शहरं
Join us  
Trending Stories
1
बडगुजर यांच्या प्रवेशावरून भाजपमध्ये घमासान, बावनकुळे अंधारात, गिरीश महाजन यांचा पुढाकार
2
अश्रूंचा बांध फुटला... राजवीर यांना शेवटचा निरोप देताना पत्नी कर्नल दीपिका चौहान भावूक ( Video )
3
MHT CET 2025 Result: एमएचटी सीईटीच्या परीक्षेत पीसीएममध्ये राज्यातील २२ जण अव्वल!
4
इराण-इस्त्रायल यांच्यातील युद्धात कोण बनणार शांतीदूत?; चीन आणि रशियानेही दिली ऑफर
5
Sonam Raghuwanshi: सोनम आणि तिच्या बॉयफ्रेंडने कशी केली राजाची हत्या? पोलीस आरोपींना घेऊन 'त्या' ठिकाणी
6
प्रक्षेपण सुरू असतानाच झाला होता हल्ला, आता इस्राइलच्या नाकावर टिच्चून त्या महिला अँकरने दिल्या बातम्या  
7
"भारतीय एजंट्सनं अपहरण केलं होतं..," फरार हिरे व्यापारी मेहुल चोक्सीचा खळबळजनक दावा
8
आर. अश्विनच्या टीमवरील बॉल टेम्परिंगचा आरोप खरा की, खोटा? TNPL आयोजकांनी निर्णय दिला, आता...
9
तुम्ही 'या' क्षेत्रात काम करताय का? सरकार दरमहा देणार ३,००० रुपये, आजच अर्ज करा!
10
अहमदाबाद विमान अपघातात २३ वर्षीय क्रिकेटपटूचा दुर्दैवी मृत्यू; टीमने वाहिली श्रद्धांजली
11
कधीही अण्वस्त्र तयार करू शकणार नाही इराण? G7 शिखर परिषदेतून तेहरानला इशारा; या सर्व देशांचा इस्रायलला पाठिंबा
12
Groww, Zerodha सह टॉप ब्रोकर्सनं २ महिन्यांत गमावले ४.७ लाख अ‍ॅक्टिव्ह ग्राहक, काय आहे कारण?
13
Israel Iran Conflict : अमेरिका आता इराणवर हल्ला करणार? ट्रम्प यांनी दिला इशारा; म्हणाले, तेहरान रिकामे करा...
14
'केवळ एका फोन कॉलने इराण-इस्रायल युद्ध थांबवता येऊ शकतं..."; परराष्ट्र मंत्री अराघची यांचा दावा
15
"इराणच्या अयातुल्ला खामेनींना संपवल्यानंतरच हा संघर्ष थांबेल"; बेंजामिन नेतन्याहूंचे मोठे विधान
16
Devendra Fadnavis: स्थलांतरित शाळाबाह्य मुलांना जबरदस्तीने शाळेत आणा, मुख्यमंत्र्यांचे आवाहन
17
'सैराट'मधील हा अभिनेता लवकरच गर्लफ्रेंडसोबत बांधणार लग्नगाठ, ती दिसायला आहे खूप सुंदर
18
UPI Changes: ट्रान्झॅक्शन टाईम, बॅलन्स चेक लिमिट... UPI शी निगडीत या मोठ्या बदलांबाबत जाणून घ्या 
19
रस्त्यावरील लोखंडी वस्तूमुळे पायाला पडले १८ टाके, महापालिकेचा ढिसाळ कारभार अभिनेत्रीला पडला महागात
20
नाशिक भाजपाचा आज प्रवेशोत्सव ! माजी मंत्री बबनराव घोलप, उद्धव सेनेचे सुधाकर बडगुजर यांच्यासह दहा ते बारा माजी नगरसेवक कमळ हातात घेणार 

ठाण्यात श्रमजीवींनी केला एल्गार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 30, 2018 23:51 IST

