर भाजपचा निशाणा; प्रकरण काय?
4
Gold News: भारतीय महिला आहेत हजारो टन सोन्याच्या 'मालक', अमेरिकेसह पाच देशांकडेही नाही इतका साठा
5
भाजपाने देव आणि महापुरुषांचा मांडला बाजार, मेट्रो स्टेशनच्या नावांवरून काँग्रेसची बोचरी टीका
6
Kalyan Crime: गर्लफ्रेंडचा मोबाईल हॅक केला, अश्लील व्हिडीओ अन् आईवडिलांना धमक्या, २९ वर्षीय तरुणीवर प्रियकरानेच केला बलात्कार
7
कोर्टाची नोटीस नाकारणे भोवले! IAS सुजाता सौनिक यांच्याविरुद्ध जामीनपात्र वॉरंट; २६ नोव्हेंबरला हजर राहण्याचे आदेश
8
Bigg Boss 19: क्रिकेटपटू दीपक चहरच्या बहिणीवर संतापला सलमान खान, सारेच झाले अवाक्, कारण काय? 
9
Diwali Sale: ७०००mAh बॅटरी आणि ३ कॅमेरे असलेला फोन ६७९ रुपयांच्या ईएमआयमध्ये उपलब्ध
10
Viral Video: "दात आहेत की वेटलिफ्टिंग मशीन?" तरुणाचा व्हिडीओ पाहून नेटकरी शॉक!
11
२७ महिन्यांपासून पगार नाही, सुट्टी मागितल्यास..., वैतागलेल्या कर्मचाऱ्याने सरकारी ऑफिससमोरच संपवलं जीवन 
12
संसदेपासून हाकेच्या अंतरावर असलेल्या ब्रह्मपुत्र अपार्टमेंटला भीषण आग, इथेच आहेत अनेक खासदारांची निवासस्थाने
13
सोमवती अमावस्या आणि लक्ष्मी पूजनाचा दुर्मिळ योग; 'या' ७ राशींच्या आयुष्याला मिळणार कलाटणी
14
Rajnath Singh : "ऑपरेशन सिंदूर हा फक्त ट्रेलर, आता पाकिस्तानची एक-एक इंच जमीन ब्रह्मोसच्या रेंजमध्ये..."
15
Mohammed Shami: शमीनं निवड समितीची केली बोलती बंद, रणजी स्पर्धेत ७ विकेट्स घेऊन दिला फिटनेसचा पुरावा!
16
"अफगाणिस्तानकडून राष्ट्रप्रेमाचे धडे घ्या": पाकिस्तानविरुद्ध खेळण्यास नकार, चतुर्वेदींचा BCCI-सरकारला टोला
17
'मिआ बाय तनिष्क'ची ब्रँड अ‍ॅम्बेसेडर म्हणून अनीत पड्डाची निवड, 'प्रेशियस, एव्हरी डे' या फेस्टिव्ह मोहिमेतून केले पदार्पण
18
IAS Ankita Chaudhary : "कधीही हार मानू नका, कारण..."; आईचं स्वप्न हेच आयुष्याचं ध्येय, IAS अंकिताचा मोलाचा सल्ला
19
Narak Chaturdashi 2025: नरक चतुर्दशीला पहाटे कारीट फोडून अभ्यंग स्नान आणि यमतर्पण का केले जाते?
20
शेवटी आईच ती! आजारी लेकीसाठी धडपड, उचललं खांद्यावर; मदत न मिळाल्याने रस्त्यातच मृत्यू

यंदा अपघातांची संख्या ७३ ने घटली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 19, 2019 23:18 IST

