शहरं
Join us  
Trending Stories
1
"हा अमेरिकेचा दुटप्पीपणाच, भारताने आता..."; शशी थरुर यांनी मोदी सरकारला काय दिला सल्ला?
2
"राष्ट्रहिताच्या रक्षणासाठी आम्ही..."; ५० टक्के टॅरिफनंतर भारताचे डोनाल्ड ट्रम्प यांना उत्तर
3
"अंधभक्तांना विनंती, राजकीय नियुक्तीचे समर्थन करु नका; कारण..."; रोहित पवारांनी काय दिला इशारा?
4
डोनाल्ड ट्रम्प यांनी टाकला 'टॅरिफ' बॉम्ब! भारतावर लादला तब्बल ५० टक्के कर, आदेशावर केली स्वाक्षरी
5
'पंतप्रधानांना महादेवाची प्रतिमा भेट दिली, कारण...'; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मोदींच्या भेटीनंतर काय बोलले?
6
कोल्हापुरकरांसाठी आनंदाची बातमी! वनताराच्या सीईओंनी केली मोठी घोषणा; महास्वामीही म्हणाले, अंबानींच्या भूमिकेला....
7
बापाचा दारु प्यायल्यामुळे मृत्यू, बारचालकांचा बदला घेण्यासाठी मुलगा बनला चोर; सगळं प्रकरण ऐकून पोलिसही चक्रावले
8
उद्धव ठाकरे-राज ठाकरेंची युती झाली! मुंबई पालिकेआधी 'या' निवडणुका एकत्र लढवणार...
9
Ankita Lokhande: मुंबई पोलिसांचे आभार... 'त्या' दोन बेपत्ता मुली सुखरूप; अंकिता लोखंडेने दिली माहिती
10
Mumbai Rape: प्रशिक्षणाच्या नावाखाली १३ वर्षाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार, क्रिकेट प्रशिक्षकाला अटक
11
यंदा चिंचपोकळीच्या ‘चिंतामणी’चं आगमन कधी? गणेशभक्तांनो 'ही' तारीख ठेवा लक्षात!
12
डोनाल्ड ट्रम्प यांनी केली उत्तराधिकाऱ्याची घोषणा, जाहीर केलं या नेत्याचं नाव    
13
संघाचा शतकमहोत्सव थाटात साजरा होणार, कार्यक्रमांची रेलचेल, देशोदेशीच्या दूतावासांना निमंत्रण, पण...
14
Dharali Cloud Burst: उरले फक्त दगड आणि गाळ! ढगफुटीनंतरचा धरालीतील पहिला ड्रोन व्हिडीओ
15
Vaishnavi Patil : छोरियां छोरों से कम नहीं! कल्याणच्या ढाबा चालकाच्या लेकीची कुस्तीत मोठी झेप, दिग्गजांना केलं चितपट
16
मुंबईत भरणार 'क्रीडा महाकुंभ'! लेझीम, फुगडीसह शिवकालीन पारंपरिक खेळांना मिळणार पुनर्वैभव
17
गलवानमधील संघर्षानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी पहिल्यांदाच चीनच्या दौऱ्यावर जाणार, एससीओ संमेलनात सहभागी होणार
18
मोबाईलमध्ये नको ते व्हिडिओ सापडले, भीतीपोटी पतीला मारले; जीव वाचवण्यासाठी प्रियकराला अडकवले, पण...
19
विकेटची गॅरेंटी देणारा बुमराहच ठरतोय टीम इंडियासाठी 'पनौती'? भयावह आकडेवारीवर सचिन तेंडुलकर म्हणाला...
20
निर्वस्त्र करुन मारहाण, एक्स गर्लफ्रेंडसोबत संबंध; मर्चंट नेव्ही अधिकाऱ्याच्या पत्नीने संपवले आयुष्य

दिव्यांग व्यक्ती नाउमेद होत नसतील तर धडधाकट व्यक्तींनी निराश होऊ नये: यजुवेंद्र महाजन

By प्रज्ञा म्हात्रे | Updated: November 9, 2023 15:39 IST

यजुवेंद्र महाजन यांच्या दीपस्तंभ फाउंडेशनच्या मनोबल प्रकल्पातील, विविध कलेत निपुण अशा आठ दिव्यांग विद्यार्थ्यांसह आनंद विश्व गुरुकुल या महाविद्यालयाला भेटीदरम्यान त्यांनी केलेले वक्तव्य.

