शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात पाचव्या टप्प्यातील १३ लोकसभा मतदारसंघात अंदाजे ५४.३३ टक्के मतदान  
2
भगवान जगन्नाथ मोदींचे भक्त; संबित पात्रांच्या वक्तव्याने नवा वाद, विरोधकांनी BJP ला घेरले...
3
इराणमधील सत्तासंघर्षामधून इब्राहीम रईसींचा बळी? खोमेनींच्या मुलावर संशय, इराणमध्ये चर्चांना उधाण
4
Narendra Modi : "राजपुत्र उघडपणे सांगत आहेत..."; राहुल गांधींच्या जुन्या Video चा उल्लेख करत मोदींचा घणाघात
5
उत्तर प्रदेशमध्ये बनावट मतदान, अनेक खुलासे; २५ मे रोजी होणार पुन्हा मतदान
6
लोकसभा निवडणुकीदरम्यान बीड आणि बारामतीमध्ये बोगस मतदान, शरद पवारांचा गंभीर आरोप  
7
भोंगळ कारभार! मतदान करता न आल्यानं कलाकार संतापले; सांगितलं नेमकं काय घडलं
8
‘ही लढाई संपलेली नाही, तर आता खरी सुरुवात झालीय’, जयंत पाटील यांचं शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांना भावूक पत्र 
9
सॅमसंगची मोठी घोषणा! तुम्ही तुमचा फुटलेला किंवा खराब झालेला फोन वर्षातून दोनदा दुरुस्त करू शकता
10
"उद्धव ठाकरे यांनी नेहमीप्रमाणे त्यांचे रडगाणे सुरु केले आहे"; देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
11
‘...हा तर अरविंद केजरीवाल यांच्या हत्येचा कट’, ‘आप’चा PMO वर सनसनाटी आरोप
12
... म्हणूनच काँग्रेसवाले आमच्या वाहनांवर हल्ले करतायत; कंगना यांचा गंभीर आरोप
13
प्लेऑफमध्ये KKR विरुद्ध SRHचं पारडं जड, अशी आहे आकडेवारी, थेट फायनल गाठणार की…
14
पंतप्रधान नेतन्याहू आणि हमास प्रमुखांना अटक होणार? ICC अटक वॉरंट जारी करण्याच्या तयारीत
15
मुंबईकर आजोबांना सलाम! नाकात नळी, मतदानाला आले, ओळखपत्र विसरले; पुढे...
16
जिथे शिवसेनेचं मतदान आहे, तिथे...; निवडणूक आयोग भाजपाची चाकरी करत असल्याचा उद्धव ठाकरेंचा आरोप
17
निवडणूक आयोगाच्या नियोजनावर भाजपाही संतापली; "मतदारांचे हाल दुर्दैवी, यातून..."
18
लोकसभेची उमेदवारी घेऊन वायकरांनी आपली अटक टाळली; गजानन कीर्तीकरांचा खळबळजनक दावा
19
"जे लोक मतदान करणार नाहीत त्यांना..."; अभिनेते परेश रावल यांनी मांडली रोखठोक भूमिका
20
अमेरिका, कॅनडा, अरब देशातून AAP ला अवैध फंडिग; ED नं गृह मंत्रालयाला सोपवला रिपोर्ट

यंदा अभय योजना नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 29, 2018 12:39 AM

मनोहर हिरे यांचे आदेश; मालमत्ताकराची तातडीने वसुली करा

भिवंडी: महापालिका क्षेत्रात दोन वर्षे अभय योजनेतंर्गत मालमत्ता करावर व्याज माफी देण्यात आली होती. तरीही थकबाकीदार त्यांच्या कराची रक्कम भरत नसल्याचे निदर्शनास आले. यामुळे पालिका आयुक्त मनोहर हिरे यांनी कडक धोरण घेत यावर्षी अभय योजना लागू होणार नाही,असे जाहीर केले.महापालिकेकडून व्याजमाफी मिळेल या अपेक्षेने नागरिक कर भरण्यास टाळाटाळ करतात. ही बाब प्रशासनातील वसुली विभागाने आयुक्त हिरे यांच्या निदर्शनास आणून दिली. तसेच व्याजमाफीमुळे पालिकेचे आर्थिक नुकसान होते. त्याचप्रमाणे पालिकेकडून जाहीर होणाऱ्या अशा व्याजमाफीमुळे प्रामाणिकपणे कर भरणाºया नागरिकांवर अन्याय होतो. यावर्षी मालमत्ताकराच्या व्याजमाफी पोटी कोणतीही अभय योजना लागू करण्यात येणार नाही किंवा कोणत्याही प्रकारे व्याजमाफी मिळणार नाही असे हिरे यांनी प्रभाग अधिकाºयांच्या बैठकीत स्पष्ट केले. तसेच मालमत्ताधारक त्यांच्या थकीत कराची रक्कम भरत नसतील अशा थकीत मालमत्ताधारकांवर जप्तीची कारवाई करा, पाणी, वीजपुरवठा खंडित करा आणि थकबाकीदारांवर कारवाई करा असे आदेश दिले. यामुळे वसुली विभागातील अधिकारी व कर्मचारी मालमत्ता कर वसुलीसाठी कार्यालयाबाहेर पडले आहेत. दरम्यान, जे अधिकारी, कर्मचारी वसुलीच्या कामात हलगर्जीपणा करतील त्या कर्मचाºयांवर दंडात्मक कारवाई म्हणून ४० टक्के पगार कपात करण्याचे आदेशही हिरे यांनी दिले आहेत.वास्तविक गेल्यावर्षापासून मालमत्ता कराबरोबर प्रत्येक मालमत्तेला १५०० रूपये जलकर लागू केला आहे. त्यामुळे एकाच इमारतीसाठी लागणारी पाणीपट्टी आता प्रत्येक फ्लॅटधारकास भरावी लागत आहे. इमारतीतील फ्लॅटधारकाच्या घरांत सोसायटीच्या नळातून पाणीपुरवठा होतो. पालिकेचा थेट पाणीपुरवठा करणारा नळ नसताना हा जलकर जबरदस्तीने लावल्याची भावना करदात्यांमध्ये पसरलेली आहे. त्याचप्रमाणे अनेक झोपडपट्टीतही थेट पालिकेचा नळ नसताना त्यांनाही जलकर लागू केल्याने असंतोष पसरलेला आहे.नागरिकांमध्येच उदासीनताकहर म्हणजे प्रशासनाने जलकराबरोबर मालमत्ताकर भरण्याची सक्ती केल्याने मागील वर्षापासून शहरातील नागरिकांमध्ये मालमत्ता कर भरण्यासाठी उदासीनता पसरली आहे. या बाबत नगरसेवकही ठोस भूमिका घेताना दिसत नाहीत.

टॅग्स :bhiwandiभिवंडीMuncipal Corporationनगर पालिका