शहरं
Join us  
Trending Stories
1
"महाराष्ट्रात भाजप कोणाच्याही कुबड्यांवर चालत नाही; सत्तेमुळे तुम्ही समाधानी असाल, पण मी नाही": शाह
2
तुमचे अधिकारी वृत्तपत्र वाचत नाहीत का? देशाची प्रतिमा मलिन होतेय; भटक्या कुत्र्यांवरून भडकले कोर्ट
3
१२ राज्यांमध्ये होणार मतदार याद्यांची पडताळणी; SIR दुसरा टप्पा ४ नोव्हेंबरपासून, महाराष्ट्राचा समावेश नाही
4
सरन्यायाधीश बूटफेक प्रकरण: वकिलावर कारवाई करणार नाही; सर्वोच्च न्यायालयाचे स्पष्टीकरण
5
तातडीने सुनावणीस नकार, पण दोन मागण्या मान्य; मराठा-ओबीसी आरक्षण वादात ओबीसी संघटनेला कोर्टाचा दिलासा
6
'चुका दुरुस्त केल्याशिवाय निवडणुका घेता येणार नाही'; उद्धव ठाकरेंची निवडणूक आयोगावर टीका
7
शिवडीतील दागिने लुटीचा सुरक्षारक्षक निघाला सूत्रधार; एकाच घरात राहत होते सर्व आरोपी
8
राम जन्मभूमी मंदिराचे काम पूर्ण, २५ नोव्हेंबरला भव्य सोहळा, ६ ते ८ हजार निमंत्रित येणार
9
विद्यार्थिनीने स्वतः टॉयलेट अ‍ॅसिड आणले, वडिलांनीच कट रचला; डीयू विद्यार्थिनी अ‍ॅसिड हल्ला प्रकरणात मोठा ट्विस्ट
10
बांगलादेशात हाफीज सईदची नापाक खेळी; ईशान्येकडे भारतासाठी धोक्याची घंटा, सीमेवर हालचाली वाढल्या
11
रेस्टॉरंटमध्ये भाऊ-बहिणीशी पोलिसांचे गैरवर्तन; व्हिडीओ व्हायरल, एसओने कारणे दाखवा नोटीस बजावली
12
छठ पूजेदरम्यान उत्तर प्रदेशात मोठी दुर्घटना; लोक सेल्फी घेत असतानाच नाव उलटली, अनेक जण बुडाल्याची शक्यता
13
विद्यार्थ्यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी काय केले? तपशील सादर करण्याचे सुप्रीम कोर्टाचे आदेश
14
2028 मध्ये अमेरिकन राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक कोण लढू शकतं? डोनाल्ड ट्रम्प यांनी स्पष्टच सांगितलं
15
अरुणाचल सीमेपासून ४० किमी अंतरावर चीनने बांधला मोठा एअरबेस; लुंजेमध्ये ३६ नवीन एअरक्राफ्ट शेल्टर तयार
16
करारा जवाब मिलेगा..! पाकिस्तानच्या धमकीला तालिबानचं जशास तसं प्रत्युत्तर; युद्ध पेटणार?
17
Suryakumar Yadav: ऑस्ट्रेलियाविरुद्ध सूर्यकुमार इतिहास रचणार? विराट- रोहितला मागे टाकण्याची संधी!
18
मतदारांनो सावधान! 'ही' कागदपत्रे नसतील तर नाव होणार कट; आयोगाने यादी जाहीर केली
19
देशव्यापी 'मतदार यादी दुरुस्ती मोहिम' का गरजेची? निवडणूक आयोगाने सांगितले SIR चे महत्व....
20
मला जाऊ द्या ना घरी...! राष्ट्रवादीच्या कार्यालयात डान्स करणारी ही महिला कोण?; समोर आला खुलासा

जमिनीचा योग्य मोबदला हवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 21, 2018 17:26 IST

कल्याण: नागपूर-मुंबई समृध्दी महामार्गात बाधित होणा-या शेतजमिनींना योग्य मोबदला मिळत नसल्याच्या निषेधार्थ कल्याण तालुक्यातील शेतक-यांनी बुधवारपासून येथील प्रांत कार्यालयाबाहेर बेमुदत उपोषण छेडले आहे. जोपर्यंत ठोस निर्णय होत नाही तोपर्यंत उपोषण सुरूच राहील असा पवित्रा शेतक-यांनी घेतला आहे.

ठळक मुद्देसमृध्दी बाधित शेतक-यांचा एल्गारप्रांत कार्यालयाबाहेर छेडले बेमुदत उपोषण

कल्याण: नागपूर-मुंबई समृध्दी महामार्गात बाधित होणा-या शेतजमिनींना योग्य मोबदला मिळत नसल्याच्या निषेधार्थ कल्याण तालुक्यातील शेतक-यांनी बुधवारपासून येथील प्रांत कार्यालयाबाहेर बेमुदत उपोषण छेडले आहे. जोपर्यंत ठोस निर्णय होत नाही तोपर्यंत उपोषण सुरूच राहील असा पवित्रा शेतक-यांनी घेतला आहे.कल्याण तालुक्यातील राया, निंबवली, गुरवली, उतणे, नडगाव, दानबाव, फळेगाव, उशीद, पितांबरे, चिंचवली या गावातील शेतक-यांच्या जमिनी समृध्दी महामार्गात बाधित होत असून या प्रत्येक गावासाठी जमिनीचा वेगवेगळा मोबदला ठरविण्यात आला आहे. हा एकप्रकारे अन्याय असून समृध्दी महामार्गाबाबत थेट खरीदी १० ते १२ टकके खरेदीखत झालेली असलीतरी या खरेदीच्या अनुषंगाने शेतक-यांमधील फुट पाडण्यासाठी काही घटकांना हाताशी धरून प्रशासनाने व सरकारच्या माध्यमातून शेतक-यांची दिशाभूल करीत हे खरेदीखत केलेले आहेत. यामध्ये बहुतांशी स्थानिक शेतकरी नसून ज्या बाहेरील धनिकांनी शेतक-यांची दिशाभूल करून जमिनी खरेदी केलेल्या आहेत. त्या धनिकांच्या जमिनीचे खरेदीखत केल्याकडे शेतकरी समितीचे जयराम मेहेर यांनी लक्ष वेधले आहे. सर्वात जास्त दर राये महसुली गावासाठी रूपये ३ लाख २ हजार प्रती गुंठा इतके जाहीर केलेला आहे पण या गावाची फक्त २० गुंठे जमिन संपादीत होणार आहे. याच गावच्या शेतीच्या बांधाला बांध लागून असलेल्या निम्बवली महसुली गावाला राये गावापेक्षा निम्मा दर ठेवून या गावच्या शेतक-याची शासनाकडून फसवणूक होत असल्याचे मेहेर म्हणाले. मौजे गुरवली व मौजे चिंचवली या दोन गावांसाठी प्रती गुंठा २ लाख ३२ हजार दर जाहीर केलेला आहे. मौजे नडगावसाठी २ लाख ४६ हजार प्रती गुंठा जाहीर केला आहे. तसेच मौजे पितांबरे, फळेगाव, उतणे या तीन महसुली गावांचा थेट खरेदीचा दर जाणून नुजून उशीराने जाणिवपूर्वक जाहीर करून सरकारने बाधितांची फसवणूक केली आहे. त्यात शेतक-यांच्या एकजुटीत तोडा-फोडा या नितीचा अवलंब देखील केला जात असल्याचा आरोप आंदोलनकर्त्या शेतक-यांचा आहे. यासंदर्भात कल्याण उपविभागीय अधिकारी प्रसाद उकर्डे यांच्याशी लोकमतने संपर्क साधला असता आमची बोलणी उपोषणाला बसलेल्या शेतक-यांसोबत सुरू असल्याचे सांगितले.

या आहेत बाधित शेतक-यांच्या मागण्यातालुक्यातील एकुण गावांची सरासरी काढून किमान ५ लाख रूपये गुंठा असा समान दर बाधित शेतक-यांच्या देणेत यावा. बिनशेतीचा दर किंवा महामार्गाचा दर देण्यात यावा. बाधित शेतीमध्ये असलेली झाडे, विहीर, घरे यांची प्रत्यक्ष साताबा-यासह जाहीर करावा. ज्या शेतक-यांनी मागील भावात खरेदी केलेले आहेत त्यांनाही नविन दराप्रमाणे मोबदला देण्यात यावा. ज्या गावाच्या हद्दीमध्ये असलेल्या गुरचरणीची जमिन महामार्गात जात आहे. त्या जमिनीचा मोबदला त्या गावाच्या ग्रामपंचायतीकडे वर्ग करावी व गुरचरनीवर ज्या ग्रामस्थांची राहती घरे आहेत ती महामार्गात बाधित होत असतील त्यांचे पुनर्वसन करण्यात यावे. महामार्गामध्ये जमिनी गेल्या त्यामुळे काही शेतकरी भूमिहीन होणार आहेत. त्यांना शेतकरी असल्याचा दाखला मिळावा व कल्याण तालुक्यामध्ये बागायती शेतीचे दर जाहीर झालेले नाहीत ते जाहीर करण्यात यावे, तीस गुंठयाचे क्षेत्र असेल आणि त्यात २० गुंठे महामार्गात जात असलेली व उरलेली १० गुंठे जागा महामार्गाला लागून असेलतर शासनाने ही जमिन खरेदी करावी अशा मागण्या नागपूर-मुंबई समृध्दी महामार्ग संघर्ष समिती कल्याण तालुका शेतकरी संघटनेच्या वतीने करण्यात आल्या आहेत.

टॅग्स :kalyanकल्याणdombivaliडोंबिवलीthakurliठाकुर्ली