शहरं
Join us  
Trending Stories
1
इतर देशांवर अवलंबित्व हाच आपला खरा शत्रू; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली स्वयंपूर्णतेची हाक
2
डोनाल्ड ट्रम्प यांच्या निर्णयानं आता अमेरिकेत नोकरी करणे महाग; भारतीयांना बसणार फटका
3
IND vs PAK यांच्यातील मॅच आधी PCB अध्यक्ष मोहसीन नक्वी यांच्यावर आली पळ काढण्याची वेळ! कारण...
4
युरोपातील विमानतळांवर सायबर हल्ला; उड्डाणे विस्कळीत, वेळापत्रकावर परिणाम
5
BCCI New President : ठरलं! पुन्हा एकदा माजी क्रिकेटर होणार बीसीसीआयचा 'कारभारी'; पण कोण?
6
IND vs PAK Live Streaming : टीम इंडिया पुन्हा पाकचा बुक्का पाडणार? मैदानातील माहोल कसा असणार?
7
ST मध्ये नोकरी करणार का? १७,४५० जागांची संधी; भविष्यात येणाऱ्या ८ हजार बसेससाठी हवे मनुष्यबळ
8
डिसेंबरपर्यंत मुंबईत स्वयंचलित दरवाजांच्या नॉन एसी लोकल धावणार; रेल्वेमंत्र्यांची माहिती
9
कुजबुज! भाजपने आणला नवा ‘ब्रँड’; CM देवेंद्र फडणवीसांनी कौतुक करत राज ठाकरेंना लगावला टोला
10
गरब्यांमध्ये फक्त हिंदूंनाच प्रवेश, प्रत्येकाच्या कपाळी टिळा लावा; विश्व हिंदू परिषदेची भूमिका
11
राज्यात पावसाचा कहर, धरणे भरली, नद्यांना पूर; ३५ धरणांमधून ३ लाख १८,८५९ क्युसेकचा विसर्ग
12
‘शेतकऱ्यांनो, हताश होऊ नका, भरपाई लवकरच’; कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांची ग्वाही
13
“सरकारमधील मंत्र्यांचा बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव”; विजय वडेट्टीवारांचा आरोप
14
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
15
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
16
Mohanlal: ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांचा दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरव, भारत सरकारची मोठी घोषणा
17
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
18
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
19
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ
20
उत्तराखंड : मुख्यमंत्री पुष्करसिंह धामींकडून चमोलीतील आपत्तीग्रस्त भागांची पाहणी, पीडितांना दिलं सर्वतोपरी मदतीचा विश्वास

रेल्वेच्या पाचव्या-सहाव्या मार्गिकांचे काम मार्च २०२१ पर्यंत होणार पूर्ण- श्रीकांत शिंदे

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 21, 2020 01:53 IST

गेल्या साडेतीन वर्षांत गती मिळाली असून हा प्रकल्प पूर्णत्वास गेल्यामुळे गर्दीचा ताण हलका होण्यास मदत होईल, अशी माहिती शिवसेना खा. श्रीकांत शिंदे यांनी दिली.

कल्याण : ठाण्याच्या पुढील प्रवाशांसाठी अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या ठाणे-दिवा रेल्वे स्थानकांदरम्यानच्या पाचव्या व सहाव्या रेल्वे मार्गिकांचे काम मार्च २०२१ पर्यंत पूर्ण करण्यात येणार आहे. अनंत अडचणीत सापडलेल्या या प्रकल्पास गेल्या साडेतीन वर्षांत गती मिळाली असून हा प्रकल्प पूर्णत्वास गेल्यामुळे गर्दीचा ताण हलका होण्यास मदत होईल, अशी माहिती शिवसेना खा. श्रीकांत शिंदे यांनी दिली.ठाण्यापुढील उपनगरीय रेल्वेसेवेतील महत्त्वाच्या प्रकल्पांच्या सद्य:स्थितीचा आढावा डीआरएम मुंबई कार्यालयात अलीकडेच घेतला. यावेळी रेल्वेचे व्यवस्थापक सलभ गोयल, संचालक संजीव मित्तल, आ. बालाजी किणीकर, ठाणे महापालिका उपायुक्त मनीष जोशी उपस्थित होते. दिवा-ठाणे यादरम्यान पाचव्या व सहाव्या रेल्वे मार्गिकांस २००८ मध्ये मंजुरी मिळाली. प्रकल्प अडचणीत आला होता. २०१४ साली शिंदे खासदार झाल्यावर त्यांनी या प्रकल्पास गती दिली. रेल्वेने मार्गिकांचे आरेखन बदलले व नवे आरेखन सीआरझेडमधून जात होते. त्यासाठी केंद्राची परवानगी घेतली. जिल्हाधिकाऱ्यांकडून आवश्यक जमीन तर ठाणे महापालिकेकडून आवश्यक परवानगी मिळवून दिली. त्यामुळे गेल्या साडेतीन वर्षांत प्रकल्पास गती मिळाली. कोरोनाचे संकट आल्याने प्रकल्पाची डिसेंबर २०२० ही डेडलाइन हुकणार असली, तरी आता मार्च २०२१ पर्यंत हा प्रकल्प पूर्ण करण्याचे लक्ष्य आहे. त्याचप्रमाणे कल्याण रेल्वेस्थानकाचे रिमॉडेलिंगचे काम मार्गी लावण्यात येणार असून लांब पल्ल्यांच्या गाड्या, मालगाड्या, उपनगरीय गाड्यांची संख्या वाढविणे शक्य होणार आहे. रिमॉडेलिंगचा प्रकल्प पूर्ण झाल्यावर कल्याण पत्रीपुलापासून थेट कल्याण रेल्वेस्थानकापर्यंत जाण्याचा मार्ग उपलब्ध होणार आहे.