शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
6
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
7
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
8
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
9
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
10
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
11
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
12
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
13
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
14
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
15
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
16
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
17
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
18
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
19
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
20
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  

संचारबंदीमुळे कामाचे तास आणि ताणही वाढला: महिला पोलिसांचीही होतेय कुचंबना

By जितेंद्र कालेकर | Updated: March 26, 2020 23:01 IST

राज्यातील संचारबंदीमुळे ठाणे शहर पोलिसांवरही कमालीचा ताण वाढला आहे. सकाळी ६ ते रात्री १० अशी तब्बल १५ ते १६ तासांची डयूटी झाल्यामुळे त्यांचेही मोठया प्रमाणात हाल होत आहेत. त्यातही महिला पोलिसांना तर अनेक समस्यांना सामोरे जाण्याची वेळ आली आहे.

ठळक मुद्दे सकाळी ६ ते रात्री १० अशी तब्बल १५ ते १६ तासांची डयूटी अनेक ठिकाणी नागरिकांबरोबर होतायेत वादाचे प्रसंग

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे: गेल्या चार दिवसांपासून सुरु असलेल्या राज्यातील संचारबंदीमुळे ठाणे शहर पोलिसांवरही कमालीचा ताण वाढला आहे. सकाळी ६ ते रात्री १० अशी तब्बल १५ ते १६ तासांची डयूटी झाल्यामुळे त्यांचेही मोठया प्रमाणात हाल होत आहेत. त्यातही महिला पोलिसांना तर अनेक समस्यांना सामोरे जाण्याची वेळ आल्याची माहिती अनेक कर्मचाऱ्यांनी ‘लोकमत’जवळ व्यक्त केली.कोरोना चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशभरातच २४ मार्च रोजी रात्रीच्या मध्यरात्रीपासून संचारबंदी लागू केली आहे. महाराष्टÑात ती आधीपासूनच म्हणजे २३ मार्चपासून लागू केलेली आहे. या काळात नागरिकांनी बाहेर पडू नये, असे वारंवार पोलिसांकडून आवाहन करण्यात येत आहे. त्यासाठी ठाणे शहरातील अनेक नाक्यांवर आणि मुख्य रस्त्यांवर पोलीस तैनात केले आहेत. या सर्व ठिकाणी नागरिकांनी तोंडाला मास्क लावले की नाही? तसेच ते कोणत्या कामासाठी बाहेर पडले? त्याची कारणे पोलिसांकडून जाणून घेतली जात आहेत. जिथे अनावश्यक फिरणारी मंडळी दिसतील त्यांना सहज सोप्या भाषेत ‘समज’ही दिली जात आहेत. गर्दी करणाऱ्यांविरुद्ध कलम १०२ नुसार कारवाई केली जात आहे. तर काही ठिकाणी सौम्य लाठीमारही पोलिसांना करावा लागत आहे. हे सर्व करतांना प्रत्येक पोलीस ठाण्याचा संपूर्ण म्हणजे साधारण १०० ते १५० जणांचा कर्मचारी आणि अधिकारी वर्ग हा चौका चौकात तैनात आहे. अनेकांना सकाळी ७ ते रात्री १० वाजताची डयूटी आहे. एरव्ही, हीच डयूटी सकाळी ९ ते रात्री ९ आणि रात्री ९ ते सकाळी ९ अशी असते. अनेकदा सकाळी ९ पर्यंतची डयूटी पुढे लांबण्याची शक्यता असते. त्यामुळे सलग १५ ते १६ तास कामावर राहून प्रचंड ताण वाढत असल्याचे कासारवडवली पोलीस ठाण्याच्या एका पोलिसाने सांगितले. तर वागळे परिमंडळातील एका ५७ वर्षीय हवालदाराला पालघर येथून रस्त्यावर मिळेल त्या वाहनाने रोज ठाणे गाठावे लागते. त्यात रेल्वे आणि एसटी सेवाहीबंद असल्यामुळे ठाण्यात येईपर्यंत चांगलीच दमछाक होत असल्याचे त्यांनी सांगितले. अशीच परिस्थिती स्वत:चे वाहन नसलेल्या पोलिसांचीही झाली आहे. त्यांना अगदी ठाण्यातल्या ठाण्यात किंवा ठाण्यातून मुंबईत अथवा नवी मुंबई, बदलापूर, कल्याण, डोंबिवली आणि भिवंडी येथून ठाण्यात किंवा ठाण्यातून इतरत्र जाण्यासाठी मोठी समस्या उद्भवली आहे. काहींनी ठाण्यातील आपल्या मित्रांकडे काहींनी पोलीस ठाण्यातच तर काहींनी एखादे हॉटेल गाठले आहे. सध्या, प्रत्येक पोलीस ठाण्याचे तपासणी नाकेही वाढविले आहेत. हे तपासतांना अनेक नागरिकांशीही पोलिसांचे खटके उडत आहेत. हॉटेल आणि पोळी भाजी केंद्रही बंद असल्यामुळे वेळेवर जेवणही उपलब्ध होत नसल्याची खंत अनेकांनी व्यक्त केली.* संचारबंदीचा फटका महिला पोलीस कर्मचा-यांनाही बसला. डयूटीचे तास वाढल्यामुळे त्यांना नेहमीपेक्षा जास्त कालावधी कुटूंबापासून दूर रहावे लागत आहे. यात चांगलीच ओढाताण होत असल्याचे अनेक महिला कर्मचाºयांनी ‘लोकमत’ला सांगितले. अनेकींना तर पोलीस ठाण्यातच आसरा घ्यावा लागल्याचे सांगितले. अशीच परिस्थिती उपनिरीक्षक आणि त्यावरील अधिकाºयांची आहे. किंमान कामाचे तास नेहमी इतकेच ठेवावेत, इतकी माफक अपेक्षा पोलीस कर्मचा-यांनी व्यक्त केली आहे.

 

टॅग्स :thaneठाणेPoliceपोलिसcorona virusकोरोना वायरस बातम्या