शहरं
Join us  
Trending Stories
1
सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही...
2
भाजपाच्या नजरेने RSS कडे पाहणे चुकीचे; सरसंघचालक मोहन भागवत यांनी असं विधान का केले?
3
काँग्रेस-शरद पवारांसोबत आघाडी करून शिंदेसेनेने २ नगरपरिषदेत भाजपाच्या तोंडचा घास हिसकावला
4
'बांगलादेशातील अराजकतेला युनूस जबाबदार, भारतासोबतचे संबंधही बिघडवले'; शेख हसीना यांचा जोरदार हल्लाबोल
5
Post Office मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹८९,९९० चं फिक्स व्याज, पैसेही सुरक्षित आणि मिळणार सरकारची गॅरेंटी
6
नांदेडमधील लोह्यात एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव, ‘घराणेशाही संपवू’ म्हणणाऱ्या भाजपचा धुव्वा
7
आणखी एक मुस्कान! मेरठच्या 'सौरभ' हत्याकांडासारखा प्लॅन बनवला; पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीचे केले तुकडे
8
वंचित बहुजन आघाडी दुर्लक्षित राहिली, पण एक नगराध्यक्ष पदासह या ठिकाणांवर मारलीय बाजी
9
नगराध्यक्ष एकाचा, बहुमत दुसऱ्याचे! जनतेतून निवडीमुळे नगर परिषदांत 'पॉवर गेम' रंगणार; ५ वर्षे संघर्षाची ठिणगी?
10
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २२ डिसेंबर २०२५: प्रिय व्यक्तीची भेट होईल, अचानक पदोन्नती होण्याचीही शक्यता!
11
संपादकीय: नगरांचा जनादेश सत्तेला, काँग्रेस पक्ष राज्यात जिवंत असल्याचे...
12
U19 Asia Cup: 'हाय व्होल्टेज' राडा! भारतीय युवा संघाने गमावला आशिया चषक; पाक पीसीबी प्रमुखांच्या हस्ते पदक स्वीकारण्यास नकार
13
‘नगरां’च्या निवडणुकीत मारली बाजी; भाजप ‘धुरंधर’ तर ठाकरेंचा धुव्वा उडाला
14
पक्षाने माझी शक्ती कमी केली- मुनगंटीवार; सत्तारूढ अन् विरोधकांमधील नेत्यांनी कुठे राखली प्रतिष्ठा
15
भारताविरुद्ध बांगलादेशात षड्‌यंत्र! कोण कोण रचतेय...
16
महामुंबईत भाजप-शिंदेसेनेचाच ‘आवाज’; प्रत्येकी पाच नगराध्यपदांवर विजय; अजित पवार गटही दमदार
17
रेल्वे प्रवाशांना नवीन वर्षाचा 'झटका'! २६ डिसेंबरपासून भाडेवाढ लागू; लांब पल्ल्याचा प्रवास आणि 'AC' कोच महागणार
18
दिशाभूल करणाऱ्या प्रचारामुळे संघाबद्दल काही लोकांमध्ये गैरसमज; संघाचा कोणीही शत्रू नाही :  सरसंघचालक मोहन भागवत
19
आमदारांचे पगार की जनतेची थट्टा? ओडिशात २००% पगारवाढीने रणकंदन; पाहा महाराष्ट्रासह कोणत्या राज्यात किती मिळतो पगार!
20
‘हा फोटो बघ’ असा मेसेज तुम्हालाही आलाय का? व्हॉट्सॲप ‘हायजॅक’चे नवे संकट!
Daily Top 2Weekly Top 5

लोकांना उल्लू बनवण्याचे काम सध्या सुरू आहे

By admin | Updated: October 13, 2015 01:43 IST

केंद्र व राज्य सरकार इंग्रजी शब्दांचा वापर करून लोकांना उल्लू बनवण्याचे काम करीत आहेत. स्मार्ट सिटी हा तोच प्रकार आहे.

