शहरं
Join us  
Trending Stories
1
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
2
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
3
भाजपचा यू-टर्न! आमदार देवयानी फरांदेंच्या नियुक्तीनंतर नाराजीची लाट, भाजपने आमदार ढिकलेंबद्दल केला खुलासा
4
३ लाख पगार, सरकारी घर, हवी तिथे नोकरी; बुरखा प्रकरणातील डॉ. नुसरत यांना कुणी दिली मोठी ऑफर?
5
बॉक्स ऑफिस मॉन्स्टर 'धुरंधर'सोबत 'उत्तर' रिलीज झाला अन्.., क्षितिज पटवर्धनची लक्षवेधी पोस्ट
6
सरकारच्या तिजोरीत लोकांनी भरले १७ लाख कोटी; कॉर्पोरेट, वैयक्तिक करात मोठी वाढ
7
'धुरंधर'मध्ये अक्षय खन्नाचंच होतंय कौतुक, आर माधवनचा जळफळाट? म्हणाला, "तो नव्या घरात..."
8
BMC निवडणुकीपूर्वी महायुतीत ट्विस्ट! भाजपा-राष्ट्रवादी नेत्यांची बैठक, शिंदेसेनेला डच्चू?
9
इम्रान खान आणि बुशरा बीबीला १७ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा; 'तोशाखाना-२' प्रकरणात पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना मोठा धक्का!
10
Infosys ADR News: इन्फोसिसच्या एडीआरमध्ये ४० टक्क्यांची तेजी; ट्रेडिंगही थांबवलं, पाहा नक्की काय आहे प्रकरण
11
२००० किमी दूर रशियाच्या जहाजावर युक्रेनचा सर्वात मोठा हल्ला; याचा बदला घेणारच, पुतिन संतापले
12
ठाकरेंना जय महाराष्ट्र, भाजपचा आणखी एक धक्का! लोकसभा लढवणारे संजोग वाघेरेंचा मोठा निर्णय
13
“सावकारांचे रॅकेट विदर्भ-मराठवाड्यात सक्रिय, महायुती सरकार शेतकरी विरोधी”: विजय वडेट्टीवार
14
“काँग्रेसमध्ये पाठिंबा नाही, काम करणे कठीण; शिंदेसेनेत येताच महिला नेत्यांनी सगळे सांगितले
15
मल्लिका शेरावतने डोनाल्ड ट्रम्प यांच्यासोबत व्हाईट हाऊसमध्ये केलं ख्रिसमस डिनर; फोटो केले शेअर
16
"आता टॅरिफ माझा 5वा आवडता शब्द...!"; असं का म्हणाले डोनाल्ड ट्रम्प? अमेरिकेसाठी केली मोठी घोषणा
17
जागांवर तडजोड नाही, शिंदेसेना ठाम, भाजपाही मागे हटेना; अहिल्यानगरमध्ये महायुतीत फूट पडणार?
18
"मी शाहरुख खान, कृपया मला कॉल कर...", राधिकाला आलेला किंग खानचा मेसेज; म्हणाली...
19
'आयात' विरुद्ध 'निष्ठावंत' भाजपात वाढला संघर्ष; मूळ कार्यकर्ते अस्वस्थ, बंडखोरी वाढणार
20
Google नं पहिल्यांदाच आणलं क्रेडिट कार्ड, लगेच मिळणार कॅशबॅक आणि रिवॉर्ड; काय आहे खास?
Daily Top 2Weekly Top 5

यंदा ठाणे जिल्ह्यात आरटीईचे १० हजार प्रवेश रिक्त, केवळ सहा हजार जागांवर प्रवेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 4, 2018 19:01 IST

दर्जेदार इंग्रजी शिक्षण देणाऱ्या शाळांमध्ये शिक्षणाचा हक्क (आरटीई) या कायद्या अंतर्गत २५ टक्के जागा आरक्षित ठेवल्या आहेत. यानुसार ठाणे जिल्ह्यात १६ हजार ५४६ जागा ६४० शाळांमध्ये राखीव आहेत. त्यापैकी आतापर्यंतच्या चौथ्या फेरी अखेर सुमारे पाच हजार ७६४ जागांवर प्रवेश झाले. पाच व्या फेरीत १५९ विद्यार्थ्यांची निवड केजी ते पहिलीच्या प्रवेशासाठी झाली. हे प्रवेश पूर्ण झाले तरीही जिल्हह्यात केवळ पाच हजार ९२३ विद्यार्थ्यांचा प्रवेश होतील. यानंतरही जिल्ह्यात दहा हजार ६२३ आरटीई प्रवेशाच्या जागा यंदा रिक्त

ठळक मुद्देआता सहावी फेरी घेतली जाणार नसल्याचे शिक्षण विभागातून सांगितलेपाचव्या फेरीत निवड झालेल्या १५९ विद्यार्थ्यांना जिल्ह्यात दहा हजार ६२३ आरटीई प्रवेशाच्या जागा यंदा रिक्त