ठाणे: दिव्यांग व्यक्ती जर नाउमेद न होता यशस्वी जीवन जगत असतील तर धडधाकट व्यक्तींनी निराश व्हायचे काही कारणच नाही, असे मत दीपस्तंभ फाउंडेशनचे संस्थापक व मनोबल प्रकल्पाचे प्रमुख यजुवेंद्र महाजन यांनी व्यक्त केले.

यजुवेंद्र महाजन यांच्या दीपस्तंभ फाउंडेशनच्या मनोबल प्रकल्पातील, विविध कलेत निपुण अशा आठ दिव्यांग विद्यार्थ्यांसह आनंद विश्व गुरुकुल या महाविद्यालयाला भेट दिली. मनोबल प्रकल्पात दिव्यांग मुलांना स्पर्धा परिक्षेसाठी तयार केले जाते, व्यक्तिगत विकास व त्यांच्यातील कला गुणांना वाव देऊन त्यांचा विकास केला जातो. तसेच उच्च शिक्षण दिले जाते. आपण कमजोर नाही आहोत, ही जाणीव करुन दिली जाते.

समस्या सर्वांना असतात, दिव्यांगांना फक्त शरीराची समस्या आहे. ती सुद्धा शरीराच्या एका भागाची समस्या आहे, दिव्यांगांकडे वैचारिक अपंगत्व नाही आणि जे धडधाकट आहेत त्यांच्याकडे विचारांचे अपंगत्व आहे. शरीराचे अपंगत्व चालेल पण विचारांचे अपंगत्व चालणार नाही. दिव्यांग विद्यार्थ्यांकडून प्रगती कशी करायची हे शिकायला हवे, बुद्धी आणि हृदय असेल तर आपल्याला तर पुढे जाता येईल. आपला ॲटीट्युड कसा आहे, आपल्याकडे कोणते स्कील आहे, आपल्याकडे कोणते नाॅलेज आहे, आपली व्हील पाॅवर कशी आहे आणि किती मेहनत आपण करता, यावरच आपल्याला आयुष्यात पुढे जाता येईल, आपण उराशी बाळगलेले कोणतेही स्वप्न आपल्याला पूर्ण करता येईल.

समस्यांचे पाढे वाचू नका आणि दुखी राहू नका, कमतरता प्रत्येकात असते त्यावर मात करायला शिका, आपण जीवंत आहोत हीच मोठी गोष्ट आहे, याचा आनंद साजरा करायला शिका. सगळ्यांबरोबर मैत्री करा. स्वतःला कमी समजु नका आणि स्वतःला स्पेशलही समजु नका आणि जिथे मदतीची गरज आहे तिथे खुल्या मनाने मदत घ्यायला कचरु नका. नेहमी याचा विचार करु नका की मला कोणाकडून काय मिळेल, मी समाजाला काय देऊ शकतो याचाही विचार करा. नवीन तंत्रज्ञान, नवीन कम्युनिकेशन स्कील व नवीन कल्पना शिकणे गरजेचे आहे. शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्य जपण्यासाठी व्यायाम करणे, ध्यानधारणा करणे, चांगली पुस्तके वाचणे याची गरज आहे. याच गोष्टी आयुष्यात पुढे जाण्यासाठी, यशस्वी होण्यासाठी मदत करतील. यामुळे दिव्यांग व्यक्ती जर नाउमेद न होता यशस्वी जीवन जगत असतील तर धडधाकट व्यक्तींनी निराश व्हायचे काही कारणच नाही, असे विचार यजुवेंद्र महाजन यांनी मांडले.

 

टॅग्स :thaneठाणेMumbaiमुंबई