शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेश पेटला! २८ पत्रकारांना जिवंत जाळण्याचा प्रयत्न, एका हिंदूला झाडाला उलटे टांगून जाळले...
2
महापालिका निवडणुकीत एकनाथ शिंदेंना मोठा धक्का; शिंदेसेनेच्या पदाधिकाऱ्यांचा सामुहिक राजीनामा
3
दिल्लीचे प्रदूषण रोखण्यासाठी चीनचा 'धक्कादायक' सल्ला! ३००० मोठे उद्योग बंद करण्याची सूचना; बीजिंगच्या धर्तीवर प्लॅन तयार?
4
"...म्हणून आम्ही सांगत होतो करा सदैव हिंदुत्वाची कदर"; पवारांचा उल्लेख, आशिष शेलारांनी उद्धव ठाकरेंवर डागली तोफ
5
Investment Plan : केवळ एका वर्षासाठी गुंतवणूक करायचीये? 'हे' ५ पर्याय देऊ शकतात तुम्हाला जबरदस्त रिटर्न, जाणून घ्या
6
गृहकर्जावर होईल १८ लाख रुपयांपर्यंतची बचत! EMI कमी करण्यापेक्षा वापरावा लागेल 'हा' पर्याय
7
कोल्हापूर हादरलं! मुलानेच केली आई-वडिलांची हत्या; धक्कादायक कारण आले समोर
8
ICICI Prudential AMC IPO Listing: आयसीआयसीआय प्रूडेंशियल एएमसीच्या आयपीओनं केलं मालामाल; प्रत्येक शेअरवर मिळाला 'इतका' नफा
9
बांगलादेशात ISI सक्रीय, कंटरपंथींकडून जाळपोळ, हिंसाचार सुरू; भारताविरोधात पाकिस्तानचं षडयंत्र?
10
नोकरी बदलणाऱ्यांना EPFO चा मोठा दिलासा! 'ब्रेक'बाबतचे नियम बदलले; आता शनिवार-रविवारची सुट्टी अडथळा ठरणार नाही
11
Dolphin in Mumbai: मुंबईकरांना सुखद धक्का! वरळी सी फेसच्या समुद्रकिनाऱ्यावर डॉल्फिनची मस्ती, व्हिडीओ व्हायरल
12
मुंबईत ठाकरे बंधू युतीत शरद पवारांची राष्ट्रवादी सहभागी होणार?; २२ जागांचा देणार प्रस्ताव
13
VIDEO: दादरमध्ये अजब प्रकार, एक तरुण या इमारतीवरुन त्या इमारतीवर मारतोय उड्या; पोलिसांची दमछाक
14
Stock Market Today: शेअर बाजाराची जबरदस्त सुरुवात; Sensex ची ३३० अंकांनी उसळी; IT Stocks सुस्साट
15
अमेरिकेतील नॉर्थ कॅरोलिनामध्ये जेट विमानाचा अपघात; संपूर्ण कुटुंबच उद्ध्वस्त
16
'...तर त्यांचा एक हात तोडून दुसऱ्या हातात दिला असता'; इम्तियाज जलील मंत्री संजय निषाद यांच्यावर संतापले
17
'या' कंपनीच्या गुंतवणूकदारांना ₹५५,५५० कोटींपेक्षा अधिकचा फटका; १६ महिन्यांत स्टॉक ८० टक्क्यांनी आपटला
18
मुंबई विमानतळाची गोपनीय माहिती चोरट्यांच्या हाती; ऐरोलीतील घटना : अदानी ग्रुपच्या मॅनेजरचा लॅपटॉप चोरीला
19
मी सर्वांसमोर तिला चुकीच्या पद्धतीने का किस करेल? ट्रोल झाल्यावर राकेश बेदींनी दिलं स्पष्टीकरण
20
Vijay Mallya : देशातून फरार, पण लंडनमध्ये मात्र जोरदार सेलिब्रेशन; ललित मोदीच्या घरी झाली विजय माल्ल्याची जंगी बर्थ डे पार्टी
Daily Top 2Weekly Top 5

नायगाव पूर्व-पश्चिम पुलाचे काम संथ; मे २०२१ अखेर वाहतुकीस खुला?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 11, 2020 23:24 IST

मागील वर्षी ९ डिसेंबर २०१९ रोजी पुलाच्या रखडलेल्या कामाला पुन्हा सुरूवात झाली, मात्र हाती घेतलेले काम पुन्हा काही कारणास्तव बंद करण्यात आले.

