शहरं
Join us  
Trending Stories
1
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
2
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
3
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
4
बेडरुम व्हिडीओ, २०२० चं 'ते' सीक्रेट अफेअर... प्रियंकाच्या क्राईम फाईलबाबत खळबळजनक खुलासा
5
होर्मुझमध्ये अमेरिकेचा 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
6
"...तेव्हा मी जगाचा निरोप घ्यावा!"; आशा भोसलेंची शेवटची इच्छा ऐकून चाहत्यांचे डोळे पाणावले
7
लहानशा देशात इराणनं लपवलाय 'खजिना'; इथूनच चालतो ड्रोन-मिसाइलचा खेळ, अमेरिकेलाही देतात चकवा
8
Raj Thackeray : "आशाताई'-दि लास्ट एम्परर, आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर वादळं पहिली, तरीही..."; राज ठाकरेंची भावुक पोस्ट
9
TCS ची मोठी घोषणा! यावर्षी २५ हजार फ्रेशर्सना देणार नोकरी; युवा टॅलेंटवर कंपनीचा फोकस
10
ना हृदय... ना मेंदू! तरीही समुद्राच्या अथांग गर्तेत राज्य करतो 'हा' जीव; नेमकं गुपित काय?
11
GT विरुद्धही भावाला प्लेइंग इलेव्हनमध्ये मिळाली नाही जागा; तरी LSG ला सपोर्ट करताना दिसली सारा तेंडुलकर
12
"मदरशांसाठी 600 कोटींचं बजेट पण विकासासाठी निधी नाही...!" प. बंगालच्या रॅलीतून पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल
13
बंद घराची कौले काढून चोरी; दहा तोळे सोने व १७ हजारांची रोकड लंपास!
14
Payal Nag : नियतीला झुकवणाऱ्या पायलची सुवर्णगाथा! अपघातात हात-पाय गमावले, तिरंदाजीतून जग जिंकले
15
LSG vs GT : पंतसमोर पहिला डाव जिंकला; गिलचा आनंद गगनात मावेना! 'तो' व्हिडिओ व्हायरल
16
युद्धविराम रद्द झाला तर जगावर मोठे संकट येणार; जागतिक बँकेचे प्रमुख अजय बंगा यांचा इशारा
17
सोशल मीडियाचा अतिवापर आणि अश्लील कंटेंटला बसणार लगाम! इन्स्टाग्रामने आणले नवीन 'टीन रूल्स'
18
“मंगेशकर कुटुंबातील ईश्वरीय आवाज लाभलेला तारा निखळला”; CM फडणवीसांकडून आशाताईंना श्रद्धांजली
19
US-इराणमधील चर्चा फिस्कटली, पुन्हा युद्धाचे ढग; भारत अलर्ट मोडवर, 'स्पेशल ऑपरेशन' लॉन्च
20
अमेरिका-इराण चर्चा निष्फळ! पाकिस्तानची पहिली प्रतिक्रिया आली समोर; परराष्ट्र मंत्री इशाक डार म्हणाले...
Daily Top 2Weekly Top 5

संचारबंदीमुळे कामाचे तास आणि ताणही वाढला: महिला पोलिसांचीही होतेय कुचंबना

By जितेंद्र कालेकर | Updated: March 26, 2020 23:01 IST

राज्यातील संचारबंदीमुळे ठाणे शहर पोलिसांवरही कमालीचा ताण वाढला आहे. सकाळी ६ ते रात्री १० अशी तब्बल १५ ते १६ तासांची डयूटी झाल्यामुळे त्यांचेही मोठया प्रमाणात हाल होत आहेत. त्यातही महिला पोलिसांना तर अनेक समस्यांना सामोरे जाण्याची वेळ आली आहे.

ठळक मुद्दे सकाळी ६ ते रात्री १० अशी तब्बल १५ ते १६ तासांची डयूटी अनेक ठिकाणी नागरिकांबरोबर होतायेत वादाचे प्रसंग

