शहरं
Join us  
Trending Stories
1
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
2
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
3
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
4
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
5
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
6
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
7
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
8
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
9
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
10
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
11
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
12
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
13
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
14
"स्वतःची काळजी घ्या बाबा"; हातावर 'ते' शब्द लिहून लेकीने आयुष्य संपवलं! नेमकं काय घडलं?
15
युद्धादरम्यान इराणला जबर धक्का, अमेरिका-इस्राइलच्या हल्ल्यात गुप्तचर संघटनेचे प्रमुख माजिद खादेमी यांचा मृत्यू
16
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
17
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
18
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
19
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
20
Lunch Box Recipe: प्रोटीन रिच सोया दाल पराठा; चवीला भारी आणि आरोग्यासाठी गुणकारी!
Daily Top 2Weekly Top 5

ठाण्यात श्रमजीवींनी केला एल्गार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 30, 2018 23:51 IST

मुख्यमंत्र्यांकडून लेखी आश्वासन हवे; तोपर्यंत मोर्चासह बेमुदत ठिय्या

ठाणे : कुपोषणाच्या पार्श्वभूमीवर मागण्यांसाठी श्रमजीवी संघटनेने अनेक आक्रमक आंदोलने केल्यानंतर शिष्टमंडळासोबत अनेक बैठका घेऊन स्वत: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सर्व मागण्या मंजूर करण्याचे आश्वासन दिले. परंतु, आजपर्यंत त्यावर अंमलबजावणी न झाल्याने संतापलेल्या सुमारे ५० हजार श्रमजीवी कार्यकर्त्यांनी मंगळवारी ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयावर एल्गार मोर्चा काढून मुख्यमंत्र्यांना जाब विचारला. मागण्या मंजूर होऊन लेखी आश्वासन मिळेपर्यंत ठिय्या आंदोलन सुरूच ठेवण्याचा निश्चिय कायम ठेवून या मोर्चेकऱ्यांनी ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयानंतर सायंकाळी मुंबई व ठाण्याच्या वेशीवरील मुलुंड टोलनाक्यावर बेमुदत ठिय्या आंदोलन सुरू केले.श्रमजीवी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष माजी आमदार विवेक पंडित यांच्या नेतृत्वाखाली सुमारे ५० हजार श्रमजीवी कार्यकर्त्यांनी मंगळवारी हा एल्गार मोर्चा काढला. ठाणेसह पालघर, रायगड, नाशिक आणि मुंबई आदी जिल्ह्यातून आदिवासी कार्यकर्ते दुपारी ठाणे शहरात धडकले. वाहनांव्दारे ठाणे कारागृहामागील साकेत मैदानावर एकत्र येऊन त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालय गाठले. कार्यकर्ते मोठ्याप्रमाणात असल्यामुळे कळवा ब्रिजवरील वाहतूक अन्यत्र वळवून पोलीस लाइनजवळील रोडवर हा मोर्चा अडवून तेथे त्याचे जाहीर सभेत रूपांतर झाले. मागण्या मंजूर झाल्याचे लेखी आश्वासन मिळेपर्यंत उठणार नसल्याचे या मोर्चेकºयांकडून सांगण्यात आले. शहरातील वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी या मोर्चेकºयांना मुलुंड चेकनाक्यावर हलविण्यात आले. मागण्यांवर अंमलबजावणी होईपर्यंत हे बेमुदत ठिय्या आंदोलन सुरूच ठेवणार असल्याचे श्रमजीवीचे सरचिटणीस बाळाराम भोईर यांनी सांगितले.याशिवाय जव्हार येथे कुटीर उपजिल्हा रूग्णालयाचे श्रेणीवर्धन करून तेथे मेडिकल कॉलेज निर्माण करणे, त्यात आदिवासींसाठी स्वतंत्र कोटा ठेवून त्यांना सवलतीत शिक्षण देऊन आदिवासी भागासाठीच पंधरा वर्षे काम करण्यासाठी कटिबद्ध करणे आदी मागण्या मंजूर झाल्याचे आश्चासन देऊनही कृती झाली नाही. प्रत्येक आदिवासीला अंत्योदय योजनेचा लाभ देऊन रेशनवर गहू तांदळासोबत तूरडाळ आणि खाद्यतेल देण्याची मागणी मुख्यमंत्र्यांनी मान्य करूनही कृतीत उतरवली नसल्याचा या मोर्चेकºयांचा सूर होता. यामुळे संतप्त आदिवासींनी मोर्चा काढून मुख्यमंत्र्यांना जाब विचारला.या आहेत मागण्यामुख्यमंत्र्यांनी शिष्टमंडळासोबत अनेक बैठका आणि आश्वासने दिली. या आश्वासनाची पूर्तता मात्र झाली नाही. कुपोषणासारख्या गंभीर समस्येवर तोडगा काढण्यासह जिल्ह्यांमधील ठिकठिकाणची रिक्त पदे तत्काळ भरती करणे, आरोग्य केंद्र, आश्रमशाळा यांची दुरुस्ती करणे, ठिकठिकाणी आरोग्य तपासणी यंत्रणा सतर्क, तज्ज्ञ डॉक्टर्सची कमतरता दूर करणे, रोजगार हमीच्या यंत्रणेतील त्रुटी तत्काळ दूर करण्यासह जव्हार येथे अप्पर जिल्हाधिकारी कार्यालय शिफ्ट करणे, रोहयो आणि रेशनिंग यंत्रणा जव्हार येथून कार्यान्वित करणे, पोषण आहारातील अनियमतिता दूर करून टीएचआरचा ठेका रद्द करून गावातील मुलांना ताजा आहार कसा मिळेल, याची योजना आखणे आदी मागण्या प्रलंबित आहेत.

टॅग्स :agitationआंदोलनthaneठाणे