शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

कल्याण-बदलापूर राज्य महामार्गाचे काम संथगतीने; सरकारी कार्यालयांच्या अतिक्रमणाचा अडथळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2020 00:50 IST

याच रस्त्यावरील दुभाजकाचे कामही करण्यात आलेले नाही. सर्वात मोठा अडथळा हा अतिक्रमणांचा असून सरकारी कार्यालयांचे अतिक्रमणही अद्याप काढण्यात आलेले नाही.

अंबरनाथ : अंबरनाथमधून जाणाऱ्या कल्याण-बदलापूर राज्य महामार्गाचे काम लॉकडाऊन शिथिल झाल्यानंतर सुरू करण्यात आले. मात्र, गेल्या महिनाभरापासून हे कामही संथगतीने सुरू असल्याने रस्त्याचे काम कधी पूर्ण होणार, असा प्रश्न उपस्थित होत आहे. त्यातच या रस्त्याच्या आड येणाºया सरकारी कार्यालयांचे अतिक्रमणही अद्याप न तोडल्याने या कामाला आणखी विलंब होत आहे.

कल्याण-बदलापूर राज्य महामार्गाचे रुंदीकरण आणि काँक्रिटीकरण सुरू असतानाच कोरोनामुळे लॉकडाऊन झाले. त्यामुळे हे काम बंद पडले होते. अर्धवट अवस्थेत असलेल्या या कामाला दोन महिन्यांपूर्वी सुरुवात करण्यात आली. महिनाभर काम झाल्यावर पुन्हा काही ठिकाणी काम थांबविण्यात आले. अनेक ठिकाणी रस्ता अर्धवट सोडण्यात आला, तर काही ठिकाणी नाल्यावरील पुलाचे काम तसेच सोडून दिले आहे. हीच परिस्थिती महात्मा गांधी विद्यालयाजवळ नवीन भेंडीपाडा परिसर, मोरिवलीनाका परिसर आणि फॉरेस्टनाका याठिकाणी आहे. काम अर्धवट राहिल्याने येथे अपघातांची भीती व्यक्त केली जात आहे. अनेक ठिकाणी नाल्याचे कामही अर्धवट सोडून देण्यात आले आहे. 

याच रस्त्यावरील दुभाजकाचे कामही करण्यात आलेले नाही. सर्वात मोठा अडथळा हा अतिक्रमणांचा असून सरकारी कार्यालयांचे अतिक्रमणही अद्याप काढण्यात आलेले नाही. तहसील, महावितरण कार्यालय, अंबरनाथ नगरपालिका, पोलीस ठाण्याची संरक्षक भिंत हे काढण्यात आलेले नाही. खाजगी कंपन्यांच्या संरक्षक भिंतीही तशाच असल्याने रस्त्याचे रुंदीकरण रखडले आहे. या कामाला गती मिळत नसल्याने हा रस्ता अपघातांना आमंत्रण देणारा ठरत आहे.रस्त्याचे काम अनेक ठिकाणी अर्धवट सोडून देण्यात आले आहे. जुन्या रस्त्यावरही अनेक ठिकाणी पेव्हरब्लॉक खचले आहेत. या सर्व रस्त्यांची दुरुस्ती आणि उर्वरित कामाला वेग देण्याची गरज आहे. - प्रदीप पाटील, विरोधी पक्षनेते

टॅग्स :Potholeखड्डे