नायगाव परिसरातील पूर्व-पश्चिमला जोडणाऱ्या उड्डाणपुलाचे काम मागील ४ वर्षांपासून सुरू आहे. एमएमआरडीए प्रशासनाकडून हाती घेण्यात आलेल्या या उड्डाणपुलाचे कंत्राट सिम्प्लेक्स नामक कंपनीला देण्यात आले आहे. मात्र या पुलाच्या कामाला रेल्वे प्रशासनाकडून परवानगी मिळत नसल्याने पुलाचे काम मागील वर्षभरापासून रखडले होते. परिणामी स्थानिक नागरिकांमध्ये तीव्र नाराजी पसरली होती.मागील वर्षी ९ डिसेंबर २०१९ रोजी पुलाच्या रखडलेल्या कामाला पुन्हा सुरूवात झाली, मात्र हाती घेतलेले काम पुन्हा काही कारणास्तव बंद करण्यात आले. या बंद पडलेल्या कामाला महिनाभरापासून पुन्हा सुरुवात झाली आहे. रेल्वेचे रूळ कोसळू नयेत म्हणून मायक्रो पायलिंगचे काम सध्या सुरू आहे. मात्र बरेच मजूर कोरोना आपत्तीमुळे गावी गेलेले असल्याने या कामासाठी आता मजूर उपलब्ध नाही. परिणामी हे काम संथगतीने सुरू आहे.सुनील घरत।

पारोळ : नायगाव पूर्व-पश्चिम जोडणाºया उड्डाणपुलाचे काम मागील चार वर्षांपासून शासनाच्या उदासीन कारभारामुळे अपूर्ण राहिले आहे. आधीच नायगाव पूर्व परिसराची लोकसंख्या झपाट्याने वाढत आहे. अशा काळात येथील लोकाभिमुख प्रश्नांना धसास लावण्यासाठी शासनाकडून ठोस प्रयत्न होण्याऐवजी आहेत तेच प्रकल्प संथगतीने सुरू असल्याने नागरिकांमध्ये नाराजीचे वातावरण आहे. हा पूल पुढील वर्षी मे २०२१ अखेरीस सुरू होण्याची शक्यता असून हा पूल वाहतुकीसाठी खुला झाल्यास वसई ते मुंबई हे अंतर २५ किलोमीटरने कमी होऊन वाहतूकदारांना व नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे.सध्या नायगाव पूर्वेकडील नागरिकीकरण झपाट्याने वाढत आहे. पूर्वेतून पश्चिमेकडे आणि पश्चिमेतून पूर्वेकडे येताना नागरिकांना वसईला वळसा घालूनच पुढे जावे लागते. त्यामुळे नायगाव परिसरातील पूर्व-पश्चिम जोडणारा हा पूल वाहतुकीसाठी खुला झाल्यास वेळेची आणि इंधनाची बचत होणार आहे.या उड्डाणपुलाचे काम सतत या ना त्या कारणास्तव संथगतीने सुरू असल्यामुळे नायगाव परिसरातील नागरिकांमध्ये याबाबत नाराजी पसरली आहे. पुढील वर्षी मे २०२१ अखेर हा पुल वाहतुकीसाठी खुला होणार असल्याचे संकेत मिळत आहेत. हा पूल वाहतुकीसाठी खुला झाल्यास नागरिक, वाहतूकदारांना मोठा दिलासा मिळणार आहे. तसेच वेळेचीही बचत होणार आहे.