शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
2
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
3
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
4
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
5
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
6
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
7
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
8
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय
9
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
10
व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये स्मृती मानधनाची ऐतिहासिक कामगिरी, मेग लॅनिंगचाही विक्रम मोडला!
11
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
12
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
13
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
14
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण
15
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
16
लंकेत टीम इंडियाचा डंका! आधी स्नेह राणाचा जलवा! मग सृती, हरलीनसह प्रतिकानं लुटली मैफिल
17
BRICS ची महत्वपूर्ण बैठक; परराष्ट्र मंत्री अन् राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची अनुपस्थिती, कारण काय...
18
राणा सांगा वाद! सपा खासदार रामजीलाल सुमन यांच्या ताफ्यावर हल्ला; अनेक वाहनांचे नुकसान...
19
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
20
खळबळजनक! भाजी बनवण्यासाठी मोठा बटाटा घेतला म्हणून पत्नीची कुऱ्हाडीने हत्या

पाणीटंचाईच्या निषेधार्थ महिलांचे ठिय्या आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 11, 2021 00:20 IST

उल्हासनगरवासीय त्रस्त : हंडाभर पाण्यासाठी सुरु आहे वणवण

लोकमत न्यूज नेटवर्कउल्हासनगर : शहर पूर्वेतील दुर्गादेवी पाडा, भावेश कॉलनी, अशोक पाटील कॉलनी, साई प्रसाद कॉलनी, ज्ञानामृत शाळेजवळील परिसरात गेल्या काही दिवसांपासून अनियमित पाणीपुरवठ्यामुळे टंचाई निर्माण झाली आहे. पाण्याच्या एका हंड्यासाठी महिलांना वणवण भटकावे लागत आहे. यामुळे संतप्त झालेल्या महिलांनी मंगळवारी महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाच्या कार्यालयावर धडक देऊन ठिय्या आंदोलन केले.

शहर पूर्वेच्या अनेक भागांत दिवसाआड पाणीपुरवठा होत असून दुर्गापाड्यासह अन्य ठिकाणी पाणीटंचाई निर्माण झाली आहे. स्थानिक महिला व नागरिकांनी पाणीपुरवठा सुरळीत करण्याची मागणी पाणीपुरवठा विभागाकडे करूनही टंचाई कायम होती. अखेर मंगळवारी महिलांनी नेताजी चौकातील पाणीपुरवठा विभागाचे कार्यालय गाठून ठिय्या आंदोलन करून निवेदन सादर केले. पूर्वेतील सुभाष टेकडी परिसरासह अन्य परिसरातील पाणीपुरवठ्यबाबत सभागृह नेते भरत गंगोत्री यांनी महापालिकेत गेल्या शुक्रवारी नागरिक व पालिका अधिकाऱ्यांची बैठक बोलावली होती. मात्र, काही कारणास्तव प्रभाग समिती क्र. ४ च्या कार्यालयात बैठक घेतली. या वेळी नादुरुस्त जलवाहिन्यांची दुरुस्ती करून पाणीपुरवठा सुरळीत करण्याचे आश्वासन संबंधित अधिकाऱ्यांनी दिले होते. अधिकाऱ्यांच्या आश्वासनानंतर दोनच दिवसांनी संतप्त महिलांना पाणीटंचाईच्या निषेधार्थ ठिय्या आंदोलन करावे लागले.शहराला मुबलक पाणीपुरवठा होण्यासाठी केंद्र व राज्य सरकारच्या मदतीने ४०० कोटींची पाणीपुरवठा वितरण योजना राबविली. मात्र, नागरिकांना मुबलक पाणीपुरवठा होण्याऐवजी दिवसाआड पाणीपुरवठा होत असून अनेक विभागांत अनियमित पाणीपुरवठ्यामुळे नागरिकांना टंचाईला तोंड द्यावे लागत आहे. दुर्गापाड्यासह अन्य विभागातील अनेक घरांचा पाणीपुरवठा रस्ता रुंदीकरणाच्या कामामुळे १५ दिवसांपासून अचानक खंडित केला आहे. त्यामुळे या भागातील महिलांनी संताप व्यक्त केला असून, पिण्याच्या हंडाभर पाण्यासाठी त्यांच्यावर वणवण भटकण्याची वेळ आली आहे. 

पाणीपुरवठा होणार पूर्ववत - रहेजा शहरातील दुर्गापाड्यासह अन्य ठिकाणचा पाणीपुरवठा रस्ता रुंदीकरणात जलवाहिन्यांना गळती लागल्याने, खंडित होऊन पाणीटंचाई निर्माण झाली आहे. संबंधित कर्मचाऱ्यांना ताकीद देऊन गळती लागलेल्या जलवाहिन्या दुरुस्त करण्यास सांगितले आहे. लवकरच पाणीपुरवठा सुरळीत होईल, अशी माहिती कार्यकारी अभियंता के. जे. रहेजा यांनी दिली.

टॅग्स :thaneठाणेWaterपाणी