शहरं
Join us  
Trending Stories
1
Conversion Law: राजस्थानात धर्मांतरण कायदा लागू, राज्यपाल हरीभाऊ बागडे यांची मंजुरी, उल्लंघन केल्यास किती शिक्षा होणार? जाणून घ्या
2
"अजित आगरकरसाठी शेवट खूप विचित्र असेल", रोहित शर्मा वादावर इंग्लंडच्या माजी खेळाडूचं विधान
3
भारत-तालिबान मैत्रीनं पाकिस्तानचं टेन्शन वाढणार; अफगाणिस्तान भारतासाठी इतकं महत्त्वाचं का?
4
मृत सासूला चितेवर ठेवताना शरीरावर दिसल्या जखमा; संशय येताच तपास झाला अन् समोर आलं विदारक सत्य!
5
"WhatsApp वर नोट आणि वरिष्ठांची नाव..."; IAS पत्नीने केले १५ कॉल, लेकीलाही पाठवलं पण...
6
Ratan Tata Death Anniversary: असे होते रतन टाटा... ज्या व्यवसायात हात घातला सोनं केलं, १० पॉईंट्समध्ये पाहा त्यांचा प्रवास
7
शून्य बँक शिल्लक असतानाही होईल UPI पेमेंट? 'भीम ॲप'चं 'हे' खास फीचर जाणून घ्या!
8
भ्रष्टाचारामध्ये महाराष्ट्र आघाडीवर; ७८५ शासकीय कर्मचारी, खासगी व्यक्तींना अटक; देशभरात २,८७५ ठिकाणी कारवाई
9
मुंबई: ठाकरे गटाच्या पेडणेकर, दुधवडकरांसह आठ जणांची उमेदवारी धोक्यात; प्रभाग आरक्षणाचा फटका
10
शुक्रवारी संकष्ट चतुर्थी: गणपतीसह लक्ष्मी देवीचेही करा पूजन, मंत्राचे जप ठरतील उपयुक्त!
11
Cough Syrup Case : विषारी 'कोल्ड्रिफ' कफ सिरप बनवणाऱ्या कंपनीच्या मालकाला अटक! औषध प्यायल्याने २० मुलांचा मृत्यू
12
अंत्यसंस्काराच्या दिवशी कापला केक; चितेवर ठेवण्यापूर्वी वडिलांनी साजरा केला मुलीचा वाढदिवस
13
चातुर्मासाची शेवटची संकष्ट चतुर्थी: गणेश कल्याण करेल, शुभ घडेल; पाहा, व्रत विधी-चंद्रोदय वेळ
14
५ राजयोगात संकष्ट चतुर्थी: १० राशींची इच्छा पूर्ण, मान-सन्मान; यश-कीर्ती-लाभ, शुभ-वरदान काळ!
15
VIRAL : गर्लफ्रेंडच्या हातात हात घालून हॉटेल बाहेर आला; पत्नीने बघताच भर रस्त्यात धुतला! व्हिडीओ व्हायरल
16
मलायकाला झालंय तरी काय? अरबाज खानने लेकीला आणलं घरी, अभिनेत्रीने स्टोरी शेअर करत...
17
India Vs China: भारत जागतिक अर्थव्यवस्थेचा प्रमुख विकास इंजिन, चीनची वाढ संथ; पाहा काय म्हणाल्या IMF प्रमुख
18
वर्षाला २० लाखाचं पॅकेज, ५ महिन्यापूर्वी केले लव्ह मॅरेज; २८ वर्षीय युवकानं स्वत:ला का संपवलं?
19
घरबसल्या महिन्याला ₹९२५० ची कमाई करुन देणारी पोस्टाची स्कीम! पण एक चूक पडेल भारी, बसू शकतो ३० हजारांचा फटका
20
Stock Market Today: शेअर बाजाराची ग्रीन झोनमध्ये सुरुवात, निफ्टी २५ हजारांच्या वर; Cipla, Zomato, Dr Reddy's मध्ये खरेदी