शहर पोलीस आयुक्तालय कार्यक्षेत्रात ३७ ब्लॅक स्पॉट; पोलीस उपायुक्तांची माहिती

ठाणे : ठाणे शहर पोलीस आयुक्तालय कार्यक्षेत्रात गतवर्षापेक्षा या वर्षी अपघातांचे प्रमाण ७३ ने घटले असून त्यामध्ये मयत आणि जखमींचे प्रमाण ही १६७ ने कमी करण्यात वाहतूक शाखेला यश आले आहे. यातील ५० टक्के अपघात हे इतर रस्त्यांवर झाले आहेत. तसेच जिल्ह्यातील १०८ ब्लॅक स्पॉटपैकी ३७ ब्लॅक स्पॉट हे ठाणे शहर पोलीस आयुक्तालय कार्यक्षेत्रात आहेत. या ३७ पैकी १५ स्पॉट हे नॅशनल हायवे नंबर ३ वर असल्याची माहिती ठाणे वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त अमित काळे यांनी मंगळवारी घेतलेल्या एका पत्रकार परिषदेत दिली. त्याचबरोबर कोपरी ब्रीजवरील चार ही लेनचे काम हे मे २०२० पर्यंत पूर्ण होईल, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.ठाणे शहर पोलीस आयुक्तालयात जानेवारी ते आॅक्टोबर २०१८ दरम्यान ८०८ अपघात झाले होते. त्यामध्ये २१५ जणांचा बळी गेला असून ८०७ जण जखमी झाले आहेत. यामध्ये प्राणांतिक २०८, गंभीर ३८७ अपघातात आणि किरकोळ १९३ तसेच कोणीही जखमी न झालेले २० अपघातांचा समावेश आहे.तर, २०१९ च्या जानेवारी-आॅक्टोबरमध्ये एकूण ७३५ अपघात झाले आहेत. तसेच १७८ जणांचा बळी गेला असून ६७७ जण जखमी झाले आहेत. प्राणांतिक अपघातात ३७ जणांचे प्राण वाचवण्यात यश आले असून गंभीर अपघातात ८६ तर किरकोळ अपघातात ४४ ने जखमींची संख्या घडल्याचे वाहतूक शाखेने सांगितले. या वर्षात झालेल्या अपघातांमध्ये नॅशनल हायवेवर १७९ अपघात झाले असून त्यामध्ये ६७ जणांचा मृत्यू झाला आहे. तर गंभीर, किरकोळ अपघातात १४८ जण जखमी झाले आहेत. तर राष्टÑीय महामार्गांवर ५८ अपघात झाले आहेत. त्याध्ये १९ जण मयत तर ४८ जखमी झाले आहेत. त्याचबरोबर इतर रस्त्यांवर ४९८ अपघात झाले असून त्यामध्ये ९२ जणांचा मृत्यू झाला आहे. तर ४८१ जण जखमी झाले आहेत.मध्यंतरी वाढलेल्या अपघात आणि त्यामध्ये मयत आणि जखमींची संख्या लक्षात घेऊन सर्वोच्च न्यायालयाने १० टक्के अपघात कमी करण्याचे उद्दिष्ट प्रत्येक जिल्ह्यास दिले आहे. त्यानुसार, जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षेखाली रस्ता सुरक्षा कमिटी तयार करण्यात आली आहे. जिल्ह्यात सद्यस्थितीत १०८ ब्लॅक स्पॉटपैकी ३७ स्पॉट हे शहर पोलीस आयुक्तालयाच्या कार्यक्षेत्रात आहेत. अपघातांचे प्रमाण शून्यावर आणण्यासाठी वाहतूक शाखा प्रयत्न करत आहे. नागरिकांनी सुरक्षेच्या उपाययोजना, नियम पाळले तर हे प्रमाण १० टक्क्यांऐवजी निश्चितच ३० ते ४० टक्क्यांनी कमी होईल, असेही उपायुक्त काळे म्हणाले.कोपरीच्या चार लेनचे काम मे २०२० पर्यंत होईलयेत्या मे २०२० पर्यंत कोपरी ब्रीजवरील जाणाºया आणि येणाºया मार्गावरील प्रत्येकी चार लेनचे काम पूर्ण होईल. त्यानंतर जो जुना पूल तो तोडण्यात येईल. तसेच या कामाबाबत संबंधित ठेकेदाराला वाहतूक शाखेमार्फत लागणाºया सर्वप्रकारच्या परवानग्या देण्यात आल्या आहेत. वाहतूककोंडी होऊ नये. यासाठी इंच-इंच जागेचा वापर करत आहोत. बारा बंगल्यातील रस्त्यांवरूनही वाहतूक होत असल्याचे उपायुक्तांनी सांगितले.एक ते सव्वालाख वाहनांची होत आहे नोंदणी : ठाण्यात दरवर्षी १ ते सव्वालाख वाहनांची नव्याने भर पडत असल्याची माहिती आरटीओ विभागाने वाहतूक शाखेला दिली आहे. या वाढत्या नव्या वाहनांमुळे वाहतूककोंडीत भर पडत आहे. तसेच या वाहनचालकांच्या मी पहिला जाणार या भावनेतूनही वाहतूककोंडीत जास्त भर पडत असल्याची माहिती वाहतूक शाखेने यावेळी दिली.

टॅग्स :Accidentअपघात