शहरं
Join us  
Trending Stories
1
"हा वादाचा नव्हे, समाजाचा विषय; आरोग्य अन् आस्था..."; CM फडणवीसांचे कबुतरखाना वादावर विधान
2
Palghar Crime: धक्का लागला म्हणून कुऱ्हाडीने केले वार, लोकांनी झाडाला बांधून आरोपी चोपला
3
"आम्हाला नाही माहीत, पाकिस्तानला...!"; ऑपरेशन सिंदूर दरम्यान एफ-१६ लढाऊ विमान पाडलं गेलं? अमेरिकेनं दिलं असं उत्तर
4
सावरकरांवरील विधानांमुळे माझ्या जीवितास धोका, राहुल गांधींचा दावा, महात्मा गांधींचा उल्लेख करत म्हणाले... 
5
Kabutar Khana: 'तुम्ही असा आदेश कसा काढू शकता?', उच्च न्यायालयाने मुंबई महापालिकेला झापले; काय घडलं?
6
दोन नाही, युट्यूबर अरमान मलिकच्या चार पत्नी; कोर्टाने पाठवले समन्स; धक्कादायक कारण आले समोर
7
भारताचं नागरिकत्व घेण्यापूर्वीच मतदार यादीत नोंदवलं गेलं होतं सोनिया गांधींचं नाव, भाजपाचा गंभीर आरोप
8
'झपाटलेला'मधील लक्ष्याची आवडी आठवतेय का?, सध्या या मालिकेत करतेय काम
9
"संतोष देशमुखांच्या कार्याने गावाला दिल्लीचा मान"; मस्साजोगच्या सरपंचांना PM मोदींकडून निमंत्रण
10
"Muscles असलेल्या बिपाशाशीच लग्न कर", म्हणणाऱ्या मृणाल ठाकूरला अभिनेत्रीचं चोख उत्तर, म्हणाली- "एक स्त्री..."
11
कबुतरखाना बंदी वाद राज ठाकरेंनी मध्यस्थी करून संपवावा; जैन मुनींनी घातली साद, म्हणाले...
12
SBI च्या ग्राहकांना मोठा झटका! १५ ऑगस्टपासून 'या' सेवेसाठी लागणार शुल्क, वाचा नवे नियम
13
Maharashtra Politics : एकनाथ शिंदे अन् आदित्य ठाकरे एकाच मंचावर येणार,नेमकं कारण काय?
14
पुढच्या ५ वर्षात २० हजार जणांना नोकरी देण्याचं लक्ष्य; PWC कंपनीने जाहीर केले 'व्हिजन २०३०'
15
ऑपरेशन सिंदूरवेळी सीमेवरील गावातील ग्रामस्थांनी केलं असं काम, आता सरपंचांचा स्वातंत्र्य दिनी होणार सन्मान
16
एकही सामना न खेळता Rohit Sharma ला अचानक 'प्रमोशन'; पाकिस्तानच्या माजी कर्णधाराने केली मदत
17
500 KM रेंज देणारी Maruti e-Vitara किती तारखेला लॉन्च होणार? खास असतील फीचर्स, जाणूनघ्या किंमत!
18
“...तरच दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येऊ शकतात”; पुतण्याची काकांना थेट ऑफर; पण ठेवली मोठी अट
19
अमेरिका पाहत राहणार...! ऑटोमोबाईलचा किंग भारताला लढाऊ विमानांचे इंजिन देणार, मोठ्या डीलच्या दिशेने
20
ट्रम्प यांचे टॅरिफ वॉर, त्यात पाकिस्तान...; ऑपरेशन सिंदूर: भारताचे ४०० सैनिक अमेरिकेला जाणार

नायगाव पूर्व-पश्चिम पुलाचे काम संथ; मे २०२१ अखेर वाहतुकीस खुला?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 11, 2020 23:24 IST

मागील वर्षी ९ डिसेंबर २०१९ रोजी पुलाच्या रखडलेल्या कामाला पुन्हा सुरूवात झाली, मात्र हाती घेतलेले काम पुन्हा काही कारणास्तव बंद करण्यात आले.

नायगाव परिसरातील पूर्व-पश्चिमला जोडणाऱ्या उड्डाणपुलाचे काम मागील ४ वर्षांपासून सुरू आहे. एमएमआरडीए प्रशासनाकडून हाती घेण्यात आलेल्या या उड्डाणपुलाचे कंत्राट सिम्प्लेक्स नामक कंपनीला देण्यात आले आहे. मात्र या पुलाच्या कामाला रेल्वे प्रशासनाकडून परवानगी मिळत नसल्याने पुलाचे काम मागील वर्षभरापासून रखडले होते. परिणामी स्थानिक नागरिकांमध्ये तीव्र नाराजी पसरली होती.मागील वर्षी ९ डिसेंबर २०१९ रोजी पुलाच्या रखडलेल्या कामाला पुन्हा सुरूवात झाली, मात्र हाती घेतलेले काम पुन्हा काही कारणास्तव बंद करण्यात आले. या बंद पडलेल्या कामाला महिनाभरापासून पुन्हा सुरुवात झाली आहे. रेल्वेचे रूळ कोसळू नयेत म्हणून मायक्रो पायलिंगचे काम सध्या सुरू आहे. मात्र बरेच मजूर कोरोना आपत्तीमुळे गावी गेलेले असल्याने या कामासाठी आता मजूर उपलब्ध नाही. परिणामी हे काम संथगतीने सुरू आहे.सुनील घरत।

पारोळ : नायगाव पूर्व-पश्चिम जोडणाºया उड्डाणपुलाचे काम मागील चार वर्षांपासून शासनाच्या उदासीन कारभारामुळे अपूर्ण राहिले आहे. आधीच नायगाव पूर्व परिसराची लोकसंख्या झपाट्याने वाढत आहे. अशा काळात येथील लोकाभिमुख प्रश्नांना धसास लावण्यासाठी शासनाकडून ठोस प्रयत्न होण्याऐवजी आहेत तेच प्रकल्प संथगतीने सुरू असल्याने नागरिकांमध्ये नाराजीचे वातावरण आहे. हा पूल पुढील वर्षी मे २०२१ अखेरीस सुरू होण्याची शक्यता असून हा पूल वाहतुकीसाठी खुला झाल्यास वसई ते मुंबई हे अंतर २५ किलोमीटरने कमी होऊन वाहतूकदारांना व नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे.सध्या नायगाव पूर्वेकडील नागरिकीकरण झपाट्याने वाढत आहे. पूर्वेतून पश्चिमेकडे आणि पश्चिमेतून पूर्वेकडे येताना नागरिकांना वसईला वळसा घालूनच पुढे जावे लागते. त्यामुळे नायगाव परिसरातील पूर्व-पश्चिम जोडणारा हा पूल वाहतुकीसाठी खुला झाल्यास वेळेची आणि इंधनाची बचत होणार आहे.या उड्डाणपुलाचे काम सतत या ना त्या कारणास्तव संथगतीने सुरू असल्यामुळे नायगाव परिसरातील नागरिकांमध्ये याबाबत नाराजी पसरली आहे. पुढील वर्षी मे २०२१ अखेर हा पुल वाहतुकीसाठी खुला होणार असल्याचे संकेत मिळत आहेत. हा पूल वाहतुकीसाठी खुला झाल्यास नागरिक, वाहतूकदारांना मोठा दिलासा मिळणार आहे. तसेच वेळेचीही बचत होणार आहे.