शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानवर हसावं की रडावं.... आता म्हणे मोहसीन नक्वीला गोल्ड मेडल देणार, सन्मान करणार !
2
लाखोंच्या गर्दीत हरवलेला 'मुन्ना' काही मिनिटांत 'अण्णा'च्या गळ्यात; बापलेकांची भावनिक भेट
3
सानिया मिर्झाशी घटस्फोट, आता शोएब मलिकचे सना जावेदशीही लग्न तुटणार? VIDEO मुळे उडाली खळबळ
4
नवी मुंबई विमानतळाला दि.बा.पाटील यांचेच नाव लागणार; CM फडणवीसांचे कृती समितीला आश्वासन
5
ट्रॅक्टरमध्ये बसून थेट बांधावर... सोलापूरच्या अधिकाऱ्यांची तत्परता, शेतकऱ्यांना दिला धीर
6
'फिट' है तो 'हिट' है... बॉलिवूड अभिनेत्रीचा कमालीचा फिटनेस, या वयातही चाहत्यांना करते घायाळ
7
२ वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांना कफ सिरप देऊ नका, केंद्राचा सल्ला; राजस्थान, मध्य प्रदेशात ११ बालकांचा मृत्यू
8
वेळागर समुद्रात आठजण बुडाले; तिघांचे मृतदेह हाती, एकीचा जीव वाचला, किनाऱ्यावर आक्रोश
9
राज्यात अतिवृष्टी, पूरस्थिती; अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेची ४-६ ऑक्टोबरला अंतिम विशेष फेरी
10
शेतकऱ्यांसाठी काँग्रेस रस्त्यावर; नुकसानग्रस्तांना तत्काळ मदत मिळण्यासाठी राज्यभर आंदोलन
11
“बावळट-मूर्ख, मनोज जरांगेंसारखा नेता मिळणे मराठ्यांचे दुर्दैव”; लक्ष्मण हाकेंचा हल्लाबोल
12
"तुम्ही आम्हाला शिकवू नका..."; भारताने पाकिस्तानला चांगलंच सुनावलं, UN मध्ये काय घडलं?
13
आशाबाई, अंबिका अन् सुनीता... सोलापुरात दोन दिवसांत तीन महिलांची हत्या, कारण एकच
14
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि.बा. पाटलांचे नाव; PM मोदींची राज्य सरकारच्या निर्णयाला मंजुरी
15
IND vs AUS : तिलक वर्माचं शतक थोडक्यात हुकलं; ऑस्ट्रेलियाविरुद्ध अभिषेकवर 'गोल्डन डक'ची नामुष्की
16
RSS च्या पथसंचलनात ढोल वाजवणाऱ्या स्वयंसेवकाचा हृदयविकाराने मृत्यू; व्हिडिओ व्हायरल
17
वैभव खेडेकरांचा तीनदा भाजपा प्रवेश रखडला, आता शिवसेनेत जाणार? शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
18
काँग्रेसनेही निवडणुकांसाठी कंबर कसली! नागपुरात ४, ५ ऑक्टोबरला विचारमंथन कार्यशाळा
19
IND vs WI: ‘ध्रुव तारा’ चमकला! पहिल्या सेंच्युरीनंतर बॅटची बंदूक करून 'बाप-माणसाला' सेल्युट! (VIDEO)
20
Business: २ मित्रांनी सोडली कॉर्पोरेट नोकरी, दूध विकून झाले कोट्यधीश, तयार केला मोठा ब्रँड!

लोकांना उल्लू बनवण्याचे काम सध्या सुरू आहे

By admin | Updated: October 13, 2015 01:43 IST

केंद्र व राज्य सरकार इंग्रजी शब्दांचा वापर करून लोकांना उल्लू बनवण्याचे काम करीत आहेत. स्मार्ट सिटी हा तोच प्रकार आहे.

