शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र निवडणुकीचे सीसीटीव्ही फुटेज देण्यास नकार; राहुल गांधींची मागणी, आयोगाने दिली ही कारणे...  
2
Plane Crash : इरफान बेटा, उठ... मुझसे बात कर..! विमान अपघातातील मृताच्या आईने फोडला हंबरडा
3
ENG vs IND : ३ शतकवीर अन् मग ४१ धावांत ७ विकेट्स! टीम इंडिया पहिल्या डावात ४७१ धावांवर All Out
4
केव्हा पूर्ववत होणार पाकिस्तानसोबतचा सिंधू पाणी करार? अमित शाह स्पष्टच बोलले, दिलं असं उत्तर की शाहबाज यांची झोप उडेल
5
इस्त्रायल युद्धावेळीच इराणमध्ये मोठा भूकंप; इराणनं केली अणु चाचणी? चर्चांना उधाण
6
'ऑपरेशन सिंधू' केवळ भारतीयच नव्हे, 'या' देशाच्या विद्यार्थ्यांनाही इराणमधून सुखरूप बाहेर आणणार!
7
"डियर क्रिकेट गिव्ह मी वन मोअर चान्स" वाल्या करुण नायरच्या पदरी भोपळा! (VIDEO)
8
शशी थरूर भाजपात जाणार का? काँग्रेस २३ जूनला मोठा निर्णय घेणार
9
Yogini Ekadashi 2025: योगिनी एकादशीला विष्णुकृपा; त्रिपुष्कर योगात ५ राशींना धनलाभाची संधी
10
"माझ्या भांगेत कुंकू भर..." आत्महत्येआधी तिने चिठ्ठीत लिहिलं होते; नैराश्यामागचे कारण काय?
11
इस्रायलचा दावा, वरिष्ठ इराणी लष्करी कमांडर सईद इजादी ठार; हमासशी संबंध असल्याचा आरोप!
12
शाहरुख खानच्या मन्नतवर बीएमसीची कारवाई! नूतनीकरणाच्या नियमांचं उल्लंघन केल्याचा आरोप
13
जिओ, एअरटेलची तयारी! दर दिवसाच्या हिशेबा सारखाच दर तासाला डेटा मिळणार...; रिचार्ज मात्र...
14
Ashadhi Wari 2025: दिंडीतून जाताना वारकरी महिला डोईवर तुळशी वृंदावन नेतात; पण का? वाचा!
15
"देवेंद्रजीसुद्धा योगीच, ते कसरत नाही पण..', अमृता फडणवीस यांचं विधान
16
"माझे ९ लाख रुपये निर्मात्यांनी दिलेले नाहीत", 'मन उडू उडू झालं' फेम अभिनेत्याची व्यथा, म्हणाला- "मी इंजिनियर असूनही..."
17
उप कर्णधार रिषभ पंतचा मोठा पराक्रम! शतकी खेळीसह मोडला MS धोनीचा विक्रम! सेलिब्रेशनही एकदम झक्कास
18
Tejasvi Ghosalkar: "उद्धव ठाकरे माझे कुटुंबप्रमुख, मी अजूनही...", बँकेचं संचालकपद मिळाल्यानंतर तेजस्वी घोसाळकरांचं स्पष्टीकरण
19
"इराणचा विजय होवो, त्यांनी इस्राइलला…’’, केंद्रातील सत्ताधारी भाजपाच्या मित्रपक्षाने इराणला दिला पाठिंबा   
20
टीव्ही कपल लता सबरवाल-संजीव सेठ यांचा घटस्फोट, लग्नानंतर १५ वर्षांनी मोडला संसार

दिव्यांग व्यक्ती नाउमेद होत नसतील तर धडधाकट व्यक्तींनी निराश होऊ नये: यजुवेंद्र महाजन

By प्रज्ञा म्हात्रे | Updated: November 9, 2023 15:39 IST

यजुवेंद्र महाजन यांच्या दीपस्तंभ फाउंडेशनच्या मनोबल प्रकल्पातील, विविध कलेत निपुण अशा आठ दिव्यांग विद्यार्थ्यांसह आनंद विश्व गुरुकुल या महाविद्यालयाला भेटीदरम्यान त्यांनी केलेले वक्तव्य.

