शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
2
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
3
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
4
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
5
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
6
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
7
कमाल झाली..! कुणाच्या स्वप्नातही नाही आली; ती गोष्ट टीम इंडियातील या तिघांनी सत्यात उतरवली
8
मालेगाव २००८; बॉम्बस्फोटातील तपासात एटीएस आणि एनआयएचा विरोधाभास 
9
सात महिन्यांत अक्षय कुमारने ११० कोटींची मालमत्ता विकली, कुठे किती रुपयांना केली विक्री? जाणून घ्या
10
महिलांसाठी मोठी संधी! LIC ची नवी योजना, फक्त ‘हे’ काम करा आणि दरमहा ७,००० रुपये कमवा!
11
भारतीय शेतकरी चुकून गेला पाकिस्तानात; न्यायालयाने सुनावली तुरुंगवासाची शिक्षा, वडील म्हणतात....
12
सरकारचा पैसा आहे, आपल्या बापाचं काय जातंय? संजय शिरसाटांचे विधान; सुप्रिया सुळे म्हणाल्या, "इशारा देऊन पण..."
13
कुलगाममध्ये तिसऱ्या दिवशीही चकमक सुरू; आतापर्यंत तीन दहशतवादी ठार, या वर्षातील सर्वात मोठी कारवाई
14
पनवेलमध्ये राडा झाला...! राज ठाकरेंच्या इशाऱ्यानंतर पनवेलमधील लेडीज बारवर मनसेचा हल्ला 
15
भारतीय निवडणूक प्रणाली मृत, निवडणुकीत घोटाळे! विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
16
मुद्द्याची गोष्ट : टॅरिफच्या खेळीने चेकमेट कोण? कुणाला बसणार फटका?
17
आजचे राशीभविष्य ३ ऑगस्ट २०२५ : सांसारिक गोष्टी बाजूला ठेवाल, गूढ रहस्यमय विद्येत रमाल
18
‘भीमराया…’ गीताची जन्मकथा सांगताना सरन्यायाधीश गवईंचा गळा दाटला! सुरेश भटांनी कसे लिहिले भीमरायाचे वंदना गीत? ऐकवली संपूर्ण कहाणी
19
प्रज्वल रेवण्णाला बलात्कारप्रकरणी जन्मठेप, १० लाख रुपयांचा दंडही; पीडित महिलेला ७ लाख रु. भरपाई देण्याचा आदेश
20
"हमे अयोध्या का मंदिर आरडीएक्स से उडाना है, पचास बंदे चाहिए..."; शिरूरच्या तरुणाला कराचीतून मेसेज, १ लाखाची ऑफर! गुन्हा दाखल

कल्याण-बदलापूर राज्य महामार्गाचे काम संथगतीने; सरकारी कार्यालयांच्या अतिक्रमणाचा अडथळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2020 00:50 IST

याच रस्त्यावरील दुभाजकाचे कामही करण्यात आलेले नाही. सर्वात मोठा अडथळा हा अतिक्रमणांचा असून सरकारी कार्यालयांचे अतिक्रमणही अद्याप काढण्यात आलेले नाही.

अंबरनाथ : अंबरनाथमधून जाणाऱ्या कल्याण-बदलापूर राज्य महामार्गाचे काम लॉकडाऊन शिथिल झाल्यानंतर सुरू करण्यात आले. मात्र, गेल्या महिनाभरापासून हे कामही संथगतीने सुरू असल्याने रस्त्याचे काम कधी पूर्ण होणार, असा प्रश्न उपस्थित होत आहे. त्यातच या रस्त्याच्या आड येणाºया सरकारी कार्यालयांचे अतिक्रमणही अद्याप न तोडल्याने या कामाला आणखी विलंब होत आहे.

कल्याण-बदलापूर राज्य महामार्गाचे रुंदीकरण आणि काँक्रिटीकरण सुरू असतानाच कोरोनामुळे लॉकडाऊन झाले. त्यामुळे हे काम बंद पडले होते. अर्धवट अवस्थेत असलेल्या या कामाला दोन महिन्यांपूर्वी सुरुवात करण्यात आली. महिनाभर काम झाल्यावर पुन्हा काही ठिकाणी काम थांबविण्यात आले. अनेक ठिकाणी रस्ता अर्धवट सोडण्यात आला, तर काही ठिकाणी नाल्यावरील पुलाचे काम तसेच सोडून दिले आहे. हीच परिस्थिती महात्मा गांधी विद्यालयाजवळ नवीन भेंडीपाडा परिसर, मोरिवलीनाका परिसर आणि फॉरेस्टनाका याठिकाणी आहे. काम अर्धवट राहिल्याने येथे अपघातांची भीती व्यक्त केली जात आहे. अनेक ठिकाणी नाल्याचे कामही अर्धवट सोडून देण्यात आले आहे. 

याच रस्त्यावरील दुभाजकाचे कामही करण्यात आलेले नाही. सर्वात मोठा अडथळा हा अतिक्रमणांचा असून सरकारी कार्यालयांचे अतिक्रमणही अद्याप काढण्यात आलेले नाही. तहसील, महावितरण कार्यालय, अंबरनाथ नगरपालिका, पोलीस ठाण्याची संरक्षक भिंत हे काढण्यात आलेले नाही. खाजगी कंपन्यांच्या संरक्षक भिंतीही तशाच असल्याने रस्त्याचे रुंदीकरण रखडले आहे. या कामाला गती मिळत नसल्याने हा रस्ता अपघातांना आमंत्रण देणारा ठरत आहे.रस्त्याचे काम अनेक ठिकाणी अर्धवट सोडून देण्यात आले आहे. जुन्या रस्त्यावरही अनेक ठिकाणी पेव्हरब्लॉक खचले आहेत. या सर्व रस्त्यांची दुरुस्ती आणि उर्वरित कामाला वेग देण्याची गरज आहे. - प्रदीप पाटील, विरोधी पक्षनेते

टॅग्स :Potholeखड्डे