शहरं
Join us  
Trending Stories
1
HSC Exam Result 2025 : कोकण पुन्हा नंबर 'वन'! बारावीचा निकाल जाहीर; मुलींचीच बाजी, जाणून घ्या निकाल
2
पहलगाम नरसंहाराला देशाचे गृहमंत्री अमित शाह जबाबदार; संजय राऊतांचा हल्लाबोल
3
Crime News: पंखा दाखवा म्हणाले अन् दुकानदारावर गोळी झाडून निघून गेले; घटना सीसीटीव्हीमध्ये कैद
4
"मी पाकिस्तानात राहणाऱ्या मामे बहिणीशी लग्न केलं कारण..."; जवानाने उघड केलं मोठं रहस्य
5
"हिला पण गोळी मारायला हवी"; मुस्लिमांच्या विरोधात जाऊ नका म्हणणाऱ्या सैनिकाच्या पत्नीला केलं ट्रोल
6
भारत-पाकिस्तान तणावावर आज संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेची बैठक; बंद खोलीत चर्चेची मागणी
7
"पाकिस्तानवाल्यांनो मी तुमच्या सोबत, जय पाकिस्तान!" राखी सावंतचा व्हिडीओ पाहून संतापले नेटकरी
8
मोठी बातमी! पहलगाम नंतर पूंछ होते निशाण्यावर, दहशतवाद्यांचा मोठा कट फसला; ५ आयईडी जप्त
9
उदय कोटक यांचा रियल इस्टेट क्षेत्रात धमाका, केली देशातील सर्वात महागडी ४०० कोटींची प्रॉपर्टी डील
10
VIDEO: दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या तरुणाने पोलिसांपासून वाचण्यासाठी नदीत उडी मारली; इम्तियाजचा मृतदेह सापडल्याने खळबळ
11
लोकप्रिय 'पंचायत' सीरिजला सचिवजी देणार होते नकार? जितेंद्र कुमार म्हणाला, "मला वाटलं..."
12
"बॉलिवूड चोर आहे!" नवाजुद्दीन सिद्दीकीचं मोठं विधान, म्हणाला- "लोक या गोष्टींना कंटाळतात..."
13
Samsung ला ४४००००००००० रुपयांचा टॅक्स भरण्याचे आदेश; कंपनीने लावला Reliance Jio वर आरोप, प्रकरण काय?
14
Mumbai Fire: मुंबईत कपड्याच्या शोरुममध्ये अग्नितांडव! पाच मजली इमारतीत अडकलेले लहान मुलांसह १९ लोक
15
पाकिस्तान सुधारत नाही! सलग ११ व्या दिवशी युद्धबंदीचे उल्लंघन; भारतीय सैनिकांनी धडा शिकवला
16
Stock Market Today: १६० अंकांच्या तेजीसह शेअर बाजार उघडला, TATA Motors चा शेअर सुस्साट; ऑटो-आयटी क्षेत्रात तेजी
17
Pahalgam Attack Update: जम्मू काश्मिरातील तुरुंगावर दहशतवादी हल्ल्याचा अलर्ट, दहशतवादी आणि ओजीडब्ल्यू आहेत बंद
18
Video: चिनी फॅक्टरीत रोबोट अचानक झाला हिंसक; कर्मचाऱ्यांवर केला जीवघेणा हल्ला, मग...
19
FD द्वारे रक्कम होऊ शकते तिप्पट, अनेकांना माहितही नाही; ₹५ लाख जमा करा, ₹१५ लाखांपेक्षा जास्त मिळतील
20
मिचमिच डोळे, रडारचे कान...! एमजी अ‍ॅस्टरमधून पुण्यात आणि गावखेड्यात भटकंती, कशी वाटली एसयुव्ही...

पाण्यासाठी महिलांचा घेराव; नांदिवलीत संताप

By admin | Updated: March 15, 2016 01:06 IST

डोंबिवलीजवळील नांदिवली टेकडी येथील महिलांनी पाण्यासाठी शिवसेनेचे स्थानिक नेते प्रकाश म्हात्रे यांना घेराव घालून जाब विचारला. त्यातील सर्वाधिक महिला शिवसेनेच्या कार्यकर्त्या होत्या.

