शहरं
Join us  
Trending Stories
1
वीज कमी वापरणाऱ्यांना स्वस्त दर; जास्त वापरल्यास बिलात ‘झटका’, किती युनिटपर्यंत दिलासा?
2
चांदीच्या ताटात न दिलेल्या जेवणाची चर्चा जोरदार; आरोप-प्रत्यारोपांचा धुरळा
3
अहिल्यानगर हादरले! आठवीच्या विद्यार्थ्याने केला दहावीच्या विद्यार्थ्याचा खून; क्रिकेटचा वादातून शाळेतच संपवले
4
पंचगंगा, चंद्रभागेला पूर, भीमा नदीत ६३ हजार क्युसेकचा विसर्ग सुरू; विदर्भाला पावसाचा दिलासा 
5
समृद्धी महामार्गावर आता २४ तास खड्डे दुरुस्तीपथक; देखभाल-दुरुस्तीचे काम कंत्राटदारामार्फत नियमित
6
जमीन सरकारी, वापरण्याचा हक्क सरकारलाच; मोघरपाड्यात मेट्रो कार शेड उभारण्याचा मार्ग मोकळा
7
‘गडकरी’ सुरू झाल्याखेरीज ‘घाणेकर’ बंद होणार नाही! ठाणे महापालिकेने मांडली स्पष्ट भूमिका
8
विधानसभा निकाल रद्द करण्याची मागणी फेटाळली; याचिका करून कोर्टाचा वेळ वाया घालवला : हायकोर्ट
9
एसटी महामंडळाच्या २ हजार बसेस भंगारात; ‘एमएसटीसी’च्या माध्यमातून करण्यात येणार लिलाव
10
भरती-ओहोटीचे सर्वेक्षण वाढवणवासियांनी उधळले; आयटीडीसी पथकाला पिटाळले
11
उद्योगस्नेही वातावरणामुळे महाराष्ट्रात देशातील सर्वाधिक गुंतवणूक -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
12
तरुणांनी प्रामाणिकपणा, नवकल्पनांसह परंपरा पुढे न्यावी : मंत्री आदिती तटकरे
13
“मोदी माझे चांगले मित्र, व्यापार निवडला अन्...”; भारत-पाक युद्धविरामावर पुन्हा ट्रम्प बोलले
14
“घोषित-अघोषित आणीबाणीत फरक करण्याची वेळ आली आहे, पुन्हा सावध राहण्याचा काळ”: शरद पवार
15
Malegaon Factory Election Result: माळेगाव सहकारी साखर कारखाना निवडणूक अजित पवारांच्या लाटेत
16
Swargate Case :स्वारगेट बलात्कार प्रकरणी पोलिसांकडून पीडितेला मानसिक त्रास; वकिलांचा आरोप
17
वीजग्राहकांसाठी आनंदाची बातमी! २६ टक्के वीजदर कमी होणार; CM फडणवीस म्हणाले, “इतिहासात प्रथमच…”
18
लग्नाआधी सरकारी नोकरी! नववी नापास रिंकू सिंह होणार थेट 'शिक्षण अधिकारी'
19
अमेरिकेच्या हल्ल्यांमुळे अणु-प्रकल्प मोठ्या प्रमाणावर उद्ध्वस्त; इराणने अखेर कबुल केलं!
20
प्रकाश आंबेडकरांना धक्का, ७६ लाख वाढीव मतदान याचिका फेटाळली; कोर्ट म्हणाले, “वेळ वाया गेला”

लोकांना उल्लू बनवण्याचे काम सध्या सुरू आहे

By admin | Updated: October 13, 2015 01:43 IST

केंद्र व राज्य सरकार इंग्रजी शब्दांचा वापर करून लोकांना उल्लू बनवण्याचे काम करीत आहेत. स्मार्ट सिटी हा तोच प्रकार आहे.