ठाणे: दिव्यांग व्यक्ती जर नाउमेद न होता यशस्वी जीवन जगत असतील तर धडधाकट व्यक्तींनी निराश व्हायचे काही कारणच नाही, असे मत दीपस्तंभ फाउंडेशनचे संस्थापक व मनोबल प्रकल्पाचे प्रमुख यजुवेंद्र महाजन यांनी व्यक्त केले.

यजुवेंद्र महाजन यांच्या दीपस्तंभ फाउंडेशनच्या मनोबल प्रकल्पातील, विविध कलेत निपुण अशा आठ दिव्यांग विद्यार्थ्यांसह आनंद विश्व गुरुकुल या महाविद्यालयाला भेट दिली. मनोबल प्रकल्पात दिव्यांग मुलांना स्पर्धा परिक्षेसाठी तयार केले जाते, व्यक्तिगत विकास व त्यांच्यातील कला गुणांना वाव देऊन त्यांचा विकास केला जातो. तसेच उच्च शिक्षण दिले जाते. आपण कमजोर नाही आहोत, ही जाणीव करुन दिली जाते.

समस्या सर्वांना असतात, दिव्यांगांना फक्त शरीराची समस्या आहे. ती सुद्धा शरीराच्या एका भागाची समस्या आहे, दिव्यांगांकडे वैचारिक अपंगत्व नाही आणि जे धडधाकट आहेत त्यांच्याकडे विचारांचे अपंगत्व आहे. शरीराचे अपंगत्व चालेल पण विचारांचे अपंगत्व चालणार नाही. दिव्यांग विद्यार्थ्यांकडून प्रगती कशी करायची हे शिकायला हवे, बुद्धी आणि हृदय असेल तर आपल्याला तर पुढे जाता येईल. आपला ॲटीट्युड कसा आहे, आपल्याकडे कोणते स्कील आहे, आपल्याकडे कोणते नाॅलेज आहे, आपली व्हील पाॅवर कशी आहे आणि किती मेहनत आपण करता, यावरच आपल्याला आयुष्यात पुढे जाता येईल, आपण उराशी बाळगलेले कोणतेही स्वप्न आपल्याला पूर्ण करता येईल.

समस्यांचे पाढे वाचू नका आणि दुखी राहू नका, कमतरता प्रत्येकात असते त्यावर मात करायला शिका, आपण जीवंत आहोत हीच मोठी गोष्ट आहे, याचा आनंद साजरा करायला शिका. सगळ्यांबरोबर मैत्री करा. स्वतःला कमी समजु नका आणि स्वतःला स्पेशलही समजु नका आणि जिथे मदतीची गरज आहे तिथे खुल्या मनाने मदत घ्यायला कचरु नका. नेहमी याचा विचार करु नका की मला कोणाकडून काय मिळेल, मी समाजाला काय देऊ शकतो याचाही विचार करा. नवीन तंत्रज्ञान, नवीन कम्युनिकेशन स्कील व नवीन कल्पना शिकणे गरजेचे आहे. शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्य जपण्यासाठी व्यायाम करणे, ध्यानधारणा करणे, चांगली पुस्तके वाचणे याची गरज आहे. याच गोष्टी आयुष्यात पुढे जाण्यासाठी, यशस्वी होण्यासाठी मदत करतील. यामुळे दिव्यांग व्यक्ती जर नाउमेद न होता यशस्वी जीवन जगत असतील तर धडधाकट व्यक्तींनी निराश व्हायचे काही कारणच नाही, असे विचार यजुवेंद्र महाजन यांनी मांडले.

 

टॅग्स :thaneठाणेMumbaiमुंबई