शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

कल्याण-बदलापूर राज्य महामार्गाचे काम संथगतीने; सरकारी कार्यालयांच्या अतिक्रमणाचा अडथळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2020 00:50 IST

याच रस्त्यावरील दुभाजकाचे कामही करण्यात आलेले नाही. सर्वात मोठा अडथळा हा अतिक्रमणांचा असून सरकारी कार्यालयांचे अतिक्रमणही अद्याप काढण्यात आलेले नाही.

अंबरनाथ : अंबरनाथमधून जाणाऱ्या कल्याण-बदलापूर राज्य महामार्गाचे काम लॉकडाऊन शिथिल झाल्यानंतर सुरू करण्यात आले. मात्र, गेल्या महिनाभरापासून हे कामही संथगतीने सुरू असल्याने रस्त्याचे काम कधी पूर्ण होणार, असा प्रश्न उपस्थित होत आहे. त्यातच या रस्त्याच्या आड येणाºया सरकारी कार्यालयांचे अतिक्रमणही अद्याप न तोडल्याने या कामाला आणखी विलंब होत आहे.

कल्याण-बदलापूर राज्य महामार्गाचे रुंदीकरण आणि काँक्रिटीकरण सुरू असतानाच कोरोनामुळे लॉकडाऊन झाले. त्यामुळे हे काम बंद पडले होते. अर्धवट अवस्थेत असलेल्या या कामाला दोन महिन्यांपूर्वी सुरुवात करण्यात आली. महिनाभर काम झाल्यावर पुन्हा काही ठिकाणी काम थांबविण्यात आले. अनेक ठिकाणी रस्ता अर्धवट सोडण्यात आला, तर काही ठिकाणी नाल्यावरील पुलाचे काम तसेच सोडून दिले आहे. हीच परिस्थिती महात्मा गांधी विद्यालयाजवळ नवीन भेंडीपाडा परिसर, मोरिवलीनाका परिसर आणि फॉरेस्टनाका याठिकाणी आहे. काम अर्धवट राहिल्याने येथे अपघातांची भीती व्यक्त केली जात आहे. अनेक ठिकाणी नाल्याचे कामही अर्धवट सोडून देण्यात आले आहे. 

याच रस्त्यावरील दुभाजकाचे कामही करण्यात आलेले नाही. सर्वात मोठा अडथळा हा अतिक्रमणांचा असून सरकारी कार्यालयांचे अतिक्रमणही अद्याप काढण्यात आलेले नाही. तहसील, महावितरण कार्यालय, अंबरनाथ नगरपालिका, पोलीस ठाण्याची संरक्षक भिंत हे काढण्यात आलेले नाही. खाजगी कंपन्यांच्या संरक्षक भिंतीही तशाच असल्याने रस्त्याचे रुंदीकरण रखडले आहे. या कामाला गती मिळत नसल्याने हा रस्ता अपघातांना आमंत्रण देणारा ठरत आहे.रस्त्याचे काम अनेक ठिकाणी अर्धवट सोडून देण्यात आले आहे. जुन्या रस्त्यावरही अनेक ठिकाणी पेव्हरब्लॉक खचले आहेत. या सर्व रस्त्यांची दुरुस्ती आणि उर्वरित कामाला वेग देण्याची गरज आहे. - प्रदीप पाटील, विरोधी पक्षनेते

टॅग्स :Potholeखड्डे