शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणूक बिहारमध्ये, चर्चा महाराष्ट्राच्या एकनाथ शिंदेंची; एनडीएला डिवचण्यासाठी विरोधकांकडून 'शिंदे मॉडेल'चा उल्लेख
2
ट्रम्प यांनी केलेला युद्धविराम हमासने तोडला की इस्रायलने? हवाई हल्ले, रणगाड्यांच्या तोफांनी गाझा हादरला, १८ ठार
3
मायक्रोसॉफ्टने नोकियानंतर या कंपनीवर तगडा पैसा लावला; Ai च्या इतिहासातील सर्वात मोठी डील, फळणार का?
4
पाकिस्तान क्रिकेटमध्ये मोठ्ठा राडा !! मोहम्मद रिझवान पाक क्रिकेट बोर्डाला नडला... काय घडलं?
5
किरकोळ तेजीसह शेअर बाजाराची सुरुवात; सेन्सेक्स ८५,००० अंकांच्या आणि निफ्टी २६,००० अंकांच्या जवळ
6
प्रकट दिन: कैलास का रहनेवाला, स्वामींचे दैवी परमशिष्य; विलक्षण अवलिया असलेले शंकर महाराज
7
PPF ला साधं समजू नका! पती-पत्नी मिळून बनवू शकता ₹१.३३ कोटींचा फंड, तोही टॅक्स फ्री
8
१३८ दिवसांनी शनि मार्गी: ७ राशींची चंगळ, वरदानाचा काळ; यश-पैसा, सुख लाभेल, साडेसाती संपेल?
9
'तो' प्रवास ठरला शेवटचा! कुटुंबीयांसमोरच वडील आणि मुलीचा होरपळून मृत्यू; १० जण जखमी
10
ब्राझीलमध्ये रेड कमांडोविरोधात युद्ध सुरु; रिओमध्ये मोठ्या अड्ड्यावर हेलिकॉप्टरद्वारे हल्ला, माफियांकडून ड्रोन हल्ल्याने प्रत्यूत्तर
11
भयानक! ब्राझीलच्या रियो डी जेनेरियोमध्ये पोलीस कारवाईत ६४ जणांचा मृत्यू, ८१ जणांना अटक
12
बदल्याची आग! मोबाईल डेटा, हार्ड ड्राइव्ह, अश्लील...; २० वर्षीय मुलीने का केली पार्टनरची हत्या?
13
आजचे राशीभविष्य, २९ ऑक्टोबर २०२५: आर्थिक लाभ, पण गुंतवणूक करताना सावधान; शुभ दिवस
14
शोधत होते दारू, सापडले एक कोटी रुपये; तपासणी नाक्यावर खाजगी बसमध्ये आढळली अवैध रक्कम
15
शेतकऱ्यांसाठी आणखी ११ हजार कोटी रुपये; मदत वाटपात विलंबावरून मंत्रिमंडळ बैठकीत नाराजी
16
निवडणुकीत उद्धवसेनेचे ७०% नवे चेहरे दिसणार; मनसेसोबत प्रचारात एकत्र, घरोघरी पोहोचण्याची योजना
17
छत्रपती संभाजीनगरमधून अमेरिकन नागरिकांना गंडा; अवैध आंतरराष्ट्रीय कॉल सेंटरमधून ११६ आरोपींना अटक
18
खासदार, आमदार हत्येचा कट; आरोपीचा जामीन फेटाळला, सिम कार्ड, सेल फोनचे केले होते तुकडे
19
तिच्या चारित्र्यावर शिंतोंडे का उडवताय? रूपाली चाकणकरांकडून मृत डॉक्टरची बदनामी; सुषमा अंधारेंचा आरोप
20
Mantha Cyclone: मोंथा चक्रीवादळ किनारपट्टीवर धडकले! वेग प्रतितास 100 किमी, विदर्भाला ऑरेंज अलर्ट

जागतिक यकृत दिन - १९ एप्रिल -  भारत जगातील सर्वाधिक यकृत रोग मृत्यू नोंदवणारा देश 

By धीरज परब | Updated: April 19, 2025 15:22 IST

भारतात दरवर्षी सुमारे २ लाख ६८ हजार ५८० लोकांचा मृत्यू यकृत रोगामुळे! 