वसई : केंद्र व राज्य सरकार इंग्रजी शब्दांचा वापर करून लोकांना उल्लू बनवण्याचे काम करीत आहेत. स्मार्ट सिटी हा तोच प्रकार आहे. स्मार्ट सिटी म्हणजे नक्की काय? शहरांना स्मार्ट करण्यासाठी १०० कोटी देण्यात येत आहेत. मुंबई महानगरपालिकेला रस्त्यांवरील खड्डे बुजविण्यासाठी १०० कोटी रुपयांपेक्षा अधिक निधी लागतो, मग सिटी स्मार्ट कशी होणार, असा प्रश्न प्रसिद्ध नगररचनाकार चंद्रशेखर प्रभू यांनी पर्यावरणावर झालेल्या परिसंवादात उपस्थित केला. वसई धर्म प्रांतातर्फे वसईच्या का. बर्नड भंडारी सभागृहामध्ये ‘पर्यावरण’ या विषयावर परिसंवाद आयोजित करण्यात आला होता. या परिसंवादामध्ये आ. हितेंद्र ठाकूर, फ्रान्सिस दिब्रिटो, मनवेल तुस्कानो, सुनीती सु.र. विज्ञान लेखक जोसेफ तुस्कानो, आर्य बिशप डॉ. फेलिक्स मच्याडो व फा. मायकलजी सहभागी झाले होते. केवळ लोकांची दिशाभूल करण्याचे काम सध्या सुरू आहे. स्मार्ट हा शब्द आपल्या सोयीनुसार वापरायचा आणि आपला माल विकायचा, अशी टीका प्रभू यांनी या वेळी केली. या योजनेंतर्गत १ लाख कोटी रुपये येत्या १० वर्षांमध्ये देण्यात येणार आहेत. यापूर्वी शहराच्या विकासासाठी हजारो कोटी रुपयांचा निधी देण्यात आला. त्याचे काय झाले? आज मुंबईसारख्या शहरामध्ये ९५ टक्के नागरिकांना मूलभूत गरजांपासून वंचित राहावे लागत आहे. १०० कोटी रुपये देऊन शहरे स्मार्ट होणार का? हे विचारायची वेळ आली आहे.त्यानंतर, मेधा पाटकर यांच्या सहकारी सुनीती सु.र. आपल्या भाषणात म्हणाल्या, आमचा विकासाला विरोध नाही. पण, विकास करताना नैसर्गिक साधनसंपत्तीचा विनाश होऊ नये, म्हणून नैसर्गिक स्रोतावर जगणाऱ्या लोकांसाठी आमची जनआंदोलने होत असतात. कल्याणकारी व्यवस्था निर्माण करणे व पुढील पिढीचे जीवन सुसह्य व्हावे, याकरिता आमचे लढे आहेत. सरंजामशाहीकडून लोकशाहीकडे वाटचाल करताना शेवटचा माणूस उद्ध्वस्त होता कामा नये. आज शहरे बांडगुळी व्यवस्था निर्माण करीत आहेत. ग्रामीण भागातील सर्व स्रोत ओरबाडून शहरे उभारण्यात येत आहेत.आ. हितेंद्र ठाकूर यांनी विकासासाठी प्रकल्प येणे आवश्यक आले. आपल्याला वीज हवी, त्यासाठी अणुऊर्जा प्रकल्प गरजेचे आहेत. परंतु, त्या प्रकल्पांचे दुष्परिणाम व निघणारी राख यामुळे कृषी उत्पन्ने नष्ट होता कामा नयेत. मी आमदार होण्यापूर्वी १९८८ मध्ये वसईचा आराखडा तयार करण्यात आला. तसेच या प्रश्नी कोर्टाचे निर्देश होते. महानगरपालिका यासंदर्भात कुठेही हस्तक्षेप करीत नाही. त्यामुळे आमच्यावर टीका करणे उचित नाही. निर्भय जनमंचचे अध्यक्ष मनवेल तुस्कानो आपल्या भाषणात म्हणाले, सत्ताधाऱ्यांनी बिल्डरांना आणले. गावे वगळण्याचा प्रश्न अंतिम टप्प्यात आला असताना तीन आमदारांनी राज्य सरकारला पत्र दिले व प्रक्रिया लांबल्याचे सांगितले. (प्रतिनिधी)