शहरं
Join us  
Trending Stories
1
महादेवी हत्ती परत आणण्यासाठी राजू शेट्टींची आत्मक्लेष पदयात्रा; अनेकांनी घेतला सहभाग
2
भारताच्या हाती खजिना लागला खजिना...! कोळशाच्या खाणीत दडलेला; लोकसभेत मोठी घोषणा...
3
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
4
‘मोदी-योगी आणि इतरांची नावे घेण्यास भाग पाडले’; साध्वी प्रज्ञा ठाकूर यांचे एटीएसवर गंभीर आरोप
5
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
6
ट्रम्प यांचा 'हा' निर्णय भारताला नव्हे तर अमेरिकेलाच महागात पडणार? अहवालातून मोठा खुलासा!
7
भरधाव बोलेरो कालव्यात कोसळली; ११ जणांचा गाडीतच मृत्यू, बाहेर येण्यासाठी धडपडत राहिले
8
मैदानावर विराट, व्यवसायात विकास! विराट कोहलीच्या १०५० कोटींच्या साम्राज्याचा 'हा' आहे खरा हिरो!
9
'पाकिस्तानात नाही, तर बलुचिस्तानमध्ये तेल सापडले', बलोच नेत्याचे डोनाल्ड ट्रम्प यांना पत्र
10
भारती सिंगने सर्वांसमोर जाळली महागडी 'लाबूबू डॉल'! कारणही सांगितलं, म्हणाली- "माझा छोट्या मुलाला.."
11
पायी जाणाऱ्या दोघांना भरधाव कारने उडविले, दोघांचा जागीच मृत्यू; छत्रपती संभाजीनगरमधील घटना
12
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
13
खुशखबर! रक्षाबंधनपूर्वी RBI देणार मोठी भेट? कर्ज घेणाऱ्यांना दिलासा, तुमचा EMI होणार स्वस्त?
14
जिभेचे चोचले पडतील महागात! अल्ट्रा-प्रोसेस्ड फूडमुळे फुफ्फुसांच्या कॅन्सरचा धोका, रिसर्चमध्ये खुलासा
15
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
16
केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे नागपुरातील घर उडविण्याची धमकी, निनावी कॉलने सुरक्षायंत्रणांची धावपळ
17
सामाजिक न्याय विभागाचे ४१० कोटी लाडक्या बहिणींसाठी वळते : खोब्रागडे
18
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
19
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
20
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप

पाण्यासाठी महिलांचा घेराव; नांदिवलीत संताप

By admin | Updated: March 15, 2016 01:06 IST

डोंबिवलीजवळील नांदिवली टेकडी येथील महिलांनी पाण्यासाठी शिवसेनेचे स्थानिक नेते प्रकाश म्हात्रे यांना घेराव घालून जाब विचारला. त्यातील सर्वाधिक महिला शिवसेनेच्या कार्यकर्त्या होत्या.

कल्याण : डोंबिवलीजवळील नांदिवली टेकडी येथील महिलांनी पाण्यासाठी शिवसेनेचे स्थानिक नेते प्रकाश म्हात्रे यांना घेराव घालून जाब विचारला. त्यातील सर्वाधिक महिला शिवसेनेच्या कार्यकर्त्या होत्या. त्यामुळे कल्याण-डोंबिवली महापालिकेतील सत्ताधारी शिवसेनेला या आंदोलनामुळे एक प्रकारे घरचा आहेर मिळाला आहे. शहरी-ग्रामीण असा दुजाभाव केला जात असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला.अपुऱ्या पाणीसाठ्यामुळे जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर पाणीटंचाई भेडसावत आहे. महापालिका हद्दीतील शहरी व ग्रामीण भागांत पाणीकपात लागू झाली आहे. ग्रामीण भागात बुधवारी मध्यरात्री १२ ते शनिवार पहाटे ६ पर्यंत पाणीपुरवठा बंद ठेवला जात आहे. सलग अडीच दिवस पाणीकपात केली जात आहे. असे असतानाही शनिवारी रात्री ९ ते रविवारी पहाटे ६ पर्यंत असा पाणीपुरवठाही बंद ठेवला जात आहे, असा स्थानिकांचा आरोप आहे. दरम्यान, पाच दिवस पाणी न आल्याने संतप्त झालेल्या महिलांनी म्हात्रे यांच्या सागाव येथील कार्यालयात धडक देत त्यांना घेराव घातला. पाणीटंचाईबाबत जाब विचारताना सलग पाच दिवस पाणी नसल्याने घरात अन्न शिजले नाही. वडापाव, भजीपाव खाऊन आम्ही दिवस काढत आहोत, असे आंदोलनकर्त्या महिलांनी यावेळी म्हात्रे यांना सांगितले.म्हात्रे हे शिवसेनेचे माजी ठाणे जिल्हा परिषद सदस्य आहेत. त्यांची पत्नी प्रेमा म्हात्रे या पी अ‍ॅण्ड टीकॉलनी प्रभागाच्या नगरसेविका आहेत. म्हात्रे यांच्याकडून शहरी-ग्रामीण दुजाभाव केला जात आहे, असा आरोप झाल्याने त्यांच्याच सत्ताधारी शिवसेनेचा केडीएमसी प्रशासनावर वचक नसल्याचे स्पष्ट झाले आहे. यासंदर्भात म्हात्रे यांच्याशी संपर्क साधला असता आठवड्याच्या १६८ तासांपैकी ग्रामीण भागाला केवळ ५० ते ६० तास पाणीपुरवठा केला जात असल्याकडेत्यांनी लक्ष वेधले. शहरी भागाला झुकते माप दिले जात आहे. प्रशासनाची दुजाभावाची भूमिका योग्य नाही. पाण्याचे समान वाटप होणे आवश्यक आहे. नैसर्गिक जलस्रोताच्या उपाययोजना सुचवल्या होत्या, त्याकडे लक्ष देणे आवश्यक आहे, असे त्यांनी सांगितले. कल्याण पूर्वेतही मोर्चा कल्याण पूर्वेतही भीषण पाणीटंचाईच्या निषेधार्थ स्थानिक महिलांनी केडीएमसीच्या ‘ड’ प्रभाग कार्यालयावर मोर्चा काढून तेथील अधिकाऱ्यांना जाब विचारला.दूषित पाणीपुरवठाएकीकडे अभूतपूर्व पाणीटंचाई भेडसावत असताना दुसरीकडे अळ्या आणि किडेमिश्रित पाणीपुरवठा होत आहे. त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. पश्चिमेकडील अन्नपूर्णानगर आणि आधारवाडी परिसरात हा दूषित पुरवठा होतो. पूर्वेतील भागांमध्येही दूषित पाणी येत असल्याच्या नागरिकांच्या तक्रारी आहेत. यासंदर्भात महापालिकेचे पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता तरुण जुनेजा यांच्याशी संपर्क साधला असता संपर्क होऊ शकला नाही.