वसई : केंद्र व राज्य सरकार इंग्रजी शब्दांचा वापर करून लोकांना उल्लू बनवण्याचे काम करीत आहेत. स्मार्ट सिटी हा तोच प्रकार आहे. स्मार्ट सिटी म्हणजे नक्की काय? शहरांना स्मार्ट करण्यासाठी १०० कोटी देण्यात येत आहेत. मुंबई महानगरपालिकेला रस्त्यांवरील खड्डे बुजविण्यासाठी १०० कोटी रुपयांपेक्षा अधिक निधी लागतो, मग सिटी स्मार्ट कशी होणार, असा प्रश्न प्रसिद्ध नगररचनाकार चंद्रशेखर प्रभू यांनी पर्यावरणावर झालेल्या परिसंवादात उपस्थित केला. वसई धर्म प्रांतातर्फे वसईच्या का. बर्नड भंडारी सभागृहामध्ये ‘पर्यावरण’ या विषयावर परिसंवाद आयोजित करण्यात आला होता. या परिसंवादामध्ये आ. हितेंद्र ठाकूर, फ्रान्सिस दिब्रिटो, मनवेल तुस्कानो, सुनीती सु.र. विज्ञान लेखक जोसेफ तुस्कानो, आर्य बिशप डॉ. फेलिक्स मच्याडो व फा. मायकलजी सहभागी झाले होते. केवळ लोकांची दिशाभूल करण्याचे काम सध्या सुरू आहे. स्मार्ट हा शब्द आपल्या सोयीनुसार वापरायचा आणि आपला माल विकायचा, अशी टीका प्रभू यांनी या वेळी केली. या योजनेंतर्गत १ लाख कोटी रुपये येत्या १० वर्षांमध्ये देण्यात येणार आहेत. यापूर्वी शहराच्या विकासासाठी हजारो कोटी रुपयांचा निधी देण्यात आला. त्याचे काय झाले? आज मुंबईसारख्या शहरामध्ये ९५ टक्के नागरिकांना मूलभूत गरजांपासून वंचित राहावे लागत आहे. १०० कोटी रुपये देऊन शहरे स्मार्ट होणार का? हे विचारायची वेळ आली आहे.त्यानंतर, मेधा पाटकर यांच्या सहकारी सुनीती सु.र. आपल्या भाषणात म्हणाल्या, आमचा विकासाला विरोध नाही. पण, विकास करताना नैसर्गिक साधनसंपत्तीचा विनाश होऊ नये, म्हणून नैसर्गिक स्रोतावर जगणाऱ्या लोकांसाठी आमची जनआंदोलने होत असतात. कल्याणकारी व्यवस्था निर्माण करणे व पुढील पिढीचे जीवन सुसह्य व्हावे, याकरिता आमचे लढे आहेत. सरंजामशाहीकडून लोकशाहीकडे वाटचाल करताना शेवटचा माणूस उद्ध्वस्त होता कामा नये. आज शहरे बांडगुळी व्यवस्था निर्माण करीत आहेत. ग्रामीण भागातील सर्व स्रोत ओरबाडून शहरे उभारण्यात येत आहेत.आ. हितेंद्र ठाकूर यांनी विकासासाठी प्रकल्प येणे आवश्यक आले. आपल्याला वीज हवी, त्यासाठी अणुऊर्जा प्रकल्प गरजेचे आहेत. परंतु, त्या प्रकल्पांचे दुष्परिणाम व निघणारी राख यामुळे कृषी उत्पन्ने नष्ट होता कामा नयेत. मी आमदार होण्यापूर्वी १९८८ मध्ये वसईचा आराखडा तयार करण्यात आला. तसेच या प्रश्नी कोर्टाचे निर्देश होते. महानगरपालिका यासंदर्भात कुठेही हस्तक्षेप करीत नाही. त्यामुळे आमच्यावर टीका करणे उचित नाही. निर्भय जनमंचचे अध्यक्ष मनवेल तुस्कानो आपल्या भाषणात म्हणाले, सत्ताधाऱ्यांनी बिल्डरांना आणले. गावे वगळण्याचा प्रश्न अंतिम टप्प्यात आला असताना तीन आमदारांनी राज्य सरकारला पत्र दिले व प्रक्रिया लांबल्याचे सांगितले. (प्रतिनिधी)