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे: गेल्या चार दिवसांपासून सुरु असलेल्या राज्यातील संचारबंदीमुळे ठाणे शहर पोलिसांवरही कमालीचा ताण वाढला आहे. सकाळी ६ ते रात्री १० अशी तब्बल १५ ते १६ तासांची डयूटी झाल्यामुळे त्यांचेही मोठया प्रमाणात हाल होत आहेत. त्यातही महिला पोलिसांना तर अनेक समस्यांना सामोरे जाण्याची वेळ आल्याची माहिती अनेक कर्मचाऱ्यांनी ‘लोकमत’जवळ व्यक्त केली.कोरोना चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशभरातच २४ मार्च रोजी रात्रीच्या मध्यरात्रीपासून संचारबंदी लागू केली आहे. महाराष्टÑात ती आधीपासूनच म्हणजे २३ मार्चपासून लागू केलेली आहे. या काळात नागरिकांनी बाहेर पडू नये, असे वारंवार पोलिसांकडून आवाहन करण्यात येत आहे. त्यासाठी ठाणे शहरातील अनेक नाक्यांवर आणि मुख्य रस्त्यांवर पोलीस तैनात केले आहेत. या सर्व ठिकाणी नागरिकांनी तोंडाला मास्क लावले की नाही? तसेच ते कोणत्या कामासाठी बाहेर पडले? त्याची कारणे पोलिसांकडून जाणून घेतली जात आहेत. जिथे अनावश्यक फिरणारी मंडळी दिसतील त्यांना सहज सोप्या भाषेत ‘समज’ही दिली जात आहेत. गर्दी करणाऱ्यांविरुद्ध कलम १०२ नुसार कारवाई केली जात आहे. तर काही ठिकाणी सौम्य लाठीमारही पोलिसांना करावा लागत आहे. हे सर्व करतांना प्रत्येक पोलीस ठाण्याचा संपूर्ण म्हणजे साधारण १०० ते १५० जणांचा कर्मचारी आणि अधिकारी वर्ग हा चौका चौकात तैनात आहे. अनेकांना सकाळी ७ ते रात्री १० वाजताची डयूटी आहे. एरव्ही, हीच डयूटी सकाळी ९ ते रात्री ९ आणि रात्री ९ ते सकाळी ९ अशी असते. अनेकदा सकाळी ९ पर्यंतची डयूटी पुढे लांबण्याची शक्यता असते. त्यामुळे सलग १५ ते १६ तास कामावर राहून प्रचंड ताण वाढत असल्याचे कासारवडवली पोलीस ठाण्याच्या एका पोलिसाने सांगितले. तर वागळे परिमंडळातील एका ५७ वर्षीय हवालदाराला पालघर येथून रस्त्यावर मिळेल त्या वाहनाने रोज ठाणे गाठावे लागते. त्यात रेल्वे आणि एसटी सेवाहीबंद असल्यामुळे ठाण्यात येईपर्यंत चांगलीच दमछाक होत असल्याचे त्यांनी सांगितले. अशीच परिस्थिती स्वत:चे वाहन नसलेल्या पोलिसांचीही झाली आहे. त्यांना अगदी ठाण्यातल्या ठाण्यात किंवा ठाण्यातून मुंबईत अथवा नवी मुंबई, बदलापूर, कल्याण, डोंबिवली आणि भिवंडी येथून ठाण्यात किंवा ठाण्यातून इतरत्र जाण्यासाठी मोठी समस्या उद्भवली आहे. काहींनी ठाण्यातील आपल्या मित्रांकडे काहींनी पोलीस ठाण्यातच तर काहींनी एखादे हॉटेल गाठले आहे. सध्या, प्रत्येक पोलीस ठाण्याचे तपासणी नाकेही वाढविले आहेत. हे तपासतांना अनेक नागरिकांशीही पोलिसांचे खटके उडत आहेत. हॉटेल आणि पोळी भाजी केंद्रही बंद असल्यामुळे वेळेवर जेवणही उपलब्ध होत नसल्याची खंत अनेकांनी व्यक्त केली.* संचारबंदीचा फटका महिला पोलीस कर्मचा-यांनाही बसला. डयूटीचे तास वाढल्यामुळे त्यांना नेहमीपेक्षा जास्त कालावधी कुटूंबापासून दूर रहावे लागत आहे. यात चांगलीच ओढाताण होत असल्याचे अनेक महिला कर्मचाºयांनी ‘लोकमत’ला सांगितले. अनेकींना तर पोलीस ठाण्यातच आसरा घ्यावा लागल्याचे सांगितले. अशीच परिस्थिती उपनिरीक्षक आणि त्यावरील अधिकाºयांची आहे. किंमान कामाचे तास नेहमी इतकेच ठेवावेत, इतकी माफक अपेक्षा पोलीस कर्मचा-यांनी व्यक्त केली आहे.

 

टॅग्स :thaneठाणेPoliceपोलिसcorona virusकोरोना वायरस बातम्या