शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
5
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
6
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
7
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
8
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
9
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
10
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
11
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
12
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
13
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
14
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
15
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
16
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
17
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
18
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
19
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

नायगाव पूर्व-पश्चिम पुलाचे काम संथ; मे २०२१ अखेर वाहतुकीस खुला?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 11, 2020 23:24 IST

मागील वर्षी ९ डिसेंबर २०१९ रोजी पुलाच्या रखडलेल्या कामाला पुन्हा सुरूवात झाली, मात्र हाती घेतलेले काम पुन्हा काही कारणास्तव बंद करण्यात आले.

नायगाव परिसरातील पूर्व-पश्चिमला जोडणाऱ्या उड्डाणपुलाचे काम मागील ४ वर्षांपासून सुरू आहे. एमएमआरडीए प्रशासनाकडून हाती घेण्यात आलेल्या या उड्डाणपुलाचे कंत्राट सिम्प्लेक्स नामक कंपनीला देण्यात आले आहे. मात्र या पुलाच्या कामाला रेल्वे प्रशासनाकडून परवानगी मिळत नसल्याने पुलाचे काम मागील वर्षभरापासून रखडले होते. परिणामी स्थानिक नागरिकांमध्ये तीव्र नाराजी पसरली होती.मागील वर्षी ९ डिसेंबर २०१९ रोजी पुलाच्या रखडलेल्या कामाला पुन्हा सुरूवात झाली, मात्र हाती घेतलेले काम पुन्हा काही कारणास्तव बंद करण्यात आले. या बंद पडलेल्या कामाला महिनाभरापासून पुन्हा सुरुवात झाली आहे. रेल्वेचे रूळ कोसळू नयेत म्हणून मायक्रो पायलिंगचे काम सध्या सुरू आहे. मात्र बरेच मजूर कोरोना आपत्तीमुळे गावी गेलेले असल्याने या कामासाठी आता मजूर उपलब्ध नाही. परिणामी हे काम संथगतीने सुरू आहे.सुनील घरत।

पारोळ : नायगाव पूर्व-पश्चिम जोडणाºया उड्डाणपुलाचे काम मागील चार वर्षांपासून शासनाच्या उदासीन कारभारामुळे अपूर्ण राहिले आहे. आधीच नायगाव पूर्व परिसराची लोकसंख्या झपाट्याने वाढत आहे. अशा काळात येथील लोकाभिमुख प्रश्नांना धसास लावण्यासाठी शासनाकडून ठोस प्रयत्न होण्याऐवजी आहेत तेच प्रकल्प संथगतीने सुरू असल्याने नागरिकांमध्ये नाराजीचे वातावरण आहे. हा पूल पुढील वर्षी मे २०२१ अखेरीस सुरू होण्याची शक्यता असून हा पूल वाहतुकीसाठी खुला झाल्यास वसई ते मुंबई हे अंतर २५ किलोमीटरने कमी होऊन वाहतूकदारांना व नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे.सध्या नायगाव पूर्वेकडील नागरिकीकरण झपाट्याने वाढत आहे. पूर्वेतून पश्चिमेकडे आणि पश्चिमेतून पूर्वेकडे येताना नागरिकांना वसईला वळसा घालूनच पुढे जावे लागते. त्यामुळे नायगाव परिसरातील पूर्व-पश्चिम जोडणारा हा पूल वाहतुकीसाठी खुला झाल्यास वेळेची आणि इंधनाची बचत होणार आहे.या उड्डाणपुलाचे काम सतत या ना त्या कारणास्तव संथगतीने सुरू असल्यामुळे नायगाव परिसरातील नागरिकांमध्ये याबाबत नाराजी पसरली आहे. पुढील वर्षी मे २०२१ अखेर हा पुल वाहतुकीसाठी खुला होणार असल्याचे संकेत मिळत आहेत. हा पूल वाहतुकीसाठी खुला झाल्यास नागरिक, वाहतूकदारांना मोठा दिलासा मिळणार आहे. तसेच वेळेचीही बचत होणार आहे.