ठाणे : दर्जेदार इंग्रजी शिक्षण देणाऱ्या शाळांमध्ये शिक्षणाचा हक्क (आरटीई) या कायद्या अंतर्गत २५ टक्के जागा आरक्षित ठेवल्या आहेत. यानुसार ठाणे जिल्ह्यात १६ हजार ५४६ जागा ६४० शाळांमध्ये राखीव आहेत. त्यापैकी आतापर्यंतच्या चौथ्या फेरी अखेर सुमारे पाच हजार ७६४ जागांवर प्रवेश झाले. पाच व्या फेरीत १५९ विद्यार्थ्यांची निवड केजी ते पहिलीच्या प्रवेशासाठी झाली. हे प्रवेश पूर्ण झाले तरीही जिल्हह्यात केवळ पाच हजार ९२३ विद्यार्थ्यांचा प्रवेश होतील. यानंतरही जिल्ह्यात दहा हजार ६२३ आरटीई प्रवेशाच्या जागा यंदा रिक्त राहत असल्याचे उघड झाले.पालकांचा प्रतिसाद मिळत नसल्यामुळे प्रवेशासाठीची आता सहावी फेरी घेतली जाणार नसल्याचे शिक्षण विभागातून सांगितले जात आहे. या पाचव्या फेरीत निवड झालेल्या विद्यार्थ्यांच्या प्रवेशाची मुदत संपलेली आहे. तरी देखील पालकांनी त्वरीत संबंधीत शाळांमध्ये जावून विद्यार्थ्यांना प्रवेश घेण्याचे आवाहन केले जात आहे. प्रवेशासाठी निवड झालेल्या १५९ विद्यार्थ्यांपैकी प्रायमरी केजीसाठी ३६ विद्यार्थी, ज्यू.केजीसाठी ११४, सिनिअर केजीसाठी तीन आणि पहिलीसाठी सहा विद्यार्थ्यांची निवड केली आहे. त्यांचे प्रवेश सध्या संबंधीत शाळांमध्ये घेतले जात आहे. यास अनुसरून पालकांनी त्वरीत संबंधीत शाळेत जावून बालकांचे प्रवेश घेण्याची अपेक्षा शिक्षणा विभागाव्दारे करण्यात आली आहे. पालकांचा प्रतिसाद मिळत नसल्यामुळे या प्रवेश प्रक्रियेला आता थांबवण्याचे प्रयत्न सुरू आहे. यामुळे आता सहावी प्रवेश फेरी होणार नसल्याचे सांगितले जात आहे. जिल्ह्याभरात अजून ११ हजार ४७० जागा रिक्त असल्याचे दिसून येत आहेत. या प्रवेशास विलंब झाल्यामुळे पालकांचा त्यास प्रतिसाद मिळत नसल्याचे निदर्शनात आले.लाखो रूपये खर्च करून दर्जेदार शिक्षण देणाºया इंग्रजी व अन्य माध्यमांच्या शाळांमध्ये मुलांचे केजी ते पहिलीच्या वर्गाचे शालेय प्रवेश श्रीमंत पालक घेतात. याप्रमाणे आर्थिक दुर्बल घटक, मागासवर्गीय परिवारातील मुलां - मुलीना देखील या शाळांमध्ये मोफत प्रवेश देण्यासाठी जिल्ह्यातील शाळांमध्ये प्रवेश राखीव ठेवले. पण शैक्षणिक वर्ष सुरू होऊन आजूनही या आरटीईच्या राखीव जागांवर प्रवेश सुरू आहेत. त्यास पालकांकडून मात्र प्रतिसाद मिळत नसल्याची बाब या चौथ्या फेरी अखेरही उघड झाली. या फेरीमध्ये २७६ बालकांचे प्रवेश निश्चित केले होते. त्यापैकी केवळ ६७ बालकांचे प्रवेश घेण्यात आले. उर्वरत पाच अर्ज रिजेक्ट केले आणि २०६ बालकांच्या आईवडीलांनी संबंधीत शाळांमध्ये संपर्कच साधलेला नसल्याचे प्राथमिक शिक्षण विभागाने स्पष्ट केले.प्लेगृप, फ्रीकेजी, ज्युनिअर केजी, सिनिअर केली आणि फर्स्ट म्हणजे पहिलीच्या वर्गात या २५ टक्के आरक्षणातून बालकांना मोफत प्रवेश आहे. शिक्षणाचा हक्क या कायद्याखाली जिल्ह्यातील दर्जेदार शिक्षण देणा-या ६४० शाळांमध्ये या ११ हजार ४७० जागा आजपर्यंत शिल्लक दिसतआहेत. पहिल्या दोन फे-यांव्दारे पाच हजार ३५२ विद्यार्थ्यांना प्रवेश मिळाले आहेत. आता तिस-या फेरी अखेर ९३९ निवडलेल्यापैकी ३४५ जणांचे प्रवेश झाले. उर्वरित ४७६ जणांनी संबंधीत शाळेत प्रवेश घेतला नाही आणि आता चौथ्याफेरीत केवळ ६७ बालकांचे प्रवेश झाले आहेत. पालकांचा प्रतिसाद मिळत नसल्यामुळे या पाचव्या फेरीतील

टॅग्स :thaneठाणेSchoolशाळा