पाणीटंचाईच्या निषेधार्थ महिलांचे ठिय्या आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 11, 2021 00:20 IST

उल्हासनगरवासीय त्रस्त : हंडाभर पाण्यासाठी सुरु आहे वणवण

लोकमत न्यूज नेटवर्कउल्हासनगर : शहर पूर्वेतील दुर्गादेवी पाडा, भावेश कॉलनी, अशोक पाटील कॉलनी, साई प्रसाद कॉलनी, ज्ञानामृत शाळेजवळील परिसरात गेल्या काही दिवसांपासून अनियमित पाणीपुरवठ्यामुळे टंचाई निर्माण झाली आहे. पाण्याच्या एका हंड्यासाठी महिलांना वणवण भटकावे लागत आहे. यामुळे संतप्त झालेल्या महिलांनी मंगळवारी महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाच्या कार्यालयावर धडक देऊन ठिय्या आंदोलन केले.

शहर पूर्वेच्या अनेक भागांत दिवसाआड पाणीपुरवठा होत असून दुर्गापाड्यासह अन्य ठिकाणी पाणीटंचाई निर्माण झाली आहे. स्थानिक महिला व नागरिकांनी पाणीपुरवठा सुरळीत करण्याची मागणी पाणीपुरवठा विभागाकडे करूनही टंचाई कायम होती. अखेर मंगळवारी महिलांनी नेताजी चौकातील पाणीपुरवठा विभागाचे कार्यालय गाठून ठिय्या आंदोलन करून निवेदन सादर केले. पूर्वेतील सुभाष टेकडी परिसरासह अन्य परिसरातील पाणीपुरवठ्यबाबत सभागृह नेते भरत गंगोत्री यांनी महापालिकेत गेल्या शुक्रवारी नागरिक व पालिका अधिकाऱ्यांची बैठक बोलावली होती. मात्र, काही कारणास्तव प्रभाग समिती क्र. ४ च्या कार्यालयात बैठक घेतली. या वेळी नादुरुस्त जलवाहिन्यांची दुरुस्ती करून पाणीपुरवठा सुरळीत करण्याचे आश्वासन संबंधित अधिकाऱ्यांनी दिले होते. अधिकाऱ्यांच्या आश्वासनानंतर दोनच दिवसांनी संतप्त महिलांना पाणीटंचाईच्या निषेधार्थ ठिय्या आंदोलन करावे लागले.शहराला मुबलक पाणीपुरवठा होण्यासाठी केंद्र व राज्य सरकारच्या मदतीने ४०० कोटींची पाणीपुरवठा वितरण योजना राबविली. मात्र, नागरिकांना मुबलक पाणीपुरवठा होण्याऐवजी दिवसाआड पाणीपुरवठा होत असून अनेक विभागांत अनियमित पाणीपुरवठ्यामुळे नागरिकांना टंचाईला तोंड द्यावे लागत आहे. दुर्गापाड्यासह अन्य विभागातील अनेक घरांचा पाणीपुरवठा रस्ता रुंदीकरणाच्या कामामुळे १५ दिवसांपासून अचानक खंडित केला आहे. त्यामुळे या भागातील महिलांनी संताप व्यक्त केला असून, पिण्याच्या हंडाभर पाण्यासाठी त्यांच्यावर वणवण भटकण्याची वेळ आली आहे. 

पाणीपुरवठा होणार पूर्ववत - रहेजा शहरातील दुर्गापाड्यासह अन्य ठिकाणचा पाणीपुरवठा रस्ता रुंदीकरणात जलवाहिन्यांना गळती लागल्याने, खंडित होऊन पाणीटंचाई निर्माण झाली आहे. संबंधित कर्मचाऱ्यांना ताकीद देऊन गळती लागलेल्या जलवाहिन्या दुरुस्त करण्यास सांगितले आहे. लवकरच पाणीपुरवठा सुरळीत होईल, अशी माहिती कार्यकारी अभियंता के. जे. रहेजा यांनी दिली.

टॅग्स :thaneठाणेWaterपाणी