मुख्यमंत्र्यांकडून लेखी आश्वासन हवे; तोपर्यंत मोर्चासह बेमुदत ठिय्या

ठाणे : कुपोषणाच्या पार्श्वभूमीवर मागण्यांसाठी श्रमजीवी संघटनेने अनेक आक्रमक आंदोलने केल्यानंतर शिष्टमंडळासोबत अनेक बैठका घेऊन स्वत: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सर्व मागण्या मंजूर करण्याचे आश्वासन दिले. परंतु, आजपर्यंत त्यावर अंमलबजावणी न झाल्याने संतापलेल्या सुमारे ५० हजार श्रमजीवी कार्यकर्त्यांनी मंगळवारी ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयावर एल्गार मोर्चा काढून मुख्यमंत्र्यांना जाब विचारला. मागण्या मंजूर होऊन लेखी आश्वासन मिळेपर्यंत ठिय्या आंदोलन सुरूच ठेवण्याचा निश्चिय कायम ठेवून या मोर्चेकऱ्यांनी ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयानंतर सायंकाळी मुंबई व ठाण्याच्या वेशीवरील मुलुंड टोलनाक्यावर बेमुदत ठिय्या आंदोलन सुरू केले.श्रमजीवी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष माजी आमदार विवेक पंडित यांच्या नेतृत्वाखाली सुमारे ५० हजार श्रमजीवी कार्यकर्त्यांनी मंगळवारी हा एल्गार मोर्चा काढला. ठाणेसह पालघर, रायगड, नाशिक आणि मुंबई आदी जिल्ह्यातून आदिवासी कार्यकर्ते दुपारी ठाणे शहरात धडकले. वाहनांव्दारे ठाणे कारागृहामागील साकेत मैदानावर एकत्र येऊन त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालय गाठले. कार्यकर्ते मोठ्याप्रमाणात असल्यामुळे कळवा ब्रिजवरील वाहतूक अन्यत्र वळवून पोलीस लाइनजवळील रोडवर हा मोर्चा अडवून तेथे त्याचे जाहीर सभेत रूपांतर झाले. मागण्या मंजूर झाल्याचे लेखी आश्वासन मिळेपर्यंत उठणार नसल्याचे या मोर्चेकºयांकडून सांगण्यात आले. शहरातील वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी या मोर्चेकºयांना मुलुंड चेकनाक्यावर हलविण्यात आले. मागण्यांवर अंमलबजावणी होईपर्यंत हे बेमुदत ठिय्या आंदोलन सुरूच ठेवणार असल्याचे श्रमजीवीचे सरचिटणीस बाळाराम भोईर यांनी सांगितले.याशिवाय जव्हार येथे कुटीर उपजिल्हा रूग्णालयाचे श्रेणीवर्धन करून तेथे मेडिकल कॉलेज निर्माण करणे, त्यात आदिवासींसाठी स्वतंत्र कोटा ठेवून त्यांना सवलतीत शिक्षण देऊन आदिवासी भागासाठीच पंधरा वर्षे काम करण्यासाठी कटिबद्ध करणे आदी मागण्या मंजूर झाल्याचे आश्चासन देऊनही कृती झाली नाही. प्रत्येक आदिवासीला अंत्योदय योजनेचा लाभ देऊन रेशनवर गहू तांदळासोबत तूरडाळ आणि खाद्यतेल देण्याची मागणी मुख्यमंत्र्यांनी मान्य करूनही कृतीत उतरवली नसल्याचा या मोर्चेकºयांचा सूर होता. यामुळे संतप्त आदिवासींनी मोर्चा काढून मुख्यमंत्र्यांना जाब विचारला.या आहेत मागण्यामुख्यमंत्र्यांनी शिष्टमंडळासोबत अनेक बैठका आणि आश्वासने दिली. या आश्वासनाची पूर्तता मात्र झाली नाही. कुपोषणासारख्या गंभीर समस्येवर तोडगा काढण्यासह जिल्ह्यांमधील ठिकठिकाणची रिक्त पदे तत्काळ भरती करणे, आरोग्य केंद्र, आश्रमशाळा यांची दुरुस्ती करणे, ठिकठिकाणी आरोग्य तपासणी यंत्रणा सतर्क, तज्ज्ञ डॉक्टर्सची कमतरता दूर करणे, रोजगार हमीच्या यंत्रणेतील त्रुटी तत्काळ दूर करण्यासह जव्हार येथे अप्पर जिल्हाधिकारी कार्यालय शिफ्ट करणे, रोहयो आणि रेशनिंग यंत्रणा जव्हार येथून कार्यान्वित करणे, पोषण आहारातील अनियमतिता दूर करून टीएचआरचा ठेका रद्द करून गावातील मुलांना ताजा आहार कसा मिळेल, याची योजना आखणे आदी मागण्या प्रलंबित आहेत.

टॅग्स :agitationआंदोलनthaneठाणे