वसई : केंद्र व राज्य सरकार इंग्रजी शब्दांचा वापर करून लोकांना उल्लू बनवण्याचे काम करीत आहेत. स्मार्ट सिटी हा तोच प्रकार आहे. स्मार्ट सिटी म्हणजे नक्की काय? शहरांना स्मार्ट करण्यासाठी १०० कोटी देण्यात येत आहेत. मुंबई महानगरपालिकेला रस्त्यांवरील खड्डे बुजविण्यासाठी १०० कोटी रुपयांपेक्षा अधिक निधी लागतो, मग सिटी स्मार्ट कशी होणार, असा प्रश्न प्रसिद्ध नगररचनाकार चंद्रशेखर प्रभू यांनी पर्यावरणावर झालेल्या परिसंवादात उपस्थित केला. वसई धर्म प्रांतातर्फे वसईच्या का. बर्नड भंडारी सभागृहामध्ये ‘पर्यावरण’ या विषयावर परिसंवाद आयोजित करण्यात आला होता. या परिसंवादामध्ये आ. हितेंद्र ठाकूर, फ्रान्सिस दिब्रिटो, मनवेल तुस्कानो, सुनीती सु.र. विज्ञान लेखक जोसेफ तुस्कानो, आर्य बिशप डॉ. फेलिक्स मच्याडो व फा. मायकलजी सहभागी झाले होते. केवळ लोकांची दिशाभूल करण्याचे काम सध्या सुरू आहे. स्मार्ट हा शब्द आपल्या सोयीनुसार वापरायचा आणि आपला माल विकायचा, अशी टीका प्रभू यांनी या वेळी केली. या योजनेंतर्गत १ लाख कोटी रुपये येत्या १० वर्षांमध्ये देण्यात येणार आहेत. यापूर्वी शहराच्या विकासासाठी हजारो कोटी रुपयांचा निधी देण्यात आला. त्याचे काय झाले? आज मुंबईसारख्या शहरामध्ये ९५ टक्के नागरिकांना मूलभूत गरजांपासून वंचित राहावे लागत आहे. १०० कोटी रुपये देऊन शहरे स्मार्ट होणार का? हे विचारायची वेळ आली आहे.त्यानंतर, मेधा पाटकर यांच्या सहकारी सुनीती सु.र. आपल्या भाषणात म्हणाल्या, आमचा विकासाला विरोध नाही. पण, विकास करताना नैसर्गिक साधनसंपत्तीचा विनाश होऊ नये, म्हणून नैसर्गिक स्रोतावर जगणाऱ्या लोकांसाठी आमची जनआंदोलने होत असतात. कल्याणकारी व्यवस्था निर्माण करणे व पुढील पिढीचे जीवन सुसह्य व्हावे, याकरिता आमचे लढे आहेत. सरंजामशाहीकडून लोकशाहीकडे वाटचाल करताना शेवटचा माणूस उद्ध्वस्त होता कामा नये. आज शहरे बांडगुळी व्यवस्था निर्माण करीत आहेत. ग्रामीण भागातील सर्व स्रोत ओरबाडून शहरे उभारण्यात येत आहेत.आ. हितेंद्र ठाकूर यांनी विकासासाठी प्रकल्प येणे आवश्यक आले. आपल्याला वीज हवी, त्यासाठी अणुऊर्जा प्रकल्प गरजेचे आहेत. परंतु, त्या प्रकल्पांचे दुष्परिणाम व निघणारी राख यामुळे कृषी उत्पन्ने नष्ट होता कामा नयेत. मी आमदार होण्यापूर्वी १९८८ मध्ये वसईचा आराखडा तयार करण्यात आला. तसेच या प्रश्नी कोर्टाचे निर्देश होते. महानगरपालिका यासंदर्भात कुठेही हस्तक्षेप करीत नाही. त्यामुळे आमच्यावर टीका करणे उचित नाही. निर्भय जनमंचचे अध्यक्ष मनवेल तुस्कानो आपल्या भाषणात म्हणाले, सत्ताधाऱ्यांनी बिल्डरांना आणले. गावे वगळण्याचा प्रश्न अंतिम टप्प्यात आला असताना तीन आमदारांनी राज्य सरकारला पत्र दिले व प्रक्रिया लांबल्याचे सांगितले. (प्रतिनिधी)