कल्याण : डोंबिवलीजवळील नांदिवली टेकडी येथील महिलांनी पाण्यासाठी शिवसेनेचे स्थानिक नेते प्रकाश म्हात्रे यांना घेराव घालून जाब विचारला. त्यातील सर्वाधिक महिला शिवसेनेच्या कार्यकर्त्या होत्या. त्यामुळे कल्याण-डोंबिवली महापालिकेतील सत्ताधारी शिवसेनेला या आंदोलनामुळे एक प्रकारे घरचा आहेर मिळाला आहे. शहरी-ग्रामीण असा दुजाभाव केला जात असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला.अपुऱ्या पाणीसाठ्यामुळे जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर पाणीटंचाई भेडसावत आहे. महापालिका हद्दीतील शहरी व ग्रामीण भागांत पाणीकपात लागू झाली आहे. ग्रामीण भागात बुधवारी मध्यरात्री १२ ते शनिवार पहाटे ६ पर्यंत पाणीपुरवठा बंद ठेवला जात आहे. सलग अडीच दिवस पाणीकपात केली जात आहे. असे असतानाही शनिवारी रात्री ९ ते रविवारी पहाटे ६ पर्यंत असा पाणीपुरवठाही बंद ठेवला जात आहे, असा स्थानिकांचा आरोप आहे. दरम्यान, पाच दिवस पाणी न आल्याने संतप्त झालेल्या महिलांनी म्हात्रे यांच्या सागाव येथील कार्यालयात धडक देत त्यांना घेराव घातला. पाणीटंचाईबाबत जाब विचारताना सलग पाच दिवस पाणी नसल्याने घरात अन्न शिजले नाही. वडापाव, भजीपाव खाऊन आम्ही दिवस काढत आहोत, असे आंदोलनकर्त्या महिलांनी यावेळी म्हात्रे यांना सांगितले.म्हात्रे हे शिवसेनेचे माजी ठाणे जिल्हा परिषद सदस्य आहेत. त्यांची पत्नी प्रेमा म्हात्रे या पी अ‍ॅण्ड टीकॉलनी प्रभागाच्या नगरसेविका आहेत. म्हात्रे यांच्याकडून शहरी-ग्रामीण दुजाभाव केला जात आहे, असा आरोप झाल्याने त्यांच्याच सत्ताधारी शिवसेनेचा केडीएमसी प्रशासनावर वचक नसल्याचे स्पष्ट झाले आहे. यासंदर्भात म्हात्रे यांच्याशी संपर्क साधला असता आठवड्याच्या १६८ तासांपैकी ग्रामीण भागाला केवळ ५० ते ६० तास पाणीपुरवठा केला जात असल्याकडेत्यांनी लक्ष वेधले. शहरी भागाला झुकते माप दिले जात आहे. प्रशासनाची दुजाभावाची भूमिका योग्य नाही. पाण्याचे समान वाटप होणे आवश्यक आहे. नैसर्गिक जलस्रोताच्या उपाययोजना सुचवल्या होत्या, त्याकडे लक्ष देणे आवश्यक आहे, असे त्यांनी सांगितले. कल्याण पूर्वेतही मोर्चा कल्याण पूर्वेतही भीषण पाणीटंचाईच्या निषेधार्थ स्थानिक महिलांनी केडीएमसीच्या ‘ड’ प्रभाग कार्यालयावर मोर्चा काढून तेथील अधिकाऱ्यांना जाब विचारला.दूषित पाणीपुरवठाएकीकडे अभूतपूर्व पाणीटंचाई भेडसावत असताना दुसरीकडे अळ्या आणि किडेमिश्रित पाणीपुरवठा होत आहे. त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. पश्चिमेकडील अन्नपूर्णानगर आणि आधारवाडी परिसरात हा दूषित पुरवठा होतो. पूर्वेतील भागांमध्येही दूषित पाणी येत असल्याच्या नागरिकांच्या तक्रारी आहेत. यासंदर्भात महापालिकेचे पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता तरुण जुनेजा यांच्याशी संपर्क साधला असता संपर्क होऊ शकला नाही.