शहरं
Join us  
Trending Stories
1
रोहित वेमुला दलित नव्हता, आईनं तयार केलं होतं बनावट जात प्रामणपत्र! तेलंगणा पोलिसांकडून सर्व आरोपींना क्लीन चिट
2
IPL 2024 Mumbai Indians vs Kolkata Knight Riders: KKRला 'व्यंकेटश' प्रसन्न! अर्धशतकवीर अय्यर एकटा भिडला, पण Nuwan Thushara - Jasprit Bumrah ने मुंबईला तारलं
3
कोथळे खून खटल्यात आता कोणाची नियुक्ती? उज्वल निकम यांचा राजीनामा; राज्य शासनाच्या निर्णयाकडे लक्ष
4
“PM मोदींनी १० वर्षांत काय केले ते सांगावे, काम पूर्ण झाले की राम मंदिरात जाणार”: शरद पवार
5
Tilak Varma Catch Video, IPL 2024 MI vs KKR: धडामsss... कॅच घ्यायला धावले अन् दोघे एकमेकांवर धडकले, तरीही तिलक वर्माने घेतला 'सुपर कॅच' (Video)
6
४०० पार हा मोदींचा जुमला, भाजप २०० पारही जाणार नाही; प्रकाश आंबेडकरांचा दावा
7
Nuwan Thushara, IPL 2024 MI vs KKR: 'पॉवर-प्ले'मध्ये कोलकाताची 'बॅटरी डाऊन'! तुषाराने घेतल्या ३ विकेट्स, हार्दिकनेही फोडला घाम
8
'आईने मोठ्या विश्वासाने...', रायबरेलीतून उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर राहुल गांधींच्या भावना
9
“सांगलीत तिरंगी नाही थेट लढत, चंद्रहार पाटील...”; विशाल पाटील यांचा ठाकरे गटावर पलटवार
10
"बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाचे सरंक्षण करणार..." राहुल गांधींचा भाजपवर हल्लाबोल
11
IPL 2024 MI vs KKR: मुंबई इंडियन्सच्या प्लेईंग XI मधून Rohit Sharma गायब! Hardik Pandya ने टाकला नवा 'डाव'
12
“एकनाथ खडसेंची भूमिका संधीसाधूपणाची, आधी राजीनामा द्या अन् मग प्रचार करा”: गिरीश महाजन
13
कितीही उमेदवार द्या, श्रीकांत शिंदे यांचाच विजय पक्का; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना विश्वास
14
पातूरच्या घाटात भीषण अपघात; सहा जण ठार, चार गंभीर जखमी!
15
"मदतीच्या बदल्यात मदत"; फडणवीसांची भेट, BJPचा प्रचार अन् अभिजीत पाटलांच्या कारखान्याचं सील निघालं!
16
ऑस्ट्रेलियाचा टीम इंडियाला धक्का; कसोटी क्रमवारीत अव्वल! भारताची दुसऱ्या स्थानी घसरण
17
संजय चव्हाण, विजय करंजकरांचे बंड; शांतीगिरी महाराज नाशिकमधून अपक्ष लढणार
18
देशातील कर प्रणालीवर राजीव बजाज यांची टीका, सरकारकडे केली 'ही' मागणी...
19
पाकिस्तान भारताची कॉपी करायला गेला, चीनच्या मदतीनं लॉन्च केलं 'मून मिशन'; झाला 'खेला'!
20
'आम्ही तेथे राहुल गांधींविरोधात जिंकू शकणार नाही...'; भाजपाच्या मुख्यमंत्र्यांचा टोमणा

ठाण्यातील अत्रे कट्ट्यावर बालकलाकारांचे साहित्यजागरचे कौतुकास्पद सादरीकरण, उपस्थितांकडून मिळाली दाद 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 19, 2018 3:18 PM

आवाजसंस्कृती केंद्र ठाणे या संस्थेच्या मुलांनी रसिकांच्या कौतुकाच्या वर्षावात साहित्यजागरचा पहिला कार्यक्रम आचार्य अत्रे कट्ट्यावर सादर केला.

