शहरं
Join us  
Trending Stories
1
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
2
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
3
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
4
जातनिहाय जनगणनेला RSS ने दीड वर्षांअगोदरच केरळमधून दाखविला होता हिरवा झेंडा
5
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
6
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
7
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
8
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
9
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
10
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
11
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
12
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
13
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
14
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश
15
उन्हाचा कहर; सातारा ४०.७ अंशावर स्थिर! झळा असह्य, पूर्व भागात नागरिकांना घामाच्या धारा 
16
अवघ्या १२०० रुपयांत दिली पतीला अद्दल घडविण्याची सुपारी! पत्नीनेच रचला पतीला लुटण्याचा 'प्लॅन'
17
सामाजिक समता प्रस्थापित करण्याच्या दिशेने जातिनिहाय जनगणनेचा निर्णय महत्त्वाचा: अजित पवार
18
वेळ वाया घालवू नका, थेट कारवाई करा; पहलगाम हल्याबाबत राहुल गांधींची सरकारला मागणी
19
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
20
जातनिहाय जनगणना; अमित शाह म्हणाले ऐतिहासिक निर्णय, ओवेसी म्हणाले भाजपनं दलित मुस्लिमांसाठी...'

रेल्वेच्या पाचव्या-सहाव्या मार्गिकांचे काम मार्च २०२१ पर्यंत होणार पूर्ण- श्रीकांत शिंदे

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 21, 2020 01:53 IST

गेल्या साडेतीन वर्षांत गती मिळाली असून हा प्रकल्प पूर्णत्वास गेल्यामुळे गर्दीचा ताण हलका होण्यास मदत होईल, अशी माहिती शिवसेना खा. श्रीकांत शिंदे यांनी दिली.

कल्याण : ठाण्याच्या पुढील प्रवाशांसाठी अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या ठाणे-दिवा रेल्वे स्थानकांदरम्यानच्या पाचव्या व सहाव्या रेल्वे मार्गिकांचे काम मार्च २०२१ पर्यंत पूर्ण करण्यात येणार आहे. अनंत अडचणीत सापडलेल्या या प्रकल्पास गेल्या साडेतीन वर्षांत गती मिळाली असून हा प्रकल्प पूर्णत्वास गेल्यामुळे गर्दीचा ताण हलका होण्यास मदत होईल, अशी माहिती शिवसेना खा. श्रीकांत शिंदे यांनी दिली.ठाण्यापुढील उपनगरीय रेल्वेसेवेतील महत्त्वाच्या प्रकल्पांच्या सद्य:स्थितीचा आढावा डीआरएम मुंबई कार्यालयात अलीकडेच घेतला. यावेळी रेल्वेचे व्यवस्थापक सलभ गोयल, संचालक संजीव मित्तल, आ. बालाजी किणीकर, ठाणे महापालिका उपायुक्त मनीष जोशी उपस्थित होते. दिवा-ठाणे यादरम्यान पाचव्या व सहाव्या रेल्वे मार्गिकांस २००८ मध्ये मंजुरी मिळाली. प्रकल्प अडचणीत आला होता. २०१४ साली शिंदे खासदार झाल्यावर त्यांनी या प्रकल्पास गती दिली. रेल्वेने मार्गिकांचे आरेखन बदलले व नवे आरेखन सीआरझेडमधून जात होते. त्यासाठी केंद्राची परवानगी घेतली. जिल्हाधिकाऱ्यांकडून आवश्यक जमीन तर ठाणे महापालिकेकडून आवश्यक परवानगी मिळवून दिली. त्यामुळे गेल्या साडेतीन वर्षांत प्रकल्पास गती मिळाली. कोरोनाचे संकट आल्याने प्रकल्पाची डिसेंबर २०२० ही डेडलाइन हुकणार असली, तरी आता मार्च २०२१ पर्यंत हा प्रकल्प पूर्ण करण्याचे लक्ष्य आहे. त्याचप्रमाणे कल्याण रेल्वेस्थानकाचे रिमॉडेलिंगचे काम मार्गी लावण्यात येणार असून लांब पल्ल्यांच्या गाड्या, मालगाड्या, उपनगरीय गाड्यांची संख्या वाढविणे शक्य होणार आहे. रिमॉडेलिंगचा प्रकल्प पूर्ण झाल्यावर कल्याण पत्रीपुलापासून थेट कल्याण रेल्वेस्थानकापर्यंत जाण्याचा मार्ग उपलब्ध होणार आहे.