लोकमत न्यूज नेटवर्क, मीरारोड- भारतात यकृत संबंधित आजार व त्याने होणारे मृत्यूचे वाढते प्रमाण चिंताजनक असल्याचे समोर आले आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या अंदाजानुसार भारतात दरवर्षी सुमारे २ लाख ६८ हजार ५८० लोकांचा मृत्यू यकृत रोगामुळे होतो. जगभरात यकृत रोगां मुळे मृत्यू होण्याच्या तुलनेत  १८.३% मृत्यू एकट्या भारतात होतात. त्यामुळे भारत जगातील सर्वाधिक यकृत रोग मृत्यू नोंदवणारा देश ठरतो. देशातील एकूण मृत्यूं पैकी ३.१७% इतके प्रमाण यकृत रोगांच्या कारणांनी आहे. 

यकृताचे महत्त्व, यकृत रोग टाळण्यासाठी उपाय आणि जनजागृती करण्यासाठी दरवर्षी १९ एप्रिल हा दिवस जागतिक यकृत दिन म्हणून साजरा केला जातो. जगभरात यकृतसंबंधित मृत्यू वाढत असताना, आहाराच्या माध्यमातून प्रतिबंधक उपाय योजणे ही काळाची गरज झाली आहे.

गॅस्ट्रोएन्टेरोलॉजिस्ट सल्लागार डॉ. आदित्य वर्मा म्हणाले कि, “भारत  गंभीर यकृत रोगाच्या महामारीला सामोरे जात आहे, आणि त्यामागे आहार हेच मुख्य  प्रमुख कारण आहे. रोजचे जेवण आपले यकृत बिघडवू शकते किंवा ते सुधारू शकते. आज धकाधकीच्या जीवनात शहरातील नागरिक झटपट खंमग पदार्थ खाण्याच्या आहारी गेला आहे.  तिखट व तेलकट पदार्थांचा समावेश वाढल्याने पोटाचे आरोग्य बिघडून त्याचा दुष्परिणाम यकृतावर होत असतो. 

मुख्य म्हणजे यकृत बिघडल्याची लाक्षाने शेवटच्या टप्य्यात समजून येतात व त्यावेळी यकृत हे पूर्णपणे खराब झालेले असते. भारतात यकृत रोग होण्यामागची प्रमुख कारणे म्हणजे फॅटी लिव्हर (चरबीयुक्त यकृत), हेपेटायटीस संसर्ग, मद्यपानामुळे होणारे यकृताचे नुकसान आणि चुकीच्या जीवनशैलीमुळे होणारे मेटाबोलिक विकार. त्यात भर म्हणून, प्रक्रियायुक्त अन्न, साखर व अपारंपरिक चरबी यांचा अतिरेक यकृतासाठी अत्यंत हानिकारक ठरतो.

 आहार हेच आपले पहिले आणि प्रभावी औषध आहे. संतुलित आणि पोषणयुक्त आहाराच्या माध्यमातून यकृत रोगांचा धोका कमी करता येतो. बर्‍याच प्रकरणांमध्ये सुरुवातीचे यकृताचे नुकसान भरूनही निघू शकते.  देशात यकृताचे वाढते रोग पाहता वैद्यकीय तज्ज्ञांनी लोकांना आहाराच्या माध्यमातून आरोग्यावर नियंत्रण ठेवण्याचे आवाहन केले आहे. 

पांढर्‍या पीठाचे पदार्थ, साखर आणि तळलेले पदार्थ कमी करणे. संपूर्ण धान्ये, भाज्या, फळे आणि कडधान्य यांचा समावेश करणे. सत्त्वयुक्त सेंद्रिय चरबींचा उदा. सुका मेवा, बिया, ऑलिव्ह तेल चा वापर करणे. भरपूर पाणी पिणे आणि मद्यपानाचे प्रमाण कमी करणे असा आहारविषयक सल्ला डॉ. आदित्य वर्मा यांनी दिला आहे.

टॅग्स :Healthआरोग्य