ठळक मुद्देअत्रे कट्ट्यावर बालकलाकारांचे साहित्यजागर९ ते १४ वयोगटातल्या मुलांनी केले सादरीकरणआवाज संस्क्रृती केंद्रातर्फे साहित्यजागर

ठाणे : शिक्षणाचं माध्यम कोणतंही असो, भाषेचे संस्कार योग्य वेळी आणि योग्य पद्धतीनं केल्यास नवी पीढी देखिल साहित्याची गोडी चाखून त्याचा लळा आजुबाजूच्यांनाही कसे लावू शकते याचं जणू प्रात्यक्षिकच या कार्यक्रमात ९ ते १४ वयोगटातल्या मुलांनी अत्रे कट्ट्यावर रसिकांसमोर सादर केले. आवाजसंस्कृती केंद्र या ठाण्यातल्या संस्थेत ही मूलं साहित्याच्या अशा वेगवेगळ्या प्रांताचा लहानपणापासून अभ्यासच करतायत असे गौरवोद्गार उपस्थितांनी यावेळी काढले.

आवाज संस्क्रृती केंद्रातर्फे साहित्यजागर या कार्यक्रमाअंतर्गत कथाकथनाची अनोखी पद्धत, बालनाट्य, पथनाट्य, बालकवितांचा निवेदनासह कार्यक्रम सादर केला जातोय. हल्लीची मुलं ही एकतर प्रचंड अभ्यासाच्याओझ्याखाली दबलेली असतात आणि वेळ मिळेल तेव्हा टीव्ही, मोबाईलच्या विळख्यात सापडलेली असतात. या पार्श्वभूमिवर लहानपणापासूनच साहित्याचा संग जोपासणयासाठी अशाप्रकारे उल्लेखनिय कार्यक्रमात सहभागी होणार्या या मुलाचं कौतुक करावं तेवढं थोडंच आहे असं मुलांचं कौतुक करताना स्मिता पोंक्षे म्हणाल्या. अत्रे कट्ट्यावर कार्यक्रम सादर करणार्या या मुलांचे संपुर्ण महाराष्टभर कार्यक्रम होतील आणि लहान मुलांच्या हाती साहित्याची पताका सोपवण्यासाठी असे कार्यक्रम झालेच पाहीजे अशा शुभेच्छा कट्ट्याच्या कार्यवाह शीला वागळे यांनी बोलताना दिल्या. कार्यक्रमादरम्यान लाईटस् जाऊनही मुलं थांबली नाहीत. त्यांनी मेबाईलच्या उजेडात कार्यक्रम पुढे सुरुच ठेवला यासाठी उपस्थितांनी मुलांचे कौतुक केले. पाऊस असतानाही कार्यक्रमाला रसिकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली होती. या मुलांप्रमाणेच इतर मुलांचेही हा साहित्यजागर ऐकण्यासाठी कान तयार करायचे असल्याचा मानस संस्थापिका माधवी राणे यांनी व्यक्त केला.या कार्यक्रमात साक्षी गवारी, वैदेही विरकर,राधा कुळकर्णी, अक्षता सुराडकर, वैष्णवी जुवेकर,पुर्वा कोल्हे, क्षितीज दुबळे,वीर म्हात्रे, कैवल्य राणे, आर्य सारंग ,सिद्धार्थ मोरे या मुलांनी उत्कृष्टरित्या संपुर्ण कार्यक्रम सादर केला.

                   आवाज संस्कृती केंद्रातर्फे ही मूलं राज्यबालनाट्य अनेक प्रकारच्या नाट्य, नृत्य स्पर्धा, वक्तृत्व व्यक्तिमत्व विकासासाठी लेखन , सादरीकरण, श्लोकपठण अशा सर्व कलांना एकाच ठिकाणी, एकत्र अंगिकारत असतात. त्यासाठी उपस्थित मान्यवरांनी मुलांना पुढच्या कार्यक्रमाच्या वाटचालीसाठी आशीर्वादपर शुभेच्छा दिल्या.

टॅग्स :thaneठाणेMumbaiमुंबईcultureसांस्कृतिक