शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
2
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
3
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
4
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
5
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
6
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
7
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
8
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
9
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
10
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
11
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
12
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय
13
व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये स्मृती मानधनाची ऐतिहासिक कामगिरी, मेग लॅनिंगचाही विक्रम मोडला!
14
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
15
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
16
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
17
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण
18
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
19
लंकेत टीम इंडियाचा डंका! आधी स्नेह राणाचा जलवा! मग सृती, हरलीनसह प्रतिकानं लुटली मैफिल
20
BRICS ची महत्वपूर्ण बैठक; परराष्ट्र मंत्री अन् राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची अनुपस्थिती, कारण काय...

जागतिक आत्महत्या प्रतिबंधक दिन : आठ महिन्यांत रुग्णालयाने वाचवले २९ जणांचे प्राण

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 10, 2019 00:10 IST

मानसोपचारतज्ज्ञ नसल्याने शासकीय रुग्णालयाच्या अडचणींत वाढ

ठाणे : दिवसेंदिवस बदलती जीवनशैली, वाढता मानसिक ताणतणाव तसेच घरगुती छोट्यामोठ्या कारणांतून आत्महत्येसारखा टोकाचा निर्णय घेतला जातो. अशा प्रकारे मागील आठ महिन्यांत ठाणे जिल्हा (सामान्य) शासकीय रुग्णालयात आत्महत्येचा प्रयत्न केल्यानंतर उपचारार्थ दाखल झालेल्या २९ जणांचे प्राण वाचविण्यात जिल्हा रुग्णालय प्रशासनाला यश आले आहे. मात्र, त्यांचे समुपदेशन करून त्यांना जीवन जगण्याचा नवीन मार्ग दाखवणारे मानसोपचारतज्ज्ञ नसल्याने मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे. त्यातच, रुग्णालय प्रशासनाने मानसोपचारतज्ज्ञांबाबत जाहिरात दिली असून लवकरच ते मिळतील, असे सांगितले जात आहे.

आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या घटनांमध्ये दरवर्षीप्रमाणे यंदाही महिलांचे प्रमाण अधिक असल्याचे शासकीय आकडेवारीवरून पुढे आले आहे. तसेच मागील चार वर्षांत आत्महत्येचा प्रयत्न करणाºया ४५६ जणांचे प्राण वाचवल्याची बाब जागतिक आत्महत्या प्रतिबंधक दिनाच्या पूर्वसंध्येला समोर आली आहे.

ठाणे जिल्हा सामान्य रुग्णालयातील डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांकडून रु ग्णांसोबत जिव्हाळ्याचे नाते जपले जात आहे. त्यातच सध्याची बदलती जीवनशैली, स्पर्धात्मक युग यामध्ये प्रत्येकाचे जीवन एका माशाप्रमाणे जणू अडकत चालले आहे. नोकरीच्या ठिकाणी वरिष्ठांकडून होणारा अपमान, प्रेमभंग यासारखे प्रकार किंवा एखादी मनासारखी गोष्ट न मिळणे या आणि काही गोष्टींमुळे माणूस हा मानसिक ताणतणावाखाली जगताना दिसतो. त्यातून तो आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलतो. त्यासाठी विषारी द्रव्य प्राशन करून जीवन संपवण्याचा प्रयत्न करतो. अशा प्रकारे आत्महत्येचा प्रयत्न केलेले रु ग्ण जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल झाल्यावर त्यांच्यावर उपचार करून त्यांचे प्राण वाचवण्यात येते. एवढेच नाहीतर रुग्णालयात आलेल्या अशा रु ग्णांवर मानसोपचारतज्ज्ञ मंडळींमार्फत जानेवारी २०१९ पर्यंत समुदेशन केले जात होते. मात्र, त्या मानसोपचारतज्ज्ञांनी राजीनामा दिला. त्यानंतर, रुग्णालयात येणाºया रुग्णाला ठाणे जिल्हा मेंटल रुग्णालयातील मानसोपचारतज्ज्ञ बोलवून त्यांचे समुपदेशन केले जाते. दरम्यान, रुग्णालयातील समाजसेवा अधीक्षक (वैद्यकीय व मनोविकृती) श्रीरंग सिद हे तज्ज्ञ डॉक्टरांना मदत करून अशा रु ग्णांना आशेचा नवीन किरण दाखविण्याचे मोलाचे काम करीत असल्याची माहिती सूत्रांनी दिली.रुग्णालयात सध्या मानसोपचारतज्ज्ञ नसल्याच्या गोष्टीला दुजोरा देताना, ती जागा भरण्यासाठी जाहिरात दिली आहे. त्यानुसार, येत्या काही दिवसांत ती जागा भरली जाईल. तसेच मीरा-भाईंदर येथील रुग्णालयातून आणखी एक मानसोपचारतज्ज्ञ जिल्हा रुग्णालयाला मिळणार आहे. - डॉ. कैलास पवार, जिल्हा शल्यचिकित्सक, ठाणे जिल